शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टिकोन - भारतातील आरोग्य सुविधा सुधारणेचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 17:01 IST

आपल्या देशाच्या ७१व्या वर्धापन दिनाला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सामान्य लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना हाती घेतली.

डॉ. नितीन मळेकर

आपल्या देशाच्या ७१व्या वर्धापन दिनाला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सामान्य लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना हाती घेतली. २0१९च्या सार्वजनिक निवडणुकांआधी ही योजना घोषित केल्यामुळे तिच्याकडे निकोप दृष्टीने पाहाणे जरा कठीण गेले, तरीही हे मान्य करावेच लागेल की, या योजनेमुळे जगभरात भारताची प्रतिमा एक परिवर्तनशील सुधारणावादी आणि प्रचंड कार्यक्षमतेचा देश अशी झाली आहे.

भारतातील गरीब व दारिद्र्य रेषेखालील जनतेसाठी लागणाऱ्या आरोग्यसेवा दर्जेदार आणि अद्यावत करणे हा एक महत्त्वाकांक्षी सुधारणा उपक्रम आहे. आजमितीस दर ६७ टक्के लोकांना आरोग्य विमा संरक्षण नाही. त्यांना आजारपणाचा सर्व खर्च स्वत: करावा लागतो. आजच्या घडीला सार्वजनिक इस्पितळे प्रचंड दबावाखाली काम करीत आहोत. गरीब माणूस अचानक उद्भवलेल्या आजारपणामुळे कर्जबाजारी होतो. ७0 टक्के भारतीय जनता ग्रामीण भागात राहते. त्यांचा कमकुवत आर्थिक कणा अगदीच कोलमडून पडतो. या योजनेंतर्गत हा खर्च केंद्र सरकार व राज्य सरकार ६0 टक्के-४0 टक्के या प्रमाणात देऊ करतील. ‘आयुष्यमान भारत’ या योजनेखाली १0 करोड गरीब कुटुंबांना प्रत्येक ५ लाख इतके विमा संरक्षण दिले जाईल, जेणेकरून ही कुटुंबे आजारपणापातून होणाºया आर्थिक गळचेपीपासून मुक्त राहतील. या उपक्रमातील सरकारकडून निर्धारित आरोग्य सुविधांच्या किमतीविरोधात संबंधित डॉक्टर आणि खासगी इस्पितळे यांनी आधीपासूनच विरोधाचा सूर लावल्याचे आपण अनुभवत आहोत. परिणामी, अनेक शहरी इस्पितळे या उपक्रमाला विरोध असल्याने, बहुतेक रुग्णांना अजूनही लहान रुग्णालयातील कौशल्यहीन, दर्जाहीन आरोग्य सेवांवर अवलंबून राहाणे भाग आहे.

ग्रामीण भागात मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने, तेथील जनतेला शहरी सुविधांवरच अवलंबून राहावे लागते, पण या सुविधा शहरात बाजार भावात उपलब्ध असतात व त्या पैशांअभावी गरिबांपासून दूरच असतात. हा पेच सोडविण्यासाठी खासगी इस्पितळ संघटना अशी आशा करत आहेत की, या सुविधांसाठी सरकार निर्धारित असलेल्या तुटपुंज्या निधीबाबत पुनर्विचार लवकरच करेल.आरोग्यसेवा देऊ करणारे आणि घेणारे (रुग्ण) यांच्यामधील अविश्वास, या अविश्वासामुळे डॉक्टर आणि इस्पितळावर होणारे हिंसाचार वाढत आहेत. यासाठी मुळापासून समस्या समजून घेऊन, ती सोडविण्याकरिता ठोस उपाय केले नाहीत, तर या आरोग्य प्रणालीत अनागोंदी वाढून परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जाईल. मोठ्या प्रमाणावरील लोकसंख्येला स्वस्त किमतीत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देणाºया सर्वांना आरोपीच्या पिंजºयात उभे करणे न्याय होणार नाही. जागतिक मानांकानुसार पाहिले, तर आपल्याकडे रुग्ण अधिक व डॉक्टर अगदीच कमी असे निराशाजनक चित्र आहे. या समस्येचे निराकारण करण्यासाठी दूरदृष्टीची गरज आहे. यासाठी सरकारी आरोग्य यंत्रणा, कायदेतज्ज्ञ, वैद्यकीय संघटना आणि रुग्ण प्रतिनिधी या सर्वांनी एकत्रित काम करणे महत्त्वाचे आहे, तरच या आरोग्य यंत्रणेवरील जनतेने गमावलेल्या विश्वास पुनर्प्रस्थापित होईल. आता ही गोष्ट जर आपण सामंजस्याने हाताळली नाही, तर समाज हिताचे, समाज आरोग्याचे अतोनात नुकसान होईल.(लेखक आरोग्यसेवा संपर्क तज्ज्ञ)

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdoctorडॉक्टर