शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

भाष्य - घोषणा जोरदार, पुढे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2017 00:44 IST

शिक्षणाचे माहेर म्हणून पुणे शहराची ओळख असली तरी, देशातील शिक्षण क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचे एक वेगळे स्थान आणि परंपरा आहे.

शिक्षणाचे माहेर म्हणून पुणे शहराची ओळख असली तरी, देशातील शिक्षण क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचे एक वेगळे स्थान आणि परंपरा आहे. याच विद्यापीठाने देशाला विविध क्षेत्रातील तज्ज्ञ दिले आहेत. अशी उज्ज्वल परंपरा असलेले मुंबई विद्यापीठ १६० वे वर्ष साजरे करीत आहे. मात्र या वर्षात विद्यापीठाला सातत्याने मान खाली घालण्याची नामुष्की ओढवत आहे. यासाठी काही प्रमाणात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख जबाबदार आहेत. ७ जुलै २०१५ साली डॉ. संजय देशमुख यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला. पाच वर्षांच्या कालावधीतील दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. पण या दोन वर्षांत कुलगुरूंनी विद्यापीठात सुधारणा करण्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. या घोषणा खूप चांगल्या असल्या तरी, त्याची अंमलबजावणी मात्र होत नसल्याने विद्यापीठाला टीकेचे धनी व्हावे लागत आहे. मुंबई विद्यापीठातील परीक्षा आणि निकाल यावर नेहमीच टीका होते. ही टीका खोडून काढण्यासाठी आॅनलाईन उत्तरपत्रिका तपासणीचा पर्याय कुलगुरूंनी शोधला. यामध्ये सर्व शाखांचे पेपर आॅनलाईन तपासले जाणार, अशी घोषणा केली आणि तत्काळ अंमलबजावणीही केलीे. पायाभूत सुविधा आणि प्राध्यापक यांचा विचार न केल्याने कुलगुरू तोंडघशी पडले. जुलै महिना उजाडला तरी अडीच लाख पेपरपैकी फक्त ३० हजार पेपर तपासून झाले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे पुढे काय, असा प्रश्न पडला आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याने राज्यपाल विद्यासागर राव यांनी कुलगुरू संजय देशमुख यांना झापले. विद्यापीठाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. मुंबई विद्यापीठाचा दर्जा घसरत असल्याची पोचपावती काही दिवसांपूर्वीच मिळाली होती. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयासमोर नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) सादर केलेल्या माहितीत मुंबई विद्यापीठ देशातील शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत पहिल्या १०० मध्ये स्थान मिळवू शकले नाही. यावेळीही कुलगुरूंनी त्यानंतर निकष आणि अन्य गोष्टी पाहू, अशी सारवासारव केली.आता दोन वर्षे कारभार सांभाळूनसुद्धा कुलगुरूंना नीट घडी बसवता आलेली नाही. अजूनही नवीन उपक्र म राबविण्याच्या जोरदार घोषणा होतात. पण यामधून विद्यार्थ्यांना फायदा झाल्याचे दिसत नाही. त्यापेक्षा विद्यार्थी आणि महाविद्यालय अडचणीत अडकत असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा कळसाच्या घोषणाबाजीपेक्षा पाया कसा आहे आणि त्यात काय बदल हवेत, याचा विचार कुलगुरूंनी करण्याची गरज आहे.