शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सीडीएसची गरज होतीच!

By रवी टाले | Updated: January 1, 2020 19:07 IST

अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि कारगिल समीक्षा समितीच्या शिफारसीवर दोन दशके उलटल्यानंतर का होईना, देशाला पहिला सीडीएस मिळाला!

ठळक मुद्देभारतात तिन्ही सेनादले स्वत:ला सर्वात प्रमुख दल आणि इतर दोन दलांना साहाय्यक दले समजतात. तिन्ही सेनादलांमध्ये युद्ध सुरू असतानाच नव्हे, तर शांततेच्या काळातही ताळमेळ आणि समन्वय असणे नितांत गरजेचे आहे.संरक्षण सिद्धतेमध्ये केवळ संख्याबळ आणि उत्तमोत्तम शस्त्रास्त्रांचेच नव्हे, तर नियोजन आणि डावपेचांचेही अनन्यसाधारण महत्त्व असते.

कारगिल युद्धापासून बरीच भवति न भवति झाल्यानंतर अखेर २०२० च्या पहिल्या दिवशी भारताला चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) मिळाला. मावळते सेनाप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्याच गळ्यात नव्या पदाची माळ पडली. कारगिल युद्धानंतर १९९९ मध्ये कारगिल समीक्षा समिती गठित करण्यात आली होती. त्या समितीने सर्वप्रथम सीडीएस पदाच्या निर्मितीची गरज अधिकृतरित्या अधोरेखित केली होती. त्यानंतर त्या मुद्यावर बरेच चर्वितचरण झाले; पण सीडीएस पद काही प्रत्यक्षात निर्माण होऊ शकले नाही. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि कारगिल समीक्षा समितीच्या शिफारसीवर दोन दशके उलटल्यानंतर का होईना, देशाला पहिला सीडीएस मिळाला!आपल्या देशात प्रस्थापित झालेल्या परंपरेनुसार, दोन दशके चावून चोथा केलेल्या या विषयावर आता नव्याने चर्चेला तोंड फुटणे अपेक्षित आहे, किंबहुना कॉंग्रेस पक्षाने चर्चेला तोंड फोडलेही आहे. कॉंग्रेसचा आक्षेप जनरल रावत यांच्या नेमणुकीवर असला तरी, मुळात सीडीएसची गरजच काय होती, या दिशेने चर्चेने लवकरच वळण घेतल्यास आश्चर्य वाटू नये! अर्थात हा प्रश्न नव्याने उपस्थित होईल, असे अजिबात नाही. यापूर्वीही हा प्रश्न उपस्थित झाला आहे आणि बराच चघळलाही गेला आहे.अगदी एकोणविसाव्या शतकापर्यंत युद्ध हे प्रामुख्याने लष्कराद्वारेच लढले जात असे. काही प्रमाणात नौदल हातभार लावत असे; पण तो तेवढ्यापुरताच! विसाव्या शतकात तंत्रज्ञानाने नवी झेप घेतल्यानंतर मात्र नौदलाचे महत्त्व तर वाढलेच; पण जोडीला वायुदल हे नवेच दल अस्तित्वात आले. लवकरच आक्रमणासाठी वायुदल आणि नौदलाचे महत्त्व खूप वाढले. जोडीला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आली. एकविसाव्या शतकात तर बाह्य अवकाशातूनही युद्ध लढण्याची तयारी सुरू झाली आहे. अर्थात, हे बदल झाले असतानाही लष्कराची महत्ता अबाधित आहेच! या पाशर््वभूमीवर तिन्ही सेनादले आणि सरकारदरम्यान अधिकाधिक समन्वयाची गरज भासू लागली आहे. ती भागविण्यासाठी म्हणून सीडीएस पदाची आवश्यकता होती.आतापर्यंत संरक्षण सचिव सरकारचे संरक्षण सल्लागार म्हणून काम बघत असत; परंतु त्या पदावरील व्यक्ती ही नागरी सेवेतून आली असल्याने लष्करी सल्ला देण्यावर मर्यादा येत असे. यापुढे सीडीएस हे देखील सरकारला संरक्षणविषयक सल्ला देण्याचे काम करतील; मात्र त्यांचे काम प्रामुख्याने लष्करी सल्ला देण्याचे असेल. संरक्षण सचिव हेच सरकारचे प्रधान संरक्षण सल्लागार असतील. भारत वगळता जगातील बहुतांश बड्या देशांमध्ये सीडीएस हे पद पूर्वीपासून अस्तित्वात आहे. आता भारतही त्या देशांच्या पंगतीत सामील झाला आहे.कुणी कितीही नाकारले तरी ही वस्तुस्थिती आहे, की भारतात तिन्ही सेनादले स्वत:ला सर्वात प्रमुख दल आणि इतर दोन दलांना साहाय्यक दले समजतात. शिवाय प्रत्येक दलाची स्वतंत्र रणनीती आहे. आज युद्ध जमीन, आकाश, समुद्राचा पृष्ठभाग आणि समुद्र तळाशीही लढली जातात. लवकरच ती अवकाशातही लढली जातील, अशी चिन्हे दिसत आहेत. या पाशर््वभूमीवर तिन्ही सेनादलांमध्ये युद्ध सुरू असतानाच नव्हे, तर शांततेच्या काळातही ताळमेळ आणि समन्वय असणे नितांत गरजेचे आहे.दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सध्याच्या घडीला संरक्षण विषयक संशोधन संस्था, संरक्षण उद्योग हे स्वतंत्रपणे काम करतात. वस्तुत: सेनादलांची गरज भागविणे हे त्यांचे काम आहे; मात्र त्यांचा सेनादलांशी नीट ताळमेळ नसल्याने नसल्याने अनेकदा सेनादलांना नेमके काय हवे आहे, हे समजून न घेताच संरक्षण सामुग्रीचे संशोधन व उत्पादन सुरू असते. त्यातूनच मग अनेकदा सेनादलांद्वारा स्वदेशी उत्पादने नाकारून विदेशी उत्पादनांच्या खरेदीचा आग्रह धरला जातो. त्यामध्ये देशाच्या अमूल्य साधनसामग्रीचा व वेळेचा अपव्यय होतो. ते टाळण्यासाठी सेनादले आणि संरक्षण विषयक संशोधन संस्था व संरक्षण उद्योगांदरम्यानही समन्वय असण्याची नितांत गरज आहे.दोन सीमांवर दोन शत्रू राष्टेÑ असताना, कितीही आवडत नसले तरी, भारताला युद्धासाठी सदैव सिद्ध राहणे अनिवार्य आहे. संरक्षण सिद्धतेमध्ये केवळ संख्याबळ आणि उत्तमोत्तम शस्त्रास्त्रांचेच नव्हे, तर नियोजन आणि डावपेचांचेही अनन्यसाधारण महत्त्व असते. हे आणि असे इतर अनेक मुद्दे लक्षात घेता देशाला सीडीएस पदाची नितांत गरज होती, हे मान्य करावेच लागते. शेवटी सीडीएस हे केवळ एक पद नसून ती एक संपूर्ण यंत्रणा आहे. ती यंत्रणा जेव्हा राबेल तेव्हा देशाच्या संरक्षण सिद्धतेत वाढच होईल!

- रवी टाले    ravi.tale@lokmat.com  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानDefenceसंरक्षण विभाग