शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

Children's Day 2019:...त्यांची ‘दीन’वाणी अवस्था दूर व्हावी !

By किरण अग्रवाल | Updated: November 14, 2019 07:36 IST

यासंदर्भात प्रकर्षाने समोर येणारी बाब म्हणजे कुपोषण. आदिवासी वाड्या-पाड्यांवरील किंवा ग्रामीण भागातील आरोग्याची स्थिती पाहता तिथे कुपोषणाचा विषय कायम असल्याचे एकवेळ समजूनही घेता यावे

किरण अग्रवालमुले ही देवाघरची फुले, असे म्हणत उद्याचे भविष्य त्यांच्यात दडल्याचे उत्सवी सूर एकीकडे आळविले जात असताना, दुसरीकडे उमलण्याआधीच कोमेजू पाहणाऱ्या या फुलांची वर्तमानातील स्थिती संवेदनशील मनाला चटका लावणारीच दिसून यावी हे दुर्दैवीच ठरावे. विशेषत: ग्रामीण व आदिवासी भागाप्रमाणेच महानगरांमध्येदेखील कुपोषित बालके आढळून येत असल्याचे पाहता, आरोग्य यंत्रणांच्या सक्षमतेवर तर प्रश्नचिन्ह उपस्थित व्हावेच; पण अशा अवस्थेत सुदृढ व सशक्त भविष्याची स्वप्ने कशी रंगवता यावीत, असाही प्रश्न पडावा.आज देशभर बालदिन साजरा केला जाईल. बालकांमधील जाणिवा व क्षमता वाढवून राष्ट्र उभारणीच्या दृष्टीने या भावी पिढीला अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न यानिमित्ताने होतील, ते गरजेचेच आहे. कारण, उद्याच्या भविष्याचे स्वप्न आज या बालकांमध्येच पेरता व पाहताही येणारे आहे. पण आपल्याकडील उत्सवप्रियता अशी की, दिनविशेषाला आपण जी जागरूकता अगर तळमळ दाखवतो, ती तेवढी वा तशी एरव्ही दिसत नाही. त्यामुळे दिवस येतात-जातात. उत्सवी स्वरूपाचे पोषाखी कार्यक्रम पार पडतात आणि कालगणना पुढे सरकली की मागच्याचा विसर पडतो. बालदिनाच्याही बाबतीत तसेच होऊ नये. कारण, वर्तमानाच्या आधारे भविष्य घडविण्याची संधी यातून लाभणारी आहे. जे चांगले आहे, आश्वासक आहे व उद्याच्या दृष्टीने दिशादर्शक ठरेल त्याची चर्चा यानिमित्ताने व्हावीच, परंतु जिथे सुधारणांना वाव आहे, त्यातही शासन यंत्रणेकडून निधी खर्च होऊनही ज्यात समाधानकारक उद्दिष्टांची साध्यपूर्ती होताना दिसत नाही; अशा बाबींकडे लक्ष पुरवून प्रणालीतील दोष दूर करण्याचे प्रयत्न झाल्यास नक्कीच चांगले काम घडून येऊ शकेल. अर्थात, यासाठी केवळ शासकीय यंत्रणांवर विसंबून चालणार नाही तर सामाजिक संस्थांनाही पुढाकार घ्यावा लागेल.

यासंदर्भात प्रकर्षाने समोर येणारी बाब म्हणजे कुपोषण. आदिवासी वाड्या-पाड्यांवरील किंवा ग्रामीण भागातील आरोग्याची स्थिती पाहता तिथे कुपोषणाचा विषय कायम असल्याचे एकवेळ समजूनही घेता यावे, परंतु शहरी-महानगरी परिसरातदेखील कुपोषित बालके आढळून येत असल्याचे पाहता यासंबंधातील तीव्रता लक्षात यावी. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार तीन वर्षांच्या आतील व अतिशय कमी वजनाची जी बालके असतात, अशी तीव्र कुपोषित बालकांची संख्या देशात तब्बल ९३ लाख इतकी असल्याचे मागे आढळून आले होते. त्यातील दहा टक्के बालकांना तत्काळ वैद्यकीय सेवा पुरवण्याची किंवा उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्याची गरज होती. राज्यातली, म्हणजे महाराष्ट्रातील आकडेवारी बघितली तर सुमारे ९४ हजार बालके तीव्र कुपोषित आढळून आली होती, तर त्यापेक्षा बरी स्थिती असलेल्या, परंतु कुपोषितच म्हणवणाऱ्यांची संख्या पाच लाखांपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर आली होती. शिवाय मुंबई, पुणे व नाशिक यांसारख्या महानगरांमध्येही कुपोषित बालके आढळून आली आहेत. वस्तुत: कुपोषणमुक्तीसाठी शासनातर्फे मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात असताना व कोट्यवधी रुपये खर्च होत असताना हे टाळता येऊ शकलेले नाही. गावोगावी अंगणवाड्यांच्या माध्यमातून पोषण आहाराचीही व्यवस्था केली गेली आहे. परंतु बालकांऐवजी व्यवस्थेतील भलत्यांचेच पोषण त्यातून होत असल्याचे वेळोवेळी बघावयास मिळते. तेव्हा बालदिनी बालकांच्या भवितव्याची चर्चा करताना कुपोषणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या बालकांच्या समस्यांकडेही गांभीर्याने लक्ष पुरविले जाणे प्राधान्याचे ठरले आहे.

दुसरे म्हणजे, शिक्षणहक्क कायद्यान्वये सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठीही प्रयत्न होत असले तरी त्यातील अपूर्णत:ही नजरेत भरणारी आहे. दारिद्र्य व पालकांमधील अशिक्षितता यांसारखी कारणे त्यामागे आहेत, परंतु तरी यंत्रणांनी म्हणून जी काळजी घ्यायला हवी ती घेतली जाताना दिसत नाही. मध्यंतरी शालेय शिक्षणातील पटसंख्येवरील हजेरीची कडक अंमलबजावणी केली गेली तेव्हा अनेक बाबी समोर आल्या होत्या. पण व्यवस्थेतील दोषाचा भाग टाळून त्या संदर्भात विचार करायचा तर वीटभट्टीवर किंवा तत्सम कामावर असणारी अनेक बालके आजही शिक्षणापासून वंचितच राहतात. कधी कधी हजेरी पटात त्यांची नावे असतात, मात्र वर्गात ती नसतात. तेव्हा या वंचित वर्गातील बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे. अन्यथा, रोजी-रोटीच्या झगड्यात या बालकांची स्वप्ने कोमेजून जाण्याचीच शक्यता मोठी आहे. शहरातील चौकाचौकांत उदरनिर्वाहासाठी वाहनधारकांसमोर हात पसरून उभी राहणारी बालके पाहता त्यांचे शिक्षण वा आरोग्याचे प्रश्न कसे असू शकतात, याची कल्पना यावी. तेव्हा, बालदिनानिमित्ताच्या उत्सवी सोहळ्यात समाधान शोधण्यापेक्षा अशा गरजू बालकांची ‘दीन’वाणी अवस्था दूर करण्यासाठी ठोस पावले उचलली गेली तर ते अधिक पुण्याचे ठरेल. कुपोषणाचा शाप दूर करतानाच, शिक्षण-आरोग्य सेवांपासून दूर असलेल्या बालकांना अधिकार व सन्मानाने जगण्यायोग्य स्थिती उत्पन्न करून देणे, यादृष्टीने यानिमित्ताने प्रामाणिक प्रयत्न होणे अपेक्षित आहे.

टॅग्स :children's dayबालदिनHealthआरोग्य