शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

भाष्य - मोहोळात दगड

By admin | Updated: December 26, 2016 00:22 IST

आपण पारंपरिक आणि पठडीबाज राजकारण न करता केवळ विकासाचे राजकारण करतो आणि त्याच्या भरवशावरच उत्तर प्रदेशात पुन्हा समाजवादी पार्टीचे सरकार स्थापन करु

आपण पारंपरिक आणि पठडीबाज राजकारण न करता केवळ विकासाचे राजकारण करतो आणि त्याच्या भरवशावरच उत्तर प्रदेशात पुन्हा समाजवादी पार्टीचे सरकार स्थापन करु अशी ग्वाही देत फिरणारे त्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री अखिलेश यादव अत्यंत गलिच्छपणे मळलेल्या वाटेवर गेले असून जातीय संघर्षास आमंत्रण देणारा एक निर्णय घेऊन ते मोकळे झाले आहे. वास्तविक पाहता अनुसूचित जाती, जमाती, भटके आणि विमुक्त यांच्या रचनेला राज्यघटनेचे संरक्षण आहे व त्यात बदल करण्याचा वा कमीजास्त करण्याचा अधिकार कोणत्याही राज्याला नाही. असे असताना अखिलेश सरकारने अन्य मागास संवर्गातील १७ जातींना अनुसूचित जाती संवर्गात समाविष्ट करण्याचा निर्णय घेऊन तसे केंद्र सरकारला कळविले आहे व केंद्राने त्यास तत्काळ मंजुरी द्यावी असा आग्रहदेखील केला आहे. त्यांनी हा पवित्रा सरळ सरळ तेथील विधानसभेची होऊ घातलेली निवडणूक नजरेसमोर ठेऊन घेतला आहे यात शंका नाही. पण हा पवित्रा दुसरे तिसरे काहीही नसून आग्यामोहोळात भिरकावलेला दगड आहे. त्याची प्रचिती लगेचच मायावती यांनी आणूनही दिली आहे. राज्यातील अन्य मागासवर्गीयांना मूर्खात काढण्याचा अखिलेश यांचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुळात आरक्षण हा विषय केवळ त्या एकट्या राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभर दिवसेंदिवस अधिकाधिक संवेदनशील बनत चालला आहे. राज्यघटनेने ज्यांना आणि जितके आरक्षण बहाल केले आहे ते वर्ग आपल्या आरक्षणात कोणताही नवा वाटेकरु होऊ देत नाहीत. स्वाभाविकच प्रथमपासून जे अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट आहेत आणि आरक्षणाचा लाभ घेत आहेत ते थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल १७ जणांना त्यात वाटेकरु होऊ देतील हे कालत्रयी शक्य नाही. म्हणजे त्यातून जातीय आणि सामाजिक संघर्ष पेटून उठण्याखेरीज अन्य काहीही होऊ शकत नाही. पण या संपूर्ण प्रकरणातील अधिक गंभीर बाब म्हणजे अखिलेश यांच्या समाजवादी पार्टीने हा खेळ यंदाच नव्हे तर खूप अगोदर सुरू केला आहे. बारा वर्षांपूर्वी खुद्द मुलायमसिंह यांनी केंद्राकडे तशी शिफारस केली होती आणि केंद्राने काहीही रोख दिला नाही तेव्हा २००५ साली आपल्याला नसलेल्या अधिकारात तशी अधिसूचनाही जारी केली होती. पण उच्च न्यायालयाने तत्काळ ही अधिसूचना खारीज करून टाकली होती.