शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
3
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
4
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
5
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
6
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
7
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
8
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
9
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
10
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
11
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
12
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
13
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
14
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
15
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
16
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
17
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
18
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
19
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
20
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अन्वयार्थ : 'पीएफ'वर किमान ८.५० टक्के व्याज हवेच, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 09:19 IST

महागाईच्या नावाने 'ईपीएफ'चे व्याजदर कमी करणे सुसंगत नाही. यावर्षीचे ५३०० कोटी व गेल्या वर्षीचे ३०० कोटी या शिल्लक रकमेवर कर्मचाऱ्यांचाच हक्क आहे.

अॅड. कांतीलाल तातेड अर्थशास्त्राचे अभ्यासक

केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री मनसुख मंडाविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर गेल्या वर्षाप्रमाणेच ८.२५ टक्के दराने व्याज देण्यासंबंधीचा निर्णय झाला आहे. अर्थमंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर ती रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या 'ईपीएफ'च्या खात्यामध्ये जमा होईल. ८.२५ टक्के व्याजदर जाहीर केल्यानंतर भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे (ईपीएफओ) ५३०० कोटी रुपयांची वाटपयोग्य रक्कम शिल्लक असून, गेल्या वर्षाचेही ३०० कोटी रुपये शिल्लक आहेत. व्याजदरात वाढ करून या शिल्लक रक्कमेचे वाटप सक्रीय ७.४० कोटी कर्मचाऱ्यांमध्ये करणे हे 'ईपीएफओ'वर बंधनकारक आहे. तसे केले, तर 'ईपीएफओ'ला ८.५५ टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर देणे शक्य आहे.

७.४० कोटी कर्मचाऱ्यांच्या दरमहा पगारातून कपात केलेल्या रकमेच्या गुंतवणुकीवर २०२४-२५ सालात मिळालेल्या उत्पन्नाच्या रकमेपैकी ५३०० कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे. त्या रकमेवर कर्मचाऱ्यांचाच हक्क आहे. असे असताना, ती रक्कम त्यांना का दिली जात नाही? यापैकी हजारो-लाखो कर्मचारी पुढच्या वर्षी सेवानिवृत्त होतील अथवा नोकरी सोडतील. अशा कर्मचाऱ्यांना या लाभाला मुकावे लागेल. हे योग्य आहे का?

कामगार संघटनांनी श्रम व रोजगार मंत्री मंडाविया यांच्याकडे 'ईपीएफ'च्या व्याजदरात वाढ करण्याची मागणी केली होती, परंतु महागाई वाढ नियंत्रणात आणण्यासाठी सरकार करीत असलेल्या उपाययोजनांमुळे महागाई कमी होईपर्यंत संघटनांनी थांबावे, असे मंडाविया यांनी सांगितले. हे प्रतिपादन पूर्णतः अयोग्य व चुकीचे आहे. मुळात महागाई वाढण्याची कारणे पूर्णतः वेगळी असून, त्याचा रेपो दराशी तसेच 'ईपीएफ'च्या व्याजदर वाढीशी फारसा सबंध नाही. कोणत्याही ठेवींवरील व्याजदर निश्चित 600 करण्याचे आर्थिक निकष हे पूर्णतः वेगळे असून, महागाईमध्ये वाढ होईल, म्हणून ठेवींवरील व्याजदरात वाढच करायची नाही, असा कोणताही आर्थिक निकष अस्तित्वात नाही. केंद्र सरकार व राज्य सरकारे विविध मार्गानी दरवर्षी काही लाख कोटी रुपये कोट्यवधी लोकांना मोफत वाटत असताना त्याचा भाववाढीवर परिणाम होत नाही का?

मुळात 'ईपीएफ'चा व्याजदर वाढविल्यास ती रक्कम संबंधित ७.४० कोटी कर्मचाऱ्यांना रोख स्वरूपात दिली जाणार नसून, ती रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे ती सर्व रक्कम चलनात येणार नसल्यामुळे भाववाढ होण्याचा कोणताही संबंध नाही. उलट 'ईपीएफ' सारख्या दीर्घकालीन गुंतवणुकीचे मूल्य महागाईमुळे कमी होऊ नये, म्हणून त्यावर जास्त दराने व्याज देणे आवश्यक असते.

'इतर मुदतीच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजाचा विचार करता 'ईपीएफ'वर इतर गुंतवणुकीपेक्षा सतत जास्त व्याज मिळत असते. हे व्याजाचे उत्पन्न एका विशिष्ट मर्यादेपर्यंत करमुक्त आहे', हे सरकारचे म्हणणे देखील पूर्णतः अयोग्य व अन्यायकारक आहे. आपल्या घटनेने 'लोककल्याणकारी राज्य'चे धोरण स्वीकारलेले असून, अनुच्छेद २१ अन्वये प्रत्येकाला सन्मानाने जीवन जगण्याचा मूलभूत अधिकार बहाल केलेला आहे. जनतेचे जीवनमान उंचवावे, त्यांनी अधिक समृद्ध जीवन जगावे व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, म्हणून १९५१ पासून देशात योजनाबद्ध विकास प्रक्रिया सुरू झाली. कर्मचाऱ्यांना 'सामाजिक सुरक्षा' प्रदान करणे ही सरकारची जबाबदारी आहे, या भावनेतून सरकारने कर्मचाऱ्यांच्या, तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याची सुरक्षितता म्हणून 'ईपीएफ' सारख्या चांगले व्याज देणाऱ्या 'सामाजिक सुरक्षा' योजना सुरू केल्या होत्या. त्यामुळे महागाईच्या नावाखाली 'ईपीएफ'चे व्याजदर कमी करणे सरकारच्या मूळ धोरणाशी विसंगत आहे, म्हणून सरकारने 'ईपीएफ' वरील व्याजदर किमान ८.५० टक्के करणे आवश्यक आहे. 

kantilaltated@gmail.com

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीEPFOईपीएफओ