शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लेख : बांगलादेशाबरोबरचे भारताचे संबंध पुन्हा रुळावर येतील?

By रवी टाले | Updated: February 24, 2026 08:00 IST

बांगलादेशातील सत्तांतर भारतासाठी अनिश्चिततेचा काळ घेऊन आले आहे; परंतु संयम, सातत्य आणि दूरदृष्टीचे धोरण ठेवल्यास, यातूनही मार्ग काढणे शक्य आहे.

-रवी टाले (कार्यकारी संपादक, लोकमत, अकोला)बांगलादेशातील सत्तांतर हा संपूर्ण दक्षिण आशियाई सामरिक पटावर परिणाम करणारा घटनाक्रम आहे.तब्बल ४,०९६ किलोमीटरची भू-सीमा, सांस्कृतिक-सामाजिक नाळ, व्यापार, ऊर्जा, सुरक्षा आणि ईशान्येतील राज्यांमुळे, भारतासाठी तर हा विषय अधिकच संवेदनशील आहे. 

माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाची सत्ता उलथवल्यानंतर झालेल्या निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) सत्तेत आली आहे. बेगम खलिदा झिया यांचे पुत्र तारीक रहमान पंतप्रधान झाले आहेत. या बदलामागे इस्लामवादी प्रवाह, राष्ट्रवादी भावनांना साद घालणारे गट आणि सत्तास्थैर्याच्या नावाखाली रचलेल्या नव्या समीकरणांचा गुंता आहे. त्यामुळे भारतासाठी ही वेळ भावनिक प्रतिक्रिया देण्याची नसून, मोजक्या दूरदर्शी पावलांची आहे.

भारताने १९७१ च्या मुक्तिसंग्रामात दिलेला लष्करी आणि मानवीय पाठिंबा हा भारत-बांगलादेश नात्याचा पाया! त्यानंतर संबंधांत चढ-उतारही आले; परंतु गेल्या दशकात सहकार्याची गती वाढली. दहशतवादविरोधी कारवाया, सीमारेषेवरील समन्वय, दळणवळण, ऊर्जा, व्यापारवृद्धी या क्षेत्रांत दोन्ही देशांनी उल्लेखनीय प्रगती साधली; पण दुर्दैवाने हे सहकार्य दोन देशांतील नव्हे, तर सत्ताधाऱ्यांमधील होते, असे चित्र उभे राहिले. त्यानंतर मोहम्मद युनूस सरकारच्या कार्यकाळात संबंध रसातळालाच पोहोचले. या पार्श्वभूमीवर, सत्तांतरानंतर सहकार्य पूर्ववत होईल का, हा कळीचा मुद्दा आहे.

ईशान्य भारतातील दहशतवादी गटांना पूर्वी बांगलादेशात आश्रय लाभत असे; परंतु हसीनांच्या कार्यकाळातील कठोर कारवायांमुळे तो धोका बराच कमी झाला. आता नवीन नेतृत्वाची या विषयावरची भूमिका काय असेल, हे महत्त्वाचे. बांगलादेशात कट्टर घटकांचा प्रभाव वाढल्यास, भारतासाठी परिस्थिती गुंतागुंतीची होऊ शकते.

गेल्या दशकात बांगलादेशाने पायाभूत सुविधा, बंदरे, ऊर्जा आणि संरक्षण खरेदीसाठी चीनकडे वळण घेतले. बांगलादेशाचा चीनकडील झुकाव आणखी वाढल्यास, भारताची पूर्व किनारपट्टी आणि अंदमान-निकोबार परिसरातील सामरिक गणिते बदलू शकतात. कोलकाता-ढाका-आगरतळा बससेवा, रेल्वेमार्ग, अंतर्देशीय जलमार्ग, बंदरांचा वापर आणि सीमापार वीजपुरवठा यामुळे बांगलादेशासोबतच ईशान्य भारताला मोठा फायदा झाला आहे. 

सत्तांतरामुळे या प्रकल्पांमध्ये खंड पडू नये, ही भारताची भूमिका असली पाहिजे. तिस्ता नदी करारावर अद्याप अंतिम सहमती झालेली नाही. पश्चिम बंगालच्या भूमिकेमुळे हा विषय अधिक गुंतागुंतीचा ठरतो. बांगलादेशच्या नव्या नेतृत्वाला भारताकडून काही ठोस सवलती अपेक्षित असतील; परंतु भारताला आपल्या अंतर्गत संघराज्यीय समीकरणांचा विचार करूनच पुढे जावे लागेल.

