शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

वचक असायला हवा

By admin | Updated: March 26, 2016 03:27 IST

एखाद्या व्याधीने गंभीर रूप धारण केल्यावर जागे होण्यापेक्षा त्याची लक्षणे दिसू लागल्यावरच जर योग्य उपचार केले तर दुर्घटना टळू शकतात. पण आपल्याकडे तसे होत नाही.

एखाद्या व्याधीने गंभीर रूप धारण केल्यावर जागे होण्यापेक्षा त्याची लक्षणे दिसू लागल्यावरच जर योग्य उपचार केले तर दुर्घटना टळू शकतात. पण आपल्याकडे तसे होत नाही. झालेच तर त्यासाठी कोणीतरी त्रयस्थ व्यक्तीकडून कान टोचण्याचे निमित्त तरी लागते. रस्ता अपघाताच्या बाबतीतही उपरोक्त उदाहरण तंतोतंत लागू होते. सध्याच्या काळात प्रत्येक नागरिकाला सतावणाऱ्या ज्या काही गंभीर समस्या आहेत, त्यात अपघातांचे वाढते प्रमाण याचाही अंतर्भाव होतोच. पूर्वी असा समज होता की, अपघात हे केवळ नशापान केल्यामुळेच होतात. परंतु हल्ली तसे राहिलेले नाही. बऱ्याचदा या कारणाने अपघात होतातही पण सर्वच ठिकाणी ते कारण लागू होत नाही. वाहन चालविताना अतिघाई, निष्काळजीपणा, बेफिकीर वृत्ती ही कारणे जशी जबाबदार आहेत तसाच भान हरवून बसलेल्या तरुणाईचा धिंगाणा आणि वाहनांच्या साहाय्याने भररस्त्यावर केली जाणारी मस्तीही तेवढीच कारणीभूत असते. काही मुले जन्मदात्याच्या पैशावर मौजमस्ती करण्यासाठी बाजारातील अत्याधुनिक मोटारसायकली खरेदी करतात आणि महाविद्यालयाचा परिसर असो की शहरातील मुख्य रस्ते असो त्याठिकाणी त्यांच्या नानाविध कसरती धूम स्टाईलने सुरूच असतात. त्यावेळी अल्पवयामुळे वाहन चालविण्याचा परवाना आपल्या खिशात नसतानाचे ठाऊक असतानाही ते भररस्त्यावर सुसाट वेगाने धावतात, कोणाच्या तरी अंगावर जाऊन धडकतात; पण त्याचे सोयरसूतक त्यांनाही नसते आणि त्यांच्यावर अंकुश ठेवणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसांनाही नसते. कालपरवा अंबाझरी पोलिसांच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलाच्या हातून अपघात घडला, तेव्हा शासनाने तीन मुद्द्यांवर पंधरा दिवसाच्या आत अहवाल देण्याचे निर्देश न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला द्यावे लागले. ‘५० सीसी’च्या गाड्या चालवायला हव्या व त्यांच्या परवान्यावर तशी नोंद करायला हवी. आतापर्यंत झालेल्या अपघातांसाठी कोणत्या बाबी कारणीभूत आहेत आणि मुलामुलींच्या दृष्टीने सोयीच्या ठरतील अशा पद्धतीने शाळा, महाविद्यालये व शिकवणी वर्गाच्या वेळा ठरविता येऊ शकतात काय, असे हे तीन मुद्दे आहेत. याचा अर्थ राज्यात जे अपघात होत आहेत व दिवसेंदिवस त्यांच्या प्रमाणात वाढ होत असतानाही त्यावर अंकुश ठेवण्याकामी शासनाची वाहतूक नियंत्रण यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचाही अर्थ यातून स्पष्ट होतो. आता तरी ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दिशाहीन झालेल्या गलबताला किनाऱ्यावर सहीसलामत पोहोचण्यासाठी जशी होकायंत्राची गरज भासते, तशीच भूमिका कठोरपणे का होईना न्यायव्यवस्थेला बजवावी लागत आहे. कोणत्या का मार्गाने होईना रस्ते अपघातमुक्त होण्यासाठी किंवा समाजहिंताच्या अन्य बाबींसाठी न्यायसंस्थेचा असा वचक असायलाच हवा.