शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
2
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
3
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
4
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
5
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
6
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
7
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
8
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
9
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
10
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
11
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
12
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
13
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
14
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
15
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
16
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
17
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
18
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
19
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
20
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
Daily Top 2Weekly Top 5

भरमसाट वीजबिलाबाबत दक्ष राहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 04:05 IST

महाराष्ट्रामध्ये मुंबईसह उर्वरित राज्यांतील वीज ग्राहकांची संख्या सुमारे २ कोटी ८० लाख आहे.

- अशोक पेंडसेमहाराष्ट्रामध्ये मुंबईसह उर्वरित राज्यांतील वीज ग्राहकांची संख्या सुमारे २ कोटी ८० लाख आहे. यातील घरगुती वीज ग्राहकांची संख्या २ कोटींपेक्षा जास्त आहे. घरगुती वीज ग्राहकांची ‘आमचे बिल भरमसाट आले’, अशी मोठ्या प्रमाणावर तक्रार असते. वीजबिल म्हणजे वापरलेली वीज युनिट गुणिले वीज दर हा सामान्य गुणाकार आहे. मुंबईत अदानी, टाटा, बेस्ट तर उर्वरित महाराष्ट्रात महावितरण वीज वितरण करते. घरगुती वीज ग्राहकांचे या चार वीज कंपन्यांचे वीजदर खालीलप्रमाणे आहेत.वीज वापर अदानी टाटा महावितरण बेस्ट ०-१०० ४.५० ४.३३ ४.३० २.९१ १०१-३०० ७.६५ ७.५१ ८.०३ ५.१६ ३०१-५०० ९.२९ ११.४९ ११.०५ ७.९६ ५०१ वर ११.२४ १४.१० ११.८० ९.४५ हा तक्ता पाहिला असता असे लक्षात येईल की अदानी, टाटा आणि महावितरण यातील ० ते ३०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांचे वीजदर जवळजवळ समानच आहेत. बेस्टचे वीजदर कमी आहेत. त्याचे कारण की बेस्टमध्ये झालेला वाहतूक विभागाचा तोटा वीज दरवाढ करून भरून काढण्यात आला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने हा तोटा वीजदर वाढवून भरून काढण्यास मज्जाव केला. यामुळे आधीच्या वर्षातील वसूल केलेला तोटा हा सध्या परत दिला जात आहे. त्यामुळे बेस्टचा दर हा सध्या कमी आहे. सुमारे वर्षभरात हा दरसुद्धा इतरांच्या पातळीवर येईल.हे वीजदर बघितल्यानंतर एक लक्षात येईल की वीजदर टप्पा पद्धतीने वाढतो. समजा एखाद्या ग्राहकाने जर शंभर युनिट वीज वापरली तर महावितरणमध्ये त्याचे बिल ४३0 रुपये येईल. परंतु त्याने १३० युनिट वीज वापरली तर तेच बिल ४३0 अधिक २४0 म्हणजे ६७0 रुपये येईल. म्हणजेच थोडी अधिकच वीज वापरली तरी आपले बिल दीडपट का झाले, हे ग्राहकाला झटकन समजत नाही. त्याचे उत्तर हे टप्पा पद्धतीत आहे. म्हणजे शंभर युनिटपर्यंत चार रुपये असलेला दर शंभर युनिट ओलांडल्यानंतर दुप्पट म्हणजेच आठ रुपये होतो. दरवर्षी किंवा एक वर्षाआड साधारणत: वीज दरवाढ होत असते. या नव्या दरासंबंधी बातम्या पेपरमध्ये येतच असतात. त्यामुळे ग्राहकांना त्याची माहिती असते.