बांगलादेशातील राजकीय पक्षांतील तीव्र स्पर्धेमुळे, विशिष्ट नेतृत्वाशी निकटता आणि इतरांशी दुरावा, ही धोरणात्मक चूक ठरू शकते. भारताने सर्वच प्रमुख राजकीय घटकांशी संवादाचे पूल उभे केले पाहिजेत. सीमाभागातील लोकसंख्येचे स्थलांतर, रोहिंग्या मुद्दा, धार्मिक ध्रुवीकरण यांचा परिणाम भारतावर होतो. 

बांगलादेशात अंतर्गत अस्थिरता वाढल्यास स्थलांतराचा दबाव पुन्हा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भारताला मानवीय दृष्टिकोन राखत, पण राष्ट्रीय सुरक्षेच्या मर्यादा स्पष्ट ठेवत, धोरण आखावे लागेल. भारताने संयम, संवाद आणि सहकार्य या त्रिसूत्रीवर भर दिला पाहिजे. नव्या नेतृत्वाला आर्थिक आणि प्रादेशिक सहकार्याची गरज भासेल. 

भारताने त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. हसीनांना राजकीय आश्रय ही त्यातील अडचण ठरू शकते. आश्रयाचा निर्णय, १९७१ पासूनचे ऐतिहासिक नाते आणि निकटचे सहकार्य लक्षात घेतल्यास तर्कसंगत, परंतु बीएनपी त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी करत आहे. 

नकार दिल्यास बांगलादेशात भारतविरोधी प्रवाहांना बळ मिळू शकते, तर प्रत्यार्पण केल्यास, भारताची विश्वासार्हता धोक्यात येईल. त्यामुळे हा प्रश्न द्विपक्षीय करार, न्यायालयीन प्रक्रिया आणि आंतरराष्ट्रीय निकषांच्या चौकटीत हाताळणेच भारतासाठी योग्य ठरेल.

हसीनांची सत्ता उलथवताना बीएनपी आणि कट्टरतावादी जमात-ए-इस्लामी सोबत होते, परंतु बीएनपी सत्तेत येताच, अवामी लीगची काही कार्यालये पुन्हा उघडली आहेत. अवामी लीगशी जवळीक असलेल्या लेफ्टनंट जनरल मोहम्मद मैनूर रहमान यांची चीफ ऑफ जनरल स्टाफसारख्या महत्त्वपूर्ण पदावर नेमणूक झाली आहे. हे भारतविरोधी जमात-ए-इस्लामीला रुचण्यासारखे नाही, तर भारताच्या दृष्टीने ही सुचिन्हे आहेत. 

मोहम्मद युनूस यांचे समर्थकही इतर शक्तींशी जवळीक वाढविण्याच्या बाजूचे आहेत. जमात-ए-इस्लामी आणि युनूस समर्थक बीएनपीच्या विरोधात गेल्यास, बीएनपी भारताच्या निकट येऊ शकते. या परिस्थितीत भारताने व्यक्तिकेंद्री नव्हे, तर संस्थाकेंद्री धोरण स्वीकारले पाहिजे. 

बांगलादेशातील सत्तांतर भारतासाठी अनिश्चिततेचा काळ घेऊन आले आहे; परंतु संयम, सातत्य आणि दूरदृष्टीच्या आधारे भूमिका घेतल्यास, यातूनही मार्ग काढणे शक्य आहे. राष्ट्रीय हित केंद्रस्थानी ठेवून उचललेली ठाम, पण मोजकी पावलेच या परीक्षेत भारताला यशस्वी ठरवतील!ravi.tale@lokmat.com

English
हिंदी सारांश
Web Title : Will India-Bangladesh relations get back on track after power shift?

Web Summary : Bangladesh's power shift impacts India. Key is balancing security, cooperation amid changing leadership, China's influence. India needs dialogue, strategic patience.
टॅग्स :Bangladeshबांगलादेशprime ministerपंतप्रधान