शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पा, आता तरी सुबुद्धी दे!

By admin | Updated: September 16, 2015 02:27 IST

घरात शॉवर की तोटी यावरून श्रीमंती ठरते आमची. जे जगण्याचे तेच पिकांचेही. पिण्याच्या पाण्याचे वांधे असताना ऊस घेतो आम्ही. बाप्पा, आता तरी ही उधळपट्टी रोखण्याची सुबुद्धी दे...

- गजानन दिवाणघरात शॉवर की तोटी यावरून श्रीमंती ठरते आमची. जे जगण्याचे तेच पिकांचेही. पिण्याच्या पाण्याचे वांधे असताना ऊस घेतो आम्ही. बाप्पा, आता तरी ही उधळपट्टी रोखण्याची सुबुद्धी दे...घशाला कोरड पडली, की आम्हाला थेंबभर पाण्याची किंमत कळते. नाही तर दररोज घरी आणि दारीही पाण्याचे पाट वाहत असतात. त्याचे काहीच वाटत नाही आम्हाला. एकही पैसा न मोजता पाईपलाईन फोडून पाणी वापरणारे आणि भरपूर पैसे मोजून पाणी घेणारे दोघेही सारखेच. एकाला पैसेच द्यायचे नसतात, तर दुसरा भरपूर पैसे मोजून हे पाणी उडवत असतो. पाणीटंचाईला दोघेही तेवढेच जबाबदार.औरंगाबादला तीन दिवसाआड पाणी मिळते. लातूरकरांना २० दिवसानंतरही पाणी मिळेलच याची शाश्वती नाही. जालनेकरांना १० ते १२ दिवसाआड ते दिले जाते. मराठवाड्यातील प्रत्येक शहरात कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र आहे. चार वर्षांपासून दुष्काळ आमची पाठ सोडत नाही. यंदा तर कळस गाठला त्याने. खरीप गेला. प्यायला आणि जनावरांना पाणी मिळते की नाही असे वाटत असताना परतीचा पाऊस पावला. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात जोरदार बरसत आहे तो. आता पिण्याच्या पाण्याची तहान भागेल, असे वाटते; पण नुसते पाणी पिऊन जगायचे काय?जोपर्यंत मानव जल आणि भूमीच्या नैसर्गिक निवड सिद्धांतास अनुकूल भूमिका घेऊन स्वत:चा विकास साधू इच्छितो, तोपर्यंत त्याला या उभयतांचा फारसा विरोध होत नाही; परंतु प्रतिकूल भूमिका घेऊन, म्हणजेच निसर्गावर विजय मिळविण्याची भूमिका घेऊन जेव्हा तो या उभयतांचा अतिरिक्त वापर करतो, तेव्हा त्याला त्यांचा विरोध सुरू होतो. कालांतराने नैसर्गिक चक्रात बिघाड होऊन त्याच्या भवितव्यातील अस्तित्वाबद्दल शंका निर्माण होऊ शकते (बलदवा बाळकृष्ण : प्राच्यसिद्धांत). सध्या आपण याच परिस्थितीतून जात आहोत. नैसर्गिक जीवनशैली कधीच मागे टाकली आहे आम्ही. घरात शॉवर की तोटी यावरून श्रीमंती ठरते आमची. पाणी जास्त उडवतो तोच श्रीमंत.जे जगण्याचे तेच पिकांचेही. ज्याच्या शेतात ऊस तोच श्रीमंत. पिण्याच्या पाण्याचे वांधे असताना ऊस घेतो आम्ही. मराठवाड्यातील एकूण जमिनीपैकी ९.४ टक्के शेतीत ऊस घेतला जातो. त्यावर वर्षभरात साधारण ४,३२२.४ दशलक्ष घनमीटर पाणी उडवतो. मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीतील जिवंत पाणीसाठा दोन हजार १७१ दशलक्ष घनमीटर इतका आहे. यावरून एकट्या उसावर किती पाणी उधळतो हे लक्षात यावे. शेतीला वापरल्या जाणाऱ्या एकूण पाण्यापैकी ७१.४ टक्के पाणी एकट्या उसाला लागते. केवळ ९.४ टक्के पाणीच कडधान्याला देतो आम्ही. एक हेक्टरवर ऊस लावल्यास तो २५ हेक्टरवरील तूर किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्रावरील भुईमुगाच्या पिकाचे पाणी पितो. २१.६ लाख हेक्टरवर तुरीचे पीक घेण्यासाठी २१६१.२ दशलक्ष घनमीटर पाणी लागते. एवढे पाणी सध्या आम्ही केवळ १.१५ लाख हेक्टर उसाच्या पिकावर उधळतो. पाण्याची ही उधळपट्टी अशीच सुरू राहिल्यास कोणीही वाचवू शकणार नाही आम्हाला. दुष्काळ आम्हाला नवा नाही. तरीही काहीच शिकलो नाही आम्ही. घरात पैसे असले की दिवाळी-दसरा, नाही तर शिमगा अशातला हा प्रकार. अन्नदाता असूनही किती दिवस लोकांसमोर हात पसरणार आम्ही?हे लिहीत असतानाच औरंगाबादेतील एका गणेश मंडळाचे दोन कार्यकर्ते कार्यालयात धडकले. ‘उद्या बाप्पाचे आगमन होत आहे; पण यंदा गणपती बसविणार नाही आम्ही. वर्गणीही जमा करणार नाही. केवळ एक दानपेटी ठेवू. अशी दानपेटी शहरातील प्रत्येक मंडळासमोर ठेवली जाईल. प्रत्येकाने एक रुपया टाकावा, असे आवाहन केले जाईल. दहा दिवसानंतर शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत या सर्व दानपेट्या उघडल्या जातील. जमलेले पैसे दुष्काळग्रस्तांसाठी दिले जातील...’ पंचविशीतील तरुणांचा हा संकल्प प्रत्यक्षात येईल तेव्हा येईल, पण गणेश मंडळावर होणारा खर्च थांबवून अडचणीतील शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावे असे त्यांना वाटणे, हा मोठा बदल नाही का? बाप्पा, असा सकारात्मक बदल आमच्यातही होऊ दे. दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी घरादारात आणि शेतीत पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन आमच्या हातूनही होऊ दे.