शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: आदिपुरुष: ही असली भाषा लिहितातच का?

By विजय दर्डा | Updated: June 26, 2023 12:01 IST

Adipurush : आदिपुरुष या चित्रपटाच्या संवादांवरून सध्या मोठे वादळ निर्माण झाले आहे. वादंग व्हायलाही हवा, कारण प्रश्न भाषेचा आहे. भाषा केवळ संवादाचे माध्यम नसते. कोणतीही व्यक्ती किंवा समाजाचे आचरण तसेच संपूर्ण चरित्र भाषा आपल्यासमोर उभे करते

- डॉ. विजय दर्डा(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)आदिपुरुष या चित्रपटाच्या संवादांवरून सध्या मोठे वादळ निर्माण झाले आहे. वादंग व्हायलाही हवा, कारण प्रश्न भाषेचा आहे. भाषा केवळ संवादाचे माध्यम नसते. कोणतीही व्यक्ती किंवा समाजाचे आचरण तसेच संपूर्ण चरित्र भाषा आपल्यासमोर उभे करते. 'धनुष्याच्या प्रत्यचेतून निघालेला बाण आणि तोंडातून निघालेला शब्द कधी परत येत नाही. त्याचा परिणाम किंवा दुष्परिणाम तेवढाच समोर येतो. अशा आशयाची एक जुनी म्हण आहे. हा शब्द म्हणजे भाषा. मग ती बोली असो वा लेखी।

आदिपुरुष चित्रपटाच्या संवाद लेखनात कशा प्रकारची भाषा वापरली गेली, हे एव्हाना आपल्या सर्वांना माहीत झाले आहे. सद्य:स्थिती विचारात घेऊन संवाद लिहिले गेले आहेत असे म्हणून ते स्वीकारता येणार फरफटत आणण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम घातकच होतील. महाभारत मालिकेचे संवाद लेखन करणाऱ्या राही मासूम रजा यांची आठवण होते. त्यांनी लिहिलेले भारदस्त संवाद आजही लोकांच्या जिभेवर खेळतात. ब्रिटिश कालखंडावर आधारित 'लगान' हा चित्रपट घ्या; त्यासाठी जावेद अख्तर यांनी कोणते गीत लिहिले? 'मधुबन में जो कन्हैया किसी गोपी से मिले. राधा कैसे न जले... चित्रपट तर नव्या जमान्यातला होता, परंतु जावेदभाईंनी लिहिलेले गीत किती शालीन आहे.

याच्या अगदी विरुद्ध मनोज मुंतशीर यांनी टपोरी भाषेत 'आदिपुरुष'चे संवाद लिहिले यूट्यूबवर जाऊन पाहाल तर काही तथाकथित संतसुद्धा अशी भाषा वापरताना दिसतील म्हणा तसे तर मनोज यांना आपल्या नावापुढे केवळ मुंतशीर खटकले, तेव्हा म्हणे त्यांनी तत्काळ शुक्ल हा शब्दही जोडला... पण म्हणून त्यांनी केलेला अपराध कसा माफ होईल ? मनोज मुंतशीर है विसरले की चित्रपटांचे संवाद जनसामान्यांपर्यंत पोहोचत असतात. अनेक संवाद कालजयी होतात. 'जिनके घर शीशे के होते है, वो दूसरों के घर पर पत्थर नही फैका करते.......

आपल्या भाषेबरोबर हा घृणास्पद खेळ व्हावा, हे दुर्दैवच. भाषेच्या पावित्र्याला आपल्याकडे पूर्वीपासून महत्त्व दिले गेले आहे. मला सुषमा स्वराज यांची तीव्रतेने आठवण येते. रामायणातीलच एक प्रसंग राम-रावण युद्धाच्या आधी रामाने शिवस्तुतीसाठी रुद्राष्टकम म्हटले तेव्हा रावणाने शिव तांडव स्तोत्र म्हटले. लोक आजही रुद्राष्टकम म्हणतात; परंतु शिव तांडव स्तोत्र कोणी म्हणत नाही. हा आहे भाषेचा प्रभाव. 

भाषेच्या सटीकतेचे आणखी एक उदाहरण सुषमाजींनी दिले होते. दंडी नावाच्या रचनाकाराने दशकुमारचरितम् नाटक लिहिले. त्यातील एक राजपुत्र शिकारीला जातो आणि कोणाच्या तरी बाणाने त्याचा एक ओठ फाटतो. आता ओठ फाटल्यावर प भ ब भ म कसे उच्चारणार?- म्हणून मग नंतरच्या नाटकात राजपुत्राच्या तोंडी कोणत्याही संवादात ओष्ठव्य म्हणजे ओठांच्या साहाय्याने उच्चार करावे लागणारे शब्द नाहीत. हाही भाषेचा चमत्कार!भाषेच्या बाबतीत इतकी काळजी घेणाऱ्या देशात टपोरी भाषा बोलली जाऊ लागली आणि चित्रपटातील संवादाच्या रूपाने प्रकट होऊ लागली, राजकारणातील भाषेच्या कडवटपणामुळे समाज संकटात सापडला तर ते फार गरजेचे आहे. खूप मोठे दुर्भाग्य ठरेल. मी याच वर्षी २७ मार्च रोजी या सदरात भाषेविषयी गांभीर्याने लिहिले होते. जेव्हा भाषेचा दर्जा घसरतो, भाषा धर्माचा रंग घेते, भावनांकडे लक्ष देत नाही, तेव्हा असा समाज विघटनाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता निर्माण होत असते.

मोठमोठी युद्ध भाषेमुळेच झाली आहेत! दुर्योधनाने जर आपली मांडी थोपटली नसती आणि द्रौपदीचा अपमान केला नसता तर कदाचित महाभारत घडलेच नसते. भाषेची आपली एक मर्यादा असते. भाषा म्हणजे केवळ अक्षर नाही. हल्ली तर आपण संस्कृतला भगवा रंग दिला, उर्दूला हिरवा ही किती मोठी विटंबना आहे! काही भाषांचा संकोच झालेला आपण पाहतो, भविष्यकाळात त्या नष्ट झाल्यास आश्चर्य वाटायला नको, कोविडने लोकांचा जीव घेतलाच, पण एक भाषाही समाप्त केली हे आपल्याला ठाऊक आहे. काय? अंदमान निकोबारमध्ये राहणाऱ्या ५० वर्षांच्या लीचोचा मृत्यू झाल्याने 'सारे' नावाची एक भाषा काळाच्या पडद्याआड गेली. भाषा बोलणारी ती एकमेव व्यक्ती शिल्लक होती. जेरू भाषा बोलणारेसुद्धा दोन-तीन लोकच शिल्लक आहेत. युनेस्कोच्या यादीत अशा १९७ भाषांची नोंद आहे, ज्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पीपल्स लिग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाच्या माहितीनुसार गेल्या ५० वर्षात २२० भाषा संपल्या. हे भीतीदायक आहे.

पण मग आता काय करायचे ? प्रथम स्वतःची भाषा सुधारावी काही मुखांना शब्दाशब्दाला शिव्या देण्याची सवय असते; तर समाजानेही तेच चलन मान्य करावे काय? अजिबात नाही. समाज असा वागत नाही! हल्ली ओटीटी प्लॅटफॉर्मवर भरपूर शिवीगाळ असलेल्या वेब सिरीज दाखवल्या जातात, त्यावर लोकांनी बहिष्कार टाकला तर या मालिकांमध्ये शिव्यांची भरमार करणारे दहावेळा विचार करतील. शिव्यांपासून आपल्या मुलांना वाचविणे फार गरजेचे आहे.

आपण जे बोलत आहोत त्याचा परिणाम काय होईल, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आपण आपल्या धर्माचे आचरण करावे, परंतु दुसऱ्याच्या धर्मावर टीका करता कामा नये. यातून विनाकारण वैमनस्य वाढते. आपल्या जागतिक वाटचालीत वैमनस्य हा सर्वांत मोठा अडथळा ठरेल. आपल्या जिभेवर, लेखणीवर लगाम लावला तर आपण कित्येक संकटांपासून देश वाचवू शकतो. तुम्ही आम्ही बदलू, तर माणसे, जग बदलेल. भाषेतून जसे प्रेम उत्पन्न होते, तसेच भाषा कटुताही निर्माण करते. प्रेम की कटुता यातली निवड अखेर आपल्यालाच करायची आहे, 

टॅग्स :Adipurushआदिपुरूषbollywoodबॉलिवूडcinemaसिनेमा