शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
3
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
4
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
5
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
6
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
7
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
8
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
9
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
10
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
11
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
12
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
13
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
14
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
15
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
17
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
18
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
19
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
20
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई दूर अस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 02:20 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शुक्रवारी सिंदखेड राजा येथे आले होते. तिथे त्यांनी अपेक्षेनुरूप राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारवर तुफानी हल्ला चढवला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शुक्रवारी सिंदखेड राजा येथे आले होते. तिथे त्यांनी अपेक्षेनुरूप राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारवर तुफानी हल्ला चढवला. भाजपा हा दंगेखोरांचा पक्ष असून, जातीधर्मांमध्ये भांडणे लावून सत्तेची ऊब घेणे, हाच त्या पक्षाचा पंथ असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. भाजपासाठी हा आरोप नवा नाही. त्या पक्षाचा पूर्वाश्रमीचा अवतार असलेल्या जनसंघाच्या काळापासूनच हा आरोप होत आला आहे; पण शाहू, फुले, आंबेडकरांच्या या राज्यात जनसंघाच्या दिव्याची ज्योत मोठी होत गेली आणि पुढे तर दोनदा भाजपाचे सत्तारूपी कमळही फुलले! केजरीवाल आले होते, भाजपाचे कमळ सुकविण्यासाठी अन् महाराष्ट्राच्या भूमीत त्यांच्या पक्षाचे पीक कितपत तरारू शकते, याची चाचपणी करण्यासाठी! त्यामुळे त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीकास्त्र डागणे अपेक्षितच होते. समतोल साधण्यासाठी, बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्या ‘नागनाथ-सापनाथ’ची उधारउसनवारी करीत, त्यांनी काँग्रेसवरही वाग्बाण डागले. केजरीवाल हे कुशल नेता आणि प्रभावी वक्ता असल्याचे त्यांनी एव्हाना सिद्ध केले आहेच; पण राष्ट्रीय पातळीवर प्रभाव पाडण्याची त्यांची इच्छा केवळ तेवढ्याच भांडवलावर फलद्रूप होणार नाही. राष्ट्रीय नेता होण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी केजरीवाल यांनी यापूर्वी पंजाब, गोवा, गुजरात या राज्यांवरही लक्ष केंद्रित केले होते. पंजाबबाबत तर ते एवढे आशावादी होते, की दिल्ली सोडून त्या राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविण्याची पूर्ण तयारी त्यांनी केली होती, अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्या होत्या. त्यांच्या दुर्दैवाने दिल्ली सोडून इतरत्र कुठेही आम आदमी पक्षाला यश लाभू शकले नाही. या पार्श्वभूमीवर, काही दिवसांपूर्वी अचानक केजरीवाल सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून येणार असल्याच्या बातम्या उमटल्या अन् केजरीवालांचे पुढील लक्ष्य महाराष्ट्र असल्याची चर्चा सुरू झाली. केजरीवालांच्या शुक्रवारच्या भाषणामुळे त्याची खात्रीही पटली; पण अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकारणात प्रभाव राखून असलेल्या चार तुल्यबळ पक्षांशी मुकाबला करीत, महाराष्ट्रात प्रभाव पाडणे केजरीवालांसाठी सोपे नाही. आम आदमी पक्षाच्या प्रारंभीच्या काळातही महाराष्ट्रात पक्ष उभा करण्याचा जोरदार प्रयत्न झाला होता; पण माफकही यश लाभले नव्हते. दमदार स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांच्या जोमदार फळीशिवाय, केवळ स्वत:च्या सभांच्या भरवशावर विसंबून राहिले, तर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसाठी ‘मुंबई दूर अस्त’, असेच म्हणावे लागेल.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाAAPआप