शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अटलजी त्यांना माफ करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:22 IST

देवेंद्रभाऊंनी केलेली हजारो कंत्राटी नोकऱ्यांची घोषणा व साखरेच्या कोसळलेल्या भावाची बित्तम्बात पाठविण्याच्या तयारीला इंद्रलोकांचा मराठी भूमीतील स्टार रिपोर्टर यमके लागला होता.

- राजा माने

देवेंद्रभाऊंनी केलेली हजारो कंत्राटी नोकऱ्यांची घोषणा व साखरेच्या कोसळलेल्या भावाची बित्तम्बात पाठविण्याच्या तयारीला इंद्रलोकांचा मराठी भूमीतील स्टार रिपोर्टर यमके लागला होता. एवढ्यातच त्याच्या कानावर हाक पडली.. ‘हॅलो यमके !’.. यमकेने मागे वळून पाहिले.. एक वयस्क व्यक्ती उभी होती. डोक्याच्या मागील बाजूस उरलेल्या विस्कटलेल्या केसांना जतन करणारे तुळतुळीत टक्कल, धोतर, शर्ट, त्यावर आखूड कोट आणि काखोटीला छत्री! यमके त्या व्यक्तीकडे पाहत म्हणाला, ‘नमस्कार ! आपण कोण?’ ती व्यक्ती म्हणाली, ‘तू मला ओळखले नाहीस?’ त्याचे बोलणे ऐकत असतानाच यमकेच्या फोनची रिंग खणाणली ... ‘नारायण.. नारायण’ ! अर्थातच महागुरू नारदांचा तो फोन होता. यमके बोलू लागला, ‘नमस्कार गुरुदेव!’ यमके : गुरुदेव, देवेंद्रभाऊ.. साखरेचे भाव.. नारद : (यमकेचे बोलणे तोडत)..ते राहू दे! मी तुझ्याकडे एका व्यक्तीला धाडलं आहे. (एवढेच बोलून नारदांनी फोन कट केला)मघाच्या व्यक्तीने पुन्हा हाक दिली, ‘हॅलो यमके..’ यमके लगेचच त्या व्यक्तीकडे वळला आणि नारदांनी पाठविलेली व्यक्ती ती हीच आहे, हे क्षणार्धात जाणले.. त्याने पुन्हा त्या व्यक्तीचे मनोभावे निरीक्षण केले आणि त्याची ट्यूब पेटली.. तो चक्क ओरडलाच ! वाहवा.. कॉमन मॅन ..कॉमन मॅन ! व्यंगचित्रमहर्षी लक्ष्मण यांचे ‘कॉमन मॅन’ तुम्हीच ना?कॉमन मॅन: हो, लक्ष्मण सर स्वर्गलोकी वास्तव्यास गेल्यापासून माझे बोलणे खुंटले..संवाद थांबला.. मी मूकबधिरच झालो. अवती-भवतीच्या वातावरणाने मन अस्वस्थ होते.. पण मन मोकळे करायला संधीच नाही. म्हणून मी नारदमुनींकडे याचना केली आणि त्यांनी मला तुझ्याकडे धाडले... यमके: कॉमन मॅनकाका सांगा, मी तुमच्यासाठी काय करू? कॉमन मॅन: एका जमान्यात लक्ष्मण सरांच्या कुंचल्यातून चितारली जाणारी प्रत्येक रेषा माझं मन मोकळं करायची! आता तूच माझं मन मोकळं कर.. कर्नाटकी नाट्याने मी खूप खूप अस्वस्थ बनलोय. यमके: काका, त्यात अस्वस्थ होण्यासारखे काय आहे? भारतभूमीतील आम्हा लोकांना अशा नाटकांची सवयच झालीय.. कॉमन मॅन: अरे, सत्ता कुणाची, याच्याशी मला देणे-घेणे नाही. जे चुकीचे ते चुकीचेच ना! कुणी तरी चुकीचे करतो म्हणूनच आपण परिवर्तन करतो ना? राष्ट्रप्रेम, आपला देश आणि आपल्या देशाची राज्यघटना यांच्यापेक्षा कुणीही मोठे नाही. यमके: खरंय काका! पण पूर्वीचे सत्ताधारी तसे वागले होते, मग आताचे तसेच वागले तर बिघडले कुठे?कॉमन मॅन: मग परिवर्तन कशासाठी? देशात त्याच त्या चुका घडत राहाव्यात यासाठी? अरे, ते नाट्य आणि येडियुरप्पांचे भाषण...छे..छे..मला अटलजी आठवले! यमके: कुठे अटलजी अन् कुठे येडियुरप्पा ? एका मताने पंतप्रधानपदाला हुलकावणी मिळाली तेव्हा..विश्वासदर्शक ठरावावरील भाषण आठव..कोट्यवधी जनता टीव्हीवर पाहत होती.. भाषणाचा समारोप ‘मी माझा राजीनामा राष्ट्रपतींकडे द्यायला जात आहे..’ या वाक्याने झाला आणि टी.व्ही.पुढे बसलेल्या प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे राहिले.. प्रत्येक भारतीय हळहळला !आज येडियुरप्पा यांच्या भाषणानंतर काय झाले? राष्टÑगीताचा मान राखण्याचेही भान कुणाला राहिले नाही. म्हणूनच म्हणावेसे वाटते, अटलजी त्यांना माफ करा!

टॅग्स :BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस