शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?

By श्रीनिवास नागे | Updated: June 18, 2025 06:33 IST

द्रुतगती महामार्गामुळे अंतर कमी झाले. या रस्त्यावरून गाड्या सुसाट जातात; पण त्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गावांत जाईपर्यंत नाकीनव येतात.

श्रीनिवास नागेवरिष्ठ वृत्तसंपादक, लोकमत, पिंपरी-चिंचवड

पहिली घटना रविवारची: पुणे-मुंबई 'एक्स्प्रेस वे' जवळच्या कुंडमळा येथील नदीवरचा जुना लोखंडी साकव कोसळून चार ठार. पूल पडल्याने पल्याडच्या गावांचा शहरी भागाशी संपर्क तुटला. त्यांना १५ किलोमीटरचा वळसा घालून जाण्याची वेळ आली. पर्यायी यी पुलाची मागणी मागच्या वर्षी मंजूर झाली. निधी आला; पण कार्यादेश निघण्यास वर्षभराचा वेळ गेला. ते काम सुरू होण्याआधीच जुना पूल कोसळला.

दुसरी घटना सोमवारची: कन्हऱ्हाड-चिपळूण महामार्गावरील बांधकाम सुरू असणाऱ्या पुलाच्या शेजारचा पर्यायी रस्ता डोंगरातून आलेल्या ओढ्याच्या पाण्याने वाहून गेला. महामार्गावरची वाहतूक बंद. या महामार्गाचे काम दोन वर्षापासून रखडले आहे. दोन्ही घटना राजकीय अनास्था आणि शासकीय यंत्रणेतील दिरंगाईवर, नियोजनशून्यतेवर बोट ठेवणाऱ्या. एकीकडे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठी निधीची कमतरता, तर दुसरीकडे, निधी मिळूनही अंमलबजावणी धिम्या गतीने.

महामार्गाचे जाळे विणले जात असताना त्या महामार्गांना जोडणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांचे आणि पुलांचे काय, हा प्रश्न कायम. महाराष्ट्रात सध्या पाच ते सात महामार्गाची आखणी सुरू आहे. त्यांतील काहींचे काम सुरू झाले आहे, तर काही नियोजनात आहेत. त्यांच्या खर्चाचे आकडे डोके गरगरवणारे. उदाहरणार्थ: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग ६१,००० कोटी, जालना-नांदेड ग्रीनफिल्ड महामार्ग: १५,००० कोटी, विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर २०,००० कोटी. अलीकडे विकास म्हणजे रस्तेबांधणी, असाच शासनाचा दृष्टिकोन दिसतो. रस्त्याने बाजारपेठा जोडल्या तर मागणी वाढू शकते. त्यामुळे रस्तेबांधणीतूनही उत्पादकता वाढू शकते. नवनवीन तंत्रज्ञान निर्मितीला चालना मिळू शकते, असा समज; पण हे ध्येय ठेवून नीट आखणी केली तरच तो खरा ठरेल. वस्तुतः महाराष्ट्रातील बहुतांश रस्त्यांची बांधणी फक्त प्रवासाचा वेळ वाचावा, यासाठीच केली जाते. याचे महामार्ग, घाटरस्त्याला बगल देऊन प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी त्याची उभारणी झाली.

आपल्याकडे महामार्गाची अनावश्यक बांधणीही सातत्याने चर्चेत येते. सातारा-सांगली जिल्ह्यांमध्ये दोन-दोन महामार्ग असताना आणखी तीन महामार्गाचे नियोजन आहे. खरी विसंगती येथेच आहे. अवाढव्य महामार्गाची उभारणी सुरू असताना त्यांना जोडणाऱ्या गावांपर्यंत जाणारे रस्ते, त्या रस्त्यांतील नद्या आणि ओढ्यांवर पूल बांधण्यास मात्र प्राधान्य दिले जात नाही. परिणामी महामार्गाचा मूळ उद्देश दूरच राहतो.

ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे सुधारण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणण्यात आली; पण नियोजनाने गोते खाल्ले! पावसाळ्यात या रस्त्यांवर पुराचे पाणी आल्यामुळे गावांचा संपर्कच तुटतो. गावकऱ्यांना कानकोंडे होऊन बसावे लागते. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात हे नित्याचेच. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी आल्याने किंवा पूल नसल्याने राज्यात दरवर्षी हजार-दीड हजार गावांचा संपर्क तुटतो. खराब रस्ते, नद्या-ओढ्यांवर पुलांचा अभाव आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांचा हा फटका. याचा सर्वाधिक परिणाम होतो, तो ग्रामीण भागातील लोकांच्या दैनंदिन जीवनावर आणि अर्थव्यवस्थेवर. पुलांअभावी नदी, ओढे किंवा द्रुतगती महामार्ग, घाटरस्त्याला बगल देऊन प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी त्याची उभारणी झाली.

आपल्याकडे महामार्गाची अनावश्यक बांधणीही सातत्याने चर्चेत येते. सातारा-सांगली जिल्ह्यांमध्ये दोन-दोन महामार्ग असताना आणखी तीन महामार्गाचे नियोजन आहे. खरी विसंगती येथेच आहे. अवाढव्य महामार्गाची उभारणी सुरू असताना त्यांना जोडणाऱ्या गावांपर्यंत जाणारे रस्ते, त्या रस्त्यांतील नद्या आणि ओढ्यांवर पूल बांधण्यास मात्र प्राधान्य दिले जात नाही. परिणामी महामार्गाचा मूळ उद्देश दूरच राहतो. ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे सुधारण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणण्यात आली; पण नियोजनाने गोते खाल्ले! पावसाळ्यात या रस्त्यांवर पुराचे पाणी आल्यामुळे गावांचा संपर्कच तुटतो. गावकऱ्यांना कानकोंडे होऊन बसावे लागते. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात हे नित्याचेच. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी आल्याने किंवा पूल नसल्याने राज्यात दरवर्षी हजार-दीड हजार गावांचा संपर्क तुटतो. खराब रस्ते, नद्या-ओढ्यांवर पुलांचा अभाव आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांचा हा फटका. याचा सर्वाधिक परिणाम होतो, तो ग्रामीण भागातील लोकांच्या दैनंदिन जीवनावर आणि अर्थव्यवस्थेवर.

पुलांअभावी नदी, ओढे किंवा खड्यांच्या रस्त्यांतून वाहनांनी किंवा पायी जाणे जिकिरीचे बनते. महामार्गापर्यंत पोहोचण्याची मारामार, बाजारपेठा, शाळा किंवा नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी लांबचा मार्ग किंवा पर्यायी मार्ग वापरावा लागतो. शेतमाल, दूध आणि इतर ग्रामीण उत्पादने बाजारपेठांपर्यंत पोहोचवणे मुश्किलीचे होते. वाहतूक खर्चात वाढ आणि माल पोहोचवण्यात विलंब यांमुळे लहान उद्योग आणि व्यापाराला फटका बसतो तो वेगळाच. अडलेल्या बाईला बाळंतपणासाठी महामार्गावरून दवाखान्यात न्यायचे म्हटल्यावर साठ-सत्तर किलोमीटरचे वळसे घालावे लागतात. पावसाळ्यात घरातील शिधा भरण्यासाठी, दुखल्या-खुपल्यावर औषधे आणण्यासाठी बोटी बाहेर काढाव्या लागतात.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गामुळे दोन्ही महानगरांतील अंतर कमी झाले. या रस्त्यावरून गाड्या सुसाट जातात; पण त्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गावांत जाईपर्यंत नाकीनऊ येतात. या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या खालापूर, कर्जत, मावळ, खेड, मुळशी, हवेली, वेल्हा या तालुक्यांतील गावे 'एक्स्प्रेस वे'वर कधी येणार? तेथे ना धड रस्ते, ना ओढ्या-नाल्यांवर लांब-रुंद पूल. ग्रामविकासाला खीळ घातली जात असताना अशा महामार्गाची बांधणी काय कामाची?

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रroad safetyरस्ते सुरक्षा