शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

ऑफिसातलं काम तुम्हाला ‘खात’ सुटलं आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 09:41 IST

कामाचा ताण सहन न होऊन थेट आत्महत्येचं टोक गाठणाऱ्या तरुण स्त्री-पुरुषांच्या कहाण्या अलीकडे सातत्याने बातम्यांमध्ये झळकतात. नेमकं काय चुकतं आहे?

- प्राची पाठक, पर्यावरण आणि शाश्वत विकासाच्या अभ्यासकएकीकडे देशभरात बेरोजगारीचा ज्वलंत प्रश्न दिसत असताना ज्यांच्या हातात काम आहे, त्यांना त्यातला ताण, धावपळ, जाणं-येणं, रस्त्यावरची रहदारी, रस्त्यांची अवस्था आणि अनेक मुद्दे अगदी नकोसे झालेले दिसतात. ‘कशासाठी, पोटासाठी’ अशी कितीही गाणी गात म्हटलं, तरी त्यातलं भयाण वास्तव आणि अपरिहार्यता आपल्याला अस्वस्थ  करते. 

कामाला चांगली माणसं मिळत नाहीत, ही रड एकीकडे आणि दुसरीकडे ठराविक गटाला त्यांचं रोजीरोटीचं काम आणि वैयक्तिक आयुष्य यातला समन्वय साधताना नाकी नऊ येताना दिसत आहेत. कित्येक लोक न आवडणाऱ्या कामात केवळ आर्थिक गरज म्हणून अडकलेले असतात. वयात येताना मुलामुलींना ठरावीकच शिक्षण घेऊन आयुष्यात ‘‘सेटल’’ होण्याच्या स्पर्धेत धावावं लागतं. कुणाला न आवडणारं शिक्षण घेऊन त्यातच आयुष्यभर रोजीरोटी कमवावी लागते. आपल्याला आपल्या कलानुसार मुळात शिक्षण मिळेल का, घेतलं त्या शिक्षणात रोजगार मिळेल का, त्या रोजगारातून होणाऱ्या कमाईत घरदार चालेल का, हे प्रश्नदेखील महत्त्वाचेच आहेत. एकेका नोकरीसाठी हजारो, लाखोंच्या संख्येत जिथे अर्ज येतात, स्पर्धा असते, तिथे नावाजलेल्या ठिकाणी नोकरी लागणे, यातच फार मोठी धन्यता मानली जाते. त्यामुळे पडेल ते काम करण्याकडे कल असतो. विरोध केला, तर हातातली संधी जाईल, आर्थिक नुकसान होईल, करिअरचा खेळखंडोबा होईल, वगैरे अनेक मुद्दे असतात. त्यातूनच मग दबावाला बळी पडायची, अन्याय सहन करायची शक्यता वाढते. पुरेशी झोप न होणं, स्क्रीनला चिकटून बसणं, कामाच्या तासांचं भान न राहणं, जेवणखाण आणि जीवनशैलीत झालेले बदल, असे अनेकानेक मुद्दे कामाच्या ताणाच्या संदर्भात आहेत. 

हे सगळं एकीकडे असताना गरज आणि हाव यातली सीमारेषा धूसर झालेली आहे. अवाजवी आणि अवास्तव टार्गेट्स स्वतःला देऊन त्यापाठी किती धावत सुटायचं, याचं भान सुटत जाताना दिसतं. बाह्य ताणतणाव असतातच. अनेक आकर्षणं, प्रलोभनं, बडेजाव, व्यसनाधीनता, कौटुंबिक आयुष्यातली, नातेसंबंधातली आव्हानं, त्यासाठी द्यावा लागणारा वेळ आणि हे सगळं करत असताना हक्काचं आणि सुरक्षित असं ऐकून घेणारं, आधार देणारं कोणी नसणं, हेही गंभीर स्वरूपाचे प्रश्न आहेत. मुळात, ‘चला, आता जाऊन मन मोकळं करू या, ताणविरहित जगायचं कसं, याचं भाषण ऐकू या आणि मग चुटकीसरशी प्रश्न सुटतील’, असं होत नाही. मनमोकळं बोलता येणं, आपली आव्हानं, मनातली खदखद आणि  आंदोलनं नेमकेपणाने सांगता येणं, ही देखील कला आहे. ती सरावाने, त्याबद्दल सजग राहून त्यावर काम केल्यानेच विकसित होऊ शकते. भारतात कामाचे तास आणि अपेक्षा वाढत असताना दिसत आहेत. फॅक्टरी ॲक्टनुसार कामाचे आठ तास दर दिवशी सुचवलेले आहेत. जगभरात, खासकरून युरोपात कामाचे तास दिवसाला सात, सहा असे होत असताना वाढत्या जागतिकीकरणात भारतात आर्थिक वाढीसाठी आणि उद्योगाची भरभराट होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी जास्त वेळ काम करणं, हे एकदम सोपं आणि सहजसाध्य ध्येय वाटतं. 

बाह्य गोष्टींवरून आपल्या आयुष्यातील ताणतणाव किती वाढू द्यायचा, किती प्रभावित व्हायचं, किती प्रमाणात नमती भूमिका घ्यायची आणि कुठे अन्यायाला वाचा फोडायची, याबद्दल अधि सजगता येणं, समुपदेशन होणं, ही काळाची गरज आहे. किमान नैतिकता पाळली जाणं महत्त्वाचं आहे. आपल्या भाषेने रोजीरोटीला ‘उपजीविका’ म्हटलं आहे. ‘‘तुम्ही काय करता?’’, या प्रश्नात तुमची ओळख म्हणजे तुमचा व्यवसाय/नोकरी इतकीच ठेवायची की त्यापलीकडे आयुष्य जगायचं, कौशल्य आत्मसात करायचं, ते आपणच ठरवायचं. ‘उप’ असलेल्या गोष्टीला ती गोष्ट म्हणजेच सर्वस्व आणि संपूर्ण आयुष्य, असं समजून जगायचा ताण आपण भिरकावून देऊ शकतो का, ती कला आत्मसात करू शकतो का, हाही विचार ज्याने त्याने स्वतःशी प्रामाणिकपणे करायची वेळ आलेली आहे.     prachi333@hotmail.com

टॅग्स :Employeeकर्मचारी