शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
4
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
5
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
6
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
7
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
8
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
9
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
10
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
11
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
12
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
13
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
14
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
15
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
16
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
17
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
18
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
19
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
20
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर

भाष्य - विद्यापीठांचे वास्तव

By admin | Updated: May 30, 2017 00:28 IST

भारतातील सर्व विद्यापीठांतील एकत्रित संशोधनाची बरोबरी केवळ केम्ब्रिज व स्टॅनफर्ड या दोन विद्यापीठांतील संशोधनांशीही होऊ शकत नाही

भारतातील सर्व विद्यापीठांतील एकत्रित संशोधनाची बरोबरी केवळ केम्ब्रिज व स्टॅनफर्ड या दोन विद्यापीठांतील संशोधनांशीही होऊ शकत नाही, असे एका अहवालातून समोर आले आहे. त्यातून भारतातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षणाची आणि एकूणच विद्यापीठांची अवस्था काय आहे, यांचे भयाण वास्तव दिसून येते. भारतात तब्बल ८०० विद्यापीठे आहे. याशिवाय आयआयटी, आयआयएम यासारख्या अग्रगण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्था वेगळ्याच. असे असूनही संशोधनाबाबत आपली विद्यापीठे इतकी मागास का, याचा विचार आता तरी करायला हवा. जागतिक दर्जाच्या २०० विद्यापीठांमध्ये भारतातील एकही विद्यापीठ नसल्याचा एक अहवालही मध्यंतरी प्रसिद्ध झाला होता. त्या यादीत आपल्याकडील ख्यातनाम म्हणून ओळखली जाणारी विद्यापीठे आणि शिक्षणसंस्था यांचे क्रमांक २५० नंतरच सुरू होत होते. त्या ८०० जागतिक संस्थांच्या यादीतही आपल्याकडील केवळ १९ विद्यापीठे होती. या सर्वांचा अर्थ आपल्याकडील विद्यापीठांत वा आयआयटी, आयआयएम आणि आयआयएस या सर्व संस्थांमध्ये संशोधनाच्या जागतिक पातळीवरील दर्जाचा अंदाज येतो. शिक्षणव्यवस्थेत कालानुरूप न झालेले बदल, जुने अभ्यासक्रम, पुरेशा प्रमाणात निधी न मिळणे, स्वायत्ततेचा अभाव, राजकारण्यांचा हस्तक्षेप, विद्यापीठांत खेळले जाणारे राजकारण, प्राध्यापकांचे अपुरे लक्ष, संशोधनासाठी न मिळणारे प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शक नसणे हीच या अवस्थेची कारणे असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. आपल्याकडे पीएच.डी. करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. पण अनेकदा त्यात संशोधन किती, असाच प्रश्न पडतो. कित्येकदा तर प्रबंधांत अन्यत्र प्रसिद्ध झालेले उतारे व मजकूर यांचाच भरणा असल्याचे दिसून येते. अशा स्थितीत आपल्या विद्यापीठांची गणना जागतिक या दर्जात झाली नाही, तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. मग जागतिक दर्जाच्या संशोधनाचा विषयच सोडून द्या. भारतीय विद्यार्थ्यांमध्ये क्षमता नाही असा मात्र याचा अर्थ नाही. आपल्याकडील विद्यार्थी हल्ली उच्चशिक्षण व संशोधन यासाठी परदेशी विद्यापीठांची वाट धरताना दिसत आहेत. तिथे त्यापैकी अनेकांनी केलेले संशोधनही अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या विद्यापीठांत तसे वातावरण नसल्याने ते परदेशी जातात, असाच याचा अर्थ. हे चित्र लगेच बदलणे शक्य नसले तरी त्यासाठी वेगाने पावले तरी उचलली जाणे गरजेचे आहे. पण ती पडताना दिसत नाहीत, हे दुर्दैव.