वीजदर पाहिल्यानंतर पुढचा भाग ग्राहकाचा वीजवापर. दर महिन्याला येत असलेल्या बिलावर गेल्या बारा महिन्यांचा वीजवापर छापलेला असतो. वीजवापर हा उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या ऋतूप्रमाणे वरखाली होत असतो. एक उदाहरणच बघूया. आपला वीजवापर बारा महिन्यांमध्ये कमीत कमी शंभर ते एकशे साठ युनिट असा असू शकेल. तर सरासरी एकशे चाळीस युनिट असू शकेल. ज्या वेळेला बिल भरमसाट आले असे आपल्याला वाटते. त्या वेळा त्या महिन्यात किती युनिट वीज वापरली गेली हे बघणे जरुरीचे आहे. गेल्या बारा महिन्यांतील जास्तीत जास्त वापर हा एकशे साठ युनिट आहे. तो समजा जर का एकशे ऐंशी, दोनशेपर्यंत गेला असेल तर एवढा वीजवापर ग्राहकांकडून होणे शक्य आहे. परंतु जास्तीत जास्त समजा एकशे साठ युनिट वापर असलेला ग्राहक दुपटीपेक्षा जास्त वापर करू शकणार नाही. त्यावेळी ग्राहकाने जागरूक होत त्याकडे बघणे जरुरीचे आहे.दर आणि विजेचा वापर हे दोन्ही तपासल्यानंतरसुद्धा जर का तक्रार असेल तर अंतर्गत ग्राहक निवारण कक्षाकडे तक्रार करावी लागते. तक्रारीचा अर्ज आयोग आणि वीज वितरण कंपन्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अंतर्गत निवारण कक्षाचा पत्ता वीज बिलावरच छापलेला असतो. अशा पद्धतीची लिखित स्वरूपाची तक्रार वीज वितरण कंपनीकडे करावी. तक्रार झाल्यापासून साठ दिवसांच्या आत तक्रारीचे निवारण होणे बंधनकारक आहे. समजा तक्रार निवारण कक्षाने दिलेला निर्णय मान्य नसला किंवा त्यांनी साठ दिवसांच्या आत निर्णय दिला नाही तर ग्राहक तक्रार निवारण कक्ष यांच्याकडे तक्रार करावी. हा करावयाचा अर्ज संकेतस्थळावर आणि कक्षाचा पत्ता बिलावर उपलब्ध असतो. सीजीआरएफ अर्थातच हे विभागीय कार्यालयात असल्यामुळे ग्राहकाला थोडा त्रास सहन करावा लागेल. सीजीआरएफमध्ये दोन सदस्य आणि एक अध्यक्ष असतो. अध्यक्ष साधारणत: न्यायाधीश किंवा सेक्रेटरी किंवा इंजिनीअरिंग कॉलेजचा प्राचार्य असू शकतो. तर दुसरा सदस्य हा ग्राहक चळवळीशी संबंधित असतो. आणि तिसरा सदस्य अर्थात वीज वितरण कंपनीचा कर्मचारी असतो. ग्राहक कक्षात येत असलेल्या तक्रारींचे ६५ ते ७० निकाल ग्राहकांच्या बाजूनेच लागतात. याचे मुख्य कारण असे की कक्षामध्ये मुख्यत: तीनपैकी दोन सदस्य हे वीज कंपनीचे कर्मचारीच नसतात.भरमसाट बिल आले असे ग्राहकाला वाटते तेव्हा पन्नास टक्के बिल ताबडतोब भरा, असे बऱ्याचदा वीज वितरण कंपनी सांगते. परंतु ते बिलसुद्धा ग्राहकाच्या क्षमतेच्या पलीकडे असू शकते. बिल भरले नाही तर वीज तोडली जाण्याची शक्यता असते. म्हणून कक्षाकडे अर्ज केला तर कक्ष या वीज बिल प्रकरणाचा निर्णय लागत नाही तोवर वीज तोडायला स्थगिती देऊ शकतो. अर्थात त्या महिन्याच्या बिलापोटी गेल्या सहा महिन्यांच्या वीजवापराची सरासरी घेऊन तेवढ्या वीज वापराचे बिल अदा करावे लागते. तात्पर्य, वीज बिलात झालेली शेवटची रक्कम पकडून काही निष्कर्ष काढण्याआधी वीज दर, वीजवापर यासंबंधी स्वत:च माहिती करून घेतलेली बरी.(वीज क्षेत्रातील तज्ज्ञ)