शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

राजा, राणी आणि भातुकलीच्या गारुडाची पन्नास वर्षं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 03:37 IST

मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते यांनी मांडलेला विलक्षण भातुकलीचा खेळ! या गाण्याला आज ५० वर्षे होत आहेत

भारतकुमार राऊत

कोणत्याही समाज व संस्कृतीत त्या त्या दशकाचे एक गाणे असते; एक चित्रपट व एक नाटकही असते. ती गाणी व ते नाटक-सिनेमे पुढे काळाच्या ओघात मागे पडतात, काही अदृश्यही होतात; पण काळाच्या प्रवाहाविरुद्ध पोहत ज्या कलाकृती जिवंत राहतात, त्याच श्रेष्ठ ठरतात. १९६०च्या दशकात कविवर्य ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके यांनी शब्दबद्ध व सूरबद्ध केलेली भावगीते मराठी मनात रुजू व ओठांवर घोळू लागली होती, त्याच काळात यशवंत देव, मंगेश पाडगावकर व अरुण दाते या त्रिकुटानेही मराठी भावविश्वात आपले साम्राज्य स्थापन करायला सुरुवात केली. या भावमंदिरावर कळस चढवला याच त्रिकुटाने साकारलेल्या ‘भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी..!’ या विराणीने. ही अजरामर कलाकृती निर्माण झाली त्या घटनेला आज तब्बल ५० वर्षे पूर्ण होत आहेत. मराठी मनावरचे या ‘भातुकली’चे गारुड काही अद्याप उतरलेले नाही. त्यानंतर या पठडीतील अनेक गीते आली व गेली. दोन पिढ्या मोठ्या झाल्या. हिंदी व आता इंग्रजी गाण्यांचीही गोडी मराठी माणसांना लागली; पण पाडगावकर, देव व दाते यांनी मांडलेला हा विलक्षण भातुकलीचा खेळ मात्र तसाच चालू आहे व आणखी काही दशके तरी ही भातुकली कुणी मोडणार नाही वा सोडणारही नाही. दुर्दैव हेच की ही भातुकली साकारणारे तीनही कलाकार मंगेश पाडगावकर, यशवंत देव व अरुण दाते आज आपल्यात नाहीत. पण कलाकार गेले, तरी ज्या कलाकृती पुढच्या पिढ्या चालवत राहतात, त्याच अस्सल कला. ‘भातुकली’ हे त्याचे उत्तम उदाहरण ! मंगेश पाडगावकर यांनी अनेक लयबद्ध कविता लिहिल्या, त्याची सुमधुर गीते झाली. गीतकार व संगीतकार यशवंत देव यांनी तर वेगवेगळ्या धाटणीच्या गीतांना सूरबद्ध करून अजरामर केले. गायक अरुण दातेंच्या गायकीचा वेगळा बाज  तत्कालीन मराठी रसिकांना अपरिचित होता. त्यांनी गझलांच्या बाजाची मराठी गाणी गायला सुरुवात केली व त्यात लोकप्रियताही कमावली. पाडगावकर-यशवंत देव आणि अरुण दाते या तिघांनी एकत्र येऊन केलेली मराठी गीते अजरामर ठरली. ‘अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी’, ‘भेट तुझी-माझी स्मरते अजून त्या दिसाची’, ‘धुके दाटले हे उदास उदास’, ‘दिवस तुझे हे फुलायाचे’, ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, या गीतांनी करोडो मराठी मनावर कधी हलकेच फुंकर घातली.‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’ हे त्यातलेच एक गीत. जणू मराठी संस्कृतीतील एक दंतकथाच ! असे म्हणतात की,  पाडगावकरांनी रेकाॅर्डिंगच्या दोन महिने आधीच हे गीत लिहून संगीतकार देवांकडे पाठवले. नंतर एकदा ते दोघे व दाते भेटले असता देवांनी ते गाणे ऐकवले. ती चाल ना पाडगावकरांना पसंत पडली, ना दातेंना ! त्या दोघांच्याही मते ती विराणी असल्याने तिला  भावगीताची चाल योग्य नव्हती; पण देव त्यांच्या सूररचनेबद्दल कमालीचे आग्रही होते. ते म्हणाले, ही मुळात विराणी नाहीच. ते एक प्रेमभंगाचे दु:खद गीत आहे. त्याचा गायक प्रेमविरहात होरपळलेला प्रेमवीर नसून त्याची कथा तिसऱ्यानेच विशद केलेली आहे. त्यावर तिघांत बराच खल झाला. अखेर देवांच्या मनाप्रमाणेच करायचे ठरले. मग  देवांनी शब्द दिला की पाहा, हे गाणे अजरामर होईल व तसेच झाले.हे गीत आकाशवाणीवर सादर होताच ते कमालीचे लोकप्रिय झाले. १९७८ मध्ये नानासाहेब गोरे ब्रिटनचे हायकमिशनर झाले, त्यावेळी इंडिया हाउसमध्ये दातेंच्या गाण्याचा कार्यक्रम झाला. स्वत: दाते तीन तास गायले. एक गायक व केवळ दोन वादक इतक्या श्रोत्यांना तीन तास खिळवून  ठेवतात, हे पाहून उपस्थित असलेले ब्रिटिश अधिकारी अवाक‌् झाले.. पुढे दोनच वर्षांनी बीबीसीने ‘भातुकलीच्या खेळामधली’चे रेकॉर्डिंग केले. बीबीसीने मराठी गाण्याचे रेकाॅर्डिंग करण्याची ती पहिलीच वेळ.इतके मात्र खरे की, भातुकलीच्या खेळातले हे राजा आणि राणी मराठी संस्कृतीच्या वाटचालीचा मैलाचा महत्त्वाचा दगड बनून राहिले आहेत.

(लेखक लोकमतचे माजी संपादक, माजी खासदार आहेत)  

टॅग्स :arun datearun date