शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

खाेके-पेट्या आता विसरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 09:56 IST

या निकालाद्वारे भ्रष्टाचार व लाचखोरीतून राजकारणाच्या शु्द्धीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले हे महत्त्वाचे. मनी आणि मसल पॉवरच्या बळावर राजकारणाचा चिखल ही मूळ समस्या आहे.

दर महिन्या-दोन महिन्याला आमदार-खासदारांच्या घोडेबाजाराचे दर्शन घडत असताना, खोके-पेट्या घेऊन किंवा धाकधपटशाला बळी पडून आमदार सरकारे पाडत असताना व नवी सरकारे बनवत असताना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने अशा लाचखोरीला, मनमानीला लगाम लावणारा ऐतिहासिक निकाल दिला आहे. भारतीय राज्यघटनेच्या १०५ व १९४ कलमान्वये लोकप्रतिनिधींना विशेषाधिकार असले तरी लाचखोरी हा काही विशेषाधिकार नाही. सभागृहाबाहेर अशा गुन्ह्यात कारवाई होते, तशीच ती सभागृहातील भ्रष्टाचार व लाचखोरीसाठी व्हायला हवी. हा प्रकार लोकप्रतिनिधींना संरक्षण देणारा असू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही विशेषाधिकाराचे हनन होत नाही, असा निर्वाळा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वातील सात सदस्यीय घटनापीठाने एकमताने दिला आहे. 

हा निकाल सभागृहातील भाषणे व मतदानाप्रमाणेच बाहेर राज्यसभेसाठी होणाऱ्या मतदानालाही लागू राहील. केवळ तुम्ही निवडून आलात, संसद किंवा विधिमंडळाचे सदस्य बनलात म्हणून तुम्हाला लाचखोरी करण्याचा परवाना मिळालेला नाही. ‘नोट के बदले व्होट’ आता चालणार नाही, असा कडक संदेश यातून लोकप्रतिनिधींना देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल यासाठी अधिक महत्त्वाचा आहे, की त्याचा थेट संबंध सभागृहांच्या आतील कृत्याशी आहे. न्यायपालिकेपेक्षा कायदेमंडळ श्रेष्ठ. कारण न्यायालयांचे काम आम्ही बनविलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचे असा युक्तिवाद करणाऱ्या लोकप्रतिनिधींना यानिमित्ताने सर्वोच्च न्यायालयाने योग्य ते उत्तर दिले आहे. राज्यघटनेच्या १०५ कलमामधील तरतुदी संसदेच्या सदस्यांच्या विशेषाधिकाराचे रक्षण करतात. राज्यांच्या विधिमंडळ सदस्यांना १९४ कलमातील तरतुदींनी त्याच प्रकारचे संरक्षण आहे. या तरतुदींचा आधार घेऊन लोकप्रतिनिधींनी खुलेआम भ्रष्टाचार चालविल्याचा प्रकार राजरोस सुरू आहे. राज्यसभेसाठी एकेका मतासाठी घेतल्या जाणाऱ्या रकमांचे आकडे सर्वसामान्यांचे डोळे दीपविणारे, त्यांना धडकी भरविणारे आहेत. एखाद्या राज्यात राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाली तर हिरमुसलेल्या आमदारांची उदाहरणे लोकांना चांगलीच माहिती आहेत. 

पक्ष फोडण्यासाठी व सरकार पाडण्यासाठी लावला जाणारा पैसा तर सामान्यांना स्वप्नातही दिसत नाही. अशी लाचखोरी खुलेआम सुरू असूनही कारवाई होत नाही. कारण, तो म्हणे लोकप्रतिनिधींचा विशेषाधिकार आहे. त्याला धक्का देताना आता सर्वोच्च न्यायालयाने लाचखोरी त्या कथित विशेषाधिकारांमधून बाहेर काढली आहे. लोकप्रतिनिधी कायदेमंडळात कसे वागतात, भूमिका घेतात किंवा भूमिका बदलतात, त्यामागे कशी आर्थिक देवाणघेवाण असते, या खूप गंभीर बाबींशी या निकालाचा संबंध आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचण्यामागे झारखंडचा संदर्भ आहे. जुलै १९९३ मध्ये तत्कालिन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारवरील अविश्वासावेळी झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांनी लाच घेऊन सरकारच्या बाजूने मतदान केल्याचा आरोप होता. नोटांनी भरलेल्या सुटकेसेसचे प्रकरण न्यायालयात गेले होते. १९९८मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने खासदारांची ती कृती लोकप्रतिनिधींच्या विशेषाधिकाराचा भाग असल्याचा निष्कर्ष काढला. आता सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय फिरवला, त्याचाही संबंध झामुमोशी आहे. झामुमोचे संस्थापक शिबू सोरेन यांची सून सीता सोरेन यांनी २०१२मध्ये पैसे घेऊन राज्यसभेसाठी मतदान केल्याचा गुन्हा सीबीआयने नोंदविला. सीता सोरेन यांनी १९९८च्या निकालाच्या आधारे आधी उच्च न्यायालयात व नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 

या निकालाद्वारे भ्रष्टाचार व लाचखोरीतून राजकारणाच्या शु्द्धीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले हे महत्त्वाचे. मनी आणि मसल पॉवरच्या बळावर राजकारणाचा चिखल ही मूळ समस्या आहे. काही वर्षांपूर्वी राजकारणातील गुन्हेगारी रोखण्यासाठी न्यायालयांनी पुढाकार घेतला. त्यामुळे थोडा फरक पडला खरे, पण गुन्हेगारीचे संपूर्ण उच्चाटन झाले नाही. कारण, राजकारणाचे शुद्धीकरण हे न्यायालयाच्या अशा ऐतिहासिक निकालांच्या अंमलबजावणीवर अवलंबून असते. लाचखोरीचा विचार करता तपास यंत्रणांची कार्यप्रणाली महत्त्वाची आहे. लाच कोणी व कोणासाठी घेतली, यावर तपास यंत्रणा कारवाईचा निर्णय घेणार असतील तर राजकारणाचे शुद्धीकरण हा केवळ सुविचार उरतो. तेव्हा, या निकालाचे स्वागत करतानाच संसद किंवा विधिमंडळातील लोकप्रतिनिधींच्या लाचखोरीवर कारवाईचे स्वातंत्र्य केंद्रीय तसेच राज्याच्या तपास यंत्रणांना मिळावे, ही अपेक्षा.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयGovernmentसरकार