शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

भाष्य - सरकारची नाचक्की

By admin | Updated: May 6, 2017 00:10 IST

जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे सावनेर येथील आमदार सुनील केदार यांच्या चौकशीसाठी सरकारला सक्षम अधिकारी नेमता येत नसेल

जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे सावनेर येथील आमदार सुनील केदार यांच्या चौकशीसाठी सरकारला सक्षम अधिकारी नेमता येत नसेल तर केदार यांना क्लीन चिट का देऊन टाकत नाही, असा संतप्त सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी सरकारला केला. न्यायालयाच्या या सवालाने ‘पारदर्शी’ कारभाराचा ढोल बडवणाऱ्या राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. केदारांच्या बचावासाठी सरकारने दारामागे काही राजकीय अ‍ॅडजेस्टमेंट तर केली नाही ना, थातूरमातूर चौकशी आटपून सरकार केदारांना पळवाट तर शोधून देत नाही ना, असेही अनेक प्रश्न यातून उपस्थित झाले आहेत. केदार हे काँग्रेसचे आमदार आहेत. ते नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना बँकेत रोखे घोटाळा झाला. या प्रकरणी केदारांना अटकही झाली होती. ते काही महिने तुरुंगातही होते. आता या प्रकरणी चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करण्यावरून राज्य सरकार चालढकल करीत आहेत. चौकशीसाठी सहकार अथवा जिल्हा न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करा, असा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानुसार सरकारने ९ निवृत्त न्यायाधीशांची यादी तयार केली. त्यापैकी तीन न्यायाधीशांची संमती मिळविली. यापैकी एका निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी केली जाईल, असेही सरकारतर्फे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात गुरुवारी सुनावणीच्या वेळी चौकशी अधिकारी म्हणून एका निवृत्त न्यायाधीशांचे नाव समोर केले गेले, ते न्यायालयाला पसंत नव्हते. यामुळे सरकारच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित झाले आहेत. सरकारचे हे पाऊल ओळखून उच्च न्यायालयाला सरकारचे कान टोचावे लागले, ही सरकारवर ओढवलेली नामुष्कीच आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत केदार यांच्या विरोधात भाजपा उमेदवाराचा अर्ज रद्दबातल ठरला. रिंगणात भाजपाचा उमेदवार नसतानाही भाजपा कार्यकर्त्यांनी आपली संपूर्ण शक्ती केदारांविरोधात शिवसेनेच्या पाठीशी उभी केली होती. केदार थोडक्यात बचावले. तेव्हापासून स्थानिक भाजपा कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. सावनेर, खापा, कळमेश्वर नगर परिषदेत केदारांना मात मिळाल्यानंतर भाजपा कार्यकर्ते काहीसे सुखावले होते. स्थानिक पातळीवर एवढा विरोध असताना सरकार मात्र केदारांना का वाचवित आहे, असा प्रश्न स्थानिक भाजपा नेत्यांना पडला असून, यामुळे त्यांची व बँकेतील घोटाळ्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढली आहे.