शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
2
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
3
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
4
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
5
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
6
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
7
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
8
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
9
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
10
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
11
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
12
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
13
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
14
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
15
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
16
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
17
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
18
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
19
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
20
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले

बाकी काहीही चालेल, काँग्रेस-डावे एकत्र नकोत!

By shrimant mane | Updated: March 3, 2023 08:19 IST

ईशान्य भारतातील मेघालय, नागालँड व त्रिपुरा या तीन राज्यांच्या विधानसभा निकालांचा संदेश स्पष्ट आहे. या टापूवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला आहे.

- श्रीमंत माने,  कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूरकर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या चार मोठ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम, सेमीफायनल मानल्या गेलेल्या ईशान्य भारतातील मेघालय, नागालँड व त्रिपुरा या तीन राज्यांच्या विधानसभा निकालांचा संदेश स्पष्ट आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांनी मशागत केलेल्या या टापूवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला आहे. प्रत्येकी ६० आमदारांच्या,  तीन राज्ये मिळून पाच लोकसभा जागांच्या या टापूत  काँग्रेसच्या वाट्याला पुन्हा अपेक्षाभंगच आला. 

 

नागालँडमध्ये नॅशनॅलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि भाजप पुन्हा सत्तेवर आला आहे. काँग्रेसला खाते उघडता आले नाही; पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सात, तर रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाने दोन जागा जिंकल्या, ही आपल्यासाठी चर्चेची बातमी. मेघालय विधानसभा त्रिशंकू दिसत असली, तरी दिवंगत पी. ए. संगमा यांनी स्थापन केलेल्या नॅशनल पीपल्स पार्टीने २५ जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. आम आदमी पक्षाच्या आधी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविलेला हा राजकीय पक्ष. तो राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडल्यामुळे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांना संपविण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीने मैदानात उतरला होता. पण, ते काही जमले नाही. गेल्यावेळी दोन जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा तीनच जागा जिंकता आल्या. कदाचित भाजप संगमांना जवळ करील. 

देशाचे लक्ष त्रिपुराकडे लागले होते. पहिले कारण,  डाव्या आघाडीची दीर्घकाळाची सत्ता गेल्यावेळी भाजपने हिसकावून घेतली होती. यंदा काँग्रेसने डाव्यांशी आघाडी  केली. दुसरे कारण, ‘मुख्यमंत्री बदला व पुन्हा सत्ता मिळवा’, हा फॉर्म्युला भाजपने त्रिपुरात राबविला. बिप्लव देब यांच्या जागी माणिक साहा यांना मुख्यमंत्री बनवून भाजपने जनतेला कौल मागितला. तिसरे कारण, काँग्रेसचे खासदार, प्रदेशाध्यक्ष राहिलेले, आगरतळ्याच्या राजघराण्याचे वारस प्रद्योत किशोर माणिक्य देबबर्मा यांनी ग्रेटर टिपरालँड या आदिवासी राज्याची मागणी करीत ‘टिपरा मोथा’ हा नवा प्रादेशिक पक्ष काढला. त्रिपुराचे किंग आहोतच, आता किंगमेकर बनू, असे स्वप्न पाहिले. तेरा जागा मिळाल्या. परंतु, भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले. राजपुत्रांचे स्वप्न त्यामुळे साकार होणार नाही. डावे व काँग्रेसच्या आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. कारण, प्रद्योत देबबर्मा यांच्या प्रादेशिक पक्षामुळे विरोधी मतांचे विभाजन झाले. त्याचा फायदा भाजपला मिळाला. आता भाजप देबबर्मा यांना सोबत घेण्याची तयारी करीत आहे. 

त्रिपुराचा निकाल हा डाव्यांशी आघाडी करून निवडणूक लढण्याचा काँग्रेसचा प्रयोग मतदारांनी धुडकावण्याचा हा पूर्व किंवा ईशान्य भारतातील दुसरा प्रसंग. पश्चिम बंगालमध्ये तो आधी फसला होता. इतिहासात पहिल्यांदाच डावे व काँग्रेस या दोघांच्या हाती भोपळा आला होता. योगायोग असा की, आजच अधीर रंजन चौधरी यांच्या मुर्शिदाबाद या गडातील सागरदिघी विधानसभेची पोटनिवडणूक जिंकून काँग्रेसने पुन्हा विधानसभेत प्रतिनिधित्व मिळविले आहे. थोडक्यात, काँग्रेसला मतदारांचा पुन्हा सांगावा आहे की, बाकी काहीही करा, ज्यांच्याविरुद्ध दशकानुदशके लढला, त्या डाव्यांशी युती मान्य नाही. जाता जाता एक गुड न्यूज..मातृसत्ताक कुटुंब पद्धतीसाठी चर्चेत असलेल्या ईशान्य भारतातील नागालँड विधानसभेत एनडीपीपी पक्षाकडून विजयी झालेल्या हेकानी जाखलू या पहिल्या महिला आमदार असतील. त्यासाठी तब्बल तेरा निवडणुका व्हाव्या लागल्या.    srimant.mane@lokmat.com

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूक