शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

बिदागीचे कीर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:30 IST

‘श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम अर्चनं वन्दनं दास्यं, सख्यं आत्मनिवेदनम!’ भागवतात सांगितल्याप्रमाणे या नऊ भक्तीपैंकी एक म्हणजे कीर्तन. आधी ब-याचअंशी आध्यात्मिक अंगाने जाणारे हे कीर्तन बदलत्या सामाजिक संदर्भांच्या काळात प्रसार, प्रचार, लोकशिक्षण, समाजप्रबोधनाचे एक उत्तम माध्यम झाले आणि आज तर ते उपजीविकेचेही साधन झाले आहे.

‘श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम अर्चनं वन्दनं दास्यं, सख्यं आत्मनिवेदनम!’ भागवतात सांगितल्याप्रमाणे या नऊ भक्तीपैंकी एक म्हणजे कीर्तन. आधी ब-याचअंशी आध्यात्मिक अंगाने जाणारे हे कीर्तन बदलत्या सामाजिक संदर्भांच्या काळात प्रसार, प्रचार, लोकशिक्षण, समाजप्रबोधनाचे एक उत्तम माध्यम झाले आणि आज तर ते उपजीविकेचेही साधन झाले आहे. प्रश्न उपजीविकेचा आहे त्यामुळे कीर्तनाचे पारिश्रमिक रोख रकमेत मोजणे अपरिहार्य आहे. परंतु कीर्तनकारांनी कायम दान-धर्माच्याच भूमिकेतून कीर्तन करावे, अशी जी धारणा तयार झाली आहे तिची दुसरी बाजू समजून घ्यायची कुणाचीच तयारी नाही. म्हणूनच परवा नागपुरात राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सव आयोजन समितीच्या पत्रकार परिषदेत आयोजकांनी मानधनाच्या विषयावरून विदर्भातील कीर्तनकारांवर टीका केली. अशी टीका करतानाच आम्ही जे विषय कीर्तनकारांना देतो त्यात वैदर्भीय कीर्तनकार कमी पडत असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली. या कीर्तन महोत्सवात दरवेळी पुण्याकडचीच नावे का दिसतात, हा मुद्दा अधिक स्पष्ट करताना आयोजकांनी वैदर्भीय कीर्तनकारांच्या क्षमते आणि प्रतिभेवरच असे धक्कादायक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पण, यात किती तथ्य आहे हे त्यांनी सप्रमाण सांगितले नाही. प्रत्येकाची क्षमता आणि प्रतिभा सारखी नसते. त्यानुसार बिदागीचा आकडाही कमी-जास्त असणे स्वाभाविक आहे. पण, म्हणून सरसकट एकूणच वैदर्भीय कीर्तनाच्या परंपरेलाच आरोपीच्या पिंज-यात उभे करून त्या परंपरेचे मोजमाप पैशांच्या तराजूत करणे समजण्या पलीकडचे आहे. तो कलावंत असेल किंवा कीर्तनकार मानधन हा त्याचा सन्मान आहे. सन्मान मागून मिळत नसतो हे मान्य. पण, जो जितक्या सन्मानाचा हकदार आहे त्याला तो न मागता कसा मिळेल, हे बघणे आयोजक म्हणून आपली जबाबदारी नाही का? प्रश्न कीर्तनामागच्या ‘उद्देशा’चा आहे. त्या उद्देशाच्या चौकटीत इतर कीर्तनकार बसत नसतील तर त्यांच्या नावांना तशा थेट नकार देणे असहिष्णूता ठरेल. परिणामी बिदागीचे कारण पुढे करून वैदर्भीय कीर्तनकारांची ‘किंमत’ समोर आणली जात आहे. पुण्याच्या कीर्तनकारांचा प्रवासखर्च, निवासखर्च आणि बिदागी ही विदर्भातल्या कीर्तनकारांपेक्षा खरच जास्त असेल का, हे न समजण्याइतपत इथे कुणीही भोळे नाही. त्यामुळे वैदर्भीय कीर्तनकारांचा वैचारिक झंझावात झेपत नसेल तर त्यांना नका बोलावू. पण, त्यांना नाकारायचे म्हणून असे ‘बिदागीचे कीर्तन’ जगासमोर केले जाऊ नये इतकेच.

टॅग्स :cultureसांस्कृतिक