शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

सरकारी आशीर्वादाने माणसे मारणारी किती गोडाउन्स अशीच चालू राहतील..?

By अतुल कुलकर्णी | Updated: May 3, 2023 05:58 IST

भिवंडीत नियम धाब्यावर बसवून अनेक गोडाउन्स उभी आहेत. या गोडाउन्समध्ये कोंडून माणसे मरत असताना सरकारने डोळ्यांवर पट्टी बांधली आहे का?

अतुल कुलकर्णी, संपादक, लोकमत, मुंबई

भिवंडीत एक इमारत कोसळून नऊ लोक ठार झाले. या इमारतीचा पहिला मजला संबंधित बिल्डरने एमआरके फूड्स नावाच्या कंपनीला भाड्याने दिला होता. त्या कंपनीने त्या मजल्यावर दहा टन सामान भरून ठेवले होते. माणसांच्या वास्तव्यासाठीची जागा गोडाउनसाठी वापरली गेली किंवा  गोडाउनसाठी असलेली जागा माणसांना राहायला दिली, असा याचा अर्थ! 

माल ठेवण्यासाठी बांधलेल्या गोडाउन्समध्ये माणसे राहतात, हे अख्ख्या जगात फक्त भिवंडीत होत असावे. भिवंडीमध्ये  सगळे नियम धाब्यावर बसवून वाटेल त्या आकाराची, वाटेल तशी गोडाउन्स उभी राहिली आहेत. त्यांना राजकारण्यांचा आशीर्वाद आहे. काही गोडाउन्स तर राजकारण्यांचीच आहेत. त्यात काम करण्यासाठी मनुष्यबळ लागते. उत्तर प्रदेश, बिहारमधून लोंढेच्या लोंढे भिवंडीत येतात. मिळेल त्या जागेत राहतात. माल भरलेला असतो, तिथेच हे लोक स्वयंपाक करतात, तिथेच जेवतात आणि झोपतात. या लोंढ्यांमधून  राजकारण्यांनी आपापले मतदारसंघ विकसित केले आहेत. त्यातून महिन्याला कोट्यवधी रुपयांचे भाडे मिळते, शिवाय मतांची बेगमी होते. पैसा आणि पॉवर यामुळे या भागात कुठलाही अधिकारी कारवाई करायची हिंमतच दाखवत नाही. जो अधिकारी कारवाई करायची भूमिका घेतो, त्याच्या विरुद्ध सहाव्या मजल्यापर्यंत तक्रारी सुरू होतात. मग वेगळ्या मार्गाने त्या अधिकाऱ्यांना गप्प केले जाते. 

सतत या भागात दुर्घटना घडतात, त्याची फारशी चर्चादेखील होत नाही. किरकोळ बातम्या येतात, मृतांच्या नातेवाइकांना मुख्यमंत्री निधीतून पाच लाख रुपयांचा धनादेश दिला जातो. काही काळ लोक हळहळतात आणि पुन्हा आपल्या कामाला लागतात. बेकायदेशीर गोडाउन्स आणि इमारती पडून झालेल्या दुर्घटनेत ज्यांचे जीव जातात, त्यांच्यासाठी सरकार लाखो रुपये मोजते. पुण्यात बेकायदेशीर होर्डिंग पडले. त्याच्याखाली दबून काही लोक मरण पावले. त्यासाठी सरकारने मृतांच्या नातेवाइकांना काही लाखांची मदत केली. खरे तर सरकारी खजिना रिकामा न करता मरणारा माणूस जिवंत राहिला असता तर त्याने आयुष्यात किती पैसे कमावले असते, त्याच्यावर अवलंबून असणारे लोक किती आहेत, याचा हिशेब करून दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्याकडून पैसे वसूल करून मृताच्या नातेवाइकाला दिले पाहिजेत. हे कायद्याने केले पाहिजे. मात्र हे करण्याची हिंमत कोणीही दाखवत नाही. कारण प्रत्येक पातळीवर सगळ्यांचे मूल्य ठरलेले आहे.

कोणतेही सरकारी काम बिनापैशाचे होत नाही, ही मानसिकता वाढीला लागली आहे. हल्ली तर दुर्घटना घडल्यावर  चौकशीची मागणीदेखील कोणी करत नाही. केलीच तर तोंडदेखली चौकशी करून विषय गुंडाळला जातो.  विषयाच्या मुळाशी गेले तर सगळ्यांचेच पितळ उघडे पडते, हे माहिती असल्यामुळे अशा दुर्घटना थांबवण्यासाठी कोणालाच पुढाकार घ्यावासा वाटत नाही. याचा अर्थ या गोष्टी थांबवता येणारच नाहीत असे नाही. कोणतीही इमारत उभी राहिली तर तिला विजेची जोडणी आणि ऑक्युपेशन सर्टिफिकेट देण्याची जबाबदारी सरकारची असते. ज्या जागा राहण्यायोग्यच नाहीत, नियमबाह्य आहेत; अशा जागांना संबंधित पालिका ऑक्युपेशन सर्टिफिकेट देतातच कशा..? वीज, पाणी आणि ऑक्युपेशन सर्टिफिकेट या तीन गोष्टींची कठोर अंमलबजावणी करायची ठरवली तर भिवंडीच काय अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही बेकायदेशीर काम उभे राहणार नाही. पण मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची..? अधिकाऱ्यांना चांगले पोस्टिंग हवे असते, म्हणून ते लोकप्रतिनिधींना फारसे खेटायच्या मन:स्थितीत नसतात. मतदारसंघ सांभाळायचे म्हणून लोकप्रतिनिधी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. 

भिवंडीत गोडाउन्सची संख्या पन्नास हजार ते लाखाच्या घरात असेल. सरकारने हिंमत दाखवून यातील नियमानुसार किती, सरकारी जागेवर किती, परवानगी नसतानाही किती गोडाउन्समध्ये बेकायदेशीररीत्या लोक राहतात, या धंद्यात किती कोटींचा व्यवहार होतो, त्यात सरकारचा कर बुडतो का, या प्रश्नांवर  श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. त्यातून  ‘न भूतो न भविष्यती’ अशी माहिती समोर येईल. मुंबईच्या जवळ किती मोठी अर्थव्यवस्था कशी उदयाला आली आहे, हे लक्षात येईल. सरकार ही हिंमत दाखवेल का, की सरकारी आशीर्वादाने माणसे मारणारी किती गोडाउन्स अशीच चालू राहतील..?

atul.kulkarni@lokmat.com

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटना