शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या कमावत्या तरुणाईचे आणखी किती बळी? 

By shrimant mane | Updated: December 9, 2023 06:00 IST

विकासाचे नवे प्रतीक बनलेले महामार्ग आणि अपघाती मृत्यू यांचे प्रमाण अंगावर काटा आणणारे आहे. कमावत्या तरुणाईचे बळी जाणे चिंताजनक आहे.

खेडे असो की गाव, विशेषत: महामार्गावरच्या गावांवरून जाता-येता कुठल्या तरी होर्डिंगवर अपघातात बळी गेलेल्या एक-दोन तरुणांचे चेहरे आणि त्याखाली त्यांच्या आकस्मिक मृत्यूबद्दल मित्रांनी वाहिलेली श्रद्धांजली हे नेहमीचे चित्र आहे. रांगड्या पुढाऱ्याकडून एखाद्या अभिनेत्रीच्या गालाची उपमा दिली जाते असे गुळगुळीत रस्ते, सरळ रेषेत जाणारे सहापदरी, आठपदरी महामार्ग, एक्स्प्रेस वे वगैरेंच्या पायाभूत सुविधा हा तसा तरुणाईला आकर्षित करणारा विषय, तर सिमेंट काँक्रीटचे चकचकीत रस्ते हा शहर विकासाचा नवा मापदंड. त्यातून तरुणाईला व्यवसायाच्या, रोजगाराच्या संधी निर्माण होतात असे सांगितले जाते. एकीकडे हा विकास असा फुलत असताना त्याच रस्त्यांवर जाणारे अपघाती बळी हा तितकाच चिंतेचा विषय आहे. कोरोना काळात दोन वर्षे हे प्रमाण तुलनेने कमी झाले खरे. परंतु, त्यानंतरची २०२२ या संपूर्ण वर्षभराची एनसीआरबी म्हणजे नॅशनल क्राइम रेकाॅर्ड ब्यूरोची आकडेवारी काही नव्या चिंता निर्माण करणारी आहे. 

एनसीआरबीच्या ताज्या आकडेवारीचा गोषवारा असा - २०२१ च्या तुलनेत २०२२ हे वर्ष चिंतेचे ठरले. सगळे काही वाढले. भ्रष्टाचार वाढला, आत्महत्या वाढल्या, अपघाती मृत्यू वाढले. एक लाख लोकसंख्येमागे आत्महत्यांचे प्रमाण १२ वरून १२.४ झाले. २०२१ मध्ये ३ लाख ९७ हजार ५३० आकस्मिक मृत्यू होते व त्यांचे एक लाख लोकसंख्येमागील प्रमाण २९.१ होते.  २०२२ मध्ये हा आकडा ४ लाख ३० हजार ५०४ असा झाला व प्रमाण ३१.२ झाले. निसर्गाच्या तडाख्यात ८०६० बळी गेले. त्यातील ३५.८ टक्के मृत्यू वीज कोसळून झाले. आकस्मिक मृत्यूंपैकी ४६ टक्के मृत्यू वाहतुकीशी संबंधित आहेत. त्यात सर्वाधिक १२.४ टक्के म्हणजे १ लाख ७० हजार ९२४ मृत्यू ३० ते ४५ या कमावत्या वयोगटातील, तर त्या खालोखाल १२ टक्के (१ लाख ६४ हजार ३३) मृत्यू १८ ते ३० वयोगटातील आहेत. एकूण मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू अशा कमावत्या तरुणांचे होतात. विकासाचे नवे प्रतीक बनलेले महामार्ग आणि अपघाती मृत्यू यांचे एक विचित्र समीकरण आहे. राष्ट्रीय महामार्गावर दर शंभर किलोमीटरला वर्षभरात १०३ मृत्यू हे प्रमाण अंगावर काटा आणणारे आहे. शिवाय राज्य महामार्गावर दर शंभर किलोमीटरला ४५ जणांचा जीव गेला. 

याबाबत महाराष्ट्राची स्थिती अधिक चिंताजनक आहे. देशाच्या ९.१ टक्के लोकसंख्येच्या महाराष्ट्रात देशातील १५.७ टक्के मृत्यू नोंदले गेले. त्या खालोखाल १०.१ टक्के मृत्यू मध्य प्रदेशात, दहा टक्के उत्तर प्रदेशात, प्रत्येकी ६.९ टक्के तामिळनाडू व कर्नाटकात, तर ६.२ टक्के राजस्थानात व ५.२ टक्के मृत्यू गुजरातमध्ये झाले आहेत. शहरांमधील अपघाती मृत्यूंचे प्रमाण मोठे आहे. मुंबई, दिल्ली, पुणे, चेन्नई, बंगळुरू व भोपाळ ही शहरे पहिल्या सहा क्रमांकावर आहेत. महाराष्ट्रात वर्षभरात १४ वर्षांपेक्षा कमी वयाची १३५५ मुले व ९३३ मुलींचा अपघाती मृत्यू झाला. १४ ते १८ वर्षे या विद्यार्थी दशेतील १६९१ मुले व ४२८ मुली, तर साधारणपणे बारावी अथवा पदवी-पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून नोकरी, व्यवसाय व उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणारे ११ हजार २९४ तरुण व २३८८ तरुणी अपघातांत बळी गेल्या. 

मृत्यू कोणताही वाईटच, परंतु विद्यार्थी, तरुण मुले, नुकतेच स्थिरस्थावर झालेले कमावते पुरुष व स्त्रिया अशी कर्ती माणसे अपघातात जातात तेव्हा माता-पिता, भावंडे मानसिकदृष्ट्या कोसळतात. कुटुंबाचे अपरिमित नुकसान होते. कमावती तरुण माणसे अशी अचानक निघून जातात तेव्हा त्यांच्या पश्चात चिमुकली मुले व माता-पित्यांची उपासमार होते. डोंगराएवढ्या दु:खातून सावरायला, पुन्हा उभे राहायला त्यांना कित्येक वर्षे लागतात. मुला-मुलींमध्ये समाजाने, त्यांच्या माता-पित्यांनी, परिवाराने आर्थिक, भावनिक गुंतवणूक केलेली असते. त्यांच्या उज्ज्वल भविष्याची सोनेरी स्वप्ने उद्ध्वस्त झालेली असतात. 

याचा अर्थ सगळे अपघात तरुणांच्याच चुकीमुळे होतात असे नाही. एकूण अपघाती मृत्यूंमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण तब्बल ४५.५ टक्के आहे. या अपघातांमध्ये काहीवेळा दुचाकीस्वारांची, तर बऱ्याचवेळा इतर अवजड वाहने चालविणाऱ्यांची चूक असते. जीव मात्र शक्यतो छोट्या गाडीवाल्याचा जातो. त्याचप्रमाणे १४.५ टक्के मृत्यू हे पादचाऱ्यांचे आहेत. त्यांची तर शक्यतो काहीच चूक नसते. ते भरधाव वाहने चालविणाऱ्यांनी घेतलेले बळी आहेत. या तुलनेत एसयूव्ही, कारमधील प्रवाशांच्या मृत्यूचे प्रमाण पादचाऱ्यांपेक्षा कमी म्हणजे १४ टक्के आहे. अलीकडे प्रवासी वाहनांमध्ये सुरक्षेचे जे अत्याधुनिक उपाय योजण्यात आले आहेत त्यामुळे हे प्रमाण आणखी कमी झाले आहे. 

रस्ते अपघातात लहान मुले व तरुणांना गमावण्याची वेळ येऊ नये यासाठी अमेरिकेतल्या बाल्टिमोर व सेंट लुईस या शहरांनी शंभर वर्षांपूर्वी केलेले प्रयत्न आजही जगाने अमलात आणावेत असे आहेत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मोटारींचा वापर वाढला आणि पादचाऱ्यांचे जीव धोक्यात आले. १९२१ साली संपूूर्ण अमेरिकेत १३ हजार जणांचा रस्ते अपघातात जीव गेला. १९१५ च्या तुलनेत हा आकडा दुप्पट होता. बाल्टिमोर शहराने त्या वर्षी १३० मुले गमावली. चिंताग्रस्त शहरवासीयांनी या चिमुकल्यांच्या आठवणींसाठी एक स्मारक उभारले. अपघातमुक्त आठवडा साजरा होऊ लागला. पादचारी व दुचाकीस्वारांची अधिक काळजी घेतली जाऊ लागली.  शंभर वर्षांत वाहने कैक पटीने वाढली. २०२१ साली अमेरिकेत रस्ते अपघातात ४३ हजार लोकांचा जीव गेला. हा आकडा आधीच्या १६ वर्षांमधील सर्वाधिक, तर अपघाती मृत्यूचे प्रमाण एक लाख लोकसंख्येमागे १२.९ होते. भारतातील अपघाती मृत्यूचे प्रमाण अमेरिकेच्या तुलनेत अडीच पट आहे. रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका महाशक्ती आहे असे सांगताना आणि उठसूठ अमेरिकेशी तुलना करताना माणसांचे जीव वाचविण्यासाठीही अमेरिकेचा आदर्श घेणार आहोत की नाही ?

shrimant.mane@lokmat.com

टॅग्स :Accidentअपघात