शहरं
Join us  
Trending Stories
1
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
2
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
3
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
4
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
5
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
6
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
7
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
8
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
9
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
10
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
11
"मला तुरुंगात ठेवलं तर आप प्रचार न करता ७० पैकी ७० जागा जिंकेल’’, अरविंद केजरीवाल यांचा भाजपाला टोला 
12
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
13
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
14
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
15
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

प्र. के. अत्रे यांची माफी मागून...

By संदीप प्रधान | Published: January 12, 2018 5:39 AM

(डोंबिवलीतील एका पोलीस शिपायाने सात लग्ने केल्याबद्दल त्याच्यावर कारवाई झाली. त्याचे काल्पनिक स्वगत प्र. के. अत्रे यांची माफी मागून)

- संदीप प्रधान(डोंबिवलीतील एका पोलीस शिपायाने सात लग्ने केल्याबद्दल त्याच्यावर कारवाई झाली. त्याचे काल्पनिक स्वगत प्र. के. अत्रे यांची माफी मागून)न्यायमूर्ती महाराज या विद्वान वकील महाशयांनी माझ्यावर इतकी आगपाखड केली आहे की, आता मी दीनदुबळा स्वत:चा बचाव काय करणार? ठकसेन काय, नटश्रेष्ठ काय... मराठीमधील एकही विशेषण वकील साहेबांनी माझे वर्णन करताना सोडले नाही. रावणानंतर लखोबाचा आणि त्यानंतर आमचा नंबर लागतो, असेच वकीलसाहेब म्हणाले आहेत. अनेक स्त्रियांना फसवून त्यांचे वाटोळे करणारा मी महाभयंकर माणूस आहे, असे वकीलसाहेब म्हणतात. त्यांनी उभे केलेले साक्षीदारही तेच सांगत आहेत. माझ्याविरुद्ध तक्रार देणारी ही सूचिता म्हणते की, तिला विवाह करून मी अंतर दिले आणि मालमत्तेत वाटा दिला नाही. अशीच फसवणूक मालती, शांताबाई, पल्लवी, दीपाली, पुष्पलता आणि कविता यांची केली. न्यायमूर्ती महाराज मी साºयांशी लग्न केली. संसार केला. एका बायकोमुळे पगार पुरत नाही. मी सात नांदवल्या. या वकील महाशयांनी सिंहाला पकडायला लावलेल्या कायद्याच्या सापळ्यात माझ्यासारखा उंदीर सापडलाय किंवा यांनी साप... साप म्हणत दोरी धोपटलीय, असेही म्हणणार नाही. न्यायमूर्ती महाराज आपल्या मागे तसबिरीत बसलेल्या महात्मा गांधी ऊर्फ बापूंची शपथ घेऊन सांगतो ‘तो मीच आहे’.लखोबा लोखंडेनी मला तरुण वयापासून भारावून टाकले होते. पोलिसांच्या टाळूवर हात फिरवणारा लखोबा मला नेहमीच आकर्षित करत आला. समाजातील लखोबा जेरबंद करण्याकरिता मी पोलीस झालो. मी जेव्हा पोलीस झालो तेव्हा परस्त्रीकडे नजर वर करून पाहत नव्हतो. त्यामुळे कृष्णासारखे मी इतक्या स्त्रियांबरोबर विवाह करीन किंवा ध्रुतराष्ट्रासारखी मुले जन्माला घालीन, यावर माझा विश्वास नव्हता. मात्र दसरा नाही की पाडवा, जत्रा नाही की ऊर्स, मोर्चा नाही की दंगा, सभा नाही की कर्फ्यु. बंदोबस्तामुळे शहरातील कानाकोपºयात माझी ड्युटी लावली गेली. थंडी, वारा, ऊन, पाऊस कशाची पर्वा न करता मी आपला उभा. माझ्या घरच्यांनी देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने माझे मालतीशी लग्न लावून दिले होते. ती बिच्चारी माझी घरी वाट पाहत असायची. मी घरी आल्याखेरीज तिच्या घशाखाली घास जात नसल्यानं उपाशीपोटी निजायची. अशीच माझ्या आठवणीत झुरून गेली. मग काय बंदोबस्त करता करता कधी भरपावसात मला सूचिता भेटली तर कधी थंडीत दया येऊन शांताबाईनं मला कांबळ दिली. या सगळ्या शिकल्यासवरल्या, नोकरी करणाºया मुली, मॅट्रीमोनियल साईटस्वर नाव नोंदवून बसलेल्या. हुरळली मेंढी अन लागली लांडग्याच्या पाठीशी अशा फसल्याच कशा? न्यायमूर्ती महाराज माधव काझीनं ५८ वर्षांपूर्वी लग्न जमत नसलेल्या मुलींना फसवलं. त्याच्यावर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी मागील दहा हजार वर्षात झाला नाही, असा लखोबा जन्माला घातला. पण कुणी धडा घेतला नाही. मात्र तरीही मुलींची मोडणारी लग्न, घोर फसवणूक हा सिलसिला सुरुच आहे. त्यामुळे न्यायमूर्ती महाराज तुम्ही मला दहा काळ्या पाण्याची किंवा २५ फाशींची शिक्षा द्या. प्रौढ मुलींच्या विवाहाचा प्रश्न सुटणार असेल तर माझे हौतात्म्य सार्थकी लागेल.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीPoliceपोलिस