शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टिकोन - श्रमिकांच्या दमनातून उफाळतोय कमालीचा असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 17:13 IST

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांतून भारतीय जनता पक्षाचे पानिपत झाले व अन्य राज्यांतूनही भाजपा नामोहरम होत आहे.

विश्वास उटगी

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांतून भारतीय जनता पक्षाचे पानिपत झाले व अन्य राज्यांतूनही भाजपा नामोहरम होत आहे! यामागे या देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन २0८ संघटनांनी जे केंद्र सरकारविरोधात प्रभावी हल्लाबोल आंदोलन केले, त्यातून धर्म व जाती समूहांच्या पलीकडे जनतेची आर्थिक दैनावस्था सत्ताधारी वर्गाने दुर्लक्षित केली म्हणून मतपेटीद्वारे उद्रेक दिसला. गेली पाच वर्षे कामगारांच्या सर्व संघटनांचा आपआपल्या मागण्यांवर आंदोलनाचा पवित्रा अधिक जोरकसपणे दिसून येतो आहे. गेल्या ७0 वर्षांत कामगार आंदोलनाचा इतिहास आपल्या आर्थिक मागण्यांभोवती जास्त व निवडणुकीच्या राजकारणावर कमी प्रभाव टाकणारा होता. मात्र ८ जानेवारी २0१९ चा दोन दिवसांचा देशव्यापी संप अधिक व्यापक, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांशी भिडणारा व थेट राजकीय संदेश देणारा होता हे नि:संशय!

काही दिवसांत हंगामी अर्थसंकल्प सादर करून लोकसभेच्या निवडणुकांना सामोरे जाणाºया मोदी सरकारला सत्तेवरून पायउतार करण्याचा इशारा देणारा देशव्यापी संप म्हणून ८ व ९ जानेवारीच्या संपाकडे बघावे लागेल. देशव्यापी संपामध्ये कामगार संघटनांचा दावा आहे की, संघटित व असंघटित वर्गातील सुमारे २५ कोटी कामगार सामील झाले होते. प्रत्यक्षात सरकारने हे आकडे मान्य न करता संपकरी संघटनांकडे ढुंकूनही पाहण्याचा प्रयत्न याही वेळी केला नाही. मोदी सरकारची काम करण्याची पद्धतच आहे की ते लोकसभा व राज्यसभा मध्येही निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासारखीच भाषणे करतात आणि विविध मंत्रिमंडळातील सचिव मंडळी प्रशासकीय निवेदनामार्फत अनेक कायद्यांना वळसा घालून सरकारला जे हवे तेच करतात. लोकप्रतिनिधींकडे दुर्लक्ष, कायद्यान्वये निर्माण झालेल्या संस्थांमध्ये हस्तक्षेप व गळचेपी, कायद्याचे उल्लंघन करणाºया उद्योगपती मालकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्या सल्ल्याने व त्यांच्या हुकुमान्वये नवीन कायदे बनविणे हे या सरकारचे गेल्या पाच वर्षांतील व्यवच्छेदक लक्षण म्हणावे लागेल. नवीन कायदे बनविताना सरकारने जाणीवपूर्वक कामगारांचे घटनात्मक अधिकारच हिरावून घेतले आहेत!

कामगारांच्या संघटित उद्रेकामागे कामगारांचे प्रत्यक्ष अनुभव काय आहेत हे तपासणे महत्त्वाचे आहे. कामगार न्यायालये मुळातच अपुरी आहेत. पण न्यायदान करणारे न्यायाधीश कुठे आहेत? रजिस्ट्रार आॅफ ट्रेड युनियन्सकडे नवीन संघटनांचे रजिस्ट्रेशन महिनोन्महिने होत नाही. भाजपाशासित राज्यांमध्ये अर्ज पडून आहेत. आता लोकसभेत मांडण्यात आलेल्या ट्रेड युनियन अ‍ॅक्ट १९२६ मध्ये नवीन बदल कामगारांच्या घटनात्मक हक्कांना पायदळी तुडविणारेच आहेत. जे ब्रिटिशकाळात व ७0 वर्षांत अनेक कामगार संघटनांच्या संघर्षातून मिळाले त्यावर बोळा फिरविण्याचे महत्कार्य केंद्र व राज्य सरकारे भांडवलदारांच्या इशाºयाने इमाने इतबारे करीत आहेत.सामान्य माणसांच्या श्रमांतून निर्माण झालेली राष्ट्रीय संपत्ती काही मूठभर उद्योगपतींसाठी वापरण्याची योजना देश कमकुवत करणारी आहे. परंतु केंद्र किंवा राज्य सरकारे ज्या पद्धतीने स्वायत्त संस्थांशी व्यवहार करतात त्यातून संविधानाला बाधा येते हे मात्र आता कामगाराला उमगले आहे. म्हणूनच तो सत्ताधाºयांना धडा शिकविण्यासाठी विरोधात मतदान करण्याची भाषा करतोय, आर्थिक मागण्यांचे काय होईल ते होवो!( लेखक कामगार नेते आहेत )