शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
4
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
5
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
6
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
7
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
8
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
9
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
10
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
11
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
12
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
13
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
14
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
16
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
17
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
18
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
19
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
20
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा

सेनेची जखम व भाजपचा दुष्टावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 05:59 IST

युद्ध हे शस्त्रांनी करावयाचे राजकारणच आहे असे कार्ल व्हॉन क्लॉसवित्सने म्हटले आहे व ते खरे म्हणावे असेच आहे. पालघरच्या अशा युद्धात शिवसेनेला भाजपने केलेली जखम लवकर भरून येणारी नाही.

युद्ध हे शस्त्रांनी करावयाचे राजकारणच आहे असे कार्ल व्हॉन क्लॉसवित्सने म्हटले आहे व ते खरे म्हणावे असेच आहे. पालघरच्या अशा युद्धात शिवसेनेला भाजपने केलेली जखम लवकर भरून येणारी नाही. शत्रूने केलेला घाव उमदेपणाने दुर्लक्षिता येतो. मित्राने केलेला वार मात्र विसरता येत नाही. ज्या पक्षाशी एवढी दशके युती केली व ज्याच्या मंत्रिमंडळात सहभागी झालो त्याच पक्षाने निवडणुकीच्या रणात आपल्याला धूळ चारावी याएवढा अपमान दुसरा नाही. त्यातही सेनेचे दुर्दैव हे की हा अपमान मुकाट्याने गिळण्याखेरीज व आपली जखम दडवून ठेवण्याखेरीज तिच्याजवळ दुसरा पर्याय नाही. हिंदुत्वाचा टिळा माथ्यावर असल्याने सेनेला महाराष्ट्रात मित्र नाही आणि ज्याच्या माथ्यावर तो टिळा मोठा आहे तो पक्ष सेनेला क:पदार्थ लेखणारा आहे. विधानसभेत सेनेच्या ६३ जागा आहेत आणि १२२ जागा मिळविणारा फडणवीसांचा पक्ष त्याच बळावर सत्तारूढ झाला आहे. पण त्याचा पाठिंबा काढून घ्यायचा तर राज्यात कुणाचे सरकार आणायचे हा पेच सेनेसमोर आहे. पवारांची काँग्रेस (४१ जागा) तिला पाठिंबा देण्याच्या अवस्थेत नाही आणि काँग्रेस पक्ष (४२ जागा) सेनेचा पाठिंबा कधी घेणार नाही. या स्थितीत कोणत्या तरी मित्र नसलेल्या पक्षामागे आपली माणसे उभी करणे एवढाच पर्याय सेनेजवळ शिल्लक राहतो. जवळचे जवळ नाहीत आणि दूरचे जवळ येण्याची शक्यता नाही या स्थितीत आपली जखम कुरवाळणे आणि ईव्हीएमला नावे ठेवणे याखेरीज सेनेला काही करता येणारेही नाही. फडणवीसांचे सरकार स्थापन होत असताना सेनेने काही काळ खळखळ करून त्यात सहभागी व्हायचे टाळले होते. त्यावेळी ‘तुम्ही पाठिंबा देत नसाल तर आम्ही देऊ’ अशी भूमिका घेऊन शरद पवारांनी फडणवीसांना तारून नेले. नंतरच्या काळात सेनेने मिळतील त्या जागा घेत फडणवीसांच्या मंत्रिमंडळात प्रवेश केला. मात्र आपले वेगळे अस्तित्व दाखविणे ही सेनेची तेव्हाची व आताचीही गरज असल्याने प्रत्येकच लहान लहान बाबीवर टीका करीत सरकारला नावे ठेवण्याचे व्रत तिने सोडले नाही. मात्र कितीही टीका केली तरी सेनेला आपल्यासोबत राहण्याखेरीज गत्यंतर नाही हे ठाऊक असणाऱ्या भाजपने तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण सोडले नाही व त्याचवेळी ‘युती कायम राहील’ ही मधाळ भाषाही थांबविली नाही. वास्तव हे की भाजपला सेनेची ताकद व मर्यादा कळते. सेनेला महाराष्ट्रात मित्र नाहीत आणि महाराष्ट्राबाहेर स्थान नाही. शिवाय स्वबळावर सत्ता ताब्यात आणण्याएवढे बळही तिच्यात नाही. त्याचमुळे ‘सेनेच्या प्रवक्त्याला मी मोजत नाही’ असे फडणवीसांना म्हणता येते. एकेकाळी प्रमोद महाजन आणि मुंडे मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची समजूत काढत. काही काळ गडकरीही ते करीत. आता मात्र भाजपमधील साºयांनाच बाळासाहेब आणि उद्धव यांच्यातला फरक कळतो व सेनेचे अस्तित्व कुठवर याचाही अंदाज घेता येतो. सेना भाजपची माणसे आपल्याकडे वळवू शकत नाही उलट भाजप मात्र सेनेतले काही सैनिक पळवून नेऊ शकतो या वास्तवाची कल्पना उद्धव ठाकºयांनाही असावी. फडणवीसांनी आपली चालविलेली फरफट त्याचमुळे ते सहन करीत असावे. मुळात सेनेजवळ कोणते धोरण नाही, कार्यक्रम पत्रिका नाही आणि मराठीचा अभिमान व मुसलमानांचा द्वेष हे धोरण आता फारसे विश्वासार्ह उरले नाही. गेल्या ५० वर्षात सेनेला आपले अस्तित्व विस्तारणेही जमले नाही. या साºयाच आघाड्यांवर भाजप सेनेच्या फार पुढे आहे. जे पक्ष केवळ एका नेत्याच्या बळावर उभे असतात त्यांना फारसे भवितव्यही नसते हे वास्तव सेनेएवढेच राष्टÑवादी काँग्रेसलाही लागू आहेत. सबब अशा पक्षांना दुसºया पायरीवर थांबण्याखेरीज वेगळे काही करता येत नाही. ते जमले नाही तर तीही पायरी काढून घेतली जाण्याचे भयच त्यांच्यापुढे मोठे असते. या पुढला काळ सेनेची दयनीय फरफट व भाजपने तिच्याशी चालविलेला दुष्टाव्याचा खेळ महाराष्टÑाला पाहायचा आहे. तो खेळ सेनेला किमान स्वाभिमानपूर्वक खेळता यावा एवढीच सदिच्छा येथे नोंदवायची आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा