शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

...आता पुस्तकं धीर देत नाहीत, माणसंच देतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 05:38 IST

अस्वस्थ काळाचे वर्तमान: साधीसुधी माणसं धडपड करीत कशी तगून राहिली, याच्या गोष्टी कळतात नि मग ‘सगळं काही नाहीसं होईल’ या टोकाला जाणारं मन ताळ्यावर येतं!

वसंत आबाजी डहाके

ख्यातनाम कवी आंणि समीक्षक

‘या शतकाची अखेर जवळ आली आहे’ या तुमच्या ओळीविषयी आजच्या संदर्भाने काय सांगाल?सध्याची मन:स्थिती अशी आहे की काय बोलावं समजत नाही आणि बोललो तरी काय उपयोग होणार असं वाटत राहतं. अशी जी थांबून जाण्याची अवस्था असते तिने रुद्ध होतो माणूस. गेल्या शतकात हिंसाचाराच्या खूप घटना घडल्या होत्या. माझ्या आधी व मी असताना. त्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला होता. त्यावेळीही असाच सर्वव्यापी वैफल्याचा अनुभव होता. नामदेव ढसाळांनी निराळ्या संदर्भात; पण तशाच काही सुरात म्हटलं होतं, ‘भयंकराच्या दरवाजापाशी मी उभा आहे...’ ते भयंकरपण आता दारात थांबून राहिलेलं नाही, ते सरळ आतच आलेलं आहे. वर्तमानपत्रं, टी.व्ही. चॅनल्स, आसपास भेटणारे, बोलणारे लोक सगळेच याचे पुरावे देत राहतात. हे सगळं इतकं विचित्र आणि असह्य करणारं आहे की मनात एरवी जे विचार असतात ते नाहीसे होऊन गेले की काय, अशी मानसिक स्थिती उत्पन्न होते. आपली प्रचंड लोकसंख्या, गरिबी, बेरोजगारी, नियोजनाबाबतीतली बेशिस्त, समाज म्हणून बेशिस्त हे चढत्या भाजणीत असताना आकस्मिक संकट कोसळलं की नेतृत्वाचा, जगणाऱ्या माणसांचा खरा कस लागतो. या आपत्तीला तोंड कसं द्यावं हे कुणाला समजत नाही, तेव्हा मात्र कठीण होतं. 

साधनांच्या कमतरतेमुळं लोकांची जी दैना उडाली आहे ती शब्दांच्या आवाक्यात न बसणारी आहे. मात्र, काही संस्था, एकेकटी माणसं, आरोग्य सेवकांची फौज झटते आहे हे दिसतं तेव्हा आपलं कुणीच नाही म्हणत निराश होऊन जावं अशीही परिस्थिती नाही असं वाटतं. गेल्या शतकाने दिलेली असुरक्षितता आणि आजची अस्वस्थता नि असुरक्षितता यात फरक आहे. आज प्रश्‍न केवळ माणसांच्या जगण्या-मरण्याचा नाही, जे जिवंत उरले आहेत त्यांनी भविष्यात जगावं कसं व कोणत्या उमेदीनं, आधारानं हा प्रश्‍न अनेक कंगोऱ्यांसहित दिसतो आहे. आपल्या आकलनाच्या कक्षेतच आपल्या जगाचं अस्तित्व असतं आणि भाषा हे त्या आकलनाचं मुख्य माध्यम असतं. ती भाषा तूर्त सापडत नाहीये. तुकड्यातुकड्यांनी दिसणाऱ्या प्रश्‍नांवर आपण काम तरी कसं करावं याच्या मर्यादांनी हतबलता येते. एका व्याधीने कितीतरी पातळ्यांवर प्रश्‍न उभे केले आहेत.

कोरोना विषाणू नव्या तऱ्हेनं माणसाच्या जगण्याचं कथानक विणत असेल तर चिकाटी कुठून मिळवावी?खरं सांगू, मोठ्या पुस्तकांनी प्रबंधानिबंधांनी व कालातीत तत्त्वज्ञान समजून सध्या धीर मिळत नाही. तो मिळतोय आसपासच्या काही साध्यासाध्या माणसांच्या जगण्यातून. काही जवळचे मित्र, परिचित यांनी आल्या संकटावर कशी मात केली, धडपड करीत ते कसे तगून राहिले याच्या गोष्टी कळतात नि मग सगळं काही नाहीसं होईल या टोकाला जाणारं मन ताळ्यावर येतं. रोज कोरोनातून बरे होणाऱ्यांचे आकडे बघितले तरी छान वाटतं. असं सगळं चालू असताना माझं माझं काम चालू असतं. वाचताना लिहिताना मन:स्थिती निवळते. मनोरंजनानं ताण हलका होतो; पण विसर पडत नाही. वास्तवाची खोल जाणीव होत राहते. ही व्याधी मानवनिर्मित आहे असं मी मानत नाही. माणसं माणसाला ठार करीत होती असा काळ येऊन गेला आहे. मरणाऱ्या व मारणाऱ्या दोन्हींबद्दल चिंता वाटायची असा तो काळ होता. आज असं दिसतं की आपत्तीत सापडलेल्या माणसांबद्दल चांगलीच भावना आहे. कटुतेची भावना कुणाहीबद्दल वाटत नाही. जास्तीत जास्त लोकांबद्दल माया, ममता, जिव्हाळा वाटत राहतो. त्यांच्यासाठी प्रार्थना करावी वाटते.

आजूबाजूची राजकीय-सामाजिक परिस्थिती आणि माणसं यांचं आजचं द्वंद्व तुम्हाला कसं दिसतं?राज्यकर्त्यांकडे दूरदृष्टी नसण्याचे परिणाम आपण भोगतो आहोत. अनुभव येऊनही पूर्वतयारी नसणं हा त्याचाच परिणाम. मात्र, समाजातील साध्यासाध्या माणसांनी आपल्या श्रमाचं, जिवाचं मोल देऊन माणसं वाचविली आहेत. अनपेक्षितपणे आलेल्या तणावावर उत्तरं काढून ही माणसं कामात राहिली. या काळात विशेषत: पत्रकारांची जबाबदारी मोठी होती. अपवाद वगळता या लोकांनी मात्र खूप जबाबदारीनं काम केलंय असं दिसत नाही. भेदांचा विचार वगळून पलीकडं जाण्याची ही वेळ आहे. वाईट, दोषपूर्ण गोष्टी नोंदवायच्या नाहीत असं कसं चालेल? 

‘व्यवस्था’ हा शब्द सध्या ‘पॉप्युलर’ आहे, तर त्या व्यवस्थेमधले अडथळे व उणिवा त्यांनी उघडपणे सांगायला हव्यात. समाजाला विश्‍वासाचं द्रव्य पुरविणं, शासन-प्रशासनावर सकारात्मक दबाव ठेण्याचं त्यांचं काम आहे खरं तर! ती भूमिका दिसत नाही. दुसऱ्या बाजूला हेही कळतं की खरं बोलाल तर तुमचा आवाज बंद करण्यात येईल अशा दडपशाहीचा सामना पत्रकार नि मोठ्यमोठ्या विचारवंतांना करावा लागतो आहे. चार-दोन वगळता बहुतांशी या दबावाला बळी पडतात हे दिसतं तेव्हा निराशा येते. मोठ्या बेगडी शब्दांचं प्रस्थ नि समाजमाध्यमांतून ‘दाखवेखोरी’ वाढताना मी पाहतो, पण फार काळ लोकांना त्याचं आकर्षण वाटेल असं नाही. अलीकडेच अमरावतीच्या सिव्हिल सर्जनची डायरी माझ्या पाहण्यात आली. 

एकही रुग्ण मदतीविना राहू नये यासाठी यंत्रणेतले सगळेच किती झटताहेत! त्यांची सतर्कता व जबाबदारीची जाणीव पाहून माणसं हृदयशून्य होणार नाहीत यावर माझा विश्‍वास पुन्हा पुन्हा बसतो. झाडापानांपासून, उत्सवाच्या खऱ्या गाभ्यापासून आपण सुटत चाललो आहोत असं वाटत असताना काहीतरी चमकतं आणि जाणीव होते की, ‘मध्येमध्ये असा काळ येतो की सगळं विसरलं जातं’. ही अपरिहार्यता सरते. क्रौर्य, हिंसा, वेदना, आक्रोश, हतबलता, अविश्‍वास या घटितांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. सगळ्या संदर्भासहित कुठलीही कृती तिचा आवाज व रूप घेऊन येते, येईल! कारण खरं लिहिताना झालेली आतड्याची कुरतड कुठं लपवायची हा एक प्रश्‍नच आहे.

मुलाखत : सोनाली नवांगूळ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या