शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

भरमसाट वीजबिलाबाबत दक्ष राहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 04:05 IST

महाराष्ट्रामध्ये मुंबईसह उर्वरित राज्यांतील वीज ग्राहकांची संख्या सुमारे २ कोटी ८० लाख आहे.

- अशोक पेंडसेमहाराष्ट्रामध्ये मुंबईसह उर्वरित राज्यांतील वीज ग्राहकांची संख्या सुमारे २ कोटी ८० लाख आहे. यातील घरगुती वीज ग्राहकांची संख्या २ कोटींपेक्षा जास्त आहे. घरगुती वीज ग्राहकांची ‘आमचे बिल भरमसाट आले’, अशी मोठ्या प्रमाणावर तक्रार असते. वीजबिल म्हणजे वापरलेली वीज युनिट गुणिले वीज दर हा सामान्य गुणाकार आहे. मुंबईत अदानी, टाटा, बेस्ट तर उर्वरित महाराष्ट्रात महावितरण वीज वितरण करते. घरगुती वीज ग्राहकांचे या चार वीज कंपन्यांचे वीजदर खालीलप्रमाणे आहेत.वीज वापर अदानी टाटा महावितरण बेस्ट ०-१०० ४.५० ४.३३ ४.३० २.९१ १०१-३०० ७.६५ ७.५१ ८.०३ ५.१६ ३०१-५०० ९.२९ ११.४९ ११.०५ ७.९६ ५०१ वर ११.२४ १४.१० ११.८० ९.४५ हा तक्ता पाहिला असता असे लक्षात येईल की अदानी, टाटा आणि महावितरण यातील ० ते ३०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांचे वीजदर जवळजवळ समानच आहेत. बेस्टचे वीजदर कमी आहेत. त्याचे कारण की बेस्टमध्ये झालेला वाहतूक विभागाचा तोटा वीज दरवाढ करून भरून काढण्यात आला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने हा तोटा वीजदर वाढवून भरून काढण्यास मज्जाव केला. यामुळे आधीच्या वर्षातील वसूल केलेला तोटा हा सध्या परत दिला जात आहे. त्यामुळे बेस्टचा दर हा सध्या कमी आहे. सुमारे वर्षभरात हा दरसुद्धा इतरांच्या पातळीवर येईल.हे वीजदर बघितल्यानंतर एक लक्षात येईल की वीजदर टप्पा पद्धतीने वाढतो. समजा एखाद्या ग्राहकाने जर शंभर युनिट वीज वापरली तर महावितरणमध्ये त्याचे बिल ४३0 रुपये येईल. परंतु त्याने १३० युनिट वीज वापरली तर तेच बिल ४३0 अधिक २४0 म्हणजे ६७0 रुपये येईल. म्हणजेच थोडी अधिकच वीज वापरली तरी आपले बिल दीडपट का झाले, हे ग्राहकाला झटकन समजत नाही. त्याचे उत्तर हे टप्पा पद्धतीत आहे. म्हणजे शंभर युनिटपर्यंत चार रुपये असलेला दर शंभर युनिट ओलांडल्यानंतर दुप्पट म्हणजेच आठ रुपये होतो. दरवर्षी किंवा एक वर्षाआड साधारणत: वीज दरवाढ होत असते. या नव्या दरासंबंधी बातम्या पेपरमध्ये येतच असतात. त्यामुळे ग्राहकांना त्याची माहिती असते.वीजदर पाहिल्यानंतर पुढचा भाग ग्राहकाचा वीजवापर. दर महिन्याला येत असलेल्या बिलावर गेल्या बारा महिन्यांचा वीजवापर छापलेला असतो. वीजवापर हा उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या ऋतूप्रमाणे वरखाली होत असतो. एक उदाहरणच बघूया. आपला वीजवापर बारा महिन्यांमध्ये कमीत कमी शंभर ते एकशे साठ युनिट असा असू शकेल. तर सरासरी एकशे चाळीस युनिट असू शकेल. ज्या वेळेला बिल भरमसाट आले असे आपल्याला वाटते. त्या वेळा त्या महिन्यात किती युनिट वीज वापरली गेली हे बघणे जरुरीचे आहे. गेल्या बारा महिन्यांतील जास्तीत जास्त वापर हा एकशे साठ युनिट आहे. तो समजा जर का एकशे ऐंशी, दोनशेपर्यंत गेला असेल तर एवढा वीजवापर ग्राहकांकडून होणे शक्य आहे. परंतु जास्तीत जास्त समजा एकशे साठ युनिट वापर असलेला ग्राहक दुपटीपेक्षा जास्त वापर करू शकणार नाही. त्यावेळी ग्राहकाने जागरूक होत त्याकडे बघणे जरुरीचे आहे.दर आणि विजेचा वापर हे दोन्ही तपासल्यानंतरसुद्धा जर का तक्रार असेल तर अंतर्गत ग्राहक निवारण कक्षाकडे तक्रार करावी लागते. तक्रारीचा अर्ज आयोग आणि वीज वितरण कंपन्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अंतर्गत निवारण कक्षाचा पत्ता वीज बिलावरच छापलेला असतो. अशा पद्धतीची लिखित स्वरूपाची तक्रार वीज वितरण कंपनीकडे करावी. तक्रार झाल्यापासून साठ दिवसांच्या आत तक्रारीचे निवारण होणे बंधनकारक आहे. समजा तक्रार निवारण कक्षाने दिलेला निर्णय मान्य नसला किंवा त्यांनी साठ दिवसांच्या आत निर्णय दिला नाही तर ग्राहक तक्रार निवारण कक्ष यांच्याकडे तक्रार करावी. हा करावयाचा अर्ज संकेतस्थळावर आणि कक्षाचा पत्ता बिलावर उपलब्ध असतो. सीजीआरएफ अर्थातच हे विभागीय कार्यालयात असल्यामुळे ग्राहकाला थोडा त्रास सहन करावा लागेल. सीजीआरएफमध्ये दोन सदस्य आणि एक अध्यक्ष असतो. अध्यक्ष साधारणत: न्यायाधीश किंवा सेक्रेटरी किंवा इंजिनीअरिंग कॉलेजचा प्राचार्य असू शकतो. तर दुसरा सदस्य हा ग्राहक चळवळीशी संबंधित असतो. आणि तिसरा सदस्य अर्थात वीज वितरण कंपनीचा कर्मचारी असतो. ग्राहक कक्षात येत असलेल्या तक्रारींचे ६५ ते ७० निकाल ग्राहकांच्या बाजूनेच लागतात. याचे मुख्य कारण असे की कक्षामध्ये मुख्यत: तीनपैकी दोन सदस्य हे वीज कंपनीचे कर्मचारीच नसतात.भरमसाट बिल आले असे ग्राहकाला वाटते तेव्हा पन्नास टक्के बिल ताबडतोब भरा, असे बऱ्याचदा वीज वितरण कंपनी सांगते. परंतु ते बिलसुद्धा ग्राहकाच्या क्षमतेच्या पलीकडे असू शकते. बिल भरले नाही तर वीज तोडली जाण्याची शक्यता असते. म्हणून कक्षाकडे अर्ज केला तर कक्ष या वीज बिल प्रकरणाचा निर्णय लागत नाही तोवर वीज तोडायला स्थगिती देऊ शकतो. अर्थात त्या महिन्याच्या बिलापोटी गेल्या सहा महिन्यांच्या वीजवापराची सरासरी घेऊन तेवढ्या वीज वापराचे बिल अदा करावे लागते. तात्पर्य, वीज बिलात झालेली शेवटची रक्कम पकडून काही निष्कर्ष काढण्याआधी वीज दर, वीजवापर यासंबंधी स्वत:च माहिती करून घेतलेली बरी.(वीज क्षेत्रातील तज्ज्ञ)