शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

बैल गेला... झोपा केला...

By राजा माने | Updated: August 13, 2018 00:26 IST

देवेंद्रभाऊ काय आणि पृथ्वीराजबाबा काय, विधिमंडळाचे सोपस्कार त्यांनी पार पाडलेच होते ना! पण तेथे तिरोडकर नामक बालक आडवा आलाच आणि पुढचे महाभारत घडते आहे. नमोच्या साथीने ‘तामिळनाडू पॅटर्न’ देवेंद्रभाऊंनी प्रामाणिकपणे राबविला आणि पुन्हा एखादा तिरोडकर उभा राहिला तर कसे?

आज इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर आपला यमके खुशीत होता. मराठी भूमीत शांतता असल्याचा रिपोर्ट इंद्र दरबाराला धाडण्याच्या तयारीत असतानाच महागुरू नारदांचा फोन आलाच... नारायण... नारायण ! (यमकेने फोन घेतला.)यमके - प्रणाम गुरुदेव ! मी आज केवळ शांतता एवढाच रिपोर्ट देण्याच्या तयारीत आहे.नारद - शिष्या, मला तो अंदाज आला, म्हणूनच तातडीने तुला फोन केला. अर्धी मराठी भूमी दुष्काळाच्या छायेत असताना तू कसला शांततेचा रिपोर्ट देतोस?यमके- वरुणराजाला कधी आणि कुठे धाडायचे हे तुमचा दरबार ठरविणार आणि वर तुम्हीच आम्हाला दुष्काळाची भीती दाखविणार! वरुणराजाला धाडा, सगळं काही व्यवस्थित होईल.नारद- इंद्रदेवांनी भूलोकी कितीही चांगले केले तरी तुम्ही लोक आनंदाने खाता कुठे? एकीकडे काही लोक आरक्षणासाठी टाहो फोडतात तर दुसरीकडे कायद्याने आरक्षण असूनही कागदी घोड्यांसाठी पोराबाळांना जीव द्यायला भाग पाडता...!यमके- आता कुणाचा जीव गेला?नारद- अरे, विदर्भभूमीत एका मुलाने जातीचा दाखला मिळाला नाही म्हणून प्राण दिल्याचे तुला माहीत नाही का? तुमचीच व्यवस्था, तुम्हीच कुजवून टाकता आणि वर आमच्या दरबाराला दोष देता.यमके - खरं आहे देवा! पण मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आता काही तरी ठोस मार्ग निघायलाच हवा.नारद - प्रश्न मार्ग निघण्याचा नाही. आपण अशा विषयांना कसे हाताळणार, हे महत्त्वाचे आहे. आज मराठा समाज ऐरणीवर आहे. धनगर, मुस्लीम आणि इतरही काही समाज पंगतीला असणारच ना...यमके - त्यासाठी तर संविधान आणि संविधानिक प्रक्रियेचा प्रत्येकाने कृतिशील आदर करायला हवा. तरीही देवेंद्रभाऊंनी ‘तामिळनाडू पॅटर्न’ मार्गाने जाऊन मराठा समाजाचे समाधान केले तर होणार नाही का?नारद - देवेंद्रभाऊ काय आणि पृथ्वीराजबाबा काय, विधिमंडळाचे सोपस्कार त्यांनी पार पाडलेच होते ना! पण तेथे तिरोडकर नामक बालक आडवा आलाच आणि पुढचे महाभारत घडते आहे. नमोच्या साथीने ‘तामिळनाडू पॅटर्न’ देवेंद्रभाऊंनी प्रामाणिकपणे राबविला आणि पुन्हा एखादा तिरोडकर उभा राहिला तर कसे?यमके - त्याचसाठी आता मराठी भूमीतील मागासवर्ग आयोगाचा रिपोर्ट आणि बाकीच्या घटनात्मक तरतुदीनुसार पुढे जाणेच मराठी भूमीला हिताचे ठरणार आहे. डॉ. सुधीर गव्हाणे नामक संशोधक-पत्रकाराने मागासलेपण कसे मोजावे, याचा मापदंड सांगणारा विशेष रिपोर्ट मागास आयोगाला दिला आहे म्हणे!नारद - हो! आता जाणता राजानेही मराठा-बहुजन फुटीची भीती व्यक्त करणारे कागदी घोडे नाचवायला सुरुवात केली आहे.यमके - मराठा समाजाच्या सर्वच संघटनांनी शांत राहण्याचे आवाहन केल्यानंतर आता अचानक जाणता राजांना तशी आठवण का व्हावी?नारद - समता हाच प्रत्येक समस्येवरचा खात्रीशीर उपाय तो संविधानाच्या चौकटीत बसविणे हेच राज्यकर्त्यांचे कर्तव्य असते. त्याचाच विसर पडल्याने आज जाणता राजाचीही ‘बैल गेला... झोपा केला...!’ अशी अवस्था झाली असावी... 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSharad Pawarशरद पवार