शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सज्जनांचे रक्षण होतेय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:59 IST

मिलिंद कुलकर्णी सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे निर्दालन करण्याचे ब्रीदवाक्य असलेले पोलीस दल खरोखर त्याला जागते काय, असा प्रश्न विचारण्याजोगी ...

मिलिंद कुलकर्णीसज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे निर्दालन करण्याचे ब्रीदवाक्य असलेले पोलीस दल खरोखर त्याला जागते काय, असा प्रश्न विचारण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळेच तसे आहेत, असे नाही. परंतु, मोजके असतील, पण त्यांचे उपद्रवमूल्य मोठे आहे.जळगाव पोलीस दलात तर वर्षभरापासून अशा पाच घटना उघडकीस आल्या आहेत. मुख्यालयातील परवेज शेख या कर्मचाऱ्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. योगेश वाघ या कर्मचाºयाने महिलेच्या घरात घुसून छेडखानी केल्याचा गुन्हा दाखल आहे. सागर रमजान तडवी याच्याविरुध्द सहकारी कर्मचाºयाच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप असून याच कारणावरुन सहकारी कर्मचाºयाने आत्महत्या केल्याची घटना घडली. मुक्ताईनगरातील कर्मचाºयाने सहकारी महिलेला अश्लील मेसेज पाठविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. आणि आता विनोद अहिरे या कराटे, स्केटींगचे प्रशिक्षण देणाºया कर्मचाºयाविरुध्द एका खेळाडू विद्यार्थिनीने अत्याचाराची तक्रार नोंदविली आहे.‘मी टू’चे अभियान तर वर्षभरापूर्वी सुरु झाले, पण त्यापूर्वी पीडित महिलांनी हिंमतीने समोर येत पोलीस कर्मचाºयांविरुध्द तक्रार दिली आहे. अर्थात हे हिमनगाचे टोक आहे. पोलीस दल आणि खाकी वर्दीची भीती एवढी आहे, की सामान्य माणूस अन्याय निमूटपणे सहन करतो. त्याची वाच्यता करीत नाही. त्यामुळे पोलीस दलातील काही मोजके लोक त्याचा गैरफायदा घेतात. विनोद अहिरे हा कराटे, स्केटींगचा प्रशिक्षक आहे. पोलीस दलाने त्याच्यासाठी चांगले मैदान तयार करुन दिले. खेळाला प्रोत्साहन मिळावे, म्हणून त्याला कोठेही बदली दिली नाही. निवासस्थानासाठी अनेक कर्मचारी प्रतिक्षा यादीवर असताना विनोदला तातडीने निवासस्थान मिळाले. त्याचा गैरफायदा त्याने घेतला आणि पोलीस दलाला बदनाम केले.खाकी वर्दी आणि कायद्याचा धाक दाखवत पोलीस दलातील काही कर्मचाºयांकडून अनैतिक कामे सुरु असतात, हे अशा घटनांमधून ठळकपणे समोर येते.पोलीस दलासोबत राजकीय मंडळी एकत्र आली तर कहर झाला असे समजायला हरकत नाही. सत्ताधारी मंडळी पोलीस दलाचा पुरेपूर उपयोग करुन घेते. उद्योजक, व्यावसायीक मंडळी गुन्हे, बदनामी टाळण्यासाठी मग या अभद्र युतीची मदत घेते. ही ‘अर्थपूर्ण’ मदत फळाला आल्याशिवाय राहत नाही.जळगावकरांनी याचा अनुभव नुकताच घेतला. महापालिका निवडणुकीनंतर ढाब्यावर पार्टी करायला गेलेल्या तरुणांच्या गाडीला अपघात झाला. अपघातातील दुसरी गाडी शहरातील मोठ्या व्यावसायिकाची होती. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांविरुध्द गुन्हा दाखल झाला, पण दुसºया वाहनातील व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल झालाच नाही. मृत तरुणांच्या नातेवाईकांनी अधिकाºयांना निवेदने दिली, पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवले. पण काही उपयोग झाला नाही.दुसºया घटनेत एका राजकीय नेत्याचा नातलग असलेल्या हॉटेल व्यावसायिकाने ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’चा थरार औरंगाबाद रस्त्यावर केला. आधी दोन मोटारसायकलस्वारांना धडक दिली. ते मागे लागल्यावर या व्यावसायिकाने बसची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या विद्यार्थिनींना धडक दिली. यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. आरोपी पसार झाला आणि रुग्णालयात दाखल झाला. सामान्य गुन्हेगाराला आणि ‘व्हीआयपी’ आरोपीला मिळणारी ‘ट्रीटमेंट’ लोकांच्या लक्षात येत नाही, असा समज परवाच्या घटनेने दूर केला असावा. अपघातग्रस्त वाहन आरोपीला परत करण्यात आल्यावर पोलीस स्टेशनमधून ते क्रेनद्वारे जळगावला नेत असताना गाडेगाव येथे काही जणांनी ते वाहन पेट्रोल टाकून जाळले. क्रेनचालकाला बाहेर काढून हा प्रकार घडला. जनतेच्या मनातील उद्रेकाची ही घटना म्हणजे एक उदाहरण आहे. या घटनेचे समर्थन अजिबात होऊ शकत नाही, पण सातत्याने अन्याय होत असलेला दुर्बलदेखील कडेलोट झाल्यावर अशी कृती करतो, हे लक्षात घ्यायला हवे.पोलीस दल, राजकीय पक्ष, धनदांडग्या मंडळींनी या घटनेपासून बोध घ्यावा, एवढेच यानिमित्ताने सुचवावेसे वाटते.

टॅग्स :PoliceपोलिसJalgaonजळगाव