शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

‘भूमाते’ला तडा?

By admin | Updated: February 10, 2016 04:28 IST

अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विरोधी अभियान जर त्याला अपवाद ठरु शकले नाही तर मग त्यापुढे भूमाता ब्रिगेडची काय कथा? तसाही महाराष्ट्राचा या बाबतीतला लौकीक थोरच आहे.

अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विरोधी अभियान जर त्याला अपवाद ठरु शकले नाही तर मग त्यापुढे भूमाता ब्रिगेडची काय कथा? तसाही महाराष्ट्राचा या बाबतीतला लौकीक थोरच आहे. विविध कारणांसाठी संघटना उभारायच्या आणि उभारलेल्या संघटनांमध्ये मतभेद निर्माण होऊन एक तर त्या निर्जीव बनायच्या किंवा त्यांच्या चिरफळ्या उडायच्या. भूमाता ब्रिगेड ही संघटनाही याच वळणावर गेल्याचे दिसून येते. मुळात अशी काही संघटना आहे याचा राज्याला तेव्हांच तपास लागला जेव्हां तिने शनिशिंगणापूर येथील शनीच्या चौथऱ्यावर महिलाना असलेल्या बंदीच्या विरोधात उठाव करण्याचा निर्णय घेतला. प्रजासत्ताकदिनाचा मुहूर्त पाहून संघटनेने आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह चौथऱ्यावर जाण्याचा निर्धार केला खरा पण पोलिसांनी तो हाणून पाडला. त्यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्याना मध्यस्थी करण्याचे आवाहन केले. या संपूर्ण काळात संघटनेच्या अध्यक्ष तृप्ती देसाई हाच संघटनेचा एकमेव चेहरा लोकांसमोर म्हणजेच माध्यमांसमोर येत राहिला. कदाचित त्यातून निर्माण झालेल्या असूयेमधूनच संघटनेच्या उपाध्यक्षासह तीन महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असावा. त्यांनी याबाबत आपले मन खुले केले नसले तरी संघटनेच्या कामकाजाबाबत तात्त्विक मतभेद निर्माण झाल्याचे मोघम कारण त्यांनी पुढे केले आहे. संघटनेला दुसरा कोणताही कर्तबगार चेहरा नको होता असा मोघम आरोप करणाऱ्या एका पदाधिकाऱ्याने आता आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांसारख्या महत्वाच्या समस्येवर लक्ष केन्द्रीत करणार असल्याचे म्हटले आहे. वस्तुत: मुळातच भूमाता ब्रिगेडने हाती घेतलेला लढा तसा सोपा नाही. पुरुषी समाजाचा त्यांच्या लढ्याला कधीच पाठिंबा नव्हता आणि तो मिळेल याची शक्यताही कमीच असताना काही महिलादेखील परंपरांचे पालन करण्याच्या मताच्या आहेत. अशा स्थितीत विशिष्ट मागणी घेऊन उभ्या राहिलेल्या लढाऊ संघटनेत मतभेद निर्माण होणे सरकारच्या दृष्टीने नेहमीच सोयीचे असते.