शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

नगरची पालखी कोणी वहायची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 02:25 IST

नगरला पार पडलेल्या मसापच्या विभागीय साहित्य संमेलनाच्या मांडवात रामदास फुटाणे यांनी नगरच्या राजकारणावर कोटी केली. ते म्हणाले, या जिल्ह्यात उत्तरेचे लोक पालखीत बसतात

नगरला पार पडलेल्या मसापच्या विभागीय साहित्य संमेलनाच्या मांडवात रामदास फुटाणे यांनी नगरच्या राजकारणावर कोटी केली. ते म्हणाले, या जिल्ह्यात उत्तरेचे लोक पालखीत बसतात, आणि दक्षिण भागातील लोक निव्वळ या पालखीचे भोई असतात.फुटाणे नगरच्या प्रादेशिक असमतोलावर बोलले. फुटाणे यांना जिल्ह्याचे जुने संदर्भ पक्के ठाऊक आहेत. ‘सामना’ चित्रपटाच्या काळातील नगरचे सरंजामी व साखर कारखानदारीचे राजकारण त्यांनी जवळून पाहिलेले आहे. हा चित्रपट सहकारातील राजकारणावर बेतलेला आहे. अर्थात ते राजकीय बेरकीपण व ‘सामना’ आजही संपलेला नाही. इतर जिल्ह्यात नेते जिल्हा म्हणून काही अस्मिता जपत असतात. नगरच्या नेत्यांना जिल्हा म्हणून जी काही अस्मिता असते त्याच्याशी घेणेदेणे दिसत नाही.नगरचा आजचा नेता कोण? असा प्रश्न फुटाणे यांनी केला असता? तर संमेलनस्थळ निरुत्तर झाले असते. ‘नेता नसलेला जिल्हा’ अशी नगरची ओळख बनू पाहत आहे. जे कोणी नेते आहेत ते आपापले किल्ले व राजकारण सांभाळण्यात मश्गुल आहेत. ते वरती श्रेष्ठींना सांभाळतात आणि खाली आपापल्या मतदारसंघाला. फुटाणे यांनी जे निरीक्षण नोंदविले ते शरद पवारही नगरमध्ये अनेकदा बोलून दाखवितात.राज्यात व केंद्रात सध्या भाजप-सेनेचे सरकार आहे. इतर जिल्ह्यांत तो फरक कदाचित जाणवत असेल. नगरमध्ये मात्र, सत्ताधारी व विरोधक इतके प्रेमात आहेत की त्यांच्यात भेदच कळत नाही. पालकमंत्री राम शिंदे व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे दोघेही एकाच सरकारमधील घटक वाटतात. गत आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी राळेगणसिद्धीत महावितरणच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले. त्या शासकीय जाहिरातीत पालकमंत्री शिंदे यांसह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांची नावे होती. राळेगणसिद्धी गाव सेनेचे आमदार विजय औटी व भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या मतदारसंघात आहे. त्यांची नावे मात्र जाहिरातीत नव्हती. अर्थात ही बाब मुख्यमंत्र्यांनाही बहुधा खटकलेली नाही. अण्णा हजारे हे ‘बिगर राजकीय’ असल्याने ते असले काही बघतच नसतात.सध्या नगरच्या जिल्हा बँकेची भरती गाजते आहे. भरतीत संचालक व अधिकाºयांची मुलेच गुणवत्ता यादीत असल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणल्याने भरतीला स्थगिती मिळाली. राज्यातील १७ हजार मुले या भरतीला बसली होती. मात्र, भरतीबाबत जे काही आक्षेप आले, त्याबाबत विखे, थोरात, पिचड, गडाख, कर्डिले, पाचपुते, कोल्हे, घुले, नागवडे असे जिल्ह्यातील सगळेच नेते मौन बाळगून आहेत. अण्णा हजारे बोलले ते भरती पूर्ण झाल्यावर. अगोदरच त्यांनी हस्तक्षेप केला असता तर कष्ट करून परीक्षा देणाºया उमेदवारांना शेवटी भरतीच्या स्थगितीला सामोरे जावे लागले नसते. पालकमंत्री शिंदेही काहीच बोलत नाहीत. प्रशासन व सरकार जो काही निर्णय घेईल तो आपणच घेतला, असे भासवून ते प्रत्येक प्रकरणात नामानिराळे राहतात. ‘मुंबई ते कर्जत-जामखेड’ आणि पुन्हा ‘सोयीने’ मुंबईकडे प्रयाण, असा त्यांचा शासकीय दौरा ठरलेला असतो. त्यामुळे नगर जिल्ह्याची पालखी कोणी वहायची? हा फुटाणे यांचा प्रश्न कळीचा आहे.- सुधीर लंके