शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

भाष्य - मोहोळात दगड

By admin | Updated: December 26, 2016 00:22 IST

आपण पारंपरिक आणि पठडीबाज राजकारण न करता केवळ विकासाचे राजकारण करतो आणि त्याच्या भरवशावरच उत्तर प्रदेशात पुन्हा समाजवादी पार्टीचे सरकार स्थापन करु

आपण पारंपरिक आणि पठडीबाज राजकारण न करता केवळ विकासाचे राजकारण करतो आणि त्याच्या भरवशावरच उत्तर प्रदेशात पुन्हा समाजवादी पार्टीचे सरकार स्थापन करु अशी ग्वाही देत फिरणारे त्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री अखिलेश यादव अत्यंत गलिच्छपणे मळलेल्या वाटेवर गेले असून जातीय संघर्षास आमंत्रण देणारा एक निर्णय घेऊन ते मोकळे झाले आहे. वास्तविक पाहता अनुसूचित जाती, जमाती, भटके आणि विमुक्त यांच्या रचनेला राज्यघटनेचे संरक्षण आहे व त्यात बदल करण्याचा वा कमीजास्त करण्याचा अधिकार कोणत्याही राज्याला नाही. असे असताना अखिलेश सरकारने अन्य मागास संवर्गातील १७ जातींना अनुसूचित जाती संवर्गात समाविष्ट करण्याचा निर्णय घेऊन तसे केंद्र सरकारला कळविले आहे व केंद्राने त्यास तत्काळ मंजुरी द्यावी असा आग्रहदेखील केला आहे. त्यांनी हा पवित्रा सरळ सरळ तेथील विधानसभेची होऊ घातलेली निवडणूक नजरेसमोर ठेऊन घेतला आहे यात शंका नाही. पण हा पवित्रा दुसरे तिसरे काहीही नसून आग्यामोहोळात भिरकावलेला दगड आहे. त्याची प्रचिती लगेचच मायावती यांनी आणूनही दिली आहे. राज्यातील अन्य मागासवर्गीयांना मूर्खात काढण्याचा अखिलेश यांचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुळात आरक्षण हा विषय केवळ त्या एकट्या राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभर दिवसेंदिवस अधिकाधिक संवेदनशील बनत चालला आहे. राज्यघटनेने ज्यांना आणि जितके आरक्षण बहाल केले आहे ते वर्ग आपल्या आरक्षणात कोणताही नवा वाटेकरु होऊ देत नाहीत. स्वाभाविकच प्रथमपासून जे अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट आहेत आणि आरक्षणाचा लाभ घेत आहेत ते थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल १७ जणांना त्यात वाटेकरु होऊ देतील हे कालत्रयी शक्य नाही. म्हणजे त्यातून जातीय आणि सामाजिक संघर्ष पेटून उठण्याखेरीज अन्य काहीही होऊ शकत नाही. पण या संपूर्ण प्रकरणातील अधिक गंभीर बाब म्हणजे अखिलेश यांच्या समाजवादी पार्टीने हा खेळ यंदाच नव्हे तर खूप अगोदर सुरू केला आहे. बारा वर्षांपूर्वी खुद्द मुलायमसिंह यांनी केंद्राकडे तशी शिफारस केली होती आणि केंद्राने काहीही रोख दिला नाही तेव्हा २००५ साली आपल्याला नसलेल्या अधिकारात तशी अधिसूचनाही जारी केली होती. पण उच्च न्यायालयाने तत्काळ ही अधिसूचना खारीज करून टाकली होती.