शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Ayodhya Verdict - अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणात संतुलित निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 05:39 IST

देशातील मुस्लीम अल्पसंख्याकांना ५ एकर पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय या वादाचा शेवट करणारा आणि साऱ्या देशाने स्वागत करावे असा आहे.

अयोध्येतील रामजन्मभूमीची २.७७ एकर जमीन मिळावी, यासाठी देशातील हिंदुत्ववाद्यांच्या संघटनांनी गेली काही दशके लावून धरलेली मागणी मान्य करतानाच देशातील मुस्लीम अल्पसंख्याकांना ५ एकर पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय या वादाचा शेवट करणारा आणि साऱ्या देशाने स्वागत करावे असा आहे. यामुळे संबंधित हिंदुत्ववादी संघटनांना राम मंदिर उभारण्याचा संकल्प तडीला नेता येईल आणि मुसलमान समाजालाही त्याच्या उपासनेसाठी पुरेशी जमीन उपलब्ध करून दिली जाईल. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने सामाजिक वास्तव लक्षात घेऊनच साऱ्यांचे समाधान होईल असा निर्णय दिला आहे. अपेक्षेप्रमाणेच देशातील सर्व राजकीय पक्षांनी त्याचे स्वागत केले आहे. हा निर्णय एकतर्फी नाही. शिवाय तो कोणाचा विजय वा पराजय करणाराही नाही. प्रत्यक्षात त्याचे स्वरूप समन्वयाचे व समंजसपणाचे आहे. ज्यांना प्रत्येकच गोष्टीचे राजकारण करायचे असते, त्यांची समजूत काढणे ही बाब अवघड असली तरी अवघड स्थितीतून बाहेर पडण्याचे व राष्ट्रीय ऐक्य कायम राखण्याचे उत्तरदायित्व आपल्या समाजाने यापूर्वी अनेकदा यशस्वीपणे पूर्ण केले आहे. राज्यघटनेने देशातील सर्व नागरिकांना धर्म निवडण्याचा अधिकार दिला आहे. राज्यघटना हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे. त्याचे पालन करण्याची जबाबदारी सरकारसह सगळ्यांचीच आहे. त्यामुळे घटनेपुढे आपल्या धर्म-पंथांचे प्रश्न गौण मानायला शिकणे ही अल्पसंख्याकांचीही जबाबदारी आहे. धर्मस्थळ ही श्रद्धेची व नम्र होऊन जाण्याची जागा आहे. ती कोणाच्याही भीतीचे वा लाचारीचे स्थान नाही. साºयांना सहजपणे जाता यावे, आपली भावना व्यक्त करता यावी असे ते श्रद्धेचे पीठ आहे. देशाची एकात्मता कायम राखणे, त्यासाठी धार्मिक वा अन्य श्रद्धांची तेढ उभी होणार नाही याची काळजी घेणे हे धार्मिक कर्तव्यही आहेच. दुसºया धर्माचा अवमान करून आपला धर्म मोठा करता येत नाही, हे आपल्या मनावर बिंबविणे हा या निर्णयाचा खरा संदेश आहे. तो साºयांनी स्वच्छ मनाने व आपलेपणाने स्वीकारायला हवा. धर्माच्या नावाने हा देश एकदा तुटला आहे. त्याचे व्रण अजूनही अनेकांच्या मनावर आहेत. ते ध्यानात घेणे व राष्ट्रीय ऐक्याची कास धरणे हे साºयांचे कर्तव्य आहे. राष्ट्राच्या जीवनात त्याची परीक्षा पाहणारे अनेक प्रसंग येतात. भारत अशा प्रसंगांना तोंड देऊन ठामपणे उभा आहे. हे ठामपण समाजाच्या ऐक्यावर उभे आहे. त्यामुळे या देशाच्या एकात्मतेसाठी सर्वधर्मसमभावाचा मार्ग स्वीकारणे आणि देशातील सर्व नागरिकांना आपले बांधव मानणे ही खरी गरज आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय