शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

दृष्टिकोन: जामलोचा अंत आणि बालमजुरीचे भीषण वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 00:12 IST

आपण आपल्या मुलांना बालमजुरीपासून वाचवू शकलो नाही. आता किमान अशा मुलांना उपाशी मरण्यापासून तरी वाचवू शकतो, अशी कळकळीची विनंती कैलास सत्यार्थी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे

सविता देव हरकरे 

जामलो माकदम. अवघ्या १२ वर्षांची चिमुकली. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात राहणारी. तेलंगणात मिरचीच्या शेतात मजुरीला पाठवली होती. कोरोनाने देशात थैमान घालायला सुरुवात केली आणि लॉकडाऊन जाहीर झाले. स्थलांतरित मजुरांचे जत्थेच्या जत्थे आपापल्या गावाकडे निघाले. पायी, अनवाणी, शेकडो किलोमीटरचा प्रवास करत. त्यात कोवळी जामलोसुद्धा होती. या समूहामध्ये तिच्यासारखेच आणखी चार बालमजूर होते. तब्बल १५० किलोमीटरचा प्रवास. तोसुद्धा पायी. त्यात जामलो दुर्दैवाने मिरचीच्या शेतात पडली आणि जखमी झाली; पण तिच्यासोबत असलेले थांबायला तयार नव्हते. सगळ्यांच्या मनात विचित्र भय आणि चिंता होती. सहकाऱ्यांशिवाय तिचे तिथे कुणीही नव्हते. त्या जखमी अवस्थेतच ती त्यांच्यापाठोपाठ निघाली. तीन दिवस तिची इवलीशी पावले चालत होती; पण चौथ्या दिवशी असह्य वेदनांमुळे तिला पाऊल पुढे टाकणेही कठीण झाले आणि ती मार्गातच कोसळली. पुन्हा कधीही न उठण्याकरिता. तिला कामावर घेऊन जाणाºया कंत्राटदार महिलेने जामलोला वैद्यकीय मदत मिळवून देण्याचीही तसदी घेतली नाही आणि एका निष्पाप जिवाचाबळी घेतला. या अत्यंत संतापजनक आणि हृदय हेलावून टाकणाºया घटनेनंतर पोलिसांनी त्या निर्दयी मजूर कंत्राटदार महिलेविरुद्ध सदोष मनुष्यवध आणि मानवी तस्करीचा गुन्हा नोंदवून कारवाई सुरू केली आहे.

हे जरी खरे असले तरी जामलोच्या आयुष्याचे काय? हसण्या-बागडण्याच्या वयात तिला अशा दारुण अवस्थेत प्राण गमवावे लागले, त्याला नेमके दोषी कोण? त्यातही लॉकडाऊनमध्ये अडकलेली जामलो ही काही एकमेव स्थलांतरित बालमजूर नाही. तिच्यासारखे हजारो बालमजूर देशभरात अनेक ठिकाणी अजूनही अडकून पडले आहेत. आपल्या गावापासून, आई-वडिलांपासून दूर, कारखाना मालक किंवा कंत्राटदारांच्या भरवशावर. दोनवेळ खायलाही मिळतेय की नाही कुणास ठावूक? अत्यंत भयावह असे हे चित्र आहे.यासंदर्भात बालमजुरीविरोधात संघर्ष करणारे नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी व्यक्त केलेली चिंता प्रश्नाचे गांभीर्य दर्शविणारी आहे. लॉकडाऊनमुळे अनेक लहान-लहान कारखाने बंद झाले आहेत. अशात तेथे काम करणाºया बालमजुरांचे काय? त्यांना त्यांच्या हक्काचा पूर्ण पगारही न देणारे खाऊ काय घालणार? परिणामी या मुलांचे जीवन धोक्यात आले आहे. ही सगळी मुले तस्करी करून आणलेली आहेत. त्यामुळे या बिकट परिस्थितीत त्यांना सुरक्षा, भोजन आणि आरोग्य सुविधा कशा मिळतील यासाठीचा मार्ग तातडीने शोधावा लागणार आहे. शिवाय त्यांना सुरक्षित घरी पोहोचविण्याची जबाबदारीही घ्यावी लागणार आहे. शासनाने या बालमजुरांसाठी शीघ्र कृतिदल स्थापन केल्यास ते शक्य होणार आहे. आपण आपल्या मुलांना बालमजुरीपासून वाचवू शकलो नाही. आता किमान अशा मुलांनाउपाशी मरण्यापासून तरी वाचवू शकतो, अशी कळकळीची विनंती कैलास सत्यार्थी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. त्यांची ही विनंती शासन मान्य करेल आणि तातडीने याअनुषंगाने कार्यवाही करेल अशी अपेक्षा आहे.

आपल्या देशाला लागलेला हा बालमजुरीचा कलंक कधी मिटणार? यासंदर्भातील कायदे कठोर करण्यात आल्यानंतरही त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. जगभरातील सर्वाधिक बालमजूर आपल्या भारतात आहेत. मोठ्या शहरांसोबतच लहान-लहान गावांमध्येही ही कुप्रथा आजही अस्तित्वात आहे. त्यातही बालकांचा हा वापर केवळ मजुरीपुरताच मर्यादित नसून, त्यांना अनेक कुकृत्यांचा सामनादेखील करावा लागतो. बालपण म्हणजे माणसाच्या आयुष्यातील सुवर्णक्षण. ना कुठल्या गोष्टींची चिंता, ना कुठली जबाबदारी. आपल्याच मस्तीत रमायचे, खेळायचे आणि अभ्यास करायचा. परंतु पराकोटीची गरिबी, लाचारी आणि आई-वडिलांची उपेक्षा यामुळे या भारतवर्षातील लाखो मुले बालपणाच्या आनंदापासून केवळ मुकतच नाहीत, तर बालमजुरीच्या दलदलीत फेकून त्यांच्या आयुष्याचा चुराडा केला जातो.

शिक्षणाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवून अशा मुलांचे भविष्य करपले जाते. शाळाबाह्य मुलांची संख्या बघितली की, हे वास्तव समोर येते. मुलांना त्यांचा शिक्षणाचा हक्क मिळावा, म्हणून इयत्ता आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्यात आले. शाळांमध्ये मुलांसाठी मध्यान्ह भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली; पण व्यर्थ. महासत्ता बनण्याचे स्वप्न बघणाºया या देशात लाखो गरीब लोक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याऐवजी बालवयातच त्यांना कामाला जुंपतात, हे कटूसत्य आहे. यातच त्यांचे भविष्य असल्याचा ठाम विश्वास त्यांना वाटत असावा. बालमजुरी वाढण्यामागील हे एक महत्त्वाचे कारण आहे. जोपर्यंत त्यांची ही मानसिकता बदलणार नाही, तोपर्यंत जामलो माकदमसारखी लाखो मुले अशीच उद्ध्वस्त होणार, हे मात्र निश्चित.

(लेखक नागपूर लोकमतच्या उप वृत्तसंपादक आहेत)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी