शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - विद्यापीठांचे वास्तव

By admin | Updated: May 30, 2017 00:28 IST

भारतातील सर्व विद्यापीठांतील एकत्रित संशोधनाची बरोबरी केवळ केम्ब्रिज व स्टॅनफर्ड या दोन विद्यापीठांतील संशोधनांशीही होऊ शकत नाही

भारतातील सर्व विद्यापीठांतील एकत्रित संशोधनाची बरोबरी केवळ केम्ब्रिज व स्टॅनफर्ड या दोन विद्यापीठांतील संशोधनांशीही होऊ शकत नाही, असे एका अहवालातून समोर आले आहे. त्यातून भारतातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षणाची आणि एकूणच विद्यापीठांची अवस्था काय आहे, यांचे भयाण वास्तव दिसून येते. भारतात तब्बल ८०० विद्यापीठे आहे. याशिवाय आयआयटी, आयआयएम यासारख्या अग्रगण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्था वेगळ्याच. असे असूनही संशोधनाबाबत आपली विद्यापीठे इतकी मागास का, याचा विचार आता तरी करायला हवा. जागतिक दर्जाच्या २०० विद्यापीठांमध्ये भारतातील एकही विद्यापीठ नसल्याचा एक अहवालही मध्यंतरी प्रसिद्ध झाला होता. त्या यादीत आपल्याकडील ख्यातनाम म्हणून ओळखली जाणारी विद्यापीठे आणि शिक्षणसंस्था यांचे क्रमांक २५० नंतरच सुरू होत होते. त्या ८०० जागतिक संस्थांच्या यादीतही आपल्याकडील केवळ १९ विद्यापीठे होती. या सर्वांचा अर्थ आपल्याकडील विद्यापीठांत वा आयआयटी, आयआयएम आणि आयआयएस या सर्व संस्थांमध्ये संशोधनाच्या जागतिक पातळीवरील दर्जाचा अंदाज येतो. शिक्षणव्यवस्थेत कालानुरूप न झालेले बदल, जुने अभ्यासक्रम, पुरेशा प्रमाणात निधी न मिळणे, स्वायत्ततेचा अभाव, राजकारण्यांचा हस्तक्षेप, विद्यापीठांत खेळले जाणारे राजकारण, प्राध्यापकांचे अपुरे लक्ष, संशोधनासाठी न मिळणारे प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शक नसणे हीच या अवस्थेची कारणे असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. आपल्याकडे पीएच.डी. करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. पण अनेकदा त्यात संशोधन किती, असाच प्रश्न पडतो. कित्येकदा तर प्रबंधांत अन्यत्र प्रसिद्ध झालेले उतारे व मजकूर यांचाच भरणा असल्याचे दिसून येते. अशा स्थितीत आपल्या विद्यापीठांची गणना जागतिक या दर्जात झाली नाही, तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. मग जागतिक दर्जाच्या संशोधनाचा विषयच सोडून द्या. भारतीय विद्यार्थ्यांमध्ये क्षमता नाही असा मात्र याचा अर्थ नाही. आपल्याकडील विद्यार्थी हल्ली उच्चशिक्षण व संशोधन यासाठी परदेशी विद्यापीठांची वाट धरताना दिसत आहेत. तिथे त्यापैकी अनेकांनी केलेले संशोधनही अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या विद्यापीठांत तसे वातावरण नसल्याने ते परदेशी जातात, असाच याचा अर्थ. हे चित्र लगेच बदलणे शक्य नसले तरी त्यासाठी वेगाने पावले तरी उचलली जाणे गरजेचे आहे. पण ती पडताना दिसत नाहीत, हे दुर्दैव.