शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
3
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
4
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
5
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
6
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
7
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
8
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
9
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
10
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
11
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
12
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
13
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
14
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
15
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
16
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
17
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
18
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
19
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
20
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लेख: ‘राज ठाकरेंच्या घरासमोर माझ्या मुलाने दहा कोटींचा फ्लॅट घेतलाय!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 08:16 IST

मराठी माणूस बदलला आहे. ‘अंथरूण पाहून पाय पसरणे’ थांबवलेल्या मराठी कुटुंबांनी ‘चौकट’ सोडली आहे.  मुंबईत ‘मराठी’चा मुद्दा तापत नाही, तो त्यामुळे!

-संदीप प्रधान (वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत, ठाणे)महापालिकांच्या निवडणुका कधी होतील हे कुणीच छातीठोकपणे सांगू शकत नाही; परंतु आता महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जे घमासान होईल ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरिताच. ‘लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आम्ही हिंदू हिंदू करणार; पण महापालिका निवडणुकीत आम्ही मराठीमराठीच करणार,’ असे स्व. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. हिंदू म्हणून आम्ही गुजराती, उत्तर भारतीय वगैरे साऱ्यांसोबत गळ्यात गळे घालून मुस्लिम समाजाच्या विरोधात आक्रमक होणार आणि मराठी अस्मितेची झूल चढवली की लगेच आम्हाला येथील रिक्षावाल्यांपासून भाजीवाल्यांपर्यंत सारे उत्तर भारतीय आहेत हे खटकणार किंवा दुकानदारांनी मराठी पाट्या लावलेल्या नाहीत. यामुळे आमची माथी भडकणार.  

हे एकाच वेळी ‘हिंदू’ व ‘मराठी’ असणे हे चित्रपटातल्या ‘डबल रोल’सारखे आहे. बाळासाहेबांनी ही ‘डबल रोल’ची कसरत मोठ्या खुबीने साकारली. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्रे स्वीकारली तेव्हा आपल्याला हे झेपणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले असावे. मुंबईतील मराठी माणसाचा टक्का कमी झालाय हे नेमके हेरून उद्धव यांनी ‘मी मुंबईकर’ अभियान हाती घेतले. 

दीर्घकाळ मुंबईत वास्तव्य केलेल्या अमराठी लोकांना ‘मुंबईकर’ म्हणून सामावून घ्यायचे व संघर्ष टाळायचा ही भूमिका शिवसेनेसाठी दीर्घकालीन लाभाची होती; मात्र त्यावेळी पक्षात उद्धव-राज ठाकरे संघर्षात ‘मी मुंबईकर’च्या चिरफळ्या उडाल्या.

शिवसेना स्थापन झाली तेव्हा बहुतांश मराठी कुटुंबांतील आर्थिक, सामाजिक परिस्थिती सारखी होती. महाराष्ट्राची निर्मिती झाली; पण येथील नोकऱ्या मराठी माणसाला मिळत नाही, हाच कळीचा मुद्दा होता. शिवसेनेने तो उचलला.  काँग्रेसमधील ज्या मराठी नेत्यांमध्ये ही मराठी अस्मिता ठायीठायी भरली होती त्यांनी शिवसेनेला वेळोवेळी बळ दिले. आता परिस्थिती बदलली आहे. आता मराठी माणूस एकसमान राहिलेला नाही. 

‘अंथरूण पाहून पाय पसरा’ वगैरे अल्पसंतुष्टतेपासून तो खूप दूर गेला. शिक्षणाच्या बळावर तो मोठमोठी स्वप्ने पाहत आहे. ‘शिवाजी पार्कला माझ्या मुलाने दहा कोटींचा फ्लॅट घेतलाय. त्याच्या खिडकीतून राज ठाकरे यांचे शिवतीर्थ अगदी स्पष्ट दिसते,’ असे एकेकाळी शिवसेनेच्या संघर्षामुळे बँकेत नोकरी लागलेला व स्वकर्तृत्वावर जनरल मँनेजरपदावरून निवृत्त झालेला बाप अभिमानाने इतरांना सांगतो.  या कुटुंबातील बाप व त्याचा मुलगा आर्थिक विचाराने ‘ग्लोबल’ झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मनावर गारूड केले आहे. मराठीच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्यांची खरी गोची याच वर्गाने केली आहे.  

शिवसेनेने संघर्ष केल्यामुळे ज्यांना लाभ झाला त्या कुटुंबांना आता उद्धव व राज यांचे आकर्षण राहिलेले नाही. धुणीभांडी करणाऱ्या बाईला किंवा रिक्षा चालवणाऱ्या मराठी पुरुषाला आपल्या मुलाने सीबीएसई शाळेत शिकावे व मोठे व्हावे, असे वाटते. आपल्या मराठी अस्मितेशी जोडलेल्या संकुचित आर्थिक विपन्नतेतून मला बाहेर पडायचे आहे, असे नॅरेटिव्ह लोकांच्या डोक्यात फिट्ट बसल्याने मराठी पाट्यांसारखे मुद्दे पूर्वीसारखे पेटत नाहीत.

बँक, एलआयसी वगैरेंत मराठी माणसाला नोकरी मिळावी, याकरिता स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून शिवसेनेने संघर्ष केला. मराठी तरुण, तरुणींना नोकऱ्या मिळवून दिल्या. काहींनी कर्तृत्वाच्या बळावर वरपर्यंत मजल मारली; मात्र ज्या पक्षाच्या प्रयत्नांमुळे आपण येथवर पोहोचलो त्याच्या विचारांची अंमलबजावणी करण्याचा आग्रह या लोकांनी धरला नाही. तसे झाले असते तर बँकांमध्ये मराठी पाट्या लागाव्यात, याकरिता राज ठाकरे यांना आजही संघर्ष करावा लागला नसता. 

सरकार आल्यावर आपली वैचारिक सत्ता प्रस्थापित करण्याचा शिवसेनेलाही विसर पडला. भाजपने त्यांचे सरकार येताच राम मंदिरापासून अनेक अस्मितेचे मुद्दे निकाली काढले. शिवसेनेनेही तेच करायला हवे होते.

राज यांनी बँकांमध्ये मराठी पाट्या लावण्याकरिता आंदोलन सुरू करताच उद्धव यांच्या पक्षाने मुंबईत वास्तव्य करणाऱ्या अमराठी लोकांना मराठी शिकवण्याचे वर्ग सुरू करण्याची घोषणा केली. आपला विचार लोकांच्या गळी उतरवण्यात यश कसे येईल?- ‘कानाखाली आवाज काढून’ की, ‘मराठी शिकवून’, ते काळ ठरवेल; पण मराठी भाषा अभिजात होऊनही तिच्या ललाटीचा राजकीय संघर्ष काही  संपलेला नाही. (sandeep.pradhan@lokmat.com)

टॅग्स :MumbaiमुंबईmarathiमराठीMNSमनसेShiv SenaशिवसेनाMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाElectionनिवडणूक 2024