शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - मोहोळात दगड

By admin | Updated: December 26, 2016 00:22 IST

आपण पारंपरिक आणि पठडीबाज राजकारण न करता केवळ विकासाचे राजकारण करतो आणि त्याच्या भरवशावरच उत्तर प्रदेशात पुन्हा समाजवादी पार्टीचे सरकार स्थापन करु

आपण पारंपरिक आणि पठडीबाज राजकारण न करता केवळ विकासाचे राजकारण करतो आणि त्याच्या भरवशावरच उत्तर प्रदेशात पुन्हा समाजवादी पार्टीचे सरकार स्थापन करु अशी ग्वाही देत फिरणारे त्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री अखिलेश यादव अत्यंत गलिच्छपणे मळलेल्या वाटेवर गेले असून जातीय संघर्षास आमंत्रण देणारा एक निर्णय घेऊन ते मोकळे झाले आहे. वास्तविक पाहता अनुसूचित जाती, जमाती, भटके आणि विमुक्त यांच्या रचनेला राज्यघटनेचे संरक्षण आहे व त्यात बदल करण्याचा वा कमीजास्त करण्याचा अधिकार कोणत्याही राज्याला नाही. असे असताना अखिलेश सरकारने अन्य मागास संवर्गातील १७ जातींना अनुसूचित जाती संवर्गात समाविष्ट करण्याचा निर्णय घेऊन तसे केंद्र सरकारला कळविले आहे व केंद्राने त्यास तत्काळ मंजुरी द्यावी असा आग्रहदेखील केला आहे. त्यांनी हा पवित्रा सरळ सरळ तेथील विधानसभेची होऊ घातलेली निवडणूक नजरेसमोर ठेऊन घेतला आहे यात शंका नाही. पण हा पवित्रा दुसरे तिसरे काहीही नसून आग्यामोहोळात भिरकावलेला दगड आहे. त्याची प्रचिती लगेचच मायावती यांनी आणूनही दिली आहे. राज्यातील अन्य मागासवर्गीयांना मूर्खात काढण्याचा अखिलेश यांचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुळात आरक्षण हा विषय केवळ त्या एकट्या राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभर दिवसेंदिवस अधिकाधिक संवेदनशील बनत चालला आहे. राज्यघटनेने ज्यांना आणि जितके आरक्षण बहाल केले आहे ते वर्ग आपल्या आरक्षणात कोणताही नवा वाटेकरु होऊ देत नाहीत. स्वाभाविकच प्रथमपासून जे अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट आहेत आणि आरक्षणाचा लाभ घेत आहेत ते थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल १७ जणांना त्यात वाटेकरु होऊ देतील हे कालत्रयी शक्य नाही. म्हणजे त्यातून जातीय आणि सामाजिक संघर्ष पेटून उठण्याखेरीज अन्य काहीही होऊ शकत नाही. पण या संपूर्ण प्रकरणातील अधिक गंभीर बाब म्हणजे अखिलेश यांच्या समाजवादी पार्टीने हा खेळ यंदाच नव्हे तर खूप अगोदर सुरू केला आहे. बारा वर्षांपूर्वी खुद्द मुलायमसिंह यांनी केंद्राकडे तशी शिफारस केली होती आणि केंद्राने काहीही रोख दिला नाही तेव्हा २००५ साली आपल्याला नसलेल्या अधिकारात तशी अधिसूचनाही जारी केली होती. पण उच्च न्यायालयाने तत्काळ ही अधिसूचना खारीज करून टाकली होती.