शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये भोपाळचीच पुनरावृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 21:45 IST

सुमारे ३४ वर्षांपूर्वी म्हणजेच २, ३ डिसेंबर १९८४ रोजी मध्य प्रदेश येथील भोपाळमध्ये वायु गळती झाली होती.

- विनायक पात्रुडकर

सुमारे ३४ वर्षांपूर्वी म्हणजेच २, ३ डिसेंबर १९८४ रोजी मध्य प्रदेश येथील भोपाळमध्ये वायु गळती झाली होती. या वायुगळतीत हजारोंचा बळी गेला. हजारोंना कायमचे व्यंगत्त्व दिले. ही घटना भारताला नव्हे, तर संपूर्ण जगाला हादरा देणारी होती. आजही या घटनेच्या जखमा कायम आहेत. या घटनेची आठवण व्हावी, अशीच एक घटना गेल्या आठवड्यात रायगड येथे घडली.

येथील रासायनिक कंपनीत वायु गळती झाली. या वायुगळतीने प्राणी व पक्षांचे बळी घेतले. या कंपनीतील निदर्यी अधिकाऱ्यांनी मृत प्राणी व पक्षांचे मृतदेह पुरून पुरावे नष्ट केले. ही बाब नक्कीच निंदनीय आहे. येथील जागरुक गावकऱ्यांनी ही घटना उजेडात आणली. याची दखल घेत लोकमतने या घटनेला सर्वप्रथम प्रसिद्धी दिली. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. कारवाई सुरू झाली. लोकमतमुळे इतर माध्यमांनाही या वृत्ताची दखल घ्यावी लागली. कारवाईचा वेग प्रचंड असल्याने प्राणी व पक्षांचे मृतदेह पुरणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला. पुढे दोषींवर खटला चालून त्यांना शिक्षा होईल. ही शिक्षा तुरळक असेल, कारण वायुगळतीने प्राणी व पक्षांचा बळी जाणे, अशा घटनेला गंभीर शिक्षा देणारे कलम नाही. या घटनेत काही कामगारांनाही बाधा झाली. ही बाधा किरकोळ आहे.

त्याआधारावरही अधिकाधिक शिक्षेची मागणी करता येणार नाही. त्यातूनही विरळातील विरळ घटना म्हणून आरोपींना गंभीर शिक्षा द्यावी, अशी मागणी करता येणे शक्य आहे. कारण प्राणी व पक्षी हे अधिक संवेदनशील असतात. वायुगळतीचा परिणाम सर्वप्रथम त्यांच्यावर होतो. हा परिणाम जाणवल्यानेच प्राणी व पक्ष्यांचा बळी गेला. तेथील अधिकाऱ्यांना या घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पुरावे नष्ट करण्याचे काम केले. 

ही वायुगळती अजून काही वेळ सुरू राहिली असती तर बळी जाणाऱ्यांची संख्या मोठी असती. त्याचा आधार घेत गंभीर शिक्षेची मागणी करता येईल. हा कायदेशीर भाग असला तरी महाराष्ट्रातील भोपाळ अशा नावाने ही घटना ओळखली गेली असती. याचे परिणाम अनेक वर्षे येथील भूमीला व नागरिकांना भोगावे लागले असते. तेव्हा या घटनेकडे भविष्यातील गंभीर धोका, या दृष्टीनेच प्रशासनासह सर्वांनाची बघायला हवे. आज अनेक रासायनिक प्रकल्प महाराष्ट्रात ठिकठिकाणी सुरू आहेत. त्याने नद्या दुषित होत आहेत. वायुचे प्रदुषण होत आहे. पर्यावरणाची हानी होत आहे. मात्र, आपल्या दफ्तरी कारभाराला समाधी लागली आहे. जनता काही प्रमाणात जागरुक असल्याने डाऊ सारखे प्रकल्प प्रस्तावित असतानाच हद्दपार झाले. तरीही अनेक रासायनिक प्रकल्प हे जीवघेणे असतानाही सुरू आहेत. अशा प्रकल्पांना निर्बंध घालणे आवश्यक आहे. किमान या घटनेनंतर तरी या दृष्टीने विचार करायला हवा. तरच भविष्यातील अशा घटनांना आळा बसेल. 

टॅग्स :MonkeyमाकडRaigadरायगड