शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

'गुगल'च्या नकाशालाही चकवा देणारी बंगळुरूची ट्रॅफिक ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 10:45 IST

भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाणारे बंगळुरू वाहतूककोंडीने बदनाम झाले आहे. येथील ट्रॅफिकचा गुगल मॅपवरूनही अंदाज लावणे कठीण झाले आहे.

योगेश बिडवई, मुख्य उपसंपादक 

एँपबेस टॅक्सी बुक करून आपण बसलो की निर्धास्त होतो. गुगल मॅप ड्रायव्हरला रस्ता दाखवितो, त्यानुसार तो गाडी चालवितो. कोणत्या रस्त्याने किती वेळ लागेल, है गुगल मॅपवरून कळते. एखाद्या नेहमीच्या रस्त्यावर ट्रॅफिक असेल तर गुगल दुसरा रस्ता सूचवितो. मात्र, भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाणारे आणि तंत्रज्ञानावर स्वार झालेल्या कर्नाटकच्या तरुणाईला याद घालणारे बंगळुरू शहर वाहतूककोंडीने बदनाम झाले आहे. येथील ट्रैफिक गुगललाही चकवा देते. येथे कोणत्या रस्त्याने किती वेळ लागेल, याचे उत्तर भल्याभल्यांना देता येत नाही.

शनिवारी, रविवारी सुटीच्या दिवशी साधारणता आठ ते दहा किलोमीटर अंतर गाठायला | २० तर सर्व कार्यालये सुरू असताना सोमवार ते शुक्रवार त्यासाठी कमीतकमी ५० मिनिटे लागतात. रविवारी मोकळे दिसणारे रस्ते सोमवारी वाहनांनी भरून जातात. रस्त्यावर पाय ठेवायलाही जागा राहत नाही. हॉर्नचा आवाज, धूर यात जीव कोंडला नाही तर नवल. एकदा तुम्ही विमानतळावर किंवा रेल्वे स्टेशनवर पोहोचला की मग शहरात जाण्यासाठी वाहनात बसता, तेव्हा हे खरेच भारताचे आयटीचे माहेरघर असलेले शहर आहे का, हा प्रश्न तुम्हाला पड्डू शकतो. जवळपास सव्वा कोटींच्या लोकसंख्येचा भार असलेल्या या शहरात दुचाकी आणि चारचाकी मिळून लाखो वाहने आहेत. कर्नाटकच्या महसुलाचा ६० टक्के हिस्सा बंगळुरूतून मिळतो. बंगळुरूत १३ हजारांपेक्षा अधिक स्टार्टअप आहेत. देशातील युनिकॉर्न उद्योगांपैकी ४० टक्के तो १०० आहेत. यावरून या महानगराचे देशातील स्थान लक्षात येऊ शकते. बंगळुरूतील एका मेट्रो लाइनचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्या भागातील वाहतूककोंडी त्यामुळे काहीशी कमी झाली. मात्र, शहरात मेट्रोच्या संथ कामामुळे वाहतूककोंडी वाढली आहे. येथील माती उत्तर भारताच्या तुलनेत वेगळी आहे. त्यामुळे कामाला वेळ लागतो, असे तंत्रज्ञांचे म्हणणे आहे.

काही ठिकाणी वर्षानुवर्षे केवळ पिलर्स उभे आहेत. काही रस्ते दोन वर्षांपासून बंद आहेत, यावर पटकन विश्वास बसणार नाही. वाढत्या लोकसंख्येनुसार येथील पायाभूत सुविधांमध्ये मात्र वाढ झालेली नाही. अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे आहेत. मुंबईसारखाच येथेही नियोजनाचा अभाव असल्याने मागील वर्षी अतिवृष्टीनंतर बंगळुरूला पुराचा तडाखा बसला. दुसरीकडे उन्हाळ्यात अनेक भागांत पाणीटंचाई असते. त्यामुळे घरांतून स्टार्टअप चालविणाऱ्यांना पाण्याची सुविधा असलेल्या भागात कार्यालये घ्यावी लागतात. त्यातून त्यांचा खर्च वाढतो

बंगळुरूला आता मेकओव्हरची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुंबईप्रमाणे बंगळुरूतही दोन वर्षांपासून महापालिका निवडणूक झालेली नाही. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या हातात सर्व कारभार आहे. येथील रस्त्यांवर मागील पाच वर्षांत तब्बल २० हजार र कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, शहरातील रस्त्यांची अवस्था वाईट आहे. बंगळुरूत एवढ्या सगळ्या समस्या असताना मुंबईप्रमाणेच हे शहर एनर्जीने भरलेले आहे. पायाभूत सुविधांचा विकास केल्यास हे शहर आणखी वेगाने विकास करेल आणि सिलिकॉन व्हॅलीच्या तोडीस तोड होईल, अशी येथील तरुणांना आशा आहे. विशेष म्हणजे बंगळुरूतील नागरी समस्या यावेळी येथील विधानसभा निवडणुकीचा मुद्दा बनल्या आहेत. मुंबईतही आता ट्राफिकचा प्रश्न जटील होत आहेत. बंगळुरूसारखी त्याची स्थिती नसली तरी रस्त्यांचा दर्जा सुधारणे, बांधकाम, फेरीवाले यावर कारवाई न केल्यास वाहतुकीचा वाघ प्रश्न आणखी जटील होऊ शकतो. मुंबईचे बंगळुरू होऊ द्यायचे नसेल तर नागरिकांनीही शहरातील सुविधांसाठी आग्रही राहिले पाहिजे. कोणत्याही शहराची संस्कृती त्या शहराच्या वाहतुकीवरून ओळखली जाते, असे म्हणतात. मुंबई शहरही पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आहे. त्यामुळे येथील रस्ते, पायाभूत सुविधा महत्त्वाच्या आहेत. त्याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे