शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

अस्मितेची भेळपुरी

By admin | Updated: January 20, 2015 22:39 IST

जालन्यात ६ वे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन झाले. मराठवाड्यातील सर्व स्त्री लेखिकांची उपस्थिती हे या संमेलनाचे यश.

जालन्यात ६ वे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन झाले. मराठवाड्यातील सर्व स्त्री लेखिकांची उपस्थिती हे या संमेलनाचे यश.पी. मुरुगन या लेखकाने ‘लेखक’ म्हणून परवा आत्महत्त्या केली. यापुढे आपण साहित्यनिर्मिती करणार नाही, लेखक म्हणून आपला मृत्यू झाला आहे, असे ‘फेसबुक’वर जाहीर केले. आपल्या देशात राजकारण आणि धर्माचा पगडा एवढा वाढत चालला की, मुरुगनसारखे लेखक स्वत:हून अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारतात. त्यांच्या ‘मधोरुबागन’ या कादंबरीत कोंगुनाडू विभागातील एका प्रथेचा विषय घेतला आणि या पुस्तकाविरोधात गौंडूर समाज पेटून उठला; पण तामिळनाडूतील कोणताही राजकीय पक्ष अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभा राहिला नाही; कारण व्होट बँक. त्यामुळेच मुरुगन यांनी हा निर्णय घेतला. अशा प्रवृत्तीविरुद्ध सफदर हाश्मींनी आवाज उठविला होता. महाराष्ट्रात दुर्गा भागवत, विजय तेंडुलकर यांनी साहित्यातील राजकारण्यांच्या हस्तक्षेपाला जाहीर आक्षेप घेण्याचे धैर्य दाखविले होते. हे सर्व आठवण्याचे कारणही तसेच आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे या वर्षी उदगीर येथे होणारे आणि आता रद्द झालेले मराठवाडा साहित्य संमेलन. आता हे संमेलन नांदेड येथे होऊ घातले आहे. उदगीरचे संमेलन रद्द होण्याचे कारण शोधले तर दुर्गा भागवत, तेंडुलकर यांची स्वर्गात (हे दोघेही स्वर्ग मानत नव्हते तरी आपण समजू या) काय प्रतिक्रिया असेल याची कल्पना न केलेली बरी. कारण त्यांनी जर हे कारण शोधले, तर आपण मराठी साहित्यिक नव्हतो असेच म्हणतील. म्हणजे मुरुगन यांच्यासारखेच. मुख्यमंत्री येणार नसल्याने उदगीरकरांनी म.सा.प.ला बोहल्यावरून उठविले आहे. अगोदर मुख्यमंत्र्यांसाठी संमेलनाची तारीख बदलली आणि आता ते संमेलनच घेणार नाहीत. त्यांचा हा निर्णय शिरोधार्ह मानून म.सा.प.ने आता नांदेडच्या मुंडावळ्या बांधल्या. एकीकडे साहित्यासाठी आपला कणा ताठ ठेवणारे साहित्यिक आणि दुसरीकडे राजकारण्यांच्या दावणीला बांधलेले साहित्यिक. उदगीरचे उदाहरण पहिलेच नाही. नाशिकला कृषी साहित्य संमेलन झाले. प्रथम अध्यक्ष होते विठ्ठल वाघ, संयोजकांनी तारीख बदलली. वाघ त्या तारखेला उपलब्ध नव्हते, तर अध्यक्षच बदलले आणि ते पद रा. रं. बोेराडेंकडे आले. त्यानंतरचे कृषी साहित्य संमेलन पैठणला झाले. अध्यक्ष होते बाबा भांड. संयोजक राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यामुळे अख्खे संमेलन राष्ट्रवादीच्या ताब्यात. व्यासपीठावर त्यांचीच गर्दी. मावळते अध्यक्ष रा. रं. बोराडे यांना बसायला जागाच नव्हती. ते समोर रांगेत बसले आणि उद्घाटनाचा कार्यक्रमही झाला; पण मावळत्या अध्यक्षांना तेथे डावलले, याची कुणालाही खंत नव्हती. तीन वर्षांपूर्वी टोरँटो येथे विश्वसाहित्य संमेलन जाहीर झाले. अध्यक्ष म्हणून ना. धों. महानोरांची घोषणा झाली; पण संमेलन अजून व्हायचे आहे. उदगीरचे संमेलन का रद्द झाले, हे म.सा.प. सांगत नाही आणि उदगीरकरसुद्धा. मराठवाड्यातील कोणत्याही साहित्यिकाने संयोजकांना याचा जाब विचारला नाही. उदगीरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते लक्ष्मीकांत देशमुख; परंतु आता नांदेड येथे होऊ घातलेल्या संमेलनाचेही तेच अध्यक्ष असतील का? देशमुखांना उदगीरऐवजी नांदेड चालणार का? किंवा ते देशमुखी बाणा दाखवून बाजूला सरकणार? खरे तर या उदगीर प्रकरणावर साहित्यिक वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया अपेक्षित होती; परंतु सारे काही चिडीचूप आहे. हे सर्व घडत असतानाच शनिवार-रविवार असे दोन दिवस जालन्यात सहावे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन झाले. मराठवाड्यातील सर्व स्त्री लेखिकांची उपस्थिती हे या संमेलनाचे यश. संयोजनापासून ते सहभागापर्यंत महिलांचा सहभाग आणि रसिकांची दाद हे या संमेलनाचे यश मानता येईल. गंभीर विषयांच्या परिसंवादांना ओस पडणारे मंडप अनेक वेळा पाहतो; पण जालन्यात त्यालाही प्रतिसाद होता. उणीव होती एकच, की मराठवाड्यातील एकही प्रथितयश साहित्यिक इकडे फिरकला नाही. लेखिकांच्या संमेलनाला जाण्याची तसदी एकानेही घेऊ नये ही बाब धक्का देणारी आहे. सर्वच मान्यवर साहित्यिकांना निमंत्रण पाठविले होते असे संयोजक सांगतात. ते आले नाही, त्यामुळे फरक पडला नाही; पण मराठवाड्यातील एक चळवळ म्हणूनही साहित्यिकांनी या संमेलनाकडे दुर्लक्ष केले.- सुधीर महाजन