शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

अन्वयार्थ : 'पीएफ'वर किमान ८.५० टक्के व्याज हवेच, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 09:19 IST

महागाईच्या नावाने 'ईपीएफ'चे व्याजदर कमी करणे सुसंगत नाही. यावर्षीचे ५३०० कोटी व गेल्या वर्षीचे ३०० कोटी या शिल्लक रकमेवर कर्मचाऱ्यांचाच हक्क आहे.

अॅड. कांतीलाल तातेड अर्थशास्त्राचे अभ्यासक

केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री मनसुख मंडाविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर गेल्या वर्षाप्रमाणेच ८.२५ टक्के दराने व्याज देण्यासंबंधीचा निर्णय झाला आहे. अर्थमंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर ती रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या 'ईपीएफ'च्या खात्यामध्ये जमा होईल. ८.२५ टक्के व्याजदर जाहीर केल्यानंतर भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे (ईपीएफओ) ५३०० कोटी रुपयांची वाटपयोग्य रक्कम शिल्लक असून, गेल्या वर्षाचेही ३०० कोटी रुपये शिल्लक आहेत. व्याजदरात वाढ करून या शिल्लक रक्कमेचे वाटप सक्रीय ७.४० कोटी कर्मचाऱ्यांमध्ये करणे हे 'ईपीएफओ'वर बंधनकारक आहे. तसे केले, तर 'ईपीएफओ'ला ८.५५ टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर देणे शक्य आहे.

७.४० कोटी कर्मचाऱ्यांच्या दरमहा पगारातून कपात केलेल्या रकमेच्या गुंतवणुकीवर २०२४-२५ सालात मिळालेल्या उत्पन्नाच्या रकमेपैकी ५३०० कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे. त्या रकमेवर कर्मचाऱ्यांचाच हक्क आहे. असे असताना, ती रक्कम त्यांना का दिली जात नाही? यापैकी हजारो-लाखो कर्मचारी पुढच्या वर्षी सेवानिवृत्त होतील अथवा नोकरी सोडतील. अशा कर्मचाऱ्यांना या लाभाला मुकावे लागेल. हे योग्य आहे का?

कामगार संघटनांनी श्रम व रोजगार मंत्री मंडाविया यांच्याकडे 'ईपीएफ'च्या व्याजदरात वाढ करण्याची मागणी केली होती, परंतु महागाई वाढ नियंत्रणात आणण्यासाठी सरकार करीत असलेल्या उपाययोजनांमुळे महागाई कमी होईपर्यंत संघटनांनी थांबावे, असे मंडाविया यांनी सांगितले. हे प्रतिपादन पूर्णतः अयोग्य व चुकीचे आहे. मुळात महागाई वाढण्याची कारणे पूर्णतः वेगळी असून, त्याचा रेपो दराशी तसेच 'ईपीएफ'च्या व्याजदर वाढीशी फारसा सबंध नाही. कोणत्याही ठेवींवरील व्याजदर निश्चित 600 करण्याचे आर्थिक निकष हे पूर्णतः वेगळे असून, महागाईमध्ये वाढ होईल, म्हणून ठेवींवरील व्याजदरात वाढच करायची नाही, असा कोणताही आर्थिक निकष अस्तित्वात नाही. केंद्र सरकार व राज्य सरकारे विविध मार्गानी दरवर्षी काही लाख कोटी रुपये कोट्यवधी लोकांना मोफत वाटत असताना त्याचा भाववाढीवर परिणाम होत नाही का?

मुळात 'ईपीएफ'चा व्याजदर वाढविल्यास ती रक्कम संबंधित ७.४० कोटी कर्मचाऱ्यांना रोख स्वरूपात दिली जाणार नसून, ती रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे ती सर्व रक्कम चलनात येणार नसल्यामुळे भाववाढ होण्याचा कोणताही संबंध नाही. उलट 'ईपीएफ' सारख्या दीर्घकालीन गुंतवणुकीचे मूल्य महागाईमुळे कमी होऊ नये, म्हणून त्यावर जास्त दराने व्याज देणे आवश्यक असते.

'इतर मुदतीच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजाचा विचार करता 'ईपीएफ'वर इतर गुंतवणुकीपेक्षा सतत जास्त व्याज मिळत असते. हे व्याजाचे उत्पन्न एका विशिष्ट मर्यादेपर्यंत करमुक्त आहे', हे सरकारचे म्हणणे देखील पूर्णतः अयोग्य व अन्यायकारक आहे. आपल्या घटनेने 'लोककल्याणकारी राज्य'चे धोरण स्वीकारलेले असून, अनुच्छेद २१ अन्वये प्रत्येकाला सन्मानाने जीवन जगण्याचा मूलभूत अधिकार बहाल केलेला आहे. जनतेचे जीवनमान उंचवावे, त्यांनी अधिक समृद्ध जीवन जगावे व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, म्हणून १९५१ पासून देशात योजनाबद्ध विकास प्रक्रिया सुरू झाली. कर्मचाऱ्यांना 'सामाजिक सुरक्षा' प्रदान करणे ही सरकारची जबाबदारी आहे, या भावनेतून सरकारने कर्मचाऱ्यांच्या, तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याची सुरक्षितता म्हणून 'ईपीएफ' सारख्या चांगले व्याज देणाऱ्या 'सामाजिक सुरक्षा' योजना सुरू केल्या होत्या. त्यामुळे महागाईच्या नावाखाली 'ईपीएफ'चे व्याजदर कमी करणे सरकारच्या मूळ धोरणाशी विसंगत आहे, म्हणून सरकारने 'ईपीएफ' वरील व्याजदर किमान ८.५० टक्के करणे आवश्यक आहे. 

kantilaltated@gmail.com

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीEPFOईपीएफओ