शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

By संदीप प्रधान | Updated: June 16, 2025 08:06 IST

रेल्वे प्रशासनाचा अत्यंत ढिसाळ व बेदरकार कारभार आणि तितकेच निष्काळजी व बेदरकार प्रवासी हेच या मृत्यूला कारणीभूत आहे.

संदीप प्रधानवरिष्ठ सहायक संपादक

भारताची लोकसंख्या १४६ कोटी झाल्याचे वृत्त आहे. सर्वाधिक युवावर्ग असलेला आपला देश ही अभिमान बाळगण्याची गोष्ट असली, तरी इतक्या प्रचंड लोकसंख्येमुळेच की काय, आपल्याकडे माणसांच्या जिवाला काडीमात्र किंमत नाही. मुंब्रा रेल्वे दुर्घटनेतून ते पुन्हा एकदा दिसले. दुर्घटना घडून आठवडा झाला, तरी लोकांचे बळी का गेले, याचे कारण अस्पष्ट आहे. रेल्वे प्रशासनाचा अत्यंत ढिसाळ व बेदरकार कारभार आणि तितकेच निष्काळजी व बेदरकार प्रवासी हेच या मृत्यूला कारणीभूत आहेत.

सकाळी व सायंकाळी  भरून येणाऱ्या लोकलमध्ये प्रवेश करण्याकरिता  मारामाऱ्या होतात. सहप्रवासी एकमेकांचे शत्रू बनतात. धक्का लागला किंवा पायावर पाय पडला, अशा किरकोळ कारणावरून त्यांच्यात हाणामारीचे प्रसंग घडतात. वस्तुत: लोकलमध्ये मारामाऱ्या करणारे ते दोघेही आपल्या राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेने वेठीस धरलेले नागरिक आहेत. भिकार व्यवस्थेवरील संताप ते एकमेकांवर काढतात. 

लोकलमध्ये प्रवासाची एक शिस्त असते. बॅग कशी सांभाळायची, दरवाजापाशी कसे उभे राहून धावत्या लोकलमधून गर्दीतून अलगद कसे उतरायचे, एकमेकांना बसायला देऊन सर्वच श्रमजिवींना थोडी  विश्रांती मिळेल, याची काळजी कशी घ्यायची, याचे काही अलिखित नियम आहेत. मात्र, महामुंबईत रोज नवीन लोक रोजगाराकरिता येतात, त्यांना हे नियम माहीत नसतात. त्यांच्याकडून  होणाऱ्या चुका अन्य प्रवाशांना महागात पडतात. मुंब्रा येथील अपघात जर प्रवाशांच्या पाठीवरील बॅग एकमेकांवर आदळून झाला असेल, तर याचा अर्थ त्या प्रवाशांना गर्दीच्या वेळी बॅग पाठीवर नव्हे, तर पोटावर लावायची हा अलिखित नियम ठाऊक नव्हता, हेच सिद्ध होते.

सर्वच जबाबदारी प्रवाशांवर ढकलता येणार नाही. रेल्वे प्रशासनाने लोकल वेळेवर चालवल्या पाहिजेत. फेऱ्या वाढवल्या पाहिजेत. एसी लोकल ही निश्चितच उत्तम सुविधा आहे; पण ती सर्वांना परवडणारी नाही. एसी लोकल चालवल्यामुळे जर सर्वसामान्य लोकलच्या फेऱ्या वर्षानुवर्षे वाढल्या नसतील, तर तो सामान्य गोरगरीब प्रवाशांवर अन्याय आहे. यामुळे एसी लोकलमधील फुकट्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. एसी लोकल ही एका विशिष्ट वर्गातील प्रवाशांकरिता हवीच. शिवाय या लोकल वेळेवर चालवायला हव्यात. दुपारी व रात्री एसी लोकल अर्धा ते पाऊण तास उशिरा चालवतात. एसी लोकलचे तिकीट काढलेल्या प्रवाशाने इतकी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी, ही अपेक्षा चुकीची आहे. 

सदोष उद्घोषणा सिस्टम हा रेल्वेचा मोठा दोष आहे. कुठली गाडी किती उशिरा येत आहे, ती का उशिरा येत आहे, जलद गाडी उशिरा येणार असेल, तर धिमी लोकल वेळेवर येत आहे का? याची सूचना आगाऊ दिली गेली तर लोक ट्रॅकमध्ये उड्या टाकून जीव धोक्यात घालणार नाहीत. मुंब्य्रातील पारसिक डोंगरावरील झोपड्यांमुळे पारसिक बोगदा धोकादायक होऊन त्याचा वापर लोकल व बाहेरगावच्या प्रवासी गाड्यांकरिता केला जात नाही, ही शोकांतिका आहे. त्यामुळे कल्याण, ठाणेदरम्यान दोन अतिरिक्त रेल्वेमार्ग टाकले जाऊनही लोकलचा गोंधळ सुटलेला नाही. दिवा, मुंब्रा व कळवा या स्थानकांच्या परिसरात लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. येथील प्रवाशांना तातडीने दिलासा देणे गरजेचे आहे.  

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई