शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

भाष्य - विद्यापीठांचे वास्तव

By admin | Updated: May 30, 2017 00:28 IST

भारतातील सर्व विद्यापीठांतील एकत्रित संशोधनाची बरोबरी केवळ केम्ब्रिज व स्टॅनफर्ड या दोन विद्यापीठांतील संशोधनांशीही होऊ शकत नाही

भारतातील सर्व विद्यापीठांतील एकत्रित संशोधनाची बरोबरी केवळ केम्ब्रिज व स्टॅनफर्ड या दोन विद्यापीठांतील संशोधनांशीही होऊ शकत नाही, असे एका अहवालातून समोर आले आहे. त्यातून भारतातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षणाची आणि एकूणच विद्यापीठांची अवस्था काय आहे, यांचे भयाण वास्तव दिसून येते. भारतात तब्बल ८०० विद्यापीठे आहे. याशिवाय आयआयटी, आयआयएम यासारख्या अग्रगण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्था वेगळ्याच. असे असूनही संशोधनाबाबत आपली विद्यापीठे इतकी मागास का, याचा विचार आता तरी करायला हवा. जागतिक दर्जाच्या २०० विद्यापीठांमध्ये भारतातील एकही विद्यापीठ नसल्याचा एक अहवालही मध्यंतरी प्रसिद्ध झाला होता. त्या यादीत आपल्याकडील ख्यातनाम म्हणून ओळखली जाणारी विद्यापीठे आणि शिक्षणसंस्था यांचे क्रमांक २५० नंतरच सुरू होत होते. त्या ८०० जागतिक संस्थांच्या यादीतही आपल्याकडील केवळ १९ विद्यापीठे होती. या सर्वांचा अर्थ आपल्याकडील विद्यापीठांत वा आयआयटी, आयआयएम आणि आयआयएस या सर्व संस्थांमध्ये संशोधनाच्या जागतिक पातळीवरील दर्जाचा अंदाज येतो. शिक्षणव्यवस्थेत कालानुरूप न झालेले बदल, जुने अभ्यासक्रम, पुरेशा प्रमाणात निधी न मिळणे, स्वायत्ततेचा अभाव, राजकारण्यांचा हस्तक्षेप, विद्यापीठांत खेळले जाणारे राजकारण, प्राध्यापकांचे अपुरे लक्ष, संशोधनासाठी न मिळणारे प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शक नसणे हीच या अवस्थेची कारणे असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. आपल्याकडे पीएच.डी. करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. पण अनेकदा त्यात संशोधन किती, असाच प्रश्न पडतो. कित्येकदा तर प्रबंधांत अन्यत्र प्रसिद्ध झालेले उतारे व मजकूर यांचाच भरणा असल्याचे दिसून येते. अशा स्थितीत आपल्या विद्यापीठांची गणना जागतिक या दर्जात झाली नाही, तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. मग जागतिक दर्जाच्या संशोधनाचा विषयच सोडून द्या. भारतीय विद्यार्थ्यांमध्ये क्षमता नाही असा मात्र याचा अर्थ नाही. आपल्याकडील विद्यार्थी हल्ली उच्चशिक्षण व संशोधन यासाठी परदेशी विद्यापीठांची वाट धरताना दिसत आहेत. तिथे त्यापैकी अनेकांनी केलेले संशोधनही अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या विद्यापीठांत तसे वातावरण नसल्याने ते परदेशी जातात, असाच याचा अर्थ. हे चित्र लगेच बदलणे शक्य नसले तरी त्यासाठी वेगाने पावले तरी उचलली जाणे गरजेचे आहे. पण ती पडताना दिसत नाहीत, हे दुर्दैव.