शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
3
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
4
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
5
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
6
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
7
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
8
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
9
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
10
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
12
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
13
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
14
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
15
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
16
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
17
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
18
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
19
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन

भाष्य - घोषणा जोरदार, पुढे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2017 00:44 IST

शिक्षणाचे माहेर म्हणून पुणे शहराची ओळख असली तरी, देशातील शिक्षण क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचे एक वेगळे स्थान आणि परंपरा आहे.

शिक्षणाचे माहेर म्हणून पुणे शहराची ओळख असली तरी, देशातील शिक्षण क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचे एक वेगळे स्थान आणि परंपरा आहे. याच विद्यापीठाने देशाला विविध क्षेत्रातील तज्ज्ञ दिले आहेत. अशी उज्ज्वल परंपरा असलेले मुंबई विद्यापीठ १६० वे वर्ष साजरे करीत आहे. मात्र या वर्षात विद्यापीठाला सातत्याने मान खाली घालण्याची नामुष्की ओढवत आहे. यासाठी काही प्रमाणात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख जबाबदार आहेत. ७ जुलै २०१५ साली डॉ. संजय देशमुख यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला. पाच वर्षांच्या कालावधीतील दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. पण या दोन वर्षांत कुलगुरूंनी विद्यापीठात सुधारणा करण्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. या घोषणा खूप चांगल्या असल्या तरी, त्याची अंमलबजावणी मात्र होत नसल्याने विद्यापीठाला टीकेचे धनी व्हावे लागत आहे. मुंबई विद्यापीठातील परीक्षा आणि निकाल यावर नेहमीच टीका होते. ही टीका खोडून काढण्यासाठी आॅनलाईन उत्तरपत्रिका तपासणीचा पर्याय कुलगुरूंनी शोधला. यामध्ये सर्व शाखांचे पेपर आॅनलाईन तपासले जाणार, अशी घोषणा केली आणि तत्काळ अंमलबजावणीही केलीे. पायाभूत सुविधा आणि प्राध्यापक यांचा विचार न केल्याने कुलगुरू तोंडघशी पडले. जुलै महिना उजाडला तरी अडीच लाख पेपरपैकी फक्त ३० हजार पेपर तपासून झाले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे पुढे काय, असा प्रश्न पडला आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याने राज्यपाल विद्यासागर राव यांनी कुलगुरू संजय देशमुख यांना झापले. विद्यापीठाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. मुंबई विद्यापीठाचा दर्जा घसरत असल्याची पोचपावती काही दिवसांपूर्वीच मिळाली होती. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयासमोर नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) सादर केलेल्या माहितीत मुंबई विद्यापीठ देशातील शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत पहिल्या १०० मध्ये स्थान मिळवू शकले नाही. यावेळीही कुलगुरूंनी त्यानंतर निकष आणि अन्य गोष्टी पाहू, अशी सारवासारव केली.आता दोन वर्षे कारभार सांभाळूनसुद्धा कुलगुरूंना नीट घडी बसवता आलेली नाही. अजूनही नवीन उपक्र म राबविण्याच्या जोरदार घोषणा होतात. पण यामधून विद्यार्थ्यांना फायदा झाल्याचे दिसत नाही. त्यापेक्षा विद्यार्थी आणि महाविद्यालय अडचणीत अडकत असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा कळसाच्या घोषणाबाजीपेक्षा पाया कसा आहे आणि त्यात काय बदल हवेत, याचा विचार कुलगुरूंनी करण्याची गरज आहे.