शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
3
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
4
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."
5
Narendra Modi : "तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक
6
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
7
'मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या...'; भाजप नेत्याचे कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान
8
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
9
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
10
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
11
Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर?
12
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
13
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!
14
पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या, पण..; जम्मू-काश्मीरमधून PM मोदींचा पाकला इशारा
15
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
16
रेपो रेटचा डबल धमाका! व्याजापोटीचे १.४८ लाख वाचणार, त्यातून ईलेक्ट्रीक स्कूटर घेतली तर आणखी... 
17
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
18
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
19
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
20
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम

बा बळीराजा, तू जन्मजात पराभूत!

By admin | Updated: August 30, 2016 05:06 IST

यवतमाळहून बातमी आली की, कर्जबाजारीपणा आणि निसर्गाने दिलेल्या तडाख्यामुळे हतबल झालेल्या शेतकरी बापलेकांनी, शेतातील झाडाला गळफास घेऊन एकाच वेळी आत्महत्त्या केली

यवतमाळहून बातमी आली की, कर्जबाजारीपणा आणि निसर्गाने दिलेल्या तडाख्यामुळे हतबल झालेल्या शेतकरी बापलेकांनी, शेतातील झाडाला गळफास घेऊन एकाच वेळी आत्महत्त्या केली. अवघी सहा एकर शेती, मोठे कुटुंब, तीन वर्षांपासून नापिकी, या वर्षी अतिवृष्टीचा फटका, डोक्यावर सेवा सहकारी सोसायटी व सावकाराचे कर्ज, स्वत:सकट लेकाचे आजारपण, अशा चोहो बाजूनी उभ्या ठाकलेल्या नैराश्याच्या डोंगरापुढे हात टेकून, काशीराम मुधळकर यांनी मुलगा अनिलसह मरण जवळ केले. त्यांच्या आत्महत्त्येच्या दुसऱ्याच दिवशी, सर्वोच्च न्यायालयाने दही हंडीसाठीची २० फुटांची मर्यादा वाढविण्यास नकार दिल्याची बातमी आली आणि लगेच अवघा महाराष्ट्र दही हंडीवरील चर्चेत आकंठ बुडाला. निवडणूक आली की हटकून ‘बळीराजा’ची आठवण येणाऱ्या एकाही राजकीय नेत्याला, दहीहंडीच्या उंचीवरील मर्यादेपेक्षा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बापलेकाची आत्महत्त्या चर्चेयोग्य वाटली नाही. बापलेकानी विचारविनिमय करून हा निर्णय घेतला असावा का? की आधी बापाने गळफास घेतला आणि ते दृश्य बघून हादरलेल्या मुलानेही बापाशेजारीच स्वत:ची मान फासात अडकवली? की याच्या नेमके उलट झाले असावे? कोणत्याही संवेदनशील मनास पडावे असे हे प्रश्न, एकाही राजकीय नेत्याला पडल्याचे दिसले नाही; कारण घटनेस तीन दिवस उलटून गेल्यावरदेखील एकाही पदारुढ राजकीय नेत्याने मुधळकर कुटुंबास भेट देण्याची तसदी घेतली नाही. राज्य पातळीवरील नेत्यांचे सोडून द्या; पण किमान जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदारांनाही, त्या निराधार, सैरभैर झालेल्या कुटुंबाच्या पाठीवरून सहानुभूतीचा हात फिरवावासा वाटू नये? याला कोडगेपणा म्हणावे, की निगरगट्टपणा? साधारणत: १९९० च्या दशकात शेतकरी आत्महत्त्यांचे सत्र विदर्भात सुरू झाले आणि २५ वर्षे उलटली तरी थांबायचे नाव घ्यायला तयार नाही. काही तुरळक अपवाद वगळता या वर्षी विदर्भात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. सुदैवाने किडीचाही प्रादुर्भाव झालेला नाही. आणखी काही दिवस निसर्गाचा वरदहस्त असाच राहिल्यास, या वर्षी गेल्या तीन वर्षांची कसर भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्यांच्या मनात पल्लवित झाली आहे. या आशादायक पार्श्वभूमीवर शेतकरी आत्महत्त्यांच्या दरात घसरण अभिप्रेत होती; पण प्रत्यक्ष चित्र वेगळेच आहे. एकट्या अकोला जिल्ह्यातच आॅगस्ट महिन्यात दहा शेतकऱ्यांनी मृत्यू जवळ केला. गत तीन महिन्यातील हा आकडा २८ आहे. का निर्माण होत असावी ही टोकाची नैराश्याची भावना? आपले ‘अच्छे दिन’ कधी येऊच शकत नाहीत, हा प्रकांड विश्वास कोठून येत असावा? अवघ्या काही दिवसांपूर्वी ग्राहकाच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याला, अवघा पाच पैसे किलोचा भाव मिळतो, तूर निघण्यापूर्वीच तूर डाळीचे भाव कोसळू लागतात, तेव्हा पुढील चित्र शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर लख्ख उभे राहते अन् मग तो टोकाचा निर्णय घेतो. चांगले उत्पादन झाल्याने, उत्पन्न वाढत नाही आणि ‘अच्छे दिन’ तर मुळीच येत नाहीत, हे जेव्हा स्पष्ट होते, तेव्हा शेतकऱ्यासमोर दुसरा कुठला मार्गच शिल्लक उरलेला नसतो; कारण तो साठेबाजी करून बाजारात कृत्रिम तुटवडा निर्माण करू शकत नाही, की मागणीपेक्षा पुरवठा कमी ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक उत्पादन घटवू शकत नाही! ...अन् जेव्हा नैसर्गिकरीत्या उत्पादन घटते, तेव्हाही मागणी व पुरवठ्याच्या सिद्धांताचा लाभ त्याच्या पदरात कधी पडतच नाही! त्याचा जन्मच मुळी निसर्ग, सरकार, व्यापारी, ग्राहक, सगळ्यांकडून मार खाण्यासाठी झालेला असतो. त्याच्यावर जन्मत:च पराभूत होण्याचा शिक्का बसलेला असतो. - रवी टाले