शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टिकोन: जामलोचा अंत आणि बालमजुरीचे भीषण वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 00:12 IST

आपण आपल्या मुलांना बालमजुरीपासून वाचवू शकलो नाही. आता किमान अशा मुलांना उपाशी मरण्यापासून तरी वाचवू शकतो, अशी कळकळीची विनंती कैलास सत्यार्थी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे

सविता देव हरकरे 

जामलो माकदम. अवघ्या १२ वर्षांची चिमुकली. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात राहणारी. तेलंगणात मिरचीच्या शेतात मजुरीला पाठवली होती. कोरोनाने देशात थैमान घालायला सुरुवात केली आणि लॉकडाऊन जाहीर झाले. स्थलांतरित मजुरांचे जत्थेच्या जत्थे आपापल्या गावाकडे निघाले. पायी, अनवाणी, शेकडो किलोमीटरचा प्रवास करत. त्यात कोवळी जामलोसुद्धा होती. या समूहामध्ये तिच्यासारखेच आणखी चार बालमजूर होते. तब्बल १५० किलोमीटरचा प्रवास. तोसुद्धा पायी. त्यात जामलो दुर्दैवाने मिरचीच्या शेतात पडली आणि जखमी झाली; पण तिच्यासोबत असलेले थांबायला तयार नव्हते. सगळ्यांच्या मनात विचित्र भय आणि चिंता होती. सहकाऱ्यांशिवाय तिचे तिथे कुणीही नव्हते. त्या जखमी अवस्थेतच ती त्यांच्यापाठोपाठ निघाली. तीन दिवस तिची इवलीशी पावले चालत होती; पण चौथ्या दिवशी असह्य वेदनांमुळे तिला पाऊल पुढे टाकणेही कठीण झाले आणि ती मार्गातच कोसळली. पुन्हा कधीही न उठण्याकरिता. तिला कामावर घेऊन जाणाºया कंत्राटदार महिलेने जामलोला वैद्यकीय मदत मिळवून देण्याचीही तसदी घेतली नाही आणि एका निष्पाप जिवाचाबळी घेतला. या अत्यंत संतापजनक आणि हृदय हेलावून टाकणाºया घटनेनंतर पोलिसांनी त्या निर्दयी मजूर कंत्राटदार महिलेविरुद्ध सदोष मनुष्यवध आणि मानवी तस्करीचा गुन्हा नोंदवून कारवाई सुरू केली आहे.

हे जरी खरे असले तरी जामलोच्या आयुष्याचे काय? हसण्या-बागडण्याच्या वयात तिला अशा दारुण अवस्थेत प्राण गमवावे लागले, त्याला नेमके दोषी कोण? त्यातही लॉकडाऊनमध्ये अडकलेली जामलो ही काही एकमेव स्थलांतरित बालमजूर नाही. तिच्यासारखे हजारो बालमजूर देशभरात अनेक ठिकाणी अजूनही अडकून पडले आहेत. आपल्या गावापासून, आई-वडिलांपासून दूर, कारखाना मालक किंवा कंत्राटदारांच्या भरवशावर. दोनवेळ खायलाही मिळतेय की नाही कुणास ठावूक? अत्यंत भयावह असे हे चित्र आहे.यासंदर्भात बालमजुरीविरोधात संघर्ष करणारे नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी व्यक्त केलेली चिंता प्रश्नाचे गांभीर्य दर्शविणारी आहे. लॉकडाऊनमुळे अनेक लहान-लहान कारखाने बंद झाले आहेत. अशात तेथे काम करणाºया बालमजुरांचे काय? त्यांना त्यांच्या हक्काचा पूर्ण पगारही न देणारे खाऊ काय घालणार? परिणामी या मुलांचे जीवन धोक्यात आले आहे. ही सगळी मुले तस्करी करून आणलेली आहेत. त्यामुळे या बिकट परिस्थितीत त्यांना सुरक्षा, भोजन आणि आरोग्य सुविधा कशा मिळतील यासाठीचा मार्ग तातडीने शोधावा लागणार आहे. शिवाय त्यांना सुरक्षित घरी पोहोचविण्याची जबाबदारीही घ्यावी लागणार आहे. शासनाने या बालमजुरांसाठी शीघ्र कृतिदल स्थापन केल्यास ते शक्य होणार आहे. आपण आपल्या मुलांना बालमजुरीपासून वाचवू शकलो नाही. आता किमान अशा मुलांनाउपाशी मरण्यापासून तरी वाचवू शकतो, अशी कळकळीची विनंती कैलास सत्यार्थी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. त्यांची ही विनंती शासन मान्य करेल आणि तातडीने याअनुषंगाने कार्यवाही करेल अशी अपेक्षा आहे.

आपल्या देशाला लागलेला हा बालमजुरीचा कलंक कधी मिटणार? यासंदर्भातील कायदे कठोर करण्यात आल्यानंतरही त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. जगभरातील सर्वाधिक बालमजूर आपल्या भारतात आहेत. मोठ्या शहरांसोबतच लहान-लहान गावांमध्येही ही कुप्रथा आजही अस्तित्वात आहे. त्यातही बालकांचा हा वापर केवळ मजुरीपुरताच मर्यादित नसून, त्यांना अनेक कुकृत्यांचा सामनादेखील करावा लागतो. बालपण म्हणजे माणसाच्या आयुष्यातील सुवर्णक्षण. ना कुठल्या गोष्टींची चिंता, ना कुठली जबाबदारी. आपल्याच मस्तीत रमायचे, खेळायचे आणि अभ्यास करायचा. परंतु पराकोटीची गरिबी, लाचारी आणि आई-वडिलांची उपेक्षा यामुळे या भारतवर्षातील लाखो मुले बालपणाच्या आनंदापासून केवळ मुकतच नाहीत, तर बालमजुरीच्या दलदलीत फेकून त्यांच्या आयुष्याचा चुराडा केला जातो.

शिक्षणाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवून अशा मुलांचे भविष्य करपले जाते. शाळाबाह्य मुलांची संख्या बघितली की, हे वास्तव समोर येते. मुलांना त्यांचा शिक्षणाचा हक्क मिळावा, म्हणून इयत्ता आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्यात आले. शाळांमध्ये मुलांसाठी मध्यान्ह भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली; पण व्यर्थ. महासत्ता बनण्याचे स्वप्न बघणाºया या देशात लाखो गरीब लोक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याऐवजी बालवयातच त्यांना कामाला जुंपतात, हे कटूसत्य आहे. यातच त्यांचे भविष्य असल्याचा ठाम विश्वास त्यांना वाटत असावा. बालमजुरी वाढण्यामागील हे एक महत्त्वाचे कारण आहे. जोपर्यंत त्यांची ही मानसिकता बदलणार नाही, तोपर्यंत जामलो माकदमसारखी लाखो मुले अशीच उद्ध्वस्त होणार, हे मात्र निश्चित.

(लेखक नागपूर लोकमतच्या उप वृत्तसंपादक आहेत)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी