शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आसामचा पेच सुटला, की..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 10:44 IST

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड तसेच न्या. सूर्य कांत, न्या. एम. एम. सुंद्रेश व न्या. मनोज मिश्रा या चाैघांनी भारतीय नागरिकत्व कायद्यातील ६-अ कलमाच्या घटनात्मक वैधतेच्या बाजूने काैल दिला, तर न्या. जे. बी. पारडीवाला यांनी हे कलम अवैध असल्याचे म्हटले. हा निकाल आसाम तसेच ईशान्येकडील बहुतेक सर्व राज्यांच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा आहे. 

भिन्न वंशाचे, धर्माचे, भिन्नभाषिक लोक केवळ शेजारी राहिल्यामुळे कोणाची संस्कृती संकटात येत नाही. उलट सहनिवासामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण वाढते आणि चार दशकांपूर्वी तेव्हाच्या राजकीय परिस्थितीवर काढलेला तोडगा योग्य की अयोग्य याचा फैसला आता केला जाऊ शकत नाही, अशा आशयाची महत्त्वपूर्ण निरीक्षणे सर्वोच्च न्यायालयाने नोंदविली आहेत. ही निरीक्षणे आसाममधील नागरिकत्वाबद्दल असली तरी ती सगळीकडेच लागू होतात. आसाममधील एक बहुचर्चित पेच सोडविणारा हा ऐतिहासिक निकाल गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच-सदस्यीय घटनापीठाने चार विरुद्ध एक अशा बहुमताने दिला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड तसेच न्या. सूर्य कांत, न्या. एम. एम. सुंद्रेश व न्या. मनोज मिश्रा या चाैघांनी भारतीय नागरिकत्व कायद्यातील ६-अ कलमाच्या घटनात्मक वैधतेच्या बाजूने काैल दिला, तर न्या. जे. बी. पारडीवाला यांनी हे कलम अवैध असल्याचे म्हटले. हा निकाल आसाम तसेच ईशान्येकडील बहुतेक सर्व राज्यांच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा आहे. 

एकतर बांगलादेशी घुसखोर कोण हे ठरविण्याची निश्चित कालमर्यादा या निकालाने ठरवली गेली आहे. इतिहासातील घटनांचा वर्तमानाशी संबंध जोडून अनाठायी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न या निकालामुळे उधळला गेला आहे. त्याचप्रमाणे बदलत्या राजकीय परिस्थितीत आता आसाम गण परिषद बाजूला फेकली गेली असली तरी अनेक दशके तेथील राजकारणावर प्रभाव टाकणारा तो प्रादेशिक पक्ष कालसुसंगत होता, हेदेखील अधोरेखित झाले आहे. या निकालाचा संबंध पाच दशकांपूर्वीच्या बांगलादेशमुक्तीशी, भारत-पाक युद्ध व त्यातून सीमावर्ती राज्यांवर झालेल्या परिणामांशी आहे. विद्यमान केंद्र सरकारने नागरिकत्व कायद्यात सुधारणा केल्यानंतर नव्याने ‘नॅशनल रजिस्टर फॉर सिटिझनशिप’ म्हणजे ‘एनआरसी’ अपडेट करण्यात आले. तेव्हा तेथील ३.२९ कोटी नागरिकांपैकी ४० लाखांवर लोकांची नावे वगळण्यात आली. त्यावर मोठा गहजब झाला. नंतर ती संख्या १९ लाखांपर्यंत खाली आली. याशिवाय, नागरिकत्वाबद्दल संशय असलेल्या लोकांची संख्या खूप मोठी आहे. कारण, बांगलादेश युद्धावेळी भारतात दाखल झालेल्या शरणार्थींची संख्या एक कोटीच्या आसपास होती. सर्वाधिक ५७ लाख शरणार्थी पश्चिम बंगालमध्ये, त्या खालोखाल ४० लाख आसाममध्ये, तर उरलेले त्रिपुरामध्ये आले होते. आक्षेप असा आहे की, लाखो शरणार्थींमुळे आसामचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, भाषिक चित्र बदलले. 

अनेक जिल्हे मुस्लीमबहुल झाले. मूळ आसामी अल्पसंख्याक झाले. त्यातूनच आसामींच्या हितरक्षणासाठी ‘ऑल आसाम स्टुडंट्स युनियन’ म्हणजे ‘आसू’ संघटनेने १९७९ साली आंदोलन उभारले. हिंसाचारात ८५५ हून अधिक लोकांचे जीव गेले. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर पंतप्रधान पदावर आलेले राजीव गांधी यांनी केंद्रीय गृहसचिव राम प्रधान यांचे प्रशासकीय काैशल्य वापरून पंजाब, आसाम, मिझोराममधील हिंसक आंदोलने थांबविण्याचे प्रयत्न केले. रक्तपात थांबविण्याच्या त्या प्रयत्नांना चांगले यश आले. १५ ऑगस्ट १९८५ ला दिल्लीत पंतप्रधान राजीव गांधी व गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या उपस्थितीत ‘आसू’चे प्रफुल्ल कुमार महंत, भृगू कुमार फुकन आणि आसाम गणसंग्राम परिषदेचे ब्रिज कुमार सरमा यांनी आंदोलकांतर्फे, तर गृह सचिव राम प्रधान व आसामचे मुख्य सचिव पी. पी. त्रिवेदी यांनी सरकारतर्फे आसाम शांतता करारावर सह्या केल्या. बांगलादेशी शरणार्थींना नागरिकत्व देणारे नागरिकत्व कायद्यातील ६-अ कलम हा त्या कराराचा मुख्य भाग आहे. १ जानेवारी १९६६ ते २५ मार्च १९७१ या कालावधीत आसाममध्ये आलेल्या बांगलादेशी शरणार्थींना त्या कलमाने अंशत: नागरिकत्व मिळाले. दहा वर्षांपर्यंत मतदानाचा हक्क नाही हा अपवाद वगळता भारताचे नागरिक म्हणून त्यांना सर्व अधिकार मिळाले. त्यामुळे आसाममध्ये रहिवाशांचे तीन प्रकार अस्तित्वात आले. 

स्वातंत्र्यानंतरच्या १९५१ ते १९६६ या काळातील मूळ आसामी हा पहिला, वरील ६-अ कलमान्वये १९६६ ते १९७१ या पाच वर्षांमध्ये भारतात आलेल्या शरणार्थींचा दुसरा आणि त्यानंतर अवैधरीत्या घुसखोरी केलेल्यांच्या तिसरा प्रकार. यापैकी दुसऱ्या शरणार्थी बांगलादेशींमुळे मूळ आसामी अल्पसंख्य बनल्याचा आक्षेप आसाम संमिलिता महासंघ नावाने विविध संघटनांनी घेतला आणि हे कलम घटनाबाह्य ठरविण्याची मागणी करणारी याचिका २०१२ साली सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. दोन सदस्यांच्या खंडपीठाने ती नंतर पाच-सदस्यीय घटनापीठाकडे पाठवली. त्या घटनापीठाने आता शरणार्थींचा पेच सोडविला असला तरी प्रत्यक्ष आसाममधील धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न थांबतील का हा प्रश्नच आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAssamआसाम