शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

धीरूभाईंचा संस्कारवृक्ष, नीता अंबानींची मशागत!

By विजय दर्डा | Updated: March 11, 2024 07:32 IST

संस्कारांचा वृक्षच सारी आव्हाने पेलू शकतो. सहजता, सरळपणा आणि संस्कारांच्या बाबतीत संपूर्ण अंबानी परिवार प्रशंसेस पात्र आहे. 

डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

एखाद्याने थोडे पैसे कमावले, थोडी प्रसिद्धी मिळवली तर त्याच्यात विनम्रता राहत नाही, तो आखडूपणा करू लागतो, असे सर्वसाधारणपणे आढळते. अशा व्यक्तीला हे ठाऊक नसते की वादळे येतात तेव्हा मोठमोठी झाडे मुळापासून उखडून फेकली जातात. केवळ संस्कारांचा वृक्ष अशा सगळ्या थपडा झेलत उभा राहू शकतो. धीरूभाई अंबानी, माता कोकिलाबेन यांनी अंबानी परिवारात संस्कारांचे जे बीजारोपण केले त्याला आज फळे-फुले आली आहेत. किंबहुना फळाफुलांनी अंबानी परिवाराचा वृक्ष बहरला आहे, याचे कारण मुकेश अंबानी तर आहेतच, विशेषत: नीता अंबानी यांनी संस्कारांच्या बाबतीत या वृक्षाचे सिंचन करून जतन केले आहे.

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग समारंभाची सगळीकडे चर्चा होत आहे. या समारंभाचे व्हिडीओ पाहून प्रत्येक जण म्हणतो आहे की, इतक्या मोठ्या साम्राज्याचा स्वामी, अंबानी परिवारातील लहान मुलगा किती विनम्र दिसतो. 

सामान्य परिवारातील एखादी महिला दहा-वीस रुपयांची चुरगळलेली नोट त्यांच्या हातात सरकवते. ग्रामीण भागात आशीर्वाद देण्याची ही पद्धत अजूनही लोकांमध्ये प्रचलित आहे. अनंत अंबानी वाकून ती नोट स्वीकारतात, कृतज्ञपूर्वक नमस्कार करतात. ती महिला राधिकाला साडी देते. राधिका ती साडी हृदयाशी धरते; हे दृश्य भावविभोर करणारे आहे. अंबानी परिवाराला जवळून ओळखणाऱ्यांना हे माहीत आहे की केवळ अनंतच नव्हे, तर बहीण ईशा आणि भाऊसुद्धा इतकेच विनम्र आहेत; जितकी विनम्रता कोकिलाबेन, मुकेश आणि नीता अंबानी यांच्यामध्ये दिसते. आकाशच्या पत्नी श्लोकाही अत्यंत नम्र, धार्मिक आहेत. अनंत यांना कोणीतरी विचारले, वडील आणि काकांप्रमाणे तुम्ही दोघे भाऊही कधी वेगळे तर होणार नाही? अनंत यांचे उत्तर होते, ‘भाऊ आकाश पित्यासमान आणि ईशा मातृतुल्य असल्याने वेगळे होण्याचा प्रश्नच नाही.’

मागच्या महिन्यातला एक प्रसंग मी आपल्याला सांगतो. ‘लोकमत समूहा’चा ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळा यावेळी खुल्या आकाशाखाली गेटवे ऑफ इंडियावर आयोजित करण्यात आला होता. स्वाभाविकपणेच तिथे आरामशीर खुर्च्या नव्हत्या. त्या समारंभात औद्योगिक क्षेत्रात श्रेष्ठ योगदान दिल्याबद्दल ‘यूथ आयकॉन’ पुरस्कार देऊन ईशा अंबानी यांना गौरवण्यात आले. खुद्द मुकेश अंबानी कार्यक्रमाला आले. माझ्या काही सहकाऱ्यांना वाटले की अशा सामान्य खुर्चीवर मुकेश अंबानी यांना बसवणे उचित होणार नाही; म्हणून त्यांनी दुसरी खुर्ची आणायला सांगितले, पण, मुकेशभाईंनी त्यांना थांबवले. संपूर्ण दीड तास ते इतर लोकांप्रमाणेच त्या सामान्य अशा खुर्चीवर बसले होते.

धीरूभाईंची विनम्रता आणि दूरदृष्टीची दोन उदाहरणे मी आपल्याला सांगू इच्छितो. माझे वडील बाबूजी; वरिष्ठ स्वातंत्र्यसैनिक जवाहरलालजी दर्डा ८० च्या दशकात महाराष्ट्राचे उद्योगमंत्री होते तेव्हा मी त्यांची आणि धीरूभाईंची भेट घडवून आणली होती. त्यानंतर आमचे नाते बहरत गेले. ‘लोकमत’ दिवाळी विशेषांकाच्या जाहिरातीसाठी मी त्यांना दरवर्षी पत्र पाठवत असे. एका वर्षी मी त्यांना पत्र पाठवायला विसरलो. तोवर ‘लोकमत’ चांगला स्थिरस्थावर झाला होता. धीरूभाईंचा मला फोन आला, ‘‘विजय, आपले पत्र नाही आले. मला हे माहीत आहे की ‘लोकमत’ला आता आमची गरज नाही, पण आम्हाला तर ‘लोकमत’ची गरज आहे. कृपया पत्र पाठवा आणि आमची जाहिरात स्वीकारा!’’

१९९८ मध्ये मी राज्यसभेची निवडणूक लढवत होतो. धीरूभाईंचा फोन आला की लवकरात लवकर येऊन भेटा. मी त्यांच्या कार्यालयात गेलो. त्यांनी मला विचारले की आपल्याला समाजवादी पक्षाच्या मतांचीही गरज असणार. मी आश्चर्यचकित झालो. म्हणालो, गरज तर लागेलच. मुकेशभाई आणि अनिलभाई तिथे उभे होते. धीरूभाईंनी म्हटले, मुलायम सिंग यांना फोन लावा. त्यांनी दुसऱ्या दिवशीच मुंबईला बोलावले आणि माझी भेट घडवून आणली. मुलायम सिंह आणि अमर सिंह यांना त्यांनी सूचना केली आणि समाजवादी पक्षाची चार मते मला मिळाली. धीरूभाईंनी विचारले की, आणखी काही गरज लागेल का? परंतु, मी त्यांना सांगितले की आणखी कशाची आवश्यकता नाही. नातेसंबंध दृढ करण्यात त्यांची दूरदृष्टी होती.

प्री वेडिंग समारंभावर अंबानी परिवाराने १००० कोटी रुपये खर्च केले असेही म्हटले जात आहे. आता एक क्रूझ पार्टी होणार असून जुलै महिन्यात मुंबईत शानदार लग्न होईल. जगातील उद्योगपती आणि राजकीय नेत्यांनी यापूर्वीही एकापेक्षा एक असे प्रचंड खर्चाचे लग्न समारंभ केलेले आहेत. सामान्यतः लोक आपापल्या ऐपतीप्रमाणे कमीत कमी १० टक्के तरी खर्च मुलांच्या लग्नावर करतातच. अंबानी परिवाराची एकंदर संपत्ती ७.६५ लाख कोटी इतकी आहे. याच्या १ टक्का ७६५० कोटी रुपये होतात. अंबानी परिवाराने जामनगरच्या ५० हजार लोकांना जेवायला बोलवले. स्वतःच्या हाताने त्यांना वाढले. त्यांना भेटवस्तू देऊन आभार मानले. ही हृदयस्पर्शी गोष्ट आहे.

या लग्नाची महत्त्वपूर्ण गोष्ट अशी की ते भारतातच होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी श्रीमंत मंडळींना आवाहन केले होते की त्यांनी परदेशात जाऊन लग्न करू नये. भारतातच करावीत. वरवर पाहता ही गोष्ट खूप साधी वाटते, पण त्यात मोठा अर्थ सामावलेला आहे. आलिशान अशी लग्ने देशात झाली तर सगळी पायाभूत सुविधा देशातच उभी राहील. लोकांना रोजगार मिळेल. मुकेश अंबानी यांनी पंतप्रधानांच्या या म्हणण्याचा आदर केला. 

इथे मी पुन्हा एकदा अनंतविषयी बोलू इच्छितो. त्यांच्यात माणुसकी ठासून भरलेली आहे. त्यांना मुक्या प्राण्यांविषयी अतिशय प्रेम असून, जामनगरमध्ये ‘वनतारा’ नावाचे आशियातले सर्वांत मोठे आसरा केंद्र जवळपास ३००० एकरांत पसरलेले आहे. तेथे केवळ जखमी प्राण्यांवर उपचार केले जात नाहीत तर दुर्लभ प्रजातींचे जीव संरक्षित केले जातात. अनंत स्वतः वनतारामध्ये रमतात. त्यांच्याबरोबर राधिकासुद्धा असते. वनताराचे उद्दिष्ट उत्पन्न कमविणे नसून सेवा आहे. अनंतला देशाचे रक्षण करणारे जवान आणि नागरिकांचे रक्षण करणारे पोलिस यांच्याबद्दल खूपच आस्था आहे. मुंबईतल्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी ठिकठिकाणी वातानुकूलित निवारे तयार केले; जिथे ते आपले कर्तव्यही बजावतात आणि गरज पडल्यास आरामही करतात. अनंत अंबानी आणि त्यांची होणारी पत्नी राधिका या उभयतांना खूप साऱ्या शुभेच्छा. 

टॅग्स :anant ambaniअनंत अंबानीMukesh Ambaniमुकेश अंबानीnita ambaniनीता अंबानीRelianceरिलायन्सVijay Dardaविजय दर्डा