शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अराजकतेचे मूळ प्रजासत्ताकात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:45 IST

देशाचे काय व्हायचे ते होवो, मला माझी पोळी शेकता आली पहिजे. केवळ याच विचारातून देशभर अनेक दबावगट कार्यरत होतात. मग ते धर्माच्या, जातीच्या, भाषेच्या नावे असोत वा तथाकथित पुरोगमित्वाच्या नावावर असो वा अगदी अमुकतमुक कल्याणाच्या नावे असोत.

- डॉ. नीरज देवदेशाचे काय व्हायचे ते होवो, मला माझी पोळी शेकता आली पहिजे. केवळ याच विचारातून देशभर अनेक दबावगट कार्यरत होतात. मग ते धर्माच्या, जातीच्या, भाषेच्या नावे असोत वा तथाकथित पुरोगमित्वाच्या नावावर असो वा अगदी अमुकतमुक कल्याणाच्या नावे असोत. हेच तर असते, झुंडसत्ताक आणि ज्यांच्या हाती सत्ता आहे, ते प्रजाजन ते जनतेचे सेवक काय करतात?देशात गेली कित्येक दशके चाललेला गोंधळ, भ्रष्टाचाराचे माजलेले थैमान पाहून कुणाही सुजाण नागरिकाला स्वाभाविकपणे चीडच येते. येणारच ना ! पण याचे मूळ कशात असावे? सारे जण आपापल्या परीने शोधतात. मला वाटते याचे मूळ असावे आपल्या प्रजासत्ताकात.प्रजासत्ताक म्हटले की, एकप्रकारे मानसिकताच बनते आपण प्रजा असल्याची. प्रजा कधीच कर्तव्य पार पाडत नसते. म्हणून तर नजर ठेवायला राजा लागतो; अमर्याद अधिकार असलेला. आणि जेथे राजा नसतो तेथील प्रजाच राजा होण्याचा प्रयास करते. प्रत्यक्षात काय दिसते? आज प्रजेतील प्रत्येक जण राजा होण्याचा प्रयास करतो. जो राजा होतो, तो तर जितके लुटता येईल तितके लुटतोच, पण राजा न होता आल्याने नाइलाजाने प्रजा रहिलेली प्रजासुद्धा लूटच करते. संधी मिळाली पण लूट केली नाही तर तो विरळाच.बरे गंमत म्हणजे राजा झालेली प्रजा स्वत:ला सेवक म्हणविते. तुम्हाला नाही वाटत जनतेचा सेवक हा स्वत:ला जनतेपासून वेगळा समजत असतो, मोठा समजत असतो म्हणून तर तो सेवक बनतो. समजा तो नाही समजत तसे पण मला सांगा, नगरसेवक असो वा प्रधान सेवक; सामान्यत: सेवक काय पाहतो, जबाबदारी की लाभ? लाभच म्हणून तर सेवक आलिशान गाड्यांतून फिरतात, मोठमोठ्या निवासस्थानात राहतात अन् झेड सुरक्षेतून वावरतात आणि जे सेवा घेतात ती प्रजा तो तथाकथित मतदारराजा सामान्य जीवन व्यतीत करतो.थोडक्यात काय प्रजासत्ताकातील राजा बनलेली प्रजा आणि राजा बनता न आल्याने प्रजा रहिलेली प्रजा केवळ आपले अधिकारच बघते. जेथे अधिकार परवलीचा शब्द बनतो तेथे कर्तव्याला तिलांजली दिली जाते आणि त्यातून जन्म होतो झुंडसत्ताकाचा.देशाचे काय व्हायचे ते होवो, मला माझी पोळी शेकता आली पहिजे. केवळ याच विचारातून देशभर अनेक दबावगट कार्यरत होतात. मग ते धर्माच्या, जातीच्या, भाषेच्या नावे असोत वा तथाकथित पुरोगमित्वाच्या नावावर असो वा अगदी अमुकतमुक कल्याणाच्या नावे असोत. हेच तर असते, झुंडसत्ताक आणि ज्यांच्या हाती सत्ता आहे ते प्रजाजन ते जनतेचे सेवक काय करतात? सत्तेच्या लालसेपायी, आपले राजेपद टिकावे यासाठी न्याय, नीती, देशहित कसलाही विचार न करता झुंडशाहीपुढे वारंवार झुकताना दिसतात. झुंडशाही बळकट करताना दिसतात.अपेक्षा तर ही असते की प्रजासत्ताक विकसित होत होत हळूहळू नागरिकसत्ताक व्हावे. अर्थातच प्रजेनेही नागरिक व्हावे. नागरिक होताच तिला पहिली जाणीव होते आपल्या कर्तव्याची! कर्तव्य केवळ राष्ट्रगीताच्या सन्मानातून दिसत नसते तर ते दिसते रोजच्या व्यवहारातून। बरे ! हे कर्तव्य मी केले असा डांगोरा पिटायचा नसतो तर कर्तव्य करून मोकळे व्हायचे असते. मला वाटते आपली ही नागरिकसत्ताकाची अपेक्षा अद्याप तरी फोलच ठरलीय. अन् तिचे कारण हेच की आपण स्वतंत्र भारतातील नागरिकांना त्यांच्या सामर्थ्याची, नागरिकत्वाची जाणीव न देता वारंवार हेच बिंबवतो की तुम्ही प्रजा आहात, दीनदुबळी जनता आहात, गोरगरीब प्रजाजन आहात. तुम्ही भारतीय प्रजासत्ताकात राहता.(लेखक प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ आहेत)

टॅग्स :Indiaभारत