शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

केजरी‘वाल’, केजरी‘वाद’ आणि केजरी‘वाले’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 08:30 IST

तुम्ही खाता तेच खाणारा, तुमच्यासारखाच जगणारा नेता म्हणून तुम्ही तुमच्यातल्याच एकाला (म्हणजे मला) निवडा- हाच त्यांचा ‘मेसेज’ होय !

प्रभू चावलाज्येष्ठ पत्रकार 

विचारसरणी हीच कोणत्याही राजकीय नेत्याची मुख्य ओळख असते. पण क्वचित केव्हातरी एखादा अगम्य राजकारणी  आपण स्वत:च आपली एकमेव विचारसरणी बनून अवतरतो. चौकड्यांचा ढगळ शर्ट, विरळ मिशी आणि बुजरे हास्य अशा अवतारातले दिल्लीचे चष्माधारी खट्याळ बाळ - अरविंद केजरीवाल हे  विचारसरणीचा पत्ता नसलेल्या अशा राजकारण्याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल. एका विचित्र राजकीय कॉकटेलमुळे केजरीवाल तिहारवासी बनले होते. आता ते आपल्या  धडाकेबाज पुनरागमनाचा लाभ उठवत आहेत. अतिशी यांना मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर तात्पुरतं बसवून ते ‘अतिसामान्य रुपातील असामान्य’ या  आपल्या मूळ पीठावर पुन्हा परतलेत. नव्या अवतारात त्यांचा स्वर अधिक धारदार झालाय. त्यांच्या आक्रमकतेचा सगळा रोख मोदी आणि काँग्रेसवर आहे.   अण्णा हजारे नावाचा शोध लावून झाल्यानंतर केजरीवालांची  नवी  राजकीय शोधयात्रा सुरू झाली ती आत्मशोधाची.  केजरीवाल आणि फक्त केजरीवाल सोडून काहीच सापडले नाही त्यांना आपल्या शोधयात्रेत. आपल्याला बळी बनवले जात असल्याची जोरदार आरोळी ठोकणे, नैतिकतेच्या झेंड्याचा सदैव फडफडाट करणे, मस्तकावर नवस्वातंत्र्यसैनिकाची टोपी मिरवणे - हे सगळे त्यांनी केले. नानाविध क्लृप्त्या वापरून त्यांनी आपल्या  मतपेटीची वीण गुंफली. 

दिल्लीला लाखलाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याची भाषा केजरीवाल करत नाहीत, एआय किंवा अन्य तंत्रज्ञानाच्या लंब्याचौड्या बाता फेकत नाहीत; त्याऐवजी ते आपली स्वत:चीच ओळख उगाळतात.   चतुर शब्दबाजीतून सामुदायिक सहमती साधू इच्छितात : तुमच्यासारखाच असणारा, तुम्ही खाता तेच खाणारा, तुमच्यासारखेच कपडे घालून तुमच्यासारखेच जगणारा नेता  तुम्ही निवडायला हवा. तुमचा नेता म्हणून तुमच्यातल्याच एकाला निवडा- असा त्यांचा ‘मेसेज’ असतो. २०१४ ला मोदी भक्तांची लाट उसळली होती. त्यानंतर जात, समुदाय यांच्या भिंती ओलांडून केजरीवाल यांच्या मतदारांची दुसरी लाट आली. या सैन्याने   दिल्लीच्या दोन्ही आणि पंजाबच्या एका निवडणुकीत मोदींच्या यंत्रणेचा जबरदस्त पाडाव केला. 

सध्या  ‘केजरी’वाद ही एक मिश्र लोकानुनयी विचारसरणी बनली आहे.  गांधीवाद, मार्क्सवाद, समाजवाद किंवा भांडवलवादाला असते तशी निश्चित रूपरेखा या विचारसरणीला नाही. बदल हवा, प्रत्यक्ष  काम करणारे  सरकार हवे यासाठी  आकांत करणाऱ्या नवशिक्यांचा पक्ष बांधून लगेच सत्तेवर येणारे केजरीवाल हे बहुदा पहिले भारतीय नेते असावेत. मोफत वीज, मोफत पाणी, परवडणारी आरोग्य व्यवस्था आणि जागतिक दर्जाची सार्वजनिक शिक्षण व्यवस्था हाच केजरीनामा आहे. मोफत सेवापुरवठ्याचा त्यांचा हा नमुना आता सगळ्याच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्याचे अविभाज्य अंग बनला आहे. 

ते कट्टर हिंदू आहेत. नियमितपणे हनुमान मंदिरात जातात. त्याचवेळी आपण  धर्मनिरपेक्ष हिंदू असल्याची ग्वाहीही देतात. त्यांनी ‘आप’ला आपले मानणाऱ्या स्वयंसेवकांची एक फौज तयार केली आहे. दिल्लीच्या गल्लीगल्लीतील झोपडपट्ट्यांत, अल्पसंख्यांकांच्या वस्त्यांत ही फौज सर्वत्र आढळते. पारंपरिक राष्ट्रीय पक्षांनी आपली फसवणूक केल्याचा राग या स्वयंसेवकांच्या मनात धुमसत असतो. अतिशय दर्जाहीन सोयी आणि गचाळ आरोग्य व्यवस्था असलेल्या नागरी वस्त्यांत  राहत असल्यामुळे त्यांना अधिक चांगल्या सार्वजनिक सेवांची, परवडणाऱ्या वीज-पाण्याची, दवाखान्यांची तीव्र आस आहे. या स्वयंसेवकांमध्ये उच्चतर नागरी वातावरणात वाढलेले ऱ्होड्स  स्कॉलर्ससुद्धा आहेत. आरंभीच्या काळात प्रतिभा आणि संसाधनांची कुमक ‘आप’ला अनिवासी भारतीयांकडूनच मिळाली होती. तुरुंगवासाच्या काळात माणसाची कसोटी लागते. केजरीवाल त्या कसोटीला पुरेपूर उतरलेत. आपले क्षितिज ते आता विस्तारू पाहत आहेत. मुख्यमंत्री पदापलिकडे झेपावत, राष्ट्रीय मैदानातील व्यक्ती केंद्रित लोकसभा निवडणुकीत  पर्याय बनण्याची त्यांची इच्छा आहे.  दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ५५ टक्के मते आणि ७० पैकी ६७ जागा मिळवून त्यांनी इतिहास घडवला. त्यानंतर त्यांनी आपले क्षेत्र विस्तारले. गेल्या दहा वर्षांत एकूण १५ राज्यांत ‘आप’ने विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या. त्यापैकी अनेक राज्यांत त्यांना खातेसुद्धा खोलता आले नाही. पण एक मुद्दा मात्र केजरीवालांनी अधोरेखित केला : ‘ मला हरवता येईल, पण माझ्याकडे दुर्लक्ष मात्र कुणालाच करता  येणार नाही.’ 

एका मुलाखतीदरम्यान केजरीवाल म्हणाले होते, ‘आम्ही सामान्य माणसे आहोत. आमच्या समस्यांची उत्तरे आम्हाला डाव्या विचारसरणीतून मिळाली तर  आम्ही ती त्यांच्याकडून घेऊ. उजवीकडून मिळाली तर तिथूनही ती तेवढ्याच आनंदाने स्वीकारू.’ ‘आप’ला राष्ट्रीय पक्ष बनवणे हे केजरीवालांचे प्राथमिक उद्दिष्ट होते, ते २०२३ ला साध्य झाले. इतर छोट्या पक्षांप्रमाणे ‘आप’पाशी भौगोलिक सीमांनी आखलेली जहागीर नाही. कुणी महाबलाढ्य पुरुष किंवा स्त्रीच्या अंमलाखालील अन्य कोणताच प्रादेशिक  पक्ष अशी पुढची  पातळी गाठू शकलेला नाही हाच आप आणि इतर पक्षांतील फरक आहे.  

व्यक्तिगत  महत्त्वाकांक्षांच्या भाऊगर्दीमुळे शिखराकडे जाणारा रस्ता ठप्प झालेला असतो याची जाणीव  केजरीवालांना आहे. म्हणूनच  स्वतंत्र ओळख असलेली आपली बँडवॅगन राष्ट्रीय निवडणुकीच्या महामार्गावर त्यांनी  ‘इंडिया’ आघाडीच्या ओम्नी बसमध्ये ढकलली आहे. आपली जागा चालकाच्या अगदी जवळच राहील अशी दक्षता मात्र ते जरुर घेतात. 

केजरीवालांच्या शैलीतील अस्मितेच्या राजकारणात ‘नव समाजवाद’ सोडून तीन गोष्टी खऱ्याखुऱ्या महत्त्वाच्या ठरतात : केजरीवाल, केजरीवाद आणि  केजरीवाले !

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्ली