शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

बाप्पा, आता तरी सुबुद्धी दे!

By admin | Updated: September 16, 2015 02:27 IST

घरात शॉवर की तोटी यावरून श्रीमंती ठरते आमची. जे जगण्याचे तेच पिकांचेही. पिण्याच्या पाण्याचे वांधे असताना ऊस घेतो आम्ही. बाप्पा, आता तरी ही उधळपट्टी रोखण्याची सुबुद्धी दे...

- गजानन दिवाणघरात शॉवर की तोटी यावरून श्रीमंती ठरते आमची. जे जगण्याचे तेच पिकांचेही. पिण्याच्या पाण्याचे वांधे असताना ऊस घेतो आम्ही. बाप्पा, आता तरी ही उधळपट्टी रोखण्याची सुबुद्धी दे...घशाला कोरड पडली, की आम्हाला थेंबभर पाण्याची किंमत कळते. नाही तर दररोज घरी आणि दारीही पाण्याचे पाट वाहत असतात. त्याचे काहीच वाटत नाही आम्हाला. एकही पैसा न मोजता पाईपलाईन फोडून पाणी वापरणारे आणि भरपूर पैसे मोजून पाणी घेणारे दोघेही सारखेच. एकाला पैसेच द्यायचे नसतात, तर दुसरा भरपूर पैसे मोजून हे पाणी उडवत असतो. पाणीटंचाईला दोघेही तेवढेच जबाबदार.औरंगाबादला तीन दिवसाआड पाणी मिळते. लातूरकरांना २० दिवसानंतरही पाणी मिळेलच याची शाश्वती नाही. जालनेकरांना १० ते १२ दिवसाआड ते दिले जाते. मराठवाड्यातील प्रत्येक शहरात कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र आहे. चार वर्षांपासून दुष्काळ आमची पाठ सोडत नाही. यंदा तर कळस गाठला त्याने. खरीप गेला. प्यायला आणि जनावरांना पाणी मिळते की नाही असे वाटत असताना परतीचा पाऊस पावला. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात जोरदार बरसत आहे तो. आता पिण्याच्या पाण्याची तहान भागेल, असे वाटते; पण नुसते पाणी पिऊन जगायचे काय?जोपर्यंत मानव जल आणि भूमीच्या नैसर्गिक निवड सिद्धांतास अनुकूल भूमिका घेऊन स्वत:चा विकास साधू इच्छितो, तोपर्यंत त्याला या उभयतांचा फारसा विरोध होत नाही; परंतु प्रतिकूल भूमिका घेऊन, म्हणजेच निसर्गावर विजय मिळविण्याची भूमिका घेऊन जेव्हा तो या उभयतांचा अतिरिक्त वापर करतो, तेव्हा त्याला त्यांचा विरोध सुरू होतो. कालांतराने नैसर्गिक चक्रात बिघाड होऊन त्याच्या भवितव्यातील अस्तित्वाबद्दल शंका निर्माण होऊ शकते (बलदवा बाळकृष्ण : प्राच्यसिद्धांत). सध्या आपण याच परिस्थितीतून जात आहोत. नैसर्गिक जीवनशैली कधीच मागे टाकली आहे आम्ही. घरात शॉवर की तोटी यावरून श्रीमंती ठरते आमची. पाणी जास्त उडवतो तोच श्रीमंत.जे जगण्याचे तेच पिकांचेही. ज्याच्या शेतात ऊस तोच श्रीमंत. पिण्याच्या पाण्याचे वांधे असताना ऊस घेतो आम्ही. मराठवाड्यातील एकूण जमिनीपैकी ९.४ टक्के शेतीत ऊस घेतला जातो. त्यावर वर्षभरात साधारण ४,३२२.४ दशलक्ष घनमीटर पाणी उडवतो. मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीतील जिवंत पाणीसाठा दोन हजार १७१ दशलक्ष घनमीटर इतका आहे. यावरून एकट्या उसावर किती पाणी उधळतो हे लक्षात यावे. शेतीला वापरल्या जाणाऱ्या एकूण पाण्यापैकी ७१.४ टक्के पाणी एकट्या उसाला लागते. केवळ ९.४ टक्के पाणीच कडधान्याला देतो आम्ही. एक हेक्टरवर ऊस लावल्यास तो २५ हेक्टरवरील तूर किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्रावरील भुईमुगाच्या पिकाचे पाणी पितो. २१.६ लाख हेक्टरवर तुरीचे पीक घेण्यासाठी २१६१.२ दशलक्ष घनमीटर पाणी लागते. एवढे पाणी सध्या आम्ही केवळ १.१५ लाख हेक्टर उसाच्या पिकावर उधळतो. पाण्याची ही उधळपट्टी अशीच सुरू राहिल्यास कोणीही वाचवू शकणार नाही आम्हाला. दुष्काळ आम्हाला नवा नाही. तरीही काहीच शिकलो नाही आम्ही. घरात पैसे असले की दिवाळी-दसरा, नाही तर शिमगा अशातला हा प्रकार. अन्नदाता असूनही किती दिवस लोकांसमोर हात पसरणार आम्ही?हे लिहीत असतानाच औरंगाबादेतील एका गणेश मंडळाचे दोन कार्यकर्ते कार्यालयात धडकले. ‘उद्या बाप्पाचे आगमन होत आहे; पण यंदा गणपती बसविणार नाही आम्ही. वर्गणीही जमा करणार नाही. केवळ एक दानपेटी ठेवू. अशी दानपेटी शहरातील प्रत्येक मंडळासमोर ठेवली जाईल. प्रत्येकाने एक रुपया टाकावा, असे आवाहन केले जाईल. दहा दिवसानंतर शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत या सर्व दानपेट्या उघडल्या जातील. जमलेले पैसे दुष्काळग्रस्तांसाठी दिले जातील...’ पंचविशीतील तरुणांचा हा संकल्प प्रत्यक्षात येईल तेव्हा येईल, पण गणेश मंडळावर होणारा खर्च थांबवून अडचणीतील शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावे असे त्यांना वाटणे, हा मोठा बदल नाही का? बाप्पा, असा सकारात्मक बदल आमच्यातही होऊ दे. दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी घरादारात आणि शेतीत पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन आमच्या हातूनही होऊ दे.