शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
5
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
6
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
7
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
8
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
9
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
10
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
11
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
12
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
13
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
14
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
15
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
16
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
17
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
18
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
19
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
20
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

विशेष लेख: आदिपुरुष: ही असली भाषा लिहितातच का?

By विजय दर्डा | Updated: June 26, 2023 12:01 IST

Adipurush : आदिपुरुष या चित्रपटाच्या संवादांवरून सध्या मोठे वादळ निर्माण झाले आहे. वादंग व्हायलाही हवा, कारण प्रश्न भाषेचा आहे. भाषा केवळ संवादाचे माध्यम नसते. कोणतीही व्यक्ती किंवा समाजाचे आचरण तसेच संपूर्ण चरित्र भाषा आपल्यासमोर उभे करते

- डॉ. विजय दर्डा(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)आदिपुरुष या चित्रपटाच्या संवादांवरून सध्या मोठे वादळ निर्माण झाले आहे. वादंग व्हायलाही हवा, कारण प्रश्न भाषेचा आहे. भाषा केवळ संवादाचे माध्यम नसते. कोणतीही व्यक्ती किंवा समाजाचे आचरण तसेच संपूर्ण चरित्र भाषा आपल्यासमोर उभे करते. 'धनुष्याच्या प्रत्यचेतून निघालेला बाण आणि तोंडातून निघालेला शब्द कधी परत येत नाही. त्याचा परिणाम किंवा दुष्परिणाम तेवढाच समोर येतो. अशा आशयाची एक जुनी म्हण आहे. हा शब्द म्हणजे भाषा. मग ती बोली असो वा लेखी।

आदिपुरुष चित्रपटाच्या संवाद लेखनात कशा प्रकारची भाषा वापरली गेली, हे एव्हाना आपल्या सर्वांना माहीत झाले आहे. सद्य:स्थिती विचारात घेऊन संवाद लिहिले गेले आहेत असे म्हणून ते स्वीकारता येणार फरफटत आणण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम घातकच होतील. महाभारत मालिकेचे संवाद लेखन करणाऱ्या राही मासूम रजा यांची आठवण होते. त्यांनी लिहिलेले भारदस्त संवाद आजही लोकांच्या जिभेवर खेळतात. ब्रिटिश कालखंडावर आधारित 'लगान' हा चित्रपट घ्या; त्यासाठी जावेद अख्तर यांनी कोणते गीत लिहिले? 'मधुबन में जो कन्हैया किसी गोपी से मिले. राधा कैसे न जले... चित्रपट तर नव्या जमान्यातला होता, परंतु जावेदभाईंनी लिहिलेले गीत किती शालीन आहे.

याच्या अगदी विरुद्ध मनोज मुंतशीर यांनी टपोरी भाषेत 'आदिपुरुष'चे संवाद लिहिले यूट्यूबवर जाऊन पाहाल तर काही तथाकथित संतसुद्धा अशी भाषा वापरताना दिसतील म्हणा तसे तर मनोज यांना आपल्या नावापुढे केवळ मुंतशीर खटकले, तेव्हा म्हणे त्यांनी तत्काळ शुक्ल हा शब्दही जोडला... पण म्हणून त्यांनी केलेला अपराध कसा माफ होईल ? मनोज मुंतशीर है विसरले की चित्रपटांचे संवाद जनसामान्यांपर्यंत पोहोचत असतात. अनेक संवाद कालजयी होतात. 'जिनके घर शीशे के होते है, वो दूसरों के घर पर पत्थर नही फैका करते.......

आपल्या भाषेबरोबर हा घृणास्पद खेळ व्हावा, हे दुर्दैवच. भाषेच्या पावित्र्याला आपल्याकडे पूर्वीपासून महत्त्व दिले गेले आहे. मला सुषमा स्वराज यांची तीव्रतेने आठवण येते. रामायणातीलच एक प्रसंग राम-रावण युद्धाच्या आधी रामाने शिवस्तुतीसाठी रुद्राष्टकम म्हटले तेव्हा रावणाने शिव तांडव स्तोत्र म्हटले. लोक आजही रुद्राष्टकम म्हणतात; परंतु शिव तांडव स्तोत्र कोणी म्हणत नाही. हा आहे भाषेचा प्रभाव. 

भाषेच्या सटीकतेचे आणखी एक उदाहरण सुषमाजींनी दिले होते. दंडी नावाच्या रचनाकाराने दशकुमारचरितम् नाटक लिहिले. त्यातील एक राजपुत्र शिकारीला जातो आणि कोणाच्या तरी बाणाने त्याचा एक ओठ फाटतो. आता ओठ फाटल्यावर प भ ब भ म कसे उच्चारणार?- म्हणून मग नंतरच्या नाटकात राजपुत्राच्या तोंडी कोणत्याही संवादात ओष्ठव्य म्हणजे ओठांच्या साहाय्याने उच्चार करावे लागणारे शब्द नाहीत. हाही भाषेचा चमत्कार!भाषेच्या बाबतीत इतकी काळजी घेणाऱ्या देशात टपोरी भाषा बोलली जाऊ लागली आणि चित्रपटातील संवादाच्या रूपाने प्रकट होऊ लागली, राजकारणातील भाषेच्या कडवटपणामुळे समाज संकटात सापडला तर ते फार गरजेचे आहे. खूप मोठे दुर्भाग्य ठरेल. मी याच वर्षी २७ मार्च रोजी या सदरात भाषेविषयी गांभीर्याने लिहिले होते. जेव्हा भाषेचा दर्जा घसरतो, भाषा धर्माचा रंग घेते, भावनांकडे लक्ष देत नाही, तेव्हा असा समाज विघटनाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता निर्माण होत असते.

मोठमोठी युद्ध भाषेमुळेच झाली आहेत! दुर्योधनाने जर आपली मांडी थोपटली नसती आणि द्रौपदीचा अपमान केला नसता तर कदाचित महाभारत घडलेच नसते. भाषेची आपली एक मर्यादा असते. भाषा म्हणजे केवळ अक्षर नाही. हल्ली तर आपण संस्कृतला भगवा रंग दिला, उर्दूला हिरवा ही किती मोठी विटंबना आहे! काही भाषांचा संकोच झालेला आपण पाहतो, भविष्यकाळात त्या नष्ट झाल्यास आश्चर्य वाटायला नको, कोविडने लोकांचा जीव घेतलाच, पण एक भाषाही समाप्त केली हे आपल्याला ठाऊक आहे. काय? अंदमान निकोबारमध्ये राहणाऱ्या ५० वर्षांच्या लीचोचा मृत्यू झाल्याने 'सारे' नावाची एक भाषा काळाच्या पडद्याआड गेली. भाषा बोलणारी ती एकमेव व्यक्ती शिल्लक होती. जेरू भाषा बोलणारेसुद्धा दोन-तीन लोकच शिल्लक आहेत. युनेस्कोच्या यादीत अशा १९७ भाषांची नोंद आहे, ज्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पीपल्स लिग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाच्या माहितीनुसार गेल्या ५० वर्षात २२० भाषा संपल्या. हे भीतीदायक आहे.

पण मग आता काय करायचे ? प्रथम स्वतःची भाषा सुधारावी काही मुखांना शब्दाशब्दाला शिव्या देण्याची सवय असते; तर समाजानेही तेच चलन मान्य करावे काय? अजिबात नाही. समाज असा वागत नाही! हल्ली ओटीटी प्लॅटफॉर्मवर भरपूर शिवीगाळ असलेल्या वेब सिरीज दाखवल्या जातात, त्यावर लोकांनी बहिष्कार टाकला तर या मालिकांमध्ये शिव्यांची भरमार करणारे दहावेळा विचार करतील. शिव्यांपासून आपल्या मुलांना वाचविणे फार गरजेचे आहे.

आपण जे बोलत आहोत त्याचा परिणाम काय होईल, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आपण आपल्या धर्माचे आचरण करावे, परंतु दुसऱ्याच्या धर्मावर टीका करता कामा नये. यातून विनाकारण वैमनस्य वाढते. आपल्या जागतिक वाटचालीत वैमनस्य हा सर्वांत मोठा अडथळा ठरेल. आपल्या जिभेवर, लेखणीवर लगाम लावला तर आपण कित्येक संकटांपासून देश वाचवू शकतो. तुम्ही आम्ही बदलू, तर माणसे, जग बदलेल. भाषेतून जसे प्रेम उत्पन्न होते, तसेच भाषा कटुताही निर्माण करते. प्रेम की कटुता यातली निवड अखेर आपल्यालाच करायची आहे, 

टॅग्स :Adipurushआदिपुरूषbollywoodबॉलिवूडcinemaसिनेमा