शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्रबोधन करा !

By admin | Updated: April 13, 2017 02:27 IST

बड्या हॉटेल्समधील रेस्टॉरण्ट्समध्ये होणारी अन्नाची नासाडी थांबविण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे सूतोवाच केंद्र सरकारने केले आहे. प्रत्येक डिशमधील खाद्य पदार्थाचे नेमके

बड्या हॉटेल्समधील रेस्टॉरण्ट्समध्ये होणारी अन्नाची नासाडी थांबविण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे सूतोवाच केंद्र सरकारने केले आहे. प्रत्येक डिशमधील खाद्य पदार्थाचे नेमके प्रमाण किती असावे, हे हॉटेल व्यावसायिकांनीच निर्धारित करावे, अशी सूचना केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या त्यांच्या नभोवाणीवरील कार्यक्रमात अन्नाच्या नासाडीबद्दल चिंता व्यक्त केली होती. बहुधा पंतप्रधानांच्या त्या वक्तव्यातूनच पासवान यांना ही प्रेरणा मिळाली असावी. भारतीय संस्कृतीने अन्न हे पूर्ण ब्रह्म मानले आहे. अन्नाला परमेश्वराचा दर्जा देणाऱ्या देशातच अन्नाची प्रचंड नासाडी व्हावी, अन्न कचऱ्यात फेकले जावे आणि तेदेखील दररोज लाखो लोकांना पोटभर अन्न मिळत नसताना, हे खरोखरच क्लेशदायक आहे. त्यामुळे सरकारच्या उद्देशाबद्दल शंका असण्याचे काही कारणच नाही. उद्देश स्तुत्यच आहे; पण प्रत्येक काम नियमनानेच होत नसते, तर काही कामे प्रबोधनानेही केली पाहिजेत, हे सरकारने लक्षात घेण्याची गरज आहे. नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये राज्यशकट सांभाळला तेव्हा, ‘मिनिमम गव्हर्न्मेट, मॅक्सिमम गव्हर्नन्स’ अशी मोठी आकर्षक घोषणा केली होती. आम्ही किमान नियमनांसह कमाल क्षमतेने कारभार हाकू, हा त्याचा अर्थ ! दुर्दैवाने गत तीन वर्षातील मोदी सरकारचा कारभार बघू जाता, नियमनांवरच जास्त जोर दिसत आला आहे. त्यातही लोकांनी काय खावे, काय प्यावे, काय ल्यावे, हे निर्धारित करण्यावर जरा जास्तच जोर दिसतो. हॉटेल्समधील अन्नाची नासाडी रोखण्यामागील उद्देश स्तुत्य असला तरी ते एकप्रकारे नागरिकांच्या स्वातंत्र्यावरील अतिक्रमणच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पासवान यांनीच स्पष्ट केल्यानुसार, हे नियमन केवळ बड्या हॉटेल्सपुरतेच मर्यादित असणार आहे. देशात दररोज शिजविल्या जाणाऱ्या अन्नाचा विचार केल्यास, बड्या हॉटेल्समध्ये शिजविल्या जाणाऱ्या अन्नाचा वाटा अत्यल्प असणार ! मग छोटी हॉटेल्स, रस्त्याच्या कडेला थाटली जाणारी खाद्य पदार्थांची दुकाने, वर्षभर या ना त्या धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने आयोजित केले जाणारे भंडारे आणि एवढेच नव्हे तर घराघरात वाया जाणाऱ्या अन्नाचे काय? बड्या हॉटेल्समधील नासाडीच्या तुलनेत होणारी ही नासाडी किती तरी पट मोठी आहे. भारतीय खाद्यान्न महामंडळाच्या देशभरातील गुदामांमधील जवळपास ५० हजार टन अन्नधान्य २०१३ ते २०१६ या कालावधीत अक्षरश: सडले, हे सरकारी आकडेवारीच सांगते. त्यासाठी स्वत: सरकारच जबाबदार नाही का? जनतेला अनावश्यक नियमन नव्हे, तर कार्यक्षम कारभार आणि विकास हवा आहे. सरकार जेवढ्या लवकर त्याकडे लक्ष देईल, तेवढे बरे !