शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

एनजीओंच्या गराड्यात अण्णा

By admin | Updated: February 27, 2015 23:30 IST

भूसंपादनाच्या मुद्द्याची महती नेहमीच्या मेणबत्तीवाल्यांना नसल्याने अण्णांचे दोन दिवसांचे राजधानीतील आंदोलन गर्दीच्या मोजपट्टीवर तकलादू ठरले. तरीही दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर अण्णांनी जंतरमंतर

रघुनाथ पांडे - 

भूसंपादनाच्या मुद्द्याची महती नेहमीच्या मेणबत्तीवाल्यांना नसल्याने अण्णांचे दोन दिवसांचे राजधानीतील आंदोलन गर्दीच्या मोजपट्टीवर तकलादू ठरले. तरीही दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर अण्णांनी जंतरमंतर गाठून सरकारला खूप जेरीस आणले, एवढे मात्र खरे. सरकारला कायदा आणायचाच असल्याने त्याने हटवादी बनणे समजून घेण्यासारखे आहे. पण अण्णांनी हा विषय हाती घेतला नसता तर तो देशातील शेतकऱ्यांना कदाचित कळलाही नसता. खरे तर आजही शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसणारा हा मुद्दा शेतकऱ्यांचा कैवार घेणाऱ्या किती नेत्यांनी वाचला आहे, त्याचा अभ्यास केला आहे हाही संशोधनाचा विषय आहेच. जे सरकारला कोंडीत पकडून शेतकऱ्यांचे तारणहार आहोत असे सांगतात त्यांचाही हेतू किती प्रांजळ आहे, तेही तपासले पाहिजे. मुळात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर देश ढवळून काढणारे, राज्य व केंद्रातील अनेक मंत्र्यांच्या नाकीनऊ आणणारे अण्णा यावेळी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आंदोलन करू लागले, त्यामुळे भुवया उंचावल्या जाणेही स्वाभाविक आहे. या बदलाची चर्चाही दिल्लीच्या राजकारणात होतच आहे. कारण त्यांचे आत्ताचे आंदोलन एनजीओंच्या अधिपत्याखाली होते. बऱ्याच एनजीओंना मिळणारा निधी विविध मार्गातून येत असल्याने भूसंपादनाचा मुद्दा कितीही रास्त असला तरी अण्णांना पुढे करून सुरू झालेला एनजीओंचा खेळ सोपा नाही असे बोलले जाते. सध्याचा अण्णांचा नवा गोतावळा मोठा विलक्षण माणसांनी व्यापलेला आहे. चारित्र्य जपणारे अण्णा नव्या चेहऱ्यांच्या भपकेबाजीत अडकू नयेत, असे खुलेआम बोलले जाते तेव्हा अण्णांच्या आंदोलनात सच्चेपणा व व्याकुळता असली तरी पडद्यामागच्या हालचाली वेगळेच भाष्य करून जातात. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या मुहूर्तावर अण्णा हजारे यांनी सरकारविरोधाचा बिगुल फुंकला आणि मग राजकीय नेत्यांना चेव आला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत गचांडी बसलेल्या भाजपाला कोंडीत धरण्याची एकही संधी विरोधक सोडणार नसल्याने भूसंपादनावरून सरकारला लक्ष्य केले गेले आहे. भूसंपादनाचे जे व्हायचे ते होईलच, पण यानिमित्ताने अण्णा पुन्हा राजधानीत आले व राजकारण अण्णामय झाले. अण्णांनी केजरीवाल यांना खूप मोठा हो, असा आशीर्वाद दिला. तासभर गप्पा रंगल्या आणि दुसऱ्या दिवशीच्या आंदोलनात केजरीवालांनी सहभागी होण्याचे ठरले. त्यावर अण्णांचे मौन. दिवस उजाडला. ते आले, त्यांनी मंचासमोरच्या गर्दीत बसकण मारली. लोकांमध्ये बसल्याने क्षणात ते सोशल मीडियात हिरो झाले. मग अण्णांनी त्यांना मंचावर येण्याची परवानगी दिली. मंच गाठल्यावर पुढे काय, यात केजरीवालांइतका कोणीच माहीर नाही. अण्णांच्या आंदोलनातून ‘आम आदमी’चा जन्म झाला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ महिन्यांच्या कार्यकाळात ‘विकास’ म्हणून केजरीवाल नावाचे अपत्य जन्मास आले. त्यामुळे नव्या बदलाची ही नांदीच आहे. पाहुण्याच्या हाताने साप मारण्याचे मनसुबे असलेल्या भाजपातील मोदी विरोधकांना अण्णांचे आंदोलन आवडल्याचे दिसले. केजरीवालांनी अण्णांना जिंकले व अण्णाही त्यांच्यावर भाळले. पण मतभेद एवढे झाले होते, की जाहीरपणे सांगायची सोय नव्हती. केजरीवालांना अण्णांनी मंचावर येण्यास परवानगी का नाकारली होती, या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर कोणाचकडे नाही. मेधा पाटकर यांनीही आपकडून निवडणूक लढविली होती पण त्या तर आयोजकच होत्या. मग केजरीवालांना दूर ठेवण्यातून नेमका संदेश काय द्यायचा होता? शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना हे सरकारचे मित्र विरोधात गेले. शिवसेनेत यावरून एकवाक्यता दिसत नसली तरी या आंदोलनामुळे सरकारवर तुटून पडण्याची नामी संधी शिवसेनेला मिळाली. पवार-मोदी मैत्रीमुळे शिवसेना सरकार विरोधात आहेच. लोकपाल उपोषणानंतर अण्णा राष्ट्रीय पातळीवर ‘संघर्षाचे प्रतीक’ झाल्याने यापुढेही सरकारला घेरणाऱ्या अनेक विषयांची ‘राळ’ उडेल. त्यामुळे अण्णांनी चारित्र्याने नांगरलेली ‘भू’ कोणी संपादन करू नये, याची दक्षता अण्णांना घ्यावी लागेल. यावेळी तसे घडल्याचे दिसून आले.