शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टिकोन - श्रमिकांच्या दमनातून उफाळतोय कमालीचा असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 17:13 IST

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांतून भारतीय जनता पक्षाचे पानिपत झाले व अन्य राज्यांतूनही भाजपा नामोहरम होत आहे.

विश्वास उटगी

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांतून भारतीय जनता पक्षाचे पानिपत झाले व अन्य राज्यांतूनही भाजपा नामोहरम होत आहे! यामागे या देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन २0८ संघटनांनी जे केंद्र सरकारविरोधात प्रभावी हल्लाबोल आंदोलन केले, त्यातून धर्म व जाती समूहांच्या पलीकडे जनतेची आर्थिक दैनावस्था सत्ताधारी वर्गाने दुर्लक्षित केली म्हणून मतपेटीद्वारे उद्रेक दिसला. गेली पाच वर्षे कामगारांच्या सर्व संघटनांचा आपआपल्या मागण्यांवर आंदोलनाचा पवित्रा अधिक जोरकसपणे दिसून येतो आहे. गेल्या ७0 वर्षांत कामगार आंदोलनाचा इतिहास आपल्या आर्थिक मागण्यांभोवती जास्त व निवडणुकीच्या राजकारणावर कमी प्रभाव टाकणारा होता. मात्र ८ जानेवारी २0१९ चा दोन दिवसांचा देशव्यापी संप अधिक व्यापक, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांशी भिडणारा व थेट राजकीय संदेश देणारा होता हे नि:संशय!

काही दिवसांत हंगामी अर्थसंकल्प सादर करून लोकसभेच्या निवडणुकांना सामोरे जाणाºया मोदी सरकारला सत्तेवरून पायउतार करण्याचा इशारा देणारा देशव्यापी संप म्हणून ८ व ९ जानेवारीच्या संपाकडे बघावे लागेल. देशव्यापी संपामध्ये कामगार संघटनांचा दावा आहे की, संघटित व असंघटित वर्गातील सुमारे २५ कोटी कामगार सामील झाले होते. प्रत्यक्षात सरकारने हे आकडे मान्य न करता संपकरी संघटनांकडे ढुंकूनही पाहण्याचा प्रयत्न याही वेळी केला नाही. मोदी सरकारची काम करण्याची पद्धतच आहे की ते लोकसभा व राज्यसभा मध्येही निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासारखीच भाषणे करतात आणि विविध मंत्रिमंडळातील सचिव मंडळी प्रशासकीय निवेदनामार्फत अनेक कायद्यांना वळसा घालून सरकारला जे हवे तेच करतात. लोकप्रतिनिधींकडे दुर्लक्ष, कायद्यान्वये निर्माण झालेल्या संस्थांमध्ये हस्तक्षेप व गळचेपी, कायद्याचे उल्लंघन करणाºया उद्योगपती मालकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्या सल्ल्याने व त्यांच्या हुकुमान्वये नवीन कायदे बनविणे हे या सरकारचे गेल्या पाच वर्षांतील व्यवच्छेदक लक्षण म्हणावे लागेल. नवीन कायदे बनविताना सरकारने जाणीवपूर्वक कामगारांचे घटनात्मक अधिकारच हिरावून घेतले आहेत!

कामगारांच्या संघटित उद्रेकामागे कामगारांचे प्रत्यक्ष अनुभव काय आहेत हे तपासणे महत्त्वाचे आहे. कामगार न्यायालये मुळातच अपुरी आहेत. पण न्यायदान करणारे न्यायाधीश कुठे आहेत? रजिस्ट्रार आॅफ ट्रेड युनियन्सकडे नवीन संघटनांचे रजिस्ट्रेशन महिनोन्महिने होत नाही. भाजपाशासित राज्यांमध्ये अर्ज पडून आहेत. आता लोकसभेत मांडण्यात आलेल्या ट्रेड युनियन अ‍ॅक्ट १९२६ मध्ये नवीन बदल कामगारांच्या घटनात्मक हक्कांना पायदळी तुडविणारेच आहेत. जे ब्रिटिशकाळात व ७0 वर्षांत अनेक कामगार संघटनांच्या संघर्षातून मिळाले त्यावर बोळा फिरविण्याचे महत्कार्य केंद्र व राज्य सरकारे भांडवलदारांच्या इशाºयाने इमाने इतबारे करीत आहेत.सामान्य माणसांच्या श्रमांतून निर्माण झालेली राष्ट्रीय संपत्ती काही मूठभर उद्योगपतींसाठी वापरण्याची योजना देश कमकुवत करणारी आहे. परंतु केंद्र किंवा राज्य सरकारे ज्या पद्धतीने स्वायत्त संस्थांशी व्यवहार करतात त्यातून संविधानाला बाधा येते हे मात्र आता कामगाराला उमगले आहे. म्हणूनच तो सत्ताधाºयांना धडा शिकविण्यासाठी विरोधात मतदान करण्याची भाषा करतोय, आर्थिक मागण्यांचे काय होईल ते होवो!( लेखक कामगार नेते आहेत )