शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

बा बळीराजा, तू जन्मजात पराभूत!

By admin | Updated: August 30, 2016 05:06 IST

यवतमाळहून बातमी आली की, कर्जबाजारीपणा आणि निसर्गाने दिलेल्या तडाख्यामुळे हतबल झालेल्या शेतकरी बापलेकांनी, शेतातील झाडाला गळफास घेऊन एकाच वेळी आत्महत्त्या केली

यवतमाळहून बातमी आली की, कर्जबाजारीपणा आणि निसर्गाने दिलेल्या तडाख्यामुळे हतबल झालेल्या शेतकरी बापलेकांनी, शेतातील झाडाला गळफास घेऊन एकाच वेळी आत्महत्त्या केली. अवघी सहा एकर शेती, मोठे कुटुंब, तीन वर्षांपासून नापिकी, या वर्षी अतिवृष्टीचा फटका, डोक्यावर सेवा सहकारी सोसायटी व सावकाराचे कर्ज, स्वत:सकट लेकाचे आजारपण, अशा चोहो बाजूनी उभ्या ठाकलेल्या नैराश्याच्या डोंगरापुढे हात टेकून, काशीराम मुधळकर यांनी मुलगा अनिलसह मरण जवळ केले. त्यांच्या आत्महत्त्येच्या दुसऱ्याच दिवशी, सर्वोच्च न्यायालयाने दही हंडीसाठीची २० फुटांची मर्यादा वाढविण्यास नकार दिल्याची बातमी आली आणि लगेच अवघा महाराष्ट्र दही हंडीवरील चर्चेत आकंठ बुडाला. निवडणूक आली की हटकून ‘बळीराजा’ची आठवण येणाऱ्या एकाही राजकीय नेत्याला, दहीहंडीच्या उंचीवरील मर्यादेपेक्षा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बापलेकाची आत्महत्त्या चर्चेयोग्य वाटली नाही. बापलेकानी विचारविनिमय करून हा निर्णय घेतला असावा का? की आधी बापाने गळफास घेतला आणि ते दृश्य बघून हादरलेल्या मुलानेही बापाशेजारीच स्वत:ची मान फासात अडकवली? की याच्या नेमके उलट झाले असावे? कोणत्याही संवेदनशील मनास पडावे असे हे प्रश्न, एकाही राजकीय नेत्याला पडल्याचे दिसले नाही; कारण घटनेस तीन दिवस उलटून गेल्यावरदेखील एकाही पदारुढ राजकीय नेत्याने मुधळकर कुटुंबास भेट देण्याची तसदी घेतली नाही. राज्य पातळीवरील नेत्यांचे सोडून द्या; पण किमान जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदारांनाही, त्या निराधार, सैरभैर झालेल्या कुटुंबाच्या पाठीवरून सहानुभूतीचा हात फिरवावासा वाटू नये? याला कोडगेपणा म्हणावे, की निगरगट्टपणा? साधारणत: १९९० च्या दशकात शेतकरी आत्महत्त्यांचे सत्र विदर्भात सुरू झाले आणि २५ वर्षे उलटली तरी थांबायचे नाव घ्यायला तयार नाही. काही तुरळक अपवाद वगळता या वर्षी विदर्भात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. सुदैवाने किडीचाही प्रादुर्भाव झालेला नाही. आणखी काही दिवस निसर्गाचा वरदहस्त असाच राहिल्यास, या वर्षी गेल्या तीन वर्षांची कसर भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्यांच्या मनात पल्लवित झाली आहे. या आशादायक पार्श्वभूमीवर शेतकरी आत्महत्त्यांच्या दरात घसरण अभिप्रेत होती; पण प्रत्यक्ष चित्र वेगळेच आहे. एकट्या अकोला जिल्ह्यातच आॅगस्ट महिन्यात दहा शेतकऱ्यांनी मृत्यू जवळ केला. गत तीन महिन्यातील हा आकडा २८ आहे. का निर्माण होत असावी ही टोकाची नैराश्याची भावना? आपले ‘अच्छे दिन’ कधी येऊच शकत नाहीत, हा प्रकांड विश्वास कोठून येत असावा? अवघ्या काही दिवसांपूर्वी ग्राहकाच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याला, अवघा पाच पैसे किलोचा भाव मिळतो, तूर निघण्यापूर्वीच तूर डाळीचे भाव कोसळू लागतात, तेव्हा पुढील चित्र शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर लख्ख उभे राहते अन् मग तो टोकाचा निर्णय घेतो. चांगले उत्पादन झाल्याने, उत्पन्न वाढत नाही आणि ‘अच्छे दिन’ तर मुळीच येत नाहीत, हे जेव्हा स्पष्ट होते, तेव्हा शेतकऱ्यासमोर दुसरा कुठला मार्गच शिल्लक उरलेला नसतो; कारण तो साठेबाजी करून बाजारात कृत्रिम तुटवडा निर्माण करू शकत नाही, की मागणीपेक्षा पुरवठा कमी ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक उत्पादन घटवू शकत नाही! ...अन् जेव्हा नैसर्गिकरीत्या उत्पादन घटते, तेव्हाही मागणी व पुरवठ्याच्या सिद्धांताचा लाभ त्याच्या पदरात कधी पडतच नाही! त्याचा जन्मच मुळी निसर्ग, सरकार, व्यापारी, ग्राहक, सगळ्यांकडून मार खाण्यासाठी झालेला असतो. त्याच्यावर जन्मत:च पराभूत होण्याचा शिक्का बसलेला असतो. - रवी टाले