शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

हा का हद्दीचा प्रश्न

By admin | Updated: November 8, 2015 23:29 IST

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांची सचोटी, प्रामाणिकपणा आणि देशनिष्ठा याबाबत कोणाच्याही मनात जरासाही किंतु नसल्याने आणि वारंवार उचलली जीभ

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांची सचोटी, प्रामाणिकपणा आणि देशनिष्ठा याबाबत कोणाच्याही मनात जरासाही किंतु नसल्याने आणि वारंवार उचलली जीभ हा त्यांचा पिंडदेखील नसल्याने, जेव्हा केव्हा त्यांना व्यक्त व्हावेसे वाटते तेव्हां त्यांचे ते व्यक्त होणे गांभीर्याने घेणे ही साऱ्यांची आणि विशेषत: देशातील विद्यमान सत्ताधीश आणि त्यांच्या निकटवर्तीयांची जबाबदारीच ठरते. स्वाभाविकच जेव्हा डॉ.सिंग असे विधान करतात की आज देशामध्ये विचारस्वातंत्र्याचा संकोच करण्याचे जे सत्र सुरु झाले आहे, ते देशाच्या आर्थिक प्रगतीलाही मारक ठरु शकते, तेव्हां त्यांचे मत गांभीर्याने घेणे सरकारचे कर्तव्यच ठरते. डॉ.सिंग यांनी आता जे विचार व्यक्त केला, तसाच विचार रिझर्व्ह बँकेचे विद्यामान गव्हर्नर डॉ.रघुराम राजन यांनीदेखील एकदा नव्हे दोनदा बोलून दाखविला आणि राष्ट्रपतींनी तर तीन वेळा त्यांच्या मनातील खंतावलेपणाचा उच्चार केला आहे. विचारवंतावर हल्ले म्हणजे मतांशी असहमती व्यक्त करण्याचाच प्रकार असल्याचे जे डॉ.सिंंग म्हणाले आहेत त्याची तंतोतंत प्रचिती भाजपाने लगेचच आणूनही दिली आहे. त्या पक्षाचे चिटणीस श्रीकांत शर्मा यांनी माजी पंतप्रधानांच्या वक्तव्याचे लगेचच खंडण केले आहे. लोकशाहीचे मर्म उलगडवून सांगणाऱ्या ज्या अनेक व्याख्या सांगितल्या जातात त्यातील एक व्याख्या असे म्हणते की, ‘तुझे आणि माझे अनेक विषयांवर कमालीचे मतभेद असले तरी मत व्यक्त करण्याचा तुझा अधिकार अबाधित राहावा यासाठी मी कोणत्याही थरापर्यंत जाण्यास तयार आहे’! श्रीकांत शर्मा वा त्यांचा पक्ष याला कदापि तयार होणार नाही हे सांप्रतच्या स्थितीवरुन कोणीही सांगू शकेल. पण त्यांनी आपल्या खुलाशात पुढे आणखी एक विचित्र प्रकार केला आहे. ते म्हणतात, विचारांवरील हिंसक हल्ल्यांच्या ज्या घटनांचा उल्लेख डॉ.सिंग करतात त्या घटना भाजपाशासित नव्हे तर काँग्रेसशासित राज्यांमध्ये घडल्या आहेत. पोलीस ठाण्यांमधील हद्दीचा वाद सारेच जाणून असतात पण हा काय हद्दीचा वाद आहे? आणि त्याही पलीकडे जाऊन विचार करायचा तर हल्ले भले काँग्रेसशासित राज्यांमध्ये झाले असतील पण असे हल्ले करणारे वा करवून घेणारे कोण आहेत? सरकार चालविणे म्हणजे केवळ राजपाट सांभाळणे नसते तर जे जे म्हणून अंगावर येईल ते झेलणे आणि पुढची पावले विचारपूर्वक टाकणे असेही असते. श्रीकांत शर्मा यांच्यासारख्या ब किंवा क श्रेणीच्या खेळाडूला समोर करुन सरकार आपला बचाव करु पाहात असेल तर लोक व्यक्त होणेच थांबवतील आणि त्यातूनच मग कदाचित लालकृष्ण अडवाणी यांच्या मनातील भीती उदयास येऊ शकेल.