शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

भाष्य - सरकारची नाचक्की

By admin | Updated: May 6, 2017 00:10 IST

जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे सावनेर येथील आमदार सुनील केदार यांच्या चौकशीसाठी सरकारला सक्षम अधिकारी नेमता येत नसेल

जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे सावनेर येथील आमदार सुनील केदार यांच्या चौकशीसाठी सरकारला सक्षम अधिकारी नेमता येत नसेल तर केदार यांना क्लीन चिट का देऊन टाकत नाही, असा संतप्त सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी सरकारला केला. न्यायालयाच्या या सवालाने ‘पारदर्शी’ कारभाराचा ढोल बडवणाऱ्या राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. केदारांच्या बचावासाठी सरकारने दारामागे काही राजकीय अ‍ॅडजेस्टमेंट तर केली नाही ना, थातूरमातूर चौकशी आटपून सरकार केदारांना पळवाट तर शोधून देत नाही ना, असेही अनेक प्रश्न यातून उपस्थित झाले आहेत. केदार हे काँग्रेसचे आमदार आहेत. ते नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना बँकेत रोखे घोटाळा झाला. या प्रकरणी केदारांना अटकही झाली होती. ते काही महिने तुरुंगातही होते. आता या प्रकरणी चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करण्यावरून राज्य सरकार चालढकल करीत आहेत. चौकशीसाठी सहकार अथवा जिल्हा न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करा, असा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानुसार सरकारने ९ निवृत्त न्यायाधीशांची यादी तयार केली. त्यापैकी तीन न्यायाधीशांची संमती मिळविली. यापैकी एका निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी केली जाईल, असेही सरकारतर्फे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात गुरुवारी सुनावणीच्या वेळी चौकशी अधिकारी म्हणून एका निवृत्त न्यायाधीशांचे नाव समोर केले गेले, ते न्यायालयाला पसंत नव्हते. यामुळे सरकारच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित झाले आहेत. सरकारचे हे पाऊल ओळखून उच्च न्यायालयाला सरकारचे कान टोचावे लागले, ही सरकारवर ओढवलेली नामुष्कीच आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत केदार यांच्या विरोधात भाजपा उमेदवाराचा अर्ज रद्दबातल ठरला. रिंगणात भाजपाचा उमेदवार नसतानाही भाजपा कार्यकर्त्यांनी आपली संपूर्ण शक्ती केदारांविरोधात शिवसेनेच्या पाठीशी उभी केली होती. केदार थोडक्यात बचावले. तेव्हापासून स्थानिक भाजपा कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. सावनेर, खापा, कळमेश्वर नगर परिषदेत केदारांना मात मिळाल्यानंतर भाजपा कार्यकर्ते काहीसे सुखावले होते. स्थानिक पातळीवर एवढा विरोध असताना सरकार मात्र केदारांना का वाचवित आहे, असा प्रश्न स्थानिक भाजपा नेत्यांना पडला असून, यामुळे त्यांची व बँकेतील घोटाळ्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढली आहे.