शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
3
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
4
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
5
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
6
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
7
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
8
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
9
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
10
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
11
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
12
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
13
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
14
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
15
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
16
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
17
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
18
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
19
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
20
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - घोषणा जोरदार, पुढे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2017 00:44 IST

शिक्षणाचे माहेर म्हणून पुणे शहराची ओळख असली तरी, देशातील शिक्षण क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचे एक वेगळे स्थान आणि परंपरा आहे.

शिक्षणाचे माहेर म्हणून पुणे शहराची ओळख असली तरी, देशातील शिक्षण क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचे एक वेगळे स्थान आणि परंपरा आहे. याच विद्यापीठाने देशाला विविध क्षेत्रातील तज्ज्ञ दिले आहेत. अशी उज्ज्वल परंपरा असलेले मुंबई विद्यापीठ १६० वे वर्ष साजरे करीत आहे. मात्र या वर्षात विद्यापीठाला सातत्याने मान खाली घालण्याची नामुष्की ओढवत आहे. यासाठी काही प्रमाणात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख जबाबदार आहेत. ७ जुलै २०१५ साली डॉ. संजय देशमुख यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला. पाच वर्षांच्या कालावधीतील दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. पण या दोन वर्षांत कुलगुरूंनी विद्यापीठात सुधारणा करण्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. या घोषणा खूप चांगल्या असल्या तरी, त्याची अंमलबजावणी मात्र होत नसल्याने विद्यापीठाला टीकेचे धनी व्हावे लागत आहे. मुंबई विद्यापीठातील परीक्षा आणि निकाल यावर नेहमीच टीका होते. ही टीका खोडून काढण्यासाठी आॅनलाईन उत्तरपत्रिका तपासणीचा पर्याय कुलगुरूंनी शोधला. यामध्ये सर्व शाखांचे पेपर आॅनलाईन तपासले जाणार, अशी घोषणा केली आणि तत्काळ अंमलबजावणीही केलीे. पायाभूत सुविधा आणि प्राध्यापक यांचा विचार न केल्याने कुलगुरू तोंडघशी पडले. जुलै महिना उजाडला तरी अडीच लाख पेपरपैकी फक्त ३० हजार पेपर तपासून झाले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे पुढे काय, असा प्रश्न पडला आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याने राज्यपाल विद्यासागर राव यांनी कुलगुरू संजय देशमुख यांना झापले. विद्यापीठाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. मुंबई विद्यापीठाचा दर्जा घसरत असल्याची पोचपावती काही दिवसांपूर्वीच मिळाली होती. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयासमोर नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) सादर केलेल्या माहितीत मुंबई विद्यापीठ देशातील शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत पहिल्या १०० मध्ये स्थान मिळवू शकले नाही. यावेळीही कुलगुरूंनी त्यानंतर निकष आणि अन्य गोष्टी पाहू, अशी सारवासारव केली.आता दोन वर्षे कारभार सांभाळूनसुद्धा कुलगुरूंना नीट घडी बसवता आलेली नाही. अजूनही नवीन उपक्र म राबविण्याच्या जोरदार घोषणा होतात. पण यामधून विद्यार्थ्यांना फायदा झाल्याचे दिसत नाही. त्यापेक्षा विद्यार्थी आणि महाविद्यालय अडचणीत अडकत असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा कळसाच्या घोषणाबाजीपेक्षा पाया कसा आहे आणि त्यात काय बदल हवेत, याचा विचार कुलगुरूंनी करण्याची गरज आहे.