शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

बाप्पा, आता तरी सुबुद्धी दे!

By admin | Updated: September 16, 2015 02:27 IST

घरात शॉवर की तोटी यावरून श्रीमंती ठरते आमची. जे जगण्याचे तेच पिकांचेही. पिण्याच्या पाण्याचे वांधे असताना ऊस घेतो आम्ही. बाप्पा, आता तरी ही उधळपट्टी रोखण्याची सुबुद्धी दे...

- गजानन दिवाणघरात शॉवर की तोटी यावरून श्रीमंती ठरते आमची. जे जगण्याचे तेच पिकांचेही. पिण्याच्या पाण्याचे वांधे असताना ऊस घेतो आम्ही. बाप्पा, आता तरी ही उधळपट्टी रोखण्याची सुबुद्धी दे...घशाला कोरड पडली, की आम्हाला थेंबभर पाण्याची किंमत कळते. नाही तर दररोज घरी आणि दारीही पाण्याचे पाट वाहत असतात. त्याचे काहीच वाटत नाही आम्हाला. एकही पैसा न मोजता पाईपलाईन फोडून पाणी वापरणारे आणि भरपूर पैसे मोजून पाणी घेणारे दोघेही सारखेच. एकाला पैसेच द्यायचे नसतात, तर दुसरा भरपूर पैसे मोजून हे पाणी उडवत असतो. पाणीटंचाईला दोघेही तेवढेच जबाबदार.औरंगाबादला तीन दिवसाआड पाणी मिळते. लातूरकरांना २० दिवसानंतरही पाणी मिळेलच याची शाश्वती नाही. जालनेकरांना १० ते १२ दिवसाआड ते दिले जाते. मराठवाड्यातील प्रत्येक शहरात कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र आहे. चार वर्षांपासून दुष्काळ आमची पाठ सोडत नाही. यंदा तर कळस गाठला त्याने. खरीप गेला. प्यायला आणि जनावरांना पाणी मिळते की नाही असे वाटत असताना परतीचा पाऊस पावला. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात जोरदार बरसत आहे तो. आता पिण्याच्या पाण्याची तहान भागेल, असे वाटते; पण नुसते पाणी पिऊन जगायचे काय?जोपर्यंत मानव जल आणि भूमीच्या नैसर्गिक निवड सिद्धांतास अनुकूल भूमिका घेऊन स्वत:चा विकास साधू इच्छितो, तोपर्यंत त्याला या उभयतांचा फारसा विरोध होत नाही; परंतु प्रतिकूल भूमिका घेऊन, म्हणजेच निसर्गावर विजय मिळविण्याची भूमिका घेऊन जेव्हा तो या उभयतांचा अतिरिक्त वापर करतो, तेव्हा त्याला त्यांचा विरोध सुरू होतो. कालांतराने नैसर्गिक चक्रात बिघाड होऊन त्याच्या भवितव्यातील अस्तित्वाबद्दल शंका निर्माण होऊ शकते (बलदवा बाळकृष्ण : प्राच्यसिद्धांत). सध्या आपण याच परिस्थितीतून जात आहोत. नैसर्गिक जीवनशैली कधीच मागे टाकली आहे आम्ही. घरात शॉवर की तोटी यावरून श्रीमंती ठरते आमची. पाणी जास्त उडवतो तोच श्रीमंत.जे जगण्याचे तेच पिकांचेही. ज्याच्या शेतात ऊस तोच श्रीमंत. पिण्याच्या पाण्याचे वांधे असताना ऊस घेतो आम्ही. मराठवाड्यातील एकूण जमिनीपैकी ९.४ टक्के शेतीत ऊस घेतला जातो. त्यावर वर्षभरात साधारण ४,३२२.४ दशलक्ष घनमीटर पाणी उडवतो. मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीतील जिवंत पाणीसाठा दोन हजार १७१ दशलक्ष घनमीटर इतका आहे. यावरून एकट्या उसावर किती पाणी उधळतो हे लक्षात यावे. शेतीला वापरल्या जाणाऱ्या एकूण पाण्यापैकी ७१.४ टक्के पाणी एकट्या उसाला लागते. केवळ ९.४ टक्के पाणीच कडधान्याला देतो आम्ही. एक हेक्टरवर ऊस लावल्यास तो २५ हेक्टरवरील तूर किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्रावरील भुईमुगाच्या पिकाचे पाणी पितो. २१.६ लाख हेक्टरवर तुरीचे पीक घेण्यासाठी २१६१.२ दशलक्ष घनमीटर पाणी लागते. एवढे पाणी सध्या आम्ही केवळ १.१५ लाख हेक्टर उसाच्या पिकावर उधळतो. पाण्याची ही उधळपट्टी अशीच सुरू राहिल्यास कोणीही वाचवू शकणार नाही आम्हाला. दुष्काळ आम्हाला नवा नाही. तरीही काहीच शिकलो नाही आम्ही. घरात पैसे असले की दिवाळी-दसरा, नाही तर शिमगा अशातला हा प्रकार. अन्नदाता असूनही किती दिवस लोकांसमोर हात पसरणार आम्ही?हे लिहीत असतानाच औरंगाबादेतील एका गणेश मंडळाचे दोन कार्यकर्ते कार्यालयात धडकले. ‘उद्या बाप्पाचे आगमन होत आहे; पण यंदा गणपती बसविणार नाही आम्ही. वर्गणीही जमा करणार नाही. केवळ एक दानपेटी ठेवू. अशी दानपेटी शहरातील प्रत्येक मंडळासमोर ठेवली जाईल. प्रत्येकाने एक रुपया टाकावा, असे आवाहन केले जाईल. दहा दिवसानंतर शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत या सर्व दानपेट्या उघडल्या जातील. जमलेले पैसे दुष्काळग्रस्तांसाठी दिले जातील...’ पंचविशीतील तरुणांचा हा संकल्प प्रत्यक्षात येईल तेव्हा येईल, पण गणेश मंडळावर होणारा खर्च थांबवून अडचणीतील शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावे असे त्यांना वाटणे, हा मोठा बदल नाही का? बाप्पा, असा सकारात्मक बदल आमच्यातही होऊ दे. दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी घरादारात आणि शेतीत पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन आमच्या हातूनही होऊ दे.