शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
2
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
3
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
4
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
5
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
6
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
7
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
8
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
9
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
10
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
11
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
12
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
13
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
14
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
15
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
16
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
17
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
18
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
19
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
20
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...

रायगडमध्ये भोपाळचीच पुनरावृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 21:45 IST

सुमारे ३४ वर्षांपूर्वी म्हणजेच २, ३ डिसेंबर १९८४ रोजी मध्य प्रदेश येथील भोपाळमध्ये वायु गळती झाली होती.

- विनायक पात्रुडकर

सुमारे ३४ वर्षांपूर्वी म्हणजेच २, ३ डिसेंबर १९८४ रोजी मध्य प्रदेश येथील भोपाळमध्ये वायु गळती झाली होती. या वायुगळतीत हजारोंचा बळी गेला. हजारोंना कायमचे व्यंगत्त्व दिले. ही घटना भारताला नव्हे, तर संपूर्ण जगाला हादरा देणारी होती. आजही या घटनेच्या जखमा कायम आहेत. या घटनेची आठवण व्हावी, अशीच एक घटना गेल्या आठवड्यात रायगड येथे घडली.

येथील रासायनिक कंपनीत वायु गळती झाली. या वायुगळतीने प्राणी व पक्षांचे बळी घेतले. या कंपनीतील निदर्यी अधिकाऱ्यांनी मृत प्राणी व पक्षांचे मृतदेह पुरून पुरावे नष्ट केले. ही बाब नक्कीच निंदनीय आहे. येथील जागरुक गावकऱ्यांनी ही घटना उजेडात आणली. याची दखल घेत लोकमतने या घटनेला सर्वप्रथम प्रसिद्धी दिली. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. कारवाई सुरू झाली. लोकमतमुळे इतर माध्यमांनाही या वृत्ताची दखल घ्यावी लागली. कारवाईचा वेग प्रचंड असल्याने प्राणी व पक्षांचे मृतदेह पुरणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला. पुढे दोषींवर खटला चालून त्यांना शिक्षा होईल. ही शिक्षा तुरळक असेल, कारण वायुगळतीने प्राणी व पक्षांचा बळी जाणे, अशा घटनेला गंभीर शिक्षा देणारे कलम नाही. या घटनेत काही कामगारांनाही बाधा झाली. ही बाधा किरकोळ आहे.

त्याआधारावरही अधिकाधिक शिक्षेची मागणी करता येणार नाही. त्यातूनही विरळातील विरळ घटना म्हणून आरोपींना गंभीर शिक्षा द्यावी, अशी मागणी करता येणे शक्य आहे. कारण प्राणी व पक्षी हे अधिक संवेदनशील असतात. वायुगळतीचा परिणाम सर्वप्रथम त्यांच्यावर होतो. हा परिणाम जाणवल्यानेच प्राणी व पक्ष्यांचा बळी गेला. तेथील अधिकाऱ्यांना या घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पुरावे नष्ट करण्याचे काम केले. 

ही वायुगळती अजून काही वेळ सुरू राहिली असती तर बळी जाणाऱ्यांची संख्या मोठी असती. त्याचा आधार घेत गंभीर शिक्षेची मागणी करता येईल. हा कायदेशीर भाग असला तरी महाराष्ट्रातील भोपाळ अशा नावाने ही घटना ओळखली गेली असती. याचे परिणाम अनेक वर्षे येथील भूमीला व नागरिकांना भोगावे लागले असते. तेव्हा या घटनेकडे भविष्यातील गंभीर धोका, या दृष्टीनेच प्रशासनासह सर्वांनाची बघायला हवे. आज अनेक रासायनिक प्रकल्प महाराष्ट्रात ठिकठिकाणी सुरू आहेत. त्याने नद्या दुषित होत आहेत. वायुचे प्रदुषण होत आहे. पर्यावरणाची हानी होत आहे. मात्र, आपल्या दफ्तरी कारभाराला समाधी लागली आहे. जनता काही प्रमाणात जागरुक असल्याने डाऊ सारखे प्रकल्प प्रस्तावित असतानाच हद्दपार झाले. तरीही अनेक रासायनिक प्रकल्प हे जीवघेणे असतानाही सुरू आहेत. अशा प्रकल्पांना निर्बंध घालणे आवश्यक आहे. किमान या घटनेनंतर तरी या दृष्टीने विचार करायला हवा. तरच भविष्यातील अशा घटनांना आळा बसेल. 

टॅग्स :MonkeyमाकडRaigadरायगड