शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

शेख हसिनांमुळे बांगलादेशात ‘अपोरिबोर्तन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 01:55 IST

बांगलादेशच्या संसदेसाठी ३० डिसेंबरला झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शेख हसिना यांच्या अवामी लीग आणि तिच्या मित्रपक्षांचा प्रचंड विजय झाला. त्यांना ३०० पैकी २८८ जागा मिळाल्या.

- अनय जोगळेकर (आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक)बांगलादेशच्या संसदेसाठी ३० डिसेंबरला झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शेख हसिना यांच्या अवामी लीग आणि तिच्या मित्रपक्षांचा प्रचंड विजय झाला. त्यांना ३०० पैकी २८८ जागा मिळाल्या. विरोधी पक्षांना केवळ सात जागा मिळाल्या. २०१४ साली झालेल्या निवडणुकीवर बांगलादेश नॅशनल पार्टीसह प्रमुख विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकल्यामुळे शेख हसिना यांचे आव्हान सोपे होते. या खेपेस विरोधी पक्ष मैदानात असून, आवामी लीगच्या १२ जागा वाढल्या आहेत. बांगलादेशच्या संसदेत ३५० जागा असतात. त्यातील ५० महिलांसाठी राखीव असतात आणि विजयी झालेल्या पक्षांनी जिंकलेल्या जागांच्या प्रमाणात त्या वाटून घेतल्या जातात. उरलेल्या ३०० जागांसाठी निवडणुका होतात.२००९ साली सत्तेवर आल्यानंतर शेख हसिनांनी पद्धतशीरपणे विरोधी पक्षांचे खच्चीकरण करण्यास प्रारंभ केला. बांगलादेश निर्मिती युद्धात झालेल्या मानवाधिकार हननाच्या गुन्ह्यांमध्ये पाकिस्तानला मदत करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्यात आल्या. भ्रष्टाचारविरोधी कारवाईचा भाग म्हणून अनेकांना अटक करण्यात आली. बीएनपीच्या नेत्या आणि माजी पंतप्रधान बेगम खलिदा झिया फेब्रुवारी, २०१८ पासून भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगात असून, आॅक्टोबरमध्ये झिया चॅरिटेबल ट्रस्टमधील अपहाराबद्दल त्यांना सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. राजकीय हिंसाचार आणि विरोधी विचारांचे दमन या गोष्टी वगळता, शेख हसिना यांच्या काळात बांगलादेशला स्थैर्य प्राप्त झाले असून, आर्थिक विकासाचा वेग वाढला आहे. दरडोई उत्पन्नात दीडपट वाढ झाली असून, गरिबी रेषेखालील लोकसंख्येत घट होऊन, ती १९ टक्क्यांवरून ९ टक्क्यांवर आली आहे. या कालावधीत बांगलादेश जगातील गरीब देशांच्या गटातून विकसनशील देशांच्या गटात पोहोचला असून, मानवी विकासाच्या अनेक निर्देशांकांत तो पाकिस्तान आणि भारतापेक्षा चांगली कामिगरी करत आहे.आवामी लीगचा विजय ही भारतासाठी चांगली बातमी आहे. आपल्या बेल्ट-रोड प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि विकास प्रकल्पांची स्वप्ने दाखवून चीन एकापाठोपाठ एक भारताच्या शेजारी देशांना गळाला लावत असताना, बांगलादेश आणि भूतान हे दोनच देश खंबीरपणे भारताच्या बाजूने उभे राहिले आहेत.नरेंद्र मोदींच्या बांगलादेश भेटीत झालेल्या करारानुसार भारताला बांगलादेशच्या मोंगला आणि चितगाव बंदरांचा वापर करता येऊ लागल्यामुळे, पूर्वांचलातील राज्यांना देशाच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांशी, तसेच आसियान देशांशी सागरी व्यापार करणे सुलभ झाले आहे.बांगलादेशच्या स्वातंत्र्यापासून, खरे तर भारताच्या फाळणीपासून प्रलंबित भू-सीमा करार केल्यामुळे जमिनींची अदलाबदल करून सीमानिश्चिती करण्यात आली. या करारामुळे भारताच्या ताब्यातील सुमारे दहा हजार हेक्टर जमीन बांगलादेशला देण्यात आली, तर बांगलादेशच्या ताब्यातील सुमारे ५०० हेक्टर जमीन भारताला मिळाली. यामुळे सीमा बंदिस्त करता येऊन बेकायदा बांगलादेशी घुसखोरांना आळा घालणे शक्य झाले आहे. दहशतवाद आणि ईशान्य भारतातील फुटीरतावादाशी लढण्यात बांगलादेश भारताला मोठ्या प्रमाणावर सहकार्य करत असून, त्यामुळेच पूर्वांचलात रस्ते, रेल्वे, पूल, वीज असे मोठे प्रकल्प आकार घेऊ लागले आहेत. भारत-बांगलादेश संबंधांच्या व्यापक परिप्रेक्ष्यातून पाहिल्यास, शेख हसिनांचा विजय ही भारतासाठी आनंदाची बातमी आहे.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश