शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

बाप्पा, आता तरी सुबुद्धी दे!

By admin | Updated: September 16, 2015 02:27 IST

घरात शॉवर की तोटी यावरून श्रीमंती ठरते आमची. जे जगण्याचे तेच पिकांचेही. पिण्याच्या पाण्याचे वांधे असताना ऊस घेतो आम्ही. बाप्पा, आता तरी ही उधळपट्टी रोखण्याची सुबुद्धी दे...

- गजानन दिवाणघरात शॉवर की तोटी यावरून श्रीमंती ठरते आमची. जे जगण्याचे तेच पिकांचेही. पिण्याच्या पाण्याचे वांधे असताना ऊस घेतो आम्ही. बाप्पा, आता तरी ही उधळपट्टी रोखण्याची सुबुद्धी दे...घशाला कोरड पडली, की आम्हाला थेंबभर पाण्याची किंमत कळते. नाही तर दररोज घरी आणि दारीही पाण्याचे पाट वाहत असतात. त्याचे काहीच वाटत नाही आम्हाला. एकही पैसा न मोजता पाईपलाईन फोडून पाणी वापरणारे आणि भरपूर पैसे मोजून पाणी घेणारे दोघेही सारखेच. एकाला पैसेच द्यायचे नसतात, तर दुसरा भरपूर पैसे मोजून हे पाणी उडवत असतो. पाणीटंचाईला दोघेही तेवढेच जबाबदार.औरंगाबादला तीन दिवसाआड पाणी मिळते. लातूरकरांना २० दिवसानंतरही पाणी मिळेलच याची शाश्वती नाही. जालनेकरांना १० ते १२ दिवसाआड ते दिले जाते. मराठवाड्यातील प्रत्येक शहरात कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र आहे. चार वर्षांपासून दुष्काळ आमची पाठ सोडत नाही. यंदा तर कळस गाठला त्याने. खरीप गेला. प्यायला आणि जनावरांना पाणी मिळते की नाही असे वाटत असताना परतीचा पाऊस पावला. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात जोरदार बरसत आहे तो. आता पिण्याच्या पाण्याची तहान भागेल, असे वाटते; पण नुसते पाणी पिऊन जगायचे काय?जोपर्यंत मानव जल आणि भूमीच्या नैसर्गिक निवड सिद्धांतास अनुकूल भूमिका घेऊन स्वत:चा विकास साधू इच्छितो, तोपर्यंत त्याला या उभयतांचा फारसा विरोध होत नाही; परंतु प्रतिकूल भूमिका घेऊन, म्हणजेच निसर्गावर विजय मिळविण्याची भूमिका घेऊन जेव्हा तो या उभयतांचा अतिरिक्त वापर करतो, तेव्हा त्याला त्यांचा विरोध सुरू होतो. कालांतराने नैसर्गिक चक्रात बिघाड होऊन त्याच्या भवितव्यातील अस्तित्वाबद्दल शंका निर्माण होऊ शकते (बलदवा बाळकृष्ण : प्राच्यसिद्धांत). सध्या आपण याच परिस्थितीतून जात आहोत. नैसर्गिक जीवनशैली कधीच मागे टाकली आहे आम्ही. घरात शॉवर की तोटी यावरून श्रीमंती ठरते आमची. पाणी जास्त उडवतो तोच श्रीमंत.जे जगण्याचे तेच पिकांचेही. ज्याच्या शेतात ऊस तोच श्रीमंत. पिण्याच्या पाण्याचे वांधे असताना ऊस घेतो आम्ही. मराठवाड्यातील एकूण जमिनीपैकी ९.४ टक्के शेतीत ऊस घेतला जातो. त्यावर वर्षभरात साधारण ४,३२२.४ दशलक्ष घनमीटर पाणी उडवतो. मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीतील जिवंत पाणीसाठा दोन हजार १७१ दशलक्ष घनमीटर इतका आहे. यावरून एकट्या उसावर किती पाणी उधळतो हे लक्षात यावे. शेतीला वापरल्या जाणाऱ्या एकूण पाण्यापैकी ७१.४ टक्के पाणी एकट्या उसाला लागते. केवळ ९.४ टक्के पाणीच कडधान्याला देतो आम्ही. एक हेक्टरवर ऊस लावल्यास तो २५ हेक्टरवरील तूर किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्रावरील भुईमुगाच्या पिकाचे पाणी पितो. २१.६ लाख हेक्टरवर तुरीचे पीक घेण्यासाठी २१६१.२ दशलक्ष घनमीटर पाणी लागते. एवढे पाणी सध्या आम्ही केवळ १.१५ लाख हेक्टर उसाच्या पिकावर उधळतो. पाण्याची ही उधळपट्टी अशीच सुरू राहिल्यास कोणीही वाचवू शकणार नाही आम्हाला. दुष्काळ आम्हाला नवा नाही. तरीही काहीच शिकलो नाही आम्ही. घरात पैसे असले की दिवाळी-दसरा, नाही तर शिमगा अशातला हा प्रकार. अन्नदाता असूनही किती दिवस लोकांसमोर हात पसरणार आम्ही?हे लिहीत असतानाच औरंगाबादेतील एका गणेश मंडळाचे दोन कार्यकर्ते कार्यालयात धडकले. ‘उद्या बाप्पाचे आगमन होत आहे; पण यंदा गणपती बसविणार नाही आम्ही. वर्गणीही जमा करणार नाही. केवळ एक दानपेटी ठेवू. अशी दानपेटी शहरातील प्रत्येक मंडळासमोर ठेवली जाईल. प्रत्येकाने एक रुपया टाकावा, असे आवाहन केले जाईल. दहा दिवसानंतर शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत या सर्व दानपेट्या उघडल्या जातील. जमलेले पैसे दुष्काळग्रस्तांसाठी दिले जातील...’ पंचविशीतील तरुणांचा हा संकल्प प्रत्यक्षात येईल तेव्हा येईल, पण गणेश मंडळावर होणारा खर्च थांबवून अडचणीतील शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावे असे त्यांना वाटणे, हा मोठा बदल नाही का? बाप्पा, असा सकारात्मक बदल आमच्यातही होऊ दे. दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी घरादारात आणि शेतीत पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन आमच्या हातूनही होऊ दे.