शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
3
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
4
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
5
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
6
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
7
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
8
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
9
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
10
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
11
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
12
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
13
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?
14
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
15
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
16
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
17
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
18
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
19
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
20
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार

बाकी काहीही चालेल, काँग्रेस-डावे एकत्र नकोत!

By shrimant mane | Updated: March 3, 2023 08:19 IST

ईशान्य भारतातील मेघालय, नागालँड व त्रिपुरा या तीन राज्यांच्या विधानसभा निकालांचा संदेश स्पष्ट आहे. या टापूवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला आहे.

- श्रीमंत माने,  कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूरकर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या चार मोठ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम, सेमीफायनल मानल्या गेलेल्या ईशान्य भारतातील मेघालय, नागालँड व त्रिपुरा या तीन राज्यांच्या विधानसभा निकालांचा संदेश स्पष्ट आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांनी मशागत केलेल्या या टापूवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला आहे. प्रत्येकी ६० आमदारांच्या,  तीन राज्ये मिळून पाच लोकसभा जागांच्या या टापूत  काँग्रेसच्या वाट्याला पुन्हा अपेक्षाभंगच आला. 

 

नागालँडमध्ये नॅशनॅलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि भाजप पुन्हा सत्तेवर आला आहे. काँग्रेसला खाते उघडता आले नाही; पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सात, तर रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाने दोन जागा जिंकल्या, ही आपल्यासाठी चर्चेची बातमी. मेघालय विधानसभा त्रिशंकू दिसत असली, तरी दिवंगत पी. ए. संगमा यांनी स्थापन केलेल्या नॅशनल पीपल्स पार्टीने २५ जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. आम आदमी पक्षाच्या आधी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविलेला हा राजकीय पक्ष. तो राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडल्यामुळे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांना संपविण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीने मैदानात उतरला होता. पण, ते काही जमले नाही. गेल्यावेळी दोन जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा तीनच जागा जिंकता आल्या. कदाचित भाजप संगमांना जवळ करील. 

देशाचे लक्ष त्रिपुराकडे लागले होते. पहिले कारण,  डाव्या आघाडीची दीर्घकाळाची सत्ता गेल्यावेळी भाजपने हिसकावून घेतली होती. यंदा काँग्रेसने डाव्यांशी आघाडी  केली. दुसरे कारण, ‘मुख्यमंत्री बदला व पुन्हा सत्ता मिळवा’, हा फॉर्म्युला भाजपने त्रिपुरात राबविला. बिप्लव देब यांच्या जागी माणिक साहा यांना मुख्यमंत्री बनवून भाजपने जनतेला कौल मागितला. तिसरे कारण, काँग्रेसचे खासदार, प्रदेशाध्यक्ष राहिलेले, आगरतळ्याच्या राजघराण्याचे वारस प्रद्योत किशोर माणिक्य देबबर्मा यांनी ग्रेटर टिपरालँड या आदिवासी राज्याची मागणी करीत ‘टिपरा मोथा’ हा नवा प्रादेशिक पक्ष काढला. त्रिपुराचे किंग आहोतच, आता किंगमेकर बनू, असे स्वप्न पाहिले. तेरा जागा मिळाल्या. परंतु, भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले. राजपुत्रांचे स्वप्न त्यामुळे साकार होणार नाही. डावे व काँग्रेसच्या आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. कारण, प्रद्योत देबबर्मा यांच्या प्रादेशिक पक्षामुळे विरोधी मतांचे विभाजन झाले. त्याचा फायदा भाजपला मिळाला. आता भाजप देबबर्मा यांना सोबत घेण्याची तयारी करीत आहे. 

त्रिपुराचा निकाल हा डाव्यांशी आघाडी करून निवडणूक लढण्याचा काँग्रेसचा प्रयोग मतदारांनी धुडकावण्याचा हा पूर्व किंवा ईशान्य भारतातील दुसरा प्रसंग. पश्चिम बंगालमध्ये तो आधी फसला होता. इतिहासात पहिल्यांदाच डावे व काँग्रेस या दोघांच्या हाती भोपळा आला होता. योगायोग असा की, आजच अधीर रंजन चौधरी यांच्या मुर्शिदाबाद या गडातील सागरदिघी विधानसभेची पोटनिवडणूक जिंकून काँग्रेसने पुन्हा विधानसभेत प्रतिनिधित्व मिळविले आहे. थोडक्यात, काँग्रेसला मतदारांचा पुन्हा सांगावा आहे की, बाकी काहीही करा, ज्यांच्याविरुद्ध दशकानुदशके लढला, त्या डाव्यांशी युती मान्य नाही. जाता जाता एक गुड न्यूज..मातृसत्ताक कुटुंब पद्धतीसाठी चर्चेत असलेल्या ईशान्य भारतातील नागालँड विधानसभेत एनडीपीपी पक्षाकडून विजयी झालेल्या हेकानी जाखलू या पहिल्या महिला आमदार असतील. त्यासाठी तब्बल तेरा निवडणुका व्हाव्या लागल्या.    srimant.mane@lokmat.com

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूक