शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

‘भूमाते’ला तडा?

By admin | Updated: February 10, 2016 04:28 IST

अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विरोधी अभियान जर त्याला अपवाद ठरु शकले नाही तर मग त्यापुढे भूमाता ब्रिगेडची काय कथा? तसाही महाराष्ट्राचा या बाबतीतला लौकीक थोरच आहे.

अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विरोधी अभियान जर त्याला अपवाद ठरु शकले नाही तर मग त्यापुढे भूमाता ब्रिगेडची काय कथा? तसाही महाराष्ट्राचा या बाबतीतला लौकीक थोरच आहे. विविध कारणांसाठी संघटना उभारायच्या आणि उभारलेल्या संघटनांमध्ये मतभेद निर्माण होऊन एक तर त्या निर्जीव बनायच्या किंवा त्यांच्या चिरफळ्या उडायच्या. भूमाता ब्रिगेड ही संघटनाही याच वळणावर गेल्याचे दिसून येते. मुळात अशी काही संघटना आहे याचा राज्याला तेव्हांच तपास लागला जेव्हां तिने शनिशिंगणापूर येथील शनीच्या चौथऱ्यावर महिलाना असलेल्या बंदीच्या विरोधात उठाव करण्याचा निर्णय घेतला. प्रजासत्ताकदिनाचा मुहूर्त पाहून संघटनेने आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह चौथऱ्यावर जाण्याचा निर्धार केला खरा पण पोलिसांनी तो हाणून पाडला. त्यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्याना मध्यस्थी करण्याचे आवाहन केले. या संपूर्ण काळात संघटनेच्या अध्यक्ष तृप्ती देसाई हाच संघटनेचा एकमेव चेहरा लोकांसमोर म्हणजेच माध्यमांसमोर येत राहिला. कदाचित त्यातून निर्माण झालेल्या असूयेमधूनच संघटनेच्या उपाध्यक्षासह तीन महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असावा. त्यांनी याबाबत आपले मन खुले केले नसले तरी संघटनेच्या कामकाजाबाबत तात्त्विक मतभेद निर्माण झाल्याचे मोघम कारण त्यांनी पुढे केले आहे. संघटनेला दुसरा कोणताही कर्तबगार चेहरा नको होता असा मोघम आरोप करणाऱ्या एका पदाधिकाऱ्याने आता आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांसारख्या महत्वाच्या समस्येवर लक्ष केन्द्रीत करणार असल्याचे म्हटले आहे. वस्तुत: मुळातच भूमाता ब्रिगेडने हाती घेतलेला लढा तसा सोपा नाही. पुरुषी समाजाचा त्यांच्या लढ्याला कधीच पाठिंबा नव्हता आणि तो मिळेल याची शक्यताही कमीच असताना काही महिलादेखील परंपरांचे पालन करण्याच्या मताच्या आहेत. अशा स्थितीत विशिष्ट मागणी घेऊन उभ्या राहिलेल्या लढाऊ संघटनेत मतभेद निर्माण होणे सरकारच्या दृष्टीने नेहमीच सोयीचे असते.