शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

...आता पुस्तकं धीर देत नाहीत, माणसंच देतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 05:38 IST

अस्वस्थ काळाचे वर्तमान: साधीसुधी माणसं धडपड करीत कशी तगून राहिली, याच्या गोष्टी कळतात नि मग ‘सगळं काही नाहीसं होईल’ या टोकाला जाणारं मन ताळ्यावर येतं!

वसंत आबाजी डहाके

ख्यातनाम कवी आंणि समीक्षक

‘या शतकाची अखेर जवळ आली आहे’ या तुमच्या ओळीविषयी आजच्या संदर्भाने काय सांगाल?सध्याची मन:स्थिती अशी आहे की काय बोलावं समजत नाही आणि बोललो तरी काय उपयोग होणार असं वाटत राहतं. अशी जी थांबून जाण्याची अवस्था असते तिने रुद्ध होतो माणूस. गेल्या शतकात हिंसाचाराच्या खूप घटना घडल्या होत्या. माझ्या आधी व मी असताना. त्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला होता. त्यावेळीही असाच सर्वव्यापी वैफल्याचा अनुभव होता. नामदेव ढसाळांनी निराळ्या संदर्भात; पण तशाच काही सुरात म्हटलं होतं, ‘भयंकराच्या दरवाजापाशी मी उभा आहे...’ ते भयंकरपण आता दारात थांबून राहिलेलं नाही, ते सरळ आतच आलेलं आहे. वर्तमानपत्रं, टी.व्ही. चॅनल्स, आसपास भेटणारे, बोलणारे लोक सगळेच याचे पुरावे देत राहतात. हे सगळं इतकं विचित्र आणि असह्य करणारं आहे की मनात एरवी जे विचार असतात ते नाहीसे होऊन गेले की काय, अशी मानसिक स्थिती उत्पन्न होते. आपली प्रचंड लोकसंख्या, गरिबी, बेरोजगारी, नियोजनाबाबतीतली बेशिस्त, समाज म्हणून बेशिस्त हे चढत्या भाजणीत असताना आकस्मिक संकट कोसळलं की नेतृत्वाचा, जगणाऱ्या माणसांचा खरा कस लागतो. या आपत्तीला तोंड कसं द्यावं हे कुणाला समजत नाही, तेव्हा मात्र कठीण होतं. 

साधनांच्या कमतरतेमुळं लोकांची जी दैना उडाली आहे ती शब्दांच्या आवाक्यात न बसणारी आहे. मात्र, काही संस्था, एकेकटी माणसं, आरोग्य सेवकांची फौज झटते आहे हे दिसतं तेव्हा आपलं कुणीच नाही म्हणत निराश होऊन जावं अशीही परिस्थिती नाही असं वाटतं. गेल्या शतकाने दिलेली असुरक्षितता आणि आजची अस्वस्थता नि असुरक्षितता यात फरक आहे. आज प्रश्‍न केवळ माणसांच्या जगण्या-मरण्याचा नाही, जे जिवंत उरले आहेत त्यांनी भविष्यात जगावं कसं व कोणत्या उमेदीनं, आधारानं हा प्रश्‍न अनेक कंगोऱ्यांसहित दिसतो आहे. आपल्या आकलनाच्या कक्षेतच आपल्या जगाचं अस्तित्व असतं आणि भाषा हे त्या आकलनाचं मुख्य माध्यम असतं. ती भाषा तूर्त सापडत नाहीये. तुकड्यातुकड्यांनी दिसणाऱ्या प्रश्‍नांवर आपण काम तरी कसं करावं याच्या मर्यादांनी हतबलता येते. एका व्याधीने कितीतरी पातळ्यांवर प्रश्‍न उभे केले आहेत.

कोरोना विषाणू नव्या तऱ्हेनं माणसाच्या जगण्याचं कथानक विणत असेल तर चिकाटी कुठून मिळवावी?खरं सांगू, मोठ्या पुस्तकांनी प्रबंधानिबंधांनी व कालातीत तत्त्वज्ञान समजून सध्या धीर मिळत नाही. तो मिळतोय आसपासच्या काही साध्यासाध्या माणसांच्या जगण्यातून. काही जवळचे मित्र, परिचित यांनी आल्या संकटावर कशी मात केली, धडपड करीत ते कसे तगून राहिले याच्या गोष्टी कळतात नि मग सगळं काही नाहीसं होईल या टोकाला जाणारं मन ताळ्यावर येतं. रोज कोरोनातून बरे होणाऱ्यांचे आकडे बघितले तरी छान वाटतं. असं सगळं चालू असताना माझं माझं काम चालू असतं. वाचताना लिहिताना मन:स्थिती निवळते. मनोरंजनानं ताण हलका होतो; पण विसर पडत नाही. वास्तवाची खोल जाणीव होत राहते. ही व्याधी मानवनिर्मित आहे असं मी मानत नाही. माणसं माणसाला ठार करीत होती असा काळ येऊन गेला आहे. मरणाऱ्या व मारणाऱ्या दोन्हींबद्दल चिंता वाटायची असा तो काळ होता. आज असं दिसतं की आपत्तीत सापडलेल्या माणसांबद्दल चांगलीच भावना आहे. कटुतेची भावना कुणाहीबद्दल वाटत नाही. जास्तीत जास्त लोकांबद्दल माया, ममता, जिव्हाळा वाटत राहतो. त्यांच्यासाठी प्रार्थना करावी वाटते.

आजूबाजूची राजकीय-सामाजिक परिस्थिती आणि माणसं यांचं आजचं द्वंद्व तुम्हाला कसं दिसतं?राज्यकर्त्यांकडे दूरदृष्टी नसण्याचे परिणाम आपण भोगतो आहोत. अनुभव येऊनही पूर्वतयारी नसणं हा त्याचाच परिणाम. मात्र, समाजातील साध्यासाध्या माणसांनी आपल्या श्रमाचं, जिवाचं मोल देऊन माणसं वाचविली आहेत. अनपेक्षितपणे आलेल्या तणावावर उत्तरं काढून ही माणसं कामात राहिली. या काळात विशेषत: पत्रकारांची जबाबदारी मोठी होती. अपवाद वगळता या लोकांनी मात्र खूप जबाबदारीनं काम केलंय असं दिसत नाही. भेदांचा विचार वगळून पलीकडं जाण्याची ही वेळ आहे. वाईट, दोषपूर्ण गोष्टी नोंदवायच्या नाहीत असं कसं चालेल? 

‘व्यवस्था’ हा शब्द सध्या ‘पॉप्युलर’ आहे, तर त्या व्यवस्थेमधले अडथळे व उणिवा त्यांनी उघडपणे सांगायला हव्यात. समाजाला विश्‍वासाचं द्रव्य पुरविणं, शासन-प्रशासनावर सकारात्मक दबाव ठेण्याचं त्यांचं काम आहे खरं तर! ती भूमिका दिसत नाही. दुसऱ्या बाजूला हेही कळतं की खरं बोलाल तर तुमचा आवाज बंद करण्यात येईल अशा दडपशाहीचा सामना पत्रकार नि मोठ्यमोठ्या विचारवंतांना करावा लागतो आहे. चार-दोन वगळता बहुतांशी या दबावाला बळी पडतात हे दिसतं तेव्हा निराशा येते. मोठ्या बेगडी शब्दांचं प्रस्थ नि समाजमाध्यमांतून ‘दाखवेखोरी’ वाढताना मी पाहतो, पण फार काळ लोकांना त्याचं आकर्षण वाटेल असं नाही. अलीकडेच अमरावतीच्या सिव्हिल सर्जनची डायरी माझ्या पाहण्यात आली. 

एकही रुग्ण मदतीविना राहू नये यासाठी यंत्रणेतले सगळेच किती झटताहेत! त्यांची सतर्कता व जबाबदारीची जाणीव पाहून माणसं हृदयशून्य होणार नाहीत यावर माझा विश्‍वास पुन्हा पुन्हा बसतो. झाडापानांपासून, उत्सवाच्या खऱ्या गाभ्यापासून आपण सुटत चाललो आहोत असं वाटत असताना काहीतरी चमकतं आणि जाणीव होते की, ‘मध्येमध्ये असा काळ येतो की सगळं विसरलं जातं’. ही अपरिहार्यता सरते. क्रौर्य, हिंसा, वेदना, आक्रोश, हतबलता, अविश्‍वास या घटितांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. सगळ्या संदर्भासहित कुठलीही कृती तिचा आवाज व रूप घेऊन येते, येईल! कारण खरं लिहिताना झालेली आतड्याची कुरतड कुठं लपवायची हा एक प्रश्‍नच आहे.

मुलाखत : सोनाली नवांगूळ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या