शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

बाकी काहीही चालेल, काँग्रेस-डावे एकत्र नकोत!

By shrimant mane | Updated: March 3, 2023 08:19 IST

ईशान्य भारतातील मेघालय, नागालँड व त्रिपुरा या तीन राज्यांच्या विधानसभा निकालांचा संदेश स्पष्ट आहे. या टापूवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला आहे.

- श्रीमंत माने,  कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूरकर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या चार मोठ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम, सेमीफायनल मानल्या गेलेल्या ईशान्य भारतातील मेघालय, नागालँड व त्रिपुरा या तीन राज्यांच्या विधानसभा निकालांचा संदेश स्पष्ट आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांनी मशागत केलेल्या या टापूवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला आहे. प्रत्येकी ६० आमदारांच्या,  तीन राज्ये मिळून पाच लोकसभा जागांच्या या टापूत  काँग्रेसच्या वाट्याला पुन्हा अपेक्षाभंगच आला. 

 

नागालँडमध्ये नॅशनॅलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि भाजप पुन्हा सत्तेवर आला आहे. काँग्रेसला खाते उघडता आले नाही; पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सात, तर रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाने दोन जागा जिंकल्या, ही आपल्यासाठी चर्चेची बातमी. मेघालय विधानसभा त्रिशंकू दिसत असली, तरी दिवंगत पी. ए. संगमा यांनी स्थापन केलेल्या नॅशनल पीपल्स पार्टीने २५ जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. आम आदमी पक्षाच्या आधी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविलेला हा राजकीय पक्ष. तो राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडल्यामुळे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांना संपविण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीने मैदानात उतरला होता. पण, ते काही जमले नाही. गेल्यावेळी दोन जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा तीनच जागा जिंकता आल्या. कदाचित भाजप संगमांना जवळ करील. 

देशाचे लक्ष त्रिपुराकडे लागले होते. पहिले कारण,  डाव्या आघाडीची दीर्घकाळाची सत्ता गेल्यावेळी भाजपने हिसकावून घेतली होती. यंदा काँग्रेसने डाव्यांशी आघाडी  केली. दुसरे कारण, ‘मुख्यमंत्री बदला व पुन्हा सत्ता मिळवा’, हा फॉर्म्युला भाजपने त्रिपुरात राबविला. बिप्लव देब यांच्या जागी माणिक साहा यांना मुख्यमंत्री बनवून भाजपने जनतेला कौल मागितला. तिसरे कारण, काँग्रेसचे खासदार, प्रदेशाध्यक्ष राहिलेले, आगरतळ्याच्या राजघराण्याचे वारस प्रद्योत किशोर माणिक्य देबबर्मा यांनी ग्रेटर टिपरालँड या आदिवासी राज्याची मागणी करीत ‘टिपरा मोथा’ हा नवा प्रादेशिक पक्ष काढला. त्रिपुराचे किंग आहोतच, आता किंगमेकर बनू, असे स्वप्न पाहिले. तेरा जागा मिळाल्या. परंतु, भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले. राजपुत्रांचे स्वप्न त्यामुळे साकार होणार नाही. डावे व काँग्रेसच्या आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. कारण, प्रद्योत देबबर्मा यांच्या प्रादेशिक पक्षामुळे विरोधी मतांचे विभाजन झाले. त्याचा फायदा भाजपला मिळाला. आता भाजप देबबर्मा यांना सोबत घेण्याची तयारी करीत आहे. 

त्रिपुराचा निकाल हा डाव्यांशी आघाडी करून निवडणूक लढण्याचा काँग्रेसचा प्रयोग मतदारांनी धुडकावण्याचा हा पूर्व किंवा ईशान्य भारतातील दुसरा प्रसंग. पश्चिम बंगालमध्ये तो आधी फसला होता. इतिहासात पहिल्यांदाच डावे व काँग्रेस या दोघांच्या हाती भोपळा आला होता. योगायोग असा की, आजच अधीर रंजन चौधरी यांच्या मुर्शिदाबाद या गडातील सागरदिघी विधानसभेची पोटनिवडणूक जिंकून काँग्रेसने पुन्हा विधानसभेत प्रतिनिधित्व मिळविले आहे. थोडक्यात, काँग्रेसला मतदारांचा पुन्हा सांगावा आहे की, बाकी काहीही करा, ज्यांच्याविरुद्ध दशकानुदशके लढला, त्या डाव्यांशी युती मान्य नाही. जाता जाता एक गुड न्यूज..मातृसत्ताक कुटुंब पद्धतीसाठी चर्चेत असलेल्या ईशान्य भारतातील नागालँड विधानसभेत एनडीपीपी पक्षाकडून विजयी झालेल्या हेकानी जाखलू या पहिल्या महिला आमदार असतील. त्यासाठी तब्बल तेरा निवडणुका व्हाव्या लागल्या.    srimant.mane@lokmat.com

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूक