शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Ayodhya Verdict - अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणात संतुलित निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 05:39 IST

देशातील मुस्लीम अल्पसंख्याकांना ५ एकर पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय या वादाचा शेवट करणारा आणि साऱ्या देशाने स्वागत करावे असा आहे.

अयोध्येतील रामजन्मभूमीची २.७७ एकर जमीन मिळावी, यासाठी देशातील हिंदुत्ववाद्यांच्या संघटनांनी गेली काही दशके लावून धरलेली मागणी मान्य करतानाच देशातील मुस्लीम अल्पसंख्याकांना ५ एकर पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय या वादाचा शेवट करणारा आणि साऱ्या देशाने स्वागत करावे असा आहे. यामुळे संबंधित हिंदुत्ववादी संघटनांना राम मंदिर उभारण्याचा संकल्प तडीला नेता येईल आणि मुसलमान समाजालाही त्याच्या उपासनेसाठी पुरेशी जमीन उपलब्ध करून दिली जाईल. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने सामाजिक वास्तव लक्षात घेऊनच साऱ्यांचे समाधान होईल असा निर्णय दिला आहे. अपेक्षेप्रमाणेच देशातील सर्व राजकीय पक्षांनी त्याचे स्वागत केले आहे. हा निर्णय एकतर्फी नाही. शिवाय तो कोणाचा विजय वा पराजय करणाराही नाही. प्रत्यक्षात त्याचे स्वरूप समन्वयाचे व समंजसपणाचे आहे. ज्यांना प्रत्येकच गोष्टीचे राजकारण करायचे असते, त्यांची समजूत काढणे ही बाब अवघड असली तरी अवघड स्थितीतून बाहेर पडण्याचे व राष्ट्रीय ऐक्य कायम राखण्याचे उत्तरदायित्व आपल्या समाजाने यापूर्वी अनेकदा यशस्वीपणे पूर्ण केले आहे. राज्यघटनेने देशातील सर्व नागरिकांना धर्म निवडण्याचा अधिकार दिला आहे. राज्यघटना हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे. त्याचे पालन करण्याची जबाबदारी सरकारसह सगळ्यांचीच आहे. त्यामुळे घटनेपुढे आपल्या धर्म-पंथांचे प्रश्न गौण मानायला शिकणे ही अल्पसंख्याकांचीही जबाबदारी आहे. धर्मस्थळ ही श्रद्धेची व नम्र होऊन जाण्याची जागा आहे. ती कोणाच्याही भीतीचे वा लाचारीचे स्थान नाही. साºयांना सहजपणे जाता यावे, आपली भावना व्यक्त करता यावी असे ते श्रद्धेचे पीठ आहे. देशाची एकात्मता कायम राखणे, त्यासाठी धार्मिक वा अन्य श्रद्धांची तेढ उभी होणार नाही याची काळजी घेणे हे धार्मिक कर्तव्यही आहेच. दुसºया धर्माचा अवमान करून आपला धर्म मोठा करता येत नाही, हे आपल्या मनावर बिंबविणे हा या निर्णयाचा खरा संदेश आहे. तो साºयांनी स्वच्छ मनाने व आपलेपणाने स्वीकारायला हवा. धर्माच्या नावाने हा देश एकदा तुटला आहे. त्याचे व्रण अजूनही अनेकांच्या मनावर आहेत. ते ध्यानात घेणे व राष्ट्रीय ऐक्याची कास धरणे हे साºयांचे कर्तव्य आहे. राष्ट्राच्या जीवनात त्याची परीक्षा पाहणारे अनेक प्रसंग येतात. भारत अशा प्रसंगांना तोंड देऊन ठामपणे उभा आहे. हे ठामपण समाजाच्या ऐक्यावर उभे आहे. त्यामुळे या देशाच्या एकात्मतेसाठी सर्वधर्मसमभावाचा मार्ग स्वीकारणे आणि देशातील सर्व नागरिकांना आपले बांधव मानणे ही खरी गरज आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय