शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

सेनेची जखम व भाजपचा दुष्टावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 05:59 IST

युद्ध हे शस्त्रांनी करावयाचे राजकारणच आहे असे कार्ल व्हॉन क्लॉसवित्सने म्हटले आहे व ते खरे म्हणावे असेच आहे. पालघरच्या अशा युद्धात शिवसेनेला भाजपने केलेली जखम लवकर भरून येणारी नाही.

युद्ध हे शस्त्रांनी करावयाचे राजकारणच आहे असे कार्ल व्हॉन क्लॉसवित्सने म्हटले आहे व ते खरे म्हणावे असेच आहे. पालघरच्या अशा युद्धात शिवसेनेला भाजपने केलेली जखम लवकर भरून येणारी नाही. शत्रूने केलेला घाव उमदेपणाने दुर्लक्षिता येतो. मित्राने केलेला वार मात्र विसरता येत नाही. ज्या पक्षाशी एवढी दशके युती केली व ज्याच्या मंत्रिमंडळात सहभागी झालो त्याच पक्षाने निवडणुकीच्या रणात आपल्याला धूळ चारावी याएवढा अपमान दुसरा नाही. त्यातही सेनेचे दुर्दैव हे की हा अपमान मुकाट्याने गिळण्याखेरीज व आपली जखम दडवून ठेवण्याखेरीज तिच्याजवळ दुसरा पर्याय नाही. हिंदुत्वाचा टिळा माथ्यावर असल्याने सेनेला महाराष्ट्रात मित्र नाही आणि ज्याच्या माथ्यावर तो टिळा मोठा आहे तो पक्ष सेनेला क:पदार्थ लेखणारा आहे. विधानसभेत सेनेच्या ६३ जागा आहेत आणि १२२ जागा मिळविणारा फडणवीसांचा पक्ष त्याच बळावर सत्तारूढ झाला आहे. पण त्याचा पाठिंबा काढून घ्यायचा तर राज्यात कुणाचे सरकार आणायचे हा पेच सेनेसमोर आहे. पवारांची काँग्रेस (४१ जागा) तिला पाठिंबा देण्याच्या अवस्थेत नाही आणि काँग्रेस पक्ष (४२ जागा) सेनेचा पाठिंबा कधी घेणार नाही. या स्थितीत कोणत्या तरी मित्र नसलेल्या पक्षामागे आपली माणसे उभी करणे एवढाच पर्याय सेनेजवळ शिल्लक राहतो. जवळचे जवळ नाहीत आणि दूरचे जवळ येण्याची शक्यता नाही या स्थितीत आपली जखम कुरवाळणे आणि ईव्हीएमला नावे ठेवणे याखेरीज सेनेला काही करता येणारेही नाही. फडणवीसांचे सरकार स्थापन होत असताना सेनेने काही काळ खळखळ करून त्यात सहभागी व्हायचे टाळले होते. त्यावेळी ‘तुम्ही पाठिंबा देत नसाल तर आम्ही देऊ’ अशी भूमिका घेऊन शरद पवारांनी फडणवीसांना तारून नेले. नंतरच्या काळात सेनेने मिळतील त्या जागा घेत फडणवीसांच्या मंत्रिमंडळात प्रवेश केला. मात्र आपले वेगळे अस्तित्व दाखविणे ही सेनेची तेव्हाची व आताचीही गरज असल्याने प्रत्येकच लहान लहान बाबीवर टीका करीत सरकारला नावे ठेवण्याचे व्रत तिने सोडले नाही. मात्र कितीही टीका केली तरी सेनेला आपल्यासोबत राहण्याखेरीज गत्यंतर नाही हे ठाऊक असणाऱ्या भाजपने तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण सोडले नाही व त्याचवेळी ‘युती कायम राहील’ ही मधाळ भाषाही थांबविली नाही. वास्तव हे की भाजपला सेनेची ताकद व मर्यादा कळते. सेनेला महाराष्ट्रात मित्र नाहीत आणि महाराष्ट्राबाहेर स्थान नाही. शिवाय स्वबळावर सत्ता ताब्यात आणण्याएवढे बळही तिच्यात नाही. त्याचमुळे ‘सेनेच्या प्रवक्त्याला मी मोजत नाही’ असे फडणवीसांना म्हणता येते. एकेकाळी प्रमोद महाजन आणि मुंडे मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची समजूत काढत. काही काळ गडकरीही ते करीत. आता मात्र भाजपमधील साºयांनाच बाळासाहेब आणि उद्धव यांच्यातला फरक कळतो व सेनेचे अस्तित्व कुठवर याचाही अंदाज घेता येतो. सेना भाजपची माणसे आपल्याकडे वळवू शकत नाही उलट भाजप मात्र सेनेतले काही सैनिक पळवून नेऊ शकतो या वास्तवाची कल्पना उद्धव ठाकºयांनाही असावी. फडणवीसांनी आपली चालविलेली फरफट त्याचमुळे ते सहन करीत असावे. मुळात सेनेजवळ कोणते धोरण नाही, कार्यक्रम पत्रिका नाही आणि मराठीचा अभिमान व मुसलमानांचा द्वेष हे धोरण आता फारसे विश्वासार्ह उरले नाही. गेल्या ५० वर्षात सेनेला आपले अस्तित्व विस्तारणेही जमले नाही. या साºयाच आघाड्यांवर भाजप सेनेच्या फार पुढे आहे. जे पक्ष केवळ एका नेत्याच्या बळावर उभे असतात त्यांना फारसे भवितव्यही नसते हे वास्तव सेनेएवढेच राष्टÑवादी काँग्रेसलाही लागू आहेत. सबब अशा पक्षांना दुसºया पायरीवर थांबण्याखेरीज वेगळे काही करता येत नाही. ते जमले नाही तर तीही पायरी काढून घेतली जाण्याचे भयच त्यांच्यापुढे मोठे असते. या पुढला काळ सेनेची दयनीय फरफट व भाजपने तिच्याशी चालविलेला दुष्टाव्याचा खेळ महाराष्टÑाला पाहायचा आहे. तो खेळ सेनेला किमान स्वाभिमानपूर्वक खेळता यावा एवढीच सदिच्छा येथे नोंदवायची आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा