शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

आंबेडकरांनी वाढविल्या सोशल इंजिनिअरिंगच्या कक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:18 IST

भारिप-बहुजन महासंघाच्या सुवर्णकाळानंतर भव्यदिव्य यश मिळाले नसले तरी विधानसभेत प्रतिनिधित्व अन् स्थानिक स्वराज्य संस्थांवर भारिप-बमसंचा झेंडा कायम राहिला तर अनेक ठिकाणी सत्तेची समीकरणे बदलविण्याची अन् बिघडविण्याची ताकद निर्माण केली. याच सामाजिक अभियांत्रिकीच्या कक्षा रुंदावत, आता अ‍ॅड.आंबेडकरांनी धनगर समाजाला साद घातली आहे.

 - राजेश शेगोकारसोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून अठरापगड जातींना एकत्र बांधत, अकोला जिल्ह्यात सत्तेचा सोपान चढण्याचा यशस्वी प्रयत्न अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी केला. त्या प्रयोगाची चर्चा पुढे महाराष्ट्रात ‘अकोला पॅटर्न’ या नावानं झाली. ‘अकोला पॅटर्न’ने १९९० ते २००४ पर्यंत सुवर्णकाळ अनुभवला. ‘भारिप-बहुजन महासंघ’ या नावाने यशस्वी झालेल्या ‘अकोला पॅटर्न’ला पुढील काळात भव्यदिव असे यश मिळाले नसले तरी, विधानसभेत प्रतिनिधित्व अन् स्थानिक स्वराज्य संस्थांवर भारिप-बमसंचा झेंडा कायम राहिला. अनेक ठिकाणी सत्तेची समीकरणे बदलविण्याची अन् बिघडविण्याची ताकद ‘अकोला पॅटर्न’ने निर्माण केली. त्याच सामाजिक अभियांत्रिकीच्या कक्षा रुंदावत, आता अ‍ॅड. आंबेडकरांनी धनगर समाजाला साद घातली आहे.धनगर समाजाने कॉँग्रेस व भाजपकडे आरक्षणाची मागणी केली; पण दोन्ही पक्षांनी समाजाला न्याय दिला नाही. त्यामुळे आता या समाजाला सोबत घेत, आलुतेदार -बलुतेदारांना एकत्र करून शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांची चळवळ बळकट करून सत्ता हस्तगत करण्याची अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांची योजना दिसते. त्यासाठी २० मे रोजी पंढरपुरात ‘सत्ता संपादन निर्धार मेळावा’चे आयोजन अ‍ॅड. आंबेडकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे.गेल्या वर्ष-दोन वर्षाच्या कालावधीत भारिप-बमसंने ‘ओबीसी पर्व’च्या माध्यमातून ओबीसींना एकत्र बांधण्याचा प्रयत्न केला . आता त्याला धनगर समाजाची जोड मिळाली आहे. अ‍ॅड. आंबेडकरांनी यापूर्वी अनेक निवडणुकांमध्ये उमेदवार ठरविताना सर्वच जाती-धर्मांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला. परंपरागत व्होट बँकेला त्यामुळे आणखी बळ मिळाल्याने ओबीसीमधील अनेकांना आमदारकीची ऊब मिळाली. त्यामध्ये धनगर समाजाचे हरिदास भदे यांचाही समावेश होतो.धनगर समाज न्याय्य हक्कांपासून वंचित राहिला आहे. कॉँग्रेस व भारतीय जनता पक्षाने आश्वासने दिली; पण त्यांची अंमलबजावणी केली नाही. सत्तेवर येताच १५ दिवसात धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केलेल्या भाजपा नेत्यांनी आता समाजबांधवांचा भावनिक छळ सुरू केला आहे. सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली असून, सरकारविरोधात आरपारची लढाई करायची आहे. व्यवस्था परिवर्तन, नवनिर्मिती व क्रांतीच्या नव्या लढाईला आता तोंड फोडा, धनगर समाज आता ‘मागतकर्ती’ नसून ‘राज्यकर्ती’ होण्यासाठी ही लढाई आहे, असा संदेश सध्या राज्यभर दिला जात आहे.सध्या निवडणुकांचे वारे वेगाने वाहत असून, अ‍ॅड. आंबेडकरांनी सामाजिक अभियांत्रिकीच्या कक्षा वाढविताना, धनगर समाजाने आता सत्तेत सहभागाच्या दिशेने वाटचाल करावी, असा नारा दिला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत अ‍ॅड. आंबेडकरांनी यापूर्वीच त्यांची भूमिका स्पष्ट केली असल्याने, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मेळाव्याच्या निमित्ताने नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. पंढरपूर येथे होणा-या या मेळाव्याचे पडसाद राज्यभर उमटणार असल्याने समाजाच्या भरवशावर राजकारण करणाºयांनाही नव्याने भूमिका घ्यावी लागणार असल्याचे चित्र उभे करण्यात भारिप-बमसंचे नेते सध्या तरी यशस्वी झाले आहेत, यात शंका नाही!

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारणnewsबातम्या