शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

विशेष लेख: आदिपुरुष: ही असली भाषा लिहितातच का?

By विजय दर्डा | Updated: June 26, 2023 12:01 IST

Adipurush : आदिपुरुष या चित्रपटाच्या संवादांवरून सध्या मोठे वादळ निर्माण झाले आहे. वादंग व्हायलाही हवा, कारण प्रश्न भाषेचा आहे. भाषा केवळ संवादाचे माध्यम नसते. कोणतीही व्यक्ती किंवा समाजाचे आचरण तसेच संपूर्ण चरित्र भाषा आपल्यासमोर उभे करते

- डॉ. विजय दर्डा(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)आदिपुरुष या चित्रपटाच्या संवादांवरून सध्या मोठे वादळ निर्माण झाले आहे. वादंग व्हायलाही हवा, कारण प्रश्न भाषेचा आहे. भाषा केवळ संवादाचे माध्यम नसते. कोणतीही व्यक्ती किंवा समाजाचे आचरण तसेच संपूर्ण चरित्र भाषा आपल्यासमोर उभे करते. 'धनुष्याच्या प्रत्यचेतून निघालेला बाण आणि तोंडातून निघालेला शब्द कधी परत येत नाही. त्याचा परिणाम किंवा दुष्परिणाम तेवढाच समोर येतो. अशा आशयाची एक जुनी म्हण आहे. हा शब्द म्हणजे भाषा. मग ती बोली असो वा लेखी।

आदिपुरुष चित्रपटाच्या संवाद लेखनात कशा प्रकारची भाषा वापरली गेली, हे एव्हाना आपल्या सर्वांना माहीत झाले आहे. सद्य:स्थिती विचारात घेऊन संवाद लिहिले गेले आहेत असे म्हणून ते स्वीकारता येणार फरफटत आणण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम घातकच होतील. महाभारत मालिकेचे संवाद लेखन करणाऱ्या राही मासूम रजा यांची आठवण होते. त्यांनी लिहिलेले भारदस्त संवाद आजही लोकांच्या जिभेवर खेळतात. ब्रिटिश कालखंडावर आधारित 'लगान' हा चित्रपट घ्या; त्यासाठी जावेद अख्तर यांनी कोणते गीत लिहिले? 'मधुबन में जो कन्हैया किसी गोपी से मिले. राधा कैसे न जले... चित्रपट तर नव्या जमान्यातला होता, परंतु जावेदभाईंनी लिहिलेले गीत किती शालीन आहे.

याच्या अगदी विरुद्ध मनोज मुंतशीर यांनी टपोरी भाषेत 'आदिपुरुष'चे संवाद लिहिले यूट्यूबवर जाऊन पाहाल तर काही तथाकथित संतसुद्धा अशी भाषा वापरताना दिसतील म्हणा तसे तर मनोज यांना आपल्या नावापुढे केवळ मुंतशीर खटकले, तेव्हा म्हणे त्यांनी तत्काळ शुक्ल हा शब्दही जोडला... पण म्हणून त्यांनी केलेला अपराध कसा माफ होईल ? मनोज मुंतशीर है विसरले की चित्रपटांचे संवाद जनसामान्यांपर्यंत पोहोचत असतात. अनेक संवाद कालजयी होतात. 'जिनके घर शीशे के होते है, वो दूसरों के घर पर पत्थर नही फैका करते.......

आपल्या भाषेबरोबर हा घृणास्पद खेळ व्हावा, हे दुर्दैवच. भाषेच्या पावित्र्याला आपल्याकडे पूर्वीपासून महत्त्व दिले गेले आहे. मला सुषमा स्वराज यांची तीव्रतेने आठवण येते. रामायणातीलच एक प्रसंग राम-रावण युद्धाच्या आधी रामाने शिवस्तुतीसाठी रुद्राष्टकम म्हटले तेव्हा रावणाने शिव तांडव स्तोत्र म्हटले. लोक आजही रुद्राष्टकम म्हणतात; परंतु शिव तांडव स्तोत्र कोणी म्हणत नाही. हा आहे भाषेचा प्रभाव. 

भाषेच्या सटीकतेचे आणखी एक उदाहरण सुषमाजींनी दिले होते. दंडी नावाच्या रचनाकाराने दशकुमारचरितम् नाटक लिहिले. त्यातील एक राजपुत्र शिकारीला जातो आणि कोणाच्या तरी बाणाने त्याचा एक ओठ फाटतो. आता ओठ फाटल्यावर प भ ब भ म कसे उच्चारणार?- म्हणून मग नंतरच्या नाटकात राजपुत्राच्या तोंडी कोणत्याही संवादात ओष्ठव्य म्हणजे ओठांच्या साहाय्याने उच्चार करावे लागणारे शब्द नाहीत. हाही भाषेचा चमत्कार!भाषेच्या बाबतीत इतकी काळजी घेणाऱ्या देशात टपोरी भाषा बोलली जाऊ लागली आणि चित्रपटातील संवादाच्या रूपाने प्रकट होऊ लागली, राजकारणातील भाषेच्या कडवटपणामुळे समाज संकटात सापडला तर ते फार गरजेचे आहे. खूप मोठे दुर्भाग्य ठरेल. मी याच वर्षी २७ मार्च रोजी या सदरात भाषेविषयी गांभीर्याने लिहिले होते. जेव्हा भाषेचा दर्जा घसरतो, भाषा धर्माचा रंग घेते, भावनांकडे लक्ष देत नाही, तेव्हा असा समाज विघटनाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता निर्माण होत असते.

मोठमोठी युद्ध भाषेमुळेच झाली आहेत! दुर्योधनाने जर आपली मांडी थोपटली नसती आणि द्रौपदीचा अपमान केला नसता तर कदाचित महाभारत घडलेच नसते. भाषेची आपली एक मर्यादा असते. भाषा म्हणजे केवळ अक्षर नाही. हल्ली तर आपण संस्कृतला भगवा रंग दिला, उर्दूला हिरवा ही किती मोठी विटंबना आहे! काही भाषांचा संकोच झालेला आपण पाहतो, भविष्यकाळात त्या नष्ट झाल्यास आश्चर्य वाटायला नको, कोविडने लोकांचा जीव घेतलाच, पण एक भाषाही समाप्त केली हे आपल्याला ठाऊक आहे. काय? अंदमान निकोबारमध्ये राहणाऱ्या ५० वर्षांच्या लीचोचा मृत्यू झाल्याने 'सारे' नावाची एक भाषा काळाच्या पडद्याआड गेली. भाषा बोलणारी ती एकमेव व्यक्ती शिल्लक होती. जेरू भाषा बोलणारेसुद्धा दोन-तीन लोकच शिल्लक आहेत. युनेस्कोच्या यादीत अशा १९७ भाषांची नोंद आहे, ज्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पीपल्स लिग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाच्या माहितीनुसार गेल्या ५० वर्षात २२० भाषा संपल्या. हे भीतीदायक आहे.

पण मग आता काय करायचे ? प्रथम स्वतःची भाषा सुधारावी काही मुखांना शब्दाशब्दाला शिव्या देण्याची सवय असते; तर समाजानेही तेच चलन मान्य करावे काय? अजिबात नाही. समाज असा वागत नाही! हल्ली ओटीटी प्लॅटफॉर्मवर भरपूर शिवीगाळ असलेल्या वेब सिरीज दाखवल्या जातात, त्यावर लोकांनी बहिष्कार टाकला तर या मालिकांमध्ये शिव्यांची भरमार करणारे दहावेळा विचार करतील. शिव्यांपासून आपल्या मुलांना वाचविणे फार गरजेचे आहे.

आपण जे बोलत आहोत त्याचा परिणाम काय होईल, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आपण आपल्या धर्माचे आचरण करावे, परंतु दुसऱ्याच्या धर्मावर टीका करता कामा नये. यातून विनाकारण वैमनस्य वाढते. आपल्या जागतिक वाटचालीत वैमनस्य हा सर्वांत मोठा अडथळा ठरेल. आपल्या जिभेवर, लेखणीवर लगाम लावला तर आपण कित्येक संकटांपासून देश वाचवू शकतो. तुम्ही आम्ही बदलू, तर माणसे, जग बदलेल. भाषेतून जसे प्रेम उत्पन्न होते, तसेच भाषा कटुताही निर्माण करते. प्रेम की कटुता यातली निवड अखेर आपल्यालाच करायची आहे, 

टॅग्स :Adipurushआदिपुरूषbollywoodबॉलिवूडcinemaसिनेमा