शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

आघाडीचा आरंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:51 IST

मायावतींचा बहुजन समाज पक्ष आणि मुलायमसिंगांचा समाजवादी पक्ष यांनी एकत्र येण्याचा व उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या गोरखपूर आणि फुलपूर या लोकसभेच्या पोटनिवडणुका संयुक्तपणे लढण्याचा घेतलेला निर्णय देशातील भाजपेतर सर्व पक्षांना मार्गदर्शक ठरावा असा आहे. या पोटनिवडणुकांमध्ये या आघाडीला यश मिळेलच असे नाही.

मायावतींचा बहुजन समाज पक्ष आणि मुलायमसिंगांचा समाजवादी पक्ष यांनी एकत्र येण्याचा व उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या गोरखपूर आणि फुलपूर या लोकसभेच्या पोटनिवडणुका संयुक्तपणे लढण्याचा घेतलेला निर्णय देशातील भाजपेतर सर्व पक्षांना मार्गदर्शक ठरावा असा आहे. या पोटनिवडणुकांमध्ये या आघाडीला यश मिळेलच असे नाही. मात्र अशा यशासाठी एकत्र येण्याची गरज या पक्षांच्या लक्षात यावी ही बाब महत्त्वाची आहे. गोरखपूरचा मतदारसंघ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा तर फुलपूरचा मतदारसंघ त्या राज्याचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा आहे. स्वाभाविकच भाजपसाठीही या पोटनिवडणुका प्रतिष्ठेच्या आहे. भाजपची प्रतिष्ठा आणि बसपा व सपा यांची जिद्द यात ही लढत होईल. या दोन पक्षांना काँग्रेसचे सहकार्यही मिळेल असे त्यांना वाटते. याआधी उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सपा आणि काँग्रेस यांच्यात युती झाली होती. २०१४ ची लोकसभेची निवडणूकही त्या दोन पक्षांनी एकत्र येऊन लढविली होती. आताचा बसपाचा यातील प्रवेश महत्त्वाचा व वजनदार आहे. काही काळापूर्वी मुंबईत भाषण करताना शरद पवार यांनी देशातील सर्व भाजपेतर पक्षांनी एकत्र येण्याची व काँग्रेसला सहकार्य करण्याची भाषा वापरली होती. भाजपची राजकीय घोडदौड लक्षात घेता देशातील अन्य पक्षांना एकत्र येणे आवश्यक वाटले तर तो पक्षीय राजकारणाचा एक अपरिहार्य असा भाग आहे. देशातील २१ राज्यात भाजपाची तर चार राज्यात काँग्रेसची सरकारे आहेत. एकेकाळी केंद्रासह साºया देशातच काँग्रेसचे एकछत्री राज्य होते. त्याचा संकोच होत जाऊन त्यामुळे रिक्त होत गेलेली सत्तेची महत्त्वाची पदे भाजपच्या ताब्यात आता गेली आहेत. भाजपला काँग्रेससह देशातील बहुसंख्य पक्षांचा विरोध आहे. तो असण्याचे प्रमुख कारण भाजपचे धर्मग्रस्त राजकारण हे आहे. देशाच्या राज्यघटनेने व त्यातील बहुसंख्य पक्षांनी धर्मनिरपेक्षतेचे धोरण राजकारण म्हणून व निष्ठा म्हणूनही स्वीकारले आहे. हा देश बहुधर्मी, बहुभाषी व संस्कृतीबहुल आहे. अशा देशाची एकात्मता टिकायची असेल आणि त्यातील जनतेत राष्ट्रीयत्वाची भावना उभी राहायची असेल तर त्याच्या राजकारणाला जात, धर्म व भाषेसारख्या संकुचित श्रद्धांच्या वर उठून राष्टÑीयत्वाची निष्ठा अंगिकारणे आवश्यक आहे. दुर्दैवाने देशाचे राजकारण सध्या या संकुचित वृत्तींवर उभे झालेलेच आपण पाहात आहोत. त्यामुळे देशातील बहुसंख्य लोकांच्या धर्माचे राजकारण करून सत्तेच्या खुर्च्या जिंकणे भाजपला व त्याच्या पाठीशी असलेल्या संघ परिवाराला शक्य झाले आहे. धर्मग्रस्त राजकारणाला उत्तर द्यायचे तर ते धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र येऊन व समाजात राष्ट्रीयतेची भावना उभी करूनच देता येणे शक्य आहे. शरद पवारांना काँग्रेसशी जुळवून घेण्याची वाटलेली गरज आणि अखिलेश यादव व मायावतींनी एकत्र येऊन भाजपविरुद्ध निवडणूक लढविण्याची केलेली घोषणा याच गरजेची निदर्शक आहे. उत्तर प्रदेशात होणाºया राज्यसभेच्या निवडणुकांमध्येही मायावतींचा पक्ष समाजवादी पक्षाला पाठिंबा देणार आहे व ही बाब त्या दोन पक्षात होऊ घातलेली आघाडी तात्कालिक नसून दीर्घकालीन राहणारी असल्याचे सांगणारी आहे. आघाडीचे हे राजकारण राष्ट्रव्यापी झाले तर त्यात अनेक प्रादेशिक पक्ष सहभागी होतील यात शंका नाही. डाव्या आघाडीचे एक लोकाभिमुख नेते व डाव्या कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी काँग्रेसशी सहकार्य करण्याच्या मताचे आहेत. प्रकाश करातांचा अडेलतट्टूपणा त्यांना दूर सारता आला तर डावी आघाडीही होऊ घातलेल्या युतीत सहभागी होऊ शकेल. लालू प्रसादांचा राष्ट्रीय जनता दल, करुणानिधींचा द्रमुक, फारुख अब्दुल्लांचा नॅशनल काँग्रेस यासारखे पक्ष त्यात सहजगत्या सामील होतील. शिवाय अनेक राज्यात लहान-मोठ्या प्रमाणात राजकारण करणारे व काही जागा पदरात पाडून घेऊ शकणारे इतरही प्रादेशिक पक्ष अशा आघाडीत येतील. ही आघाडी अस्तित्वात यावी ही देशातील लोकशाहीवर प्रेम करणाºया अनेकांची इच्छाही आहे. एकाच पक्षाची सर्वंकष सत्ता लोकशाहीच्या हिताची नाही ही बाब ज्यांना कळते त्या साºयांना अशा एकजुटीचे महत्त्वही कळणारे आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीPoliticsराजकारण