शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

मुंबई दूर अस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 02:20 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शुक्रवारी सिंदखेड राजा येथे आले होते. तिथे त्यांनी अपेक्षेनुरूप राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारवर तुफानी हल्ला चढवला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शुक्रवारी सिंदखेड राजा येथे आले होते. तिथे त्यांनी अपेक्षेनुरूप राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारवर तुफानी हल्ला चढवला. भाजपा हा दंगेखोरांचा पक्ष असून, जातीधर्मांमध्ये भांडणे लावून सत्तेची ऊब घेणे, हाच त्या पक्षाचा पंथ असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. भाजपासाठी हा आरोप नवा नाही. त्या पक्षाचा पूर्वाश्रमीचा अवतार असलेल्या जनसंघाच्या काळापासूनच हा आरोप होत आला आहे; पण शाहू, फुले, आंबेडकरांच्या या राज्यात जनसंघाच्या दिव्याची ज्योत मोठी होत गेली आणि पुढे तर दोनदा भाजपाचे सत्तारूपी कमळही फुलले! केजरीवाल आले होते, भाजपाचे कमळ सुकविण्यासाठी अन् महाराष्ट्राच्या भूमीत त्यांच्या पक्षाचे पीक कितपत तरारू शकते, याची चाचपणी करण्यासाठी! त्यामुळे त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीकास्त्र डागणे अपेक्षितच होते. समतोल साधण्यासाठी, बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्या ‘नागनाथ-सापनाथ’ची उधारउसनवारी करीत, त्यांनी काँग्रेसवरही वाग्बाण डागले. केजरीवाल हे कुशल नेता आणि प्रभावी वक्ता असल्याचे त्यांनी एव्हाना सिद्ध केले आहेच; पण राष्ट्रीय पातळीवर प्रभाव पाडण्याची त्यांची इच्छा केवळ तेवढ्याच भांडवलावर फलद्रूप होणार नाही. राष्ट्रीय नेता होण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी केजरीवाल यांनी यापूर्वी पंजाब, गोवा, गुजरात या राज्यांवरही लक्ष केंद्रित केले होते. पंजाबबाबत तर ते एवढे आशावादी होते, की दिल्ली सोडून त्या राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविण्याची पूर्ण तयारी त्यांनी केली होती, अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्या होत्या. त्यांच्या दुर्दैवाने दिल्ली सोडून इतरत्र कुठेही आम आदमी पक्षाला यश लाभू शकले नाही. या पार्श्वभूमीवर, काही दिवसांपूर्वी अचानक केजरीवाल सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून येणार असल्याच्या बातम्या उमटल्या अन् केजरीवालांचे पुढील लक्ष्य महाराष्ट्र असल्याची चर्चा सुरू झाली. केजरीवालांच्या शुक्रवारच्या भाषणामुळे त्याची खात्रीही पटली; पण अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकारणात प्रभाव राखून असलेल्या चार तुल्यबळ पक्षांशी मुकाबला करीत, महाराष्ट्रात प्रभाव पाडणे केजरीवालांसाठी सोपे नाही. आम आदमी पक्षाच्या प्रारंभीच्या काळातही महाराष्ट्रात पक्ष उभा करण्याचा जोरदार प्रयत्न झाला होता; पण माफकही यश लाभले नव्हते. दमदार स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांच्या जोमदार फळीशिवाय, केवळ स्वत:च्या सभांच्या भरवशावर विसंबून राहिले, तर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसाठी ‘मुंबई दूर अस्त’, असेच म्हणावे लागेल.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाAAPआप