शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

बापूशाही ! जिल्ह्याचं पालकत्व.. वेध बदलत्या समीकरणांचा !

By सचिन जवळकोटे | Updated: November 10, 2019 07:37 IST

लगाव बत्ती...

- सचिन जवळकोटे

काय मंडळी...दिवाळी कशी साजरी झाली ? यंदाचा फराळ कसा होता ? लाडू-चिवडा संपला की नाही ? बालूशाही खाल्ली की नाही ?...एक मिनिट. ‘बालूशाही’वरून आठवलं. यंदा ‘बापूशाही’ जोरात दिसतेय आपल्याकडं. राज्यात ‘ओन्ली वन भाजप गाडी’ निघाली तर म्हणे ‘दक्षिण’चे ‘सुभाषबापू’... अन् ‘महाशिवआघाडी’ जमली, तर म्हणे ‘सांगोल्या’चे ‘शहाजीबापू’. आलं का लक्षात ? होय... होय. जिल्ह्याचं ‘पालकत्व’ मिळविण्यासाठी या दोन्ही ‘बापूं’नी लावलीय आपापल्या गॉडफादरकडे जोरदार फिल्डिंग. लगाव बत्ती...

‘देवेंद्रपंतां’शी जवळीक वाढतेय ‘सुभाषबापूं’ची !‘काळजापूर मारुती’जवळच्या ‘देशमुख’ बंगल्यात बरीच वर्षे ‘पालकत्वाची खुर्ची’ नांदली. त्यांनी या पदाचा जिल्ह्याच्या विकासासाठी अन् पक्षाच्या भल्यासाठी किती फायदा करून घेतला हा भाग वेगळा; मात्र त्यांच्या मतदारसंघापुरतंच बोलायचं झालं तर, त्यांना यंदा भरभरून मिळालेल्या ‘लीड’मधूनच ‘उत्तर’ मिळालेलं. 

खरंतर, जिल्ह्यात पार्टीचा अजून एक ‘कॅबिनेट’ असतानाही ‘राज्य’मंत्र्याला ‘पालकत्व’ मिळावं, ही खदखद शेवटपर्यंत ‘लोकमंगल’ ग्रुपमध्ये राहिलेली. अनेकांच्या तक्रारी असतानाही ‘विजयकुमारां’ची खुर्ची टिकली, केवळ दोन गोष्टींसाठी. पहिली म्हणजे महाराष्ट्रातील ‘तम् तम् मंदीं’ना खूश ठेवणे. दुसरी म्हणजे ‘सुभाषबापूं’चा ‘गडकरी पॅटर्न’ जिल्ह्यात स्ट्राँग होऊ नये म्हणून त्यांचा विरोधी गट बळकट करणे; मात्र यंदाच्या निकालानंतर परिस्थिती पूर्णपणे पालटलीय. राज्यात ‘वारणानगर’चे ‘विनय’ तर ‘अक्कलकोट’चे ‘सचिनदादा’ हेही ‘तम् तम् मंदी’ नेते म्हणून निवडून आलेत. या दोघांचीही ‘देवेंद्रपंतां’सोबत खूप चांगली सलगी. त्यामुळं केवळ समाजाच्या पॉर्इंटवरच ‘विजयकुमारां’च्या नावाचा विचार झाला तर त्यांना दोन सक्षम पर्यायही पार्टीला मिळालेले. तशात पुन्हा ‘सुभाषबापूं’नी अलीकडच्या काळात आपली ‘पॉलिटिकल स्ट्रॅटेजी’ थोडीशी बदललेली. भलेही ते ‘गडकरी वाड्या’वरचे म्हणून ओळखले जात असले तरी आजकाल ‘देवेंद्रपंतां’सोबत अधिकाधिक जवळीक साधू लागलेले. शुक्रवारी जेव्हा स्वतंत्र सत्तास्थापनेसंदर्भात ‘पंत’ आपली भूमिका मीडियासमोर मांडत होते, तेव्हा त्यांच्यासोबत बसलेले ‘सुभाषबापू’ सा-या जगाला दिसलेले. सध्या पार्टीच्या कोअर कमिटीत असलेल्या ‘बापूं’वर ‘पंतां’चा विश्वास वाढत चालल्याचीच ही लक्षणं.

त्यामुळं यंदा कोणत्याही परिस्थितीत ‘बापूं’नाच ‘सोलापूरचं पालकत्व’ मिळणार, असा दावा ‘लोकमंगल’ बँकेच्या पिग्मी एजंटापासून ते ‘लोकमंगल’ कारखान्याच्या डायरेक्टरपर्यंत सारेच म्हणे करू लागलेत; पण थांबाऽऽ थांबाऽऽ हे कधी होणार ?...जर ‘कमळा’ला बहुमत मिळालं तरच. तोपर्यंत लगाव बत्ती.

...तर मग नक्कीच ‘शहाजीबापूं’चं नाव पुढं...

समजा ‘कमळ’वाल्यांचं सरकार आलंच नाही. थोरले काका ‘बारामतीकरां’च्या करामतीतून ‘धनुष्यबाण’वाल्यांचा मुख्यमंत्री खुर्चीवर बसला तर जिल्ह्यातील एकमेव ‘बाण’वाल्या आमदाराची चांदीच चांदी. ‘सांगोल्याचे शहाजीबापू’ होऊ शकतात ‘लाल बत्ती’चे मानकरी. कदाचित त्यांनाच मिळू शकते ‘पालकत्वाची खुर्ची’...कारण ‘अकलूजच्या दादां’पासून ते ‘पंढरपूरच्या पंतां’पर्यंत सर्वांना नडण्याचं धाडस दाखवू शकतात केवळ तेच. फक्त पूर्वीच्या सवयीप्रमाणं कुणाला मॅनेज होऊ नये म्हणजे मिळविली.

‘बापू’ म्हणजे रांगडा गडी. बोलताना वाणी सुटली की, भल्याभल्यांची पंचाईत करून टाकणार. कदाचित याच स्वभावामुळं कैक वर्षे आमदारकीविना ‘अनवाणी’ फिरण्याची पाळी आलेली; मात्र यंदा ‘बाणा’चे एकमेव आमदार म्हणून ते निवडून आलेत.खरंतर, ‘जिल्ह्याचं पालकत्व’ परंड्याच्या ‘तानाजीरावां’कडे दिली जाण्याची शक्यता दाट. मात्र त्यांना ‘सोलापूर’पेक्षाही ‘उस्मानाबाद’च्या राजकारणावर अधिक कमांड घ्यायची असल्यानं त्यांचा ओढा तिकडंच. तशात पुन्हा त्यांनी सोलापूूर जिल्ह्यात वेचून-वेचून निवडलेला एकही हिरा चमकला नाहीच. त्यांचा ‘सुपरहीट फॉर्म्युला’ पाचही ठिकाणी पुरता ‘फ्लॉप’ झाला. त्यामुळंच ‘शहाजीबापूं’चं नाव वरच्या पातळीवर येऊ लागलंय चर्चेत...पण या सा-या जर-तरच्या गोष्टी...कारण ‘कमळा’ऐवजी ‘बाणा’चं सरकार आलं तरच असं शकतं घडू. तोपर्यंत लगाव बत्ती....

(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSubhash Deshmukhसुभाष देशमुखShiv SenaशिवसेनाBJPभाजपाCